by Hansraj Agrawal | Feb 15, 2026 | Trending News
Mulund Accident: कळवा परिसरात एका कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. घर सजवले जात होते, पाहुण्यांची ये-जा सुरू होती आणि लग्नाच्या तयारीत सगळे व्यस्त होते. आजोबा आपल्या नातीच्या लग्नासाठी विशेष उत्सुक होते. सकाळपासूनच मंडप, जेवणावळ आणि स्वागताच्या तयारीत कुटुंबातील सदस्य गुंतले होते. पण काही तासांतच या आनंदावर दुःखाचे सावट आले. मुलुंडमध्ये अचानक झालेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर आघात झाला आणि जिथे लग्नाचे मंगलध्वनी घुमायचे होते, तिथे शोककळा पसरली.
Add Zee News as a Preferred Source
लग्नाच्या तयारीत असताना घडली दुर्घटना
काही कामानिमित्त रामधन यादव हे 2 नातेवाईकांसह स्वतःच्या रिक्षाने मुलुंडच्या दिशेने निघाले होते. प्रवास सुरू असतानाच भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रामधन यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले दोघे जखमी अवस्थेत वाहनाखाली अडकले. आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना बाहेर काढले आणि जवळच्या उपासनी रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार
जखमींपैकी राजकुमार यादव हे रिक्षा चालवत होते, तर रामधन यादव आणि महेंद्र यादव मागील बाजूस बसले होते. राजकुमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तपासणीनंतर रामधन यादव यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे जिचे लग्न ठरले होते ती मुलगी राजकुमार यांचीच भाची असल्याचे समोर आले. त्यामुळे कुटुंबातील आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकात बदलले.
टीव्हीवरील बातमीने नातेवाईकांना धक्का
कुटुंबातील काही सदस्यांना या अपघाताची माहिती प्रथम वृत्तवाहिनीवरून मिळाली. घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर गेल्याचे माहित असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. नंतर पोलिसांनी फोन उचलून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक तातडीने रुग्णालयात पोहोचले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
रुग्णालयात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे बाहेरच नातेवाईकांची गर्दी झाली होती. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर भागातील असून सध्या कळव्यात वास्तव्यास आहे. नातीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेले कुटुंबीय आता अंत्यसंस्काराची तयारी करत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सनई-चौघड्यांचे सूर विरले आणि घरात शोककळा पसरली.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 14, 2026 | Trending News
Harihareshwar Temple Konkan : भारतात एकूण 108 तीर्थस्थाने आहेत. यापैकी अनेक तीर्थक्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहेत. चार डोंगरांच्या मध्ये आणि दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले चमत्कारिक शिव मंदिर कोकणात आहे. हे शिव मंदिर कोकणातील हरिहरेश्वरमध्ये आहे. हरिहरेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. “दक्षिणकाशी” म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर पेशव्यांचे कुलदैवत आहे. दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही. कोकणातील हे ठिकाण महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते.
Add Zee News as a Preferred Source
सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार वसलेलं हरिहरेश्वर हे सुंदर गाव
श्री हरिहरेश्वर मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरिहरेश्वर मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर समोर, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा अथांग समुद्र. याच समुद्र किनाऱ्याजवळ श्री हरिहरेश्वर हे तीर्थ क्षेत्र आहे. राज्याच्या कानापोऱ्यातून भाविक येथे श्री हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार हरिहरेश्वर हे सुंदर गाव वसलेले आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक मंदिरे आहेत. हरिहरेश्वरच्या दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने आहेत. देशात ऐकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते.
दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले शिवमंदिर
ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत हरिहरेश्वर हे गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची मंदिरे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. हे मंदिर शिवकालीन असावे असा अंदाज आहे. बांधकामाच्या निश्चित कालखंडाची कोणतीच नोंद नाही पहिल्या बाजीरावाने 1723 मध्ये या जोर्नोद्धार केल्याचे सांगितले जाते. देवाच्या दर्शनानंतर प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले असले तरी कितीही मोठी आपत्ती आली तरी या मंदिराला काहीच होत नाही.
हरिहरेश्वरला जायचे कसे
हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर तर पुण्याहून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे. एस.टी. बस किंवा खासगी वाहनाने येथे जाता येते. पुण्याहून मिळशी, भोरवरून महाड मार्गे, वाई वरून महाबळेश्वर मार्गे येथे जाता येते. कोकण रेल्वेने गेल्यास माणगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
रस्त्याने (By Road)
मुंबईहून अंतर: सुमारे 210 किमी
पुण्याहून अंतर: सुमारे 170 किमी
मुंबई – पनवेल – महाड – माणगाव – श्रीवर्धन – हरिहरेश्वर असा मार्ग घेतला जातो.
गाडीसाठी प्रशस्त रस्ता असून गाडीने 5-6 तासांचा प्रवास होतो.
रेल्वेने (By Train)
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव (Konkan Railway)
माणगावहून हरिहरेश्वर सुमारे 60 किमी आहे. स्टेशनवरून तुम्ही कॅब, रिक्षा किंवा एसटी बस घेऊ शकता.
बसने (By Bus)
मुंबई, पुणे, पनवेल, महाड इत्यादी ठिकाणांहून MSRTC (एसटी) किंवा खाजगी बसेस श्रीवर्धनपर्यंत उपलब्ध आहेत.
श्रीवर्धनहून हरिहरेश्वर हे अवघ्या 18-20 किमीवर आहे.
फेरी बोटने (By Ferry Route):
दापोलीहून येताना दाभोळ ते धोपावे फेरीने पार करून पुढे हरिहरेश्वरपर्यंत पोहोचता येते.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 14, 2026 | Trending News
विशाल मोरे, झी मीडिया, नाशिक : अचानक होणारे स्फोट, घरांना जाणारे तडे आणि शेतीवर होणारे वाईट परिणाम यामुळं सध्या नाशिकच्या मालेगाव इथं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या स्फोटांमुळं सध्या नागरिकांमध्येसुद्धा प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Add Zee News as a Preferred Source
मालेगावात घडतंय काय?
मालेगाव तालुक्यातील हाताने येथे जवळपास 7 खडी क्रशरचे प्लांट असून त्यामुळे तेथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रात्री अपरात्री या खडी स्टोन प्लांट मध्ये ब्लास्टिंग होत असून, शिवाय या प्लांटमुळं गावाचा 30 ते 35 लाख रुपयांचा महसूल बुडवला आहे. यासाठी ग्रामपंचायतीनं वारंवार प्रकल्पाला नोटिस बजावूनसुद्धा त्यामुळे गावच्या विकासासाठी महसूलाची व्यवस्था झालेली नाही. शिवाय गावात प्रादुर्भाव पण वाढल्याने हे सर्व खडी क्रशर प्लांट बंद करण्याचा ठरावही गावानं केला. मात्र कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
खडी तयार करण्यासाठी केले जातात स्फोट…
खडी तयार करण्यासाठी या प्लांट मध्ये दिवसा, रात्री अपरात्री मोठी ब्लास्टिंग केली जाते अर्थात स्फोट घडवून आणले जातात. यामुळे लहान मुलं, जनावरंही सतत दचकत असून या स्फोटांमुळं आणि ब्लास्टिंग मुळे गावातील घरांना तडे गेले आहेत. या खडीची वाहतूक मोठमोठ्या डंपरमधून केली जाते, या डंपरना कोणत्याही प्रकारचे कपड्याचे आवरण नसल्याने लहान शालेय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांनासुद्धा ये-जा करण्यासाठी मोठा धोका असून अपघाताची शक्यता असल्यानं भीतीचं वातावरण आहे.
शेतीवरही होतोय अनिष्ठ परिणाम, काय घडतंय?
या गावात असणाऱ्या खडी क्रशरच्या प्लांटमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. प्लांटला कुठेही नेट अर्थात जाळीसुद्धा मारली नसल्या कारणाने प्लांट मधील सर्व धूळ पिकावर आल्यानं मका, कांदा, शेवगा आदी पीक घेणं शेतकऱ्यांना आव्हानात्मक होत असून असून काही शेतकऱ्यांना यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे आजारांचाही सामना करावा लागत आहे.
एकंदरीत स्थिती पाहचा, प्रथमदर्शनी गावच्या विकासासाठी हा प्लांट गावात आला होता. मात्र लाखोंचा महसूल बुडवल्याने गावाचा विकास देखील साधता येत नाही याउलट प्लांटमुळे गावात होणारा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांचं जीवनमान खालावलं आहे, ज्यामुळं तेव्हा हे प्लांट तात्काळ बंद करण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. मात्र आता प्रशासनाकडून गावाच्या हिताचा विचार करत प्रकल्पावर कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 13, 2026 | Trending News
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 12, 2026 | Trending News
भंडा-यात नवजात बालकांची विक्री करणा-या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. एका दाम्पत्याला विक्री केलेल्या दहा दिवसांच्या बालिकेची सुटका करण्यात आलीय. या प्रकरणाचा सूत्रधार गोंदियातील एक बडा डॉक्टर असल्याची माहिती समोर आलीये.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 12, 2026 | Trending News
Na Certificate: पूर्वी कृषी जमिनीला गैरकृषी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागत असे. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती.
Source link