'मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी…' उद्धव यांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

'मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी…' उद्धव यांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?


Raj Thackeray Reaction: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या अचानक भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी या भेटीचे स्वागत केलंय तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज यांनी सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलीय. यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलंय. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला. ज्यावर ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या  बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’ असे कॅप्शन दिले. यातून राज ठाकरेंना काय सुचवायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागलाय. 

याआधी कशामुळे आले ठाकरे बंधू एकत्र?

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती, परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, “आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,” असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगितले.

पालिका निवडणुकीसाठी येणार एकत्र?

आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि सत्ताधारी महायुतीला (BJP-शिंदे गट) आव्हान देण्यासाठी ही जवळीक महत्त्वाची मानली जाते. असे असले तरी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शिवसेनेत असताना राज ठाकरेंना पक्षात दुय्यम स्थान दिले गेले आणि उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले गेले. यामुळे दोघांमधील राजकीय आणि वैयक्तिक तणाव वाढला. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली. 2006 नंतर अनेकदा राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, परंतु राजकीय मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील स्थानिक पातळीवरील संघर्षांमुळे युती शक्य झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, पण ती प्रत्यक्षात आली नव्हती.

राजकीय अस्तित्वाचे आव्हान आणि मराठी मतदारांचा पाठींबा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठाधक्का बसला, तर मनसेला निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश आले आहे. दोन्ही पक्षांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी मतदारांमध्ये इतर भाषिकांच्या वाढत्या प्रभावामुळे नाराजी आहे. राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा पारंपरिक जनाधार यांचा एकत्रित परिणाम सत्ताधारी महायुतीला आव्हान देऊ शकतो. तसेच मराठी मतदारांचा मोठा पाठींबा ठाकरे बंधुंना पाहायला मिळतोय.





Source link

वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ



संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र,  तुरुंगात वाल्मिक कराड मोबाईल फोन वापरत असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नवा वाद उफाळला आहे.



Source link

अजित दादा आले, त्यांनी पाहिलं आणि झापलं, राष्ट्रवादीत चुका करणाऱ्यांवर कधी चिडणार?

अजित दादा आले, त्यांनी पाहिलं आणि झापलं, राष्ट्रवादीत चुका करणाऱ्यांवर कधी चिडणार?


कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या हिंजवडी दौऱ्या दरम्यान अधिकारी सरपंच यांना चांगलेच झापले… पण अधिकारी आणि छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांवर राग काढणारे अजित पवार त्यांच्या पक्षातील चुका करणाऱ्या आमदारांवर का चिडत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड बोलण्यासाठी कायम चर्चेत राहिले आहेत.आजही अजित पवार यांचा परखडपणा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवला.अजित पवार यांनी आज हिंजवडीचा भर पावसात सकाळी सहा पासून पाहणी दौरा सुरू केला.दौरा सुरू होताच अजित दादांची वक्रदृष्टी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर पडली. जांभूळकर यांनी अजित पवार यांच्याकडे विकास कामात मंदिर जात असल्याची तक्रार केली. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले. त्यांनी थेट सरपंचांना खडे बोल सुनावले….!

अजित दादांचे सरपंचांना काय म्हणाले?

अजित पवारांनी सरपंचाला सुनावल. ‘अहो असू द्या हो असू द्या हो साहेब,धरण करताना मंदिर जातातच की नाही….तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं.माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर.काय तुम्हाला पडलं नाही..बेंगलोरला हैदराबादला.कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत.हे केल्याशिवाय गत्यंतर नाही.ए कॅमेरा बंद कर.’

सरपंचाला बोलल्यानंतर अजित पवार यांनी पाहणी दरम्यान नाल्यावर बांधकाम करणाऱ्या एका विकासालाही झापले….! हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते. बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच ‘तुमच्यामुळे बस पाण्यात गेला तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची..’ असे अजित दादा म्हणाले. 

तिसऱ्या घटनेत अधिकाऱ्यांना बोलताना स्वतःचा दाखला देत त्यांनी ‘रस्ता अडवणाऱ्यांवर 357 चा गुन्हा दाखल करा’, अस सुनावले…

अजित पवारमध्ये आला तरी 353 टाका…!

-कोणालाही मध्ये येऊ देऊ नका,कोणतीही आडवा आडवी करू नका ,कोणी आडवा आल तर समजून सांगणार,एकदाच कामच करून टाकायचे, असे अजित पवार म्हणाले. एकीकडे अजित पवार अधिकारी सरपंच यांना झापताना दिसत आहेत.मात्र पक्षातील आमदाराना ते झापताना का दिसत नाहीत? असा सवाल उपास्थित केला जात आहे. सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते टाकणाऱ्या विजयकुमार घाडगेस मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण याला, तर विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना मात्र ते बोलताना दिसत नाहीत.तर भावाच्या गोळीबार प्रकरणी चर्चेत असलेले भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्यावर ही ते रागावले असल्याचे चित्र नाही…! वाल्मीक कराडच्या संबंधामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे हे तर त्यांच्या गळ्यातील अजून ही ताईत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना राग फक्त काही मोजक्या लोकांवर येतो का असा प्रश्न उपस्थित झालाय…!





Source link

खरंच मंत्र्यांचे फोटो टॅप होतात? टॅपिंगच्या भीतीनं मंत्र्यांनी मोबाईल बंद केल्याचा दावा

खरंच मंत्र्यांचे फोटो टॅप होतात? टॅपिंगच्या भीतीनं मंत्र्यांनी मोबाईल बंद केल्याचा दावा



महायुती सरकारवर विरोधकांनी आरोपांचे बॉम्बगोळे डागण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. 



Source link

Job Alert: नवी मुंबई एअरपोर्टसाठी 285 नव्या पदांवर विशेष पोलीस भरती; जाणून घ्या तपशील

Job Alert: नवी मुंबई एअरपोर्टसाठी 285 नव्या पदांवर विशेष पोलीस भरती; जाणून घ्या तपशील


Navi Mumbai Police Job Vacancy 2025: बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता आहे. गृह विभागाने विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्टसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण 285 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता दिली. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.

कोणकोणत्या पोस्टसाठी होणार भरती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत 17 सप्टेंबरला नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्टसाठी निर्माण करण्यात आलेल्या पोलीस पदांमध्ये पोलीस निरीक्षक 20, पोलीस उपनिरीक्षक 55, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 30, पोलीस हवालदार 60 आणि पोलीस शिपाई 120 या पदांचा समावेश आहे. पोलीस दलातील नोकऱ्यांबरोबरच या विमानतळाशीसंबंधीत हजारो नोकऱ्या लवकरच उपलब्ध होणार आहे. या विमानतळाचा आकार आणि त्यासाठी उपलब्ध करुन दिली कनेक्टीव्हीटीचा विचार केल्यास हे विमानतळ सुरु झाल्यानंतर हजारो लोकांना नोकरी मिळणार आहे.

केवढा आहे या विमानतळाचा पसारा?

नवी मुंबई विमानतळ 1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात.  हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.

पहिल्या दिवशीच 15 हून अधिक शहरं जोडणार

नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या दिवसापासून 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणे (36 एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू केले जाणार आहे.  सिडकोकडून नवी मुंबई विमानतळाचा विकास केला जाणार आहे. विमानतळाला चांगली कनेक्टीव्हिटी मिळावी यासाठी परिसरातील इतर मार्गाना विमानतळासोबत जोडलं जाणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याची माहिती सिडकोच्या संचालकांनी दिली. नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणे (158 एटीएम) केले जाणार असून, यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश  आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळं टर्मिनल

बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि अति महत्त्वाचे नेते, मंत्री यांच्यासाठी नवी मुंबई विमानतळावर एक समर्पित असलेल्या वेगळं टर्मिनल बनविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन विमानतळाच्या व्यावसायिक उद्घाटनानंतर सुरू होणाऱ्या विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) एक वेगळं टर्मिनल बांधण्याची योजना आखत आहे.





Source link

जालनाः क्राइम स्टोरी पाहून दोन मुलांनी सात वर्षांच्या चिमुरड्याला संपवले, रात्रभर मृतदेहाशेजारी…; कारण ऐकून पोलिसही हादरले

जालनाः क्राइम स्टोरी पाहून दोन मुलांनी सात वर्षांच्या चिमुरड्याला संपवले, रात्रभर मृतदेहाशेजारी…; कारण ऐकून पोलिसही हादरले


Jalna Crime News: जालनात्यातील एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. जालन्यातील भोकरदन येथील गणपती इंग्लिश स्कुलच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या आणि दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच हॉस्टेलमधील दोन अल्पवयीन बालकांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन आरोपींनी मोबाईलवर क्राईम स्टोरीज पाहून हा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन दोन बालकांना ताब्यात घेत त्यांची बालसुधारगृहात रवानगी केलीय. 

जालन्यातील भोकरदनच्या याच गणपती विद्यालयात दुसरी च्या वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षाच्या बालवीर पवारचा रात्रीच्या वेळी दोरीने गळा आवळून खून करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनं भोकरदन शहर आणि तालुका हादरून गेला होता. दोन दिवसांपूर्वी बालवीरचा हॉस्टेलच्या परीसरात मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आणि पोलीस तपास सुरू झाला. बालवीरच्या हत्येप्रकरणी तपासा दरम्यान पोलिसांनी याच शाळेच्या हॉस्टेलमधून एक 14 आणि दुसऱ्या 8 वर्षाच्या अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतलं आणि या दोन्हीही मुलांनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली

पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना या हत्येप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. अल्पवयीन दोन्हीही आरोपींचे बालवीरसोबत शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून भांडण होत होतं. तसेच हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी दोन कप्प्यांचे बेड असल्यानं वर झोपलेल्या बालकाकडून पेन्सिल अथवा पेन सतत खाली पडण्यावरून देखील त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे या दोन अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केला. हा खून केल्यानंतर अल्पवयीन आरोपी रात्रभर बालवीरच्या पार्थिवावर ब्लॅंकेट टाकून या पार्थिवा शेजारी देखील बसून राहिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. विशेष म्हणजे या तपासा दरम्यान या अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा खून मोबाईलमध्ये क्राईम स्टोरी पाहून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यामुळे पालकांनी आपली लहान मुलं मोबाईलमध्ये काय बघतात याकडे लक्ष द्यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय

भोकरदनमध्ये 2 रीच्या वर्गात शिकणाऱ्या बालविरच्या हत्येनं सध्या भोकरदन शहर सुन्न झालंय. या खुनाच्या घटनेने बालविरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शाळा अथवा हॉस्टेलमध्ये लहान मुलांच्या भांडणांच्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे या घटनेने अधोरेखीत केलंय





Source link