Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील याच्या मनगटावर शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या मर्दाची छाती पाहिल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची छाती कोणचाी होणार नाही असं म्हटलं, तसंच संपूर्ण महाराष्ट्रात आणि एकूण राजकारण बघता, पक्षातून नामर्द पळून जातायत, पण मर्द शिवसेनेत येतायत, शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना राहिलीय. लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल असं म्हटलंय.
गदा आणि मशाल ही नेही मर्दाच्या हाती शोभतं, आता ही गदा आणि मशाल घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलंय. आता लवकरच सांगलीचा दौरा करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. गद्दारांना आडवं करायचं आहे, भविष्य तुमच्या हाती आहे, जनता आपल्याकडे अपेक्षेने पाहतेय, आजच्या पक्षप्रवेशामुळे जनतेला हे कळलंय, आपल्यासाठी लढणारे मर्द आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया
एका शेतकऱ्याच्या मुलाला जो मानसन्मान दिलात, त्याबद्दल मनापासून आभार असं म्हणत चंद्रहाट पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आभार मानले. यावेळी चंद्रहार पाटील यांच्या सहकाऱ्यांनी अब की बार चंद्रहार अशा घोषणा दिल्या.
चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात?
महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तीढा सूटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत केलंय. मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा करण्यात आली. या मतदार संघातून माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)ला लोकसभा उमेदवारी मिळणार हे आता जवळपास निश्चित झालंय.
काही दिवसांपूर्वी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे
चंद्रहार पाटील निवडणुकीच्या तयारीला
चंद्रहार पाटील गेल्या चार महिन्यांपासूनची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्याने जिल्ह्यातील गावागावात संपर्क सुरु केला आहे. सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
Navi Mumbai News : नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Source link
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे
Source link
कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात जाली आहे. मेट्रोच्या कामाची पायाभरणी करण्यात आली आहे,
Source link
Man Killed 27 year old Aunt: नाशिकमध्ये मामा-भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 6 मार्च रोजी नाशिक रोड भागात राहत्या घरात एका महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. मामीकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर तिने नकार दिल्याने भाच्यानेच मामीची निघ्रृण हत्या केल्याचं उघड झालं असून यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळकेंनी यासंदर्भातील सविस्तर माहिती शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली.
“6 मार्च 2024 रोजी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप मळा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव कांती सुदाम बनेरीया असं आहे. कांती या केवळ 27 वर्षांच्या होत्या. कांती या त्यांच्या पतीला पाणीपुरी आणि भेळपुरी विकण्याच्या व्यवसायामध्ये हातभार लावायच्या,” असं शेळकेंनी सांगितलं. एकलहरे परिसरात राहणारं बनेरीया कुटुंब हे हातावर पोट असलेलं कुटुंब आहे, असंही शेळकेंनी नमूद केलं.
“कांती आणि त्यांच्या पतीबरोबर मागील 7 ते 8 महिन्यांपासून पती सुदामचा भाचा अभिषेक सिंह राहत होता. अभिषेक हा मूळ गावी येऊन जाऊन नाशिकमधील आपल्या मामाच्या घरी राहत होता. काही दिवसांपूर्वी तो इथे राहायला आला होता. तो सुद्धा पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये होता,” अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.
कांती यांची हत्या झाली त्यावेळी घरात असलेल्या अभिषेकवरही अज्ञात व्यक्तीने वार केल्याचा दावा करण्यात आला. अभिषेकच्या गळ्यावरही वार करण्यात आले होते, असं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. “भाचा अभिषेकने दिलेल्या माहितीच्या आधारे मयत कांतीचे पती सुदाम यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने पत्नीची हत्या करुन भाच्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केल्याचं सुदाम यांनी म्हटलं होतं. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि केलेल्या तक्रारीमधील घटनाक्रम जुळवून खात्री करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही अज्ञात इसम या ठिकाणी आलेला नव्हता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं,” असं शेळकेंनी सांगितलं.
नक्की वाचा >> ‘मी शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता’; 21 वर्षीय मुंबईकर तरुणीच्या दाव्याने खळबळ
“पोलिसांनी तपास अन्य मार्गाने सुरु केला. पोलिसांनी कांती, सुदाम आणि अभिषेक या तिघांचेही मोबाईल रेकॉर्ड्स तपासले. परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर माहिती पोलिसांनी गोळा केली. या तपासात असं निष्पण्ण झालं की कांतीचा भाचा अभिषेक हा तिच्याकडे अनैतिक संबंधांसाठी (शरीरसुखाची) सातत्याने मागणी करायचा. मात्र कांती त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करायची. यातूनच कांती आणि अभिषेकमध्ये वाद झाला होता. याच मुळ वादातून रोज वेगवेगळ्या गोष्टींचं निमित्त काढून या दोघांमध्ये वाद व्हायचे. त्यामुळेच अभिषेकला घरातून कायमचं हकलवून लावण्याचा कांतीचा विचार होता. यासंदर्भातील चाहूल अभिषेकला लागली. त्यामुळेच त्याने स्वत:च्या मामीची हत्या केली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.
आपणच मामीची हत्या केली आहे हे उघडकीस येऊ नये म्हणून अभिषेकने स्वत:च्या गळ्यावर वार करुन घेतले आहेत. तो स्वत: गुन्हा लपवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, असं शेळके म्हणाले. पोलिसांची त्याच्यावर नजर असून तो बरा झाल्यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात होईल असं पोलिसांनी सांगितलं.
अज्ञात इसम सांगून तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य मार्गावर तपास करत पोलीस खऱ्या आरोपीपर्यंत पोहचल्याबद्दल शेळकेंनी पोलिसांच्या टीमचं कौतुक केलं आहे.