Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथे रविवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. क्रश सॅंड उतरवताना डंपर उलटून शेजारच्या घरावर कोसळल्याने एका पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
Add Zee News as a Preferred Source
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावात एमएच-12 केपी-2118 क्रमांकाचा डंपर बांधकाम साईटवर क्रश सॅंड खाली करत होता. त्यावेळी चालक अमरजीत राजभर हा निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने डंपर अचानक असंतुलित होऊन बाजूच्या घरावरील पत्र्याच्या शेडवर कोसळला.
या अपघातात घरात असलेल्या आलोक अशोक कचरे (वय 5) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर घरातील आरती अशोक कचरे (वय 35), प्रियांका जगन्नाथ कचरे (वय 17) आणि श्लोक अशोक कचरे (वय 6) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात घराचंही मोठं नुकसान झालं असून घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर धोंडीबा रामभाऊ कचरे (वय 29, रा. कुरुंगवडी) यांनी डंपर चालकाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे राजगड पोलीस ठाण्यात चालक अमरजीत राजभर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार औदुंबर अडवाल करत आहेत. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालकाला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.
गावात शोककळा
भोर तालुक्यातील या घटनेनंतर कुरुंगवडी गावात वातावरण अत्यंत हळहळजनक झाले आहे. छोट्या आलोकच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
FAQ
1 अपघात नेमका कुठे घडला?
हा दुर्दैवी अपघात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावात रविवारी दुपारी घडला.
2 अपघाताचे कारण काय होते?
डंपर चालक अमरजीत राजभर हा क्रश सॅंड उतरवताना निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्यामुळे डंपर असंतुलित होऊन बाजूच्या घरावरील पत्र्याच्या शेडवर कोसळला.
3 अपघातात किती लोक जखमी झाले?
या अपघातात एक पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील तिघेजण — आरती अशोक कचरे (३५), प्रियांका जगन्नाथ कचरे (१७) आणि श्लोक अशोक कचरे (६) हे गंभीर जखमी झाले आहेत.
नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे.
Koregaon Park Land Controversy : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या आणि पवार कुटुंबाला हादरा देणाऱ्या कोरेगाव भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून होणारे आरोप, नवनवीन खुलासे आणि समोर येणारी नावं या साऱ्यांदरम्यानच ‘झी 24तास’नं ही मोठी बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आत कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. या संपूर्ण प्रकरणात अद्यापही कैक प्रश्न उपस्थित होत असून, आता खुद्द (Sharad Pawar) शरद पवार यांनीसुद्धा त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे.
Add Zee News as a Preferred Source
अकोला इथं माध्यमांशी संवाद साधत असलाना राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते अशी ओळख असणाऱ्या पवारांना त्यांचे नातू पार्थ पवार यांचं नाव गोवलं गेलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाती प्रश्न विचारला असता, ‘पार्थवर गुन्हा का नाही, हे मुख्यमंत्रीच सांगतिल’ असं सूचक विधान केलं.
काय म्हणाले शरद पवार?
जिथं सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांवरील होणाऱ्या आरोपांवर दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्याचसंदर्भात प्रश्न केला असता, आपल्या कुटुंबाची विचारधारा एक असून प्रशासकीय आणि कौटुंबीक गोष्टी वेगळ्या आहेत असं सांगताना ‘सुप्रियाचं मत तिचं वैयक्तीक असू शकतं’ असं पवारांनी स्पष्ट केलं.
सदर प्रकरण आणि त्यात समोर आलेल्या गोष्टी या गंभीर असून, त्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्यामुळं पार्थ प्रकरणात चौकशी करून मत समाजासमोर ठेवलं पाहिजे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात सत्य समाजासमोर आलं पाहिजे आणि . पार्थवर गुन्हा का नाही मुख्यमंत्रीच सांगतील…, असं शरद पवार म्हणाले.
इथं शरद पवारांनी या प्ररकरणावरील प्रतिक्रिया देण्यापूर्वी शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी अजित पवार यांनी माध्यमांना कोरेगाव प्रकरणी माहिती देत हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली. याचदरम्यान कोरेगाव जमीन प्रकरणावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘कोणी कोणाची फसवणूक केली, याची चौकशी होईल. कोणी सांगितल्यामुळं हे घडलं, कोणाचे फोन गेले, कोणाकडून या प्रकरणात दबाव आणला होता? आणला होता तर कोणी आणला होता? याबाबतची चौकशी होईल,’ असं म्हणत हा व्यवहार झाल्याचं आपल्याला ठाऊक नव्हतं, ठाऊक असतं तर आपत त्याबाबतच सांगितलं असतं असं ते माध्यमांना उद्देशून सांगत ‘जे काही असेल ते नियमानुसार करा’ याचाच त्यांनी पुनरुच्चार केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील कोरेगाव येथे जमीन व्यवहार झाला. या व्यवहाराचा भांडाफोड ‘झी 24 तास’ ने केल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रासह सगळीकडे गाजली. यानंतर आज अखेर अजित पवारांनी हा जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. यानंतर या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या अजित पवारांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
Add Zee News as a Preferred Source
चोरी केलेला माल रिकव्हर केला तर…
चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का?’असा थेट सवाल अंबादास दानवेंनी अजित पवारांना विचारला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे का नाही? कंपनीवर गुन्हा दाखल करावा. 300 कोटी कुठून आले…सरकारी जमीन विकली गेली आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, हे उघड झाले नसते तर पचवले असते ना… राज्य सरकार बनवाबनवी करत आहे. अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज आहे, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे.
या प्रकरणाची ईडीने चौकशी करायला हवी. कारण अशाच प्रकरणत खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता, मग अजित पवारांना वेगळा न्याय का?महसूल मंत्री अजित पवारांना वाचवत आहे? असा सवालही विचारण्यात आला आहे.
हाच नियम सर्वांना लावावा, कोरेगाव पार्कातील ४० एकर जमीन दिली जाते व एकही पैसा दिला जात नाही..आणखी मोठे आश्चर्य आहे. अजितदादा फक्त गोष्टी करतात. आता घाला टायरमध्ये एकेकाला…एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मुलाला सांभाळले पाहिजे. अजितदादांना माहिती नाही असं कसं होवू शकते. भ्रष्टाचाराचे बरबटलेले हे सरकार आहे. अजित पवारांना क्लिनचीट देणे हे पाप ठरेल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.
अंबादास दानवेंनी काय म्हटलं आहे?
मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही… आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत..
तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना?
बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून…
मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही. आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असं आश्चर्य अंबादास दानवे यांनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे. बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे. खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे असंही ते म्हणाले आहेत.
Manoj Jarange On Dhananjay Munde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मनोज जरांगे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी लॉरेन्श बिश्नोई गँगकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांनी आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
Add Zee News as a Preferred Source
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला सांगतो शांततेने घ्या. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार. मनोज जरांगे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए आहे. त्याने या आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेलं .तिथे पकडलेल्या एका पैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे या आरोपींची एक तास वाट पाहत राहिले. आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासन दिलं. यात खूप जण आहे अंतरवालीच्या परिसरातील बडे नावाची व्यक्ती देखील आहे यात एकूण 10 ते 11 जण आहेत. ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटलांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलंय.याप्रकरणी राजकीय वर्तुलळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.. हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी असं मत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलंय. तर मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे नेते म्हणून उदयास आले आहेत.. मतभेद असून शकतात..मात्र विचारांची लढाई विचारांनी लढावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.
FAQ
1 मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट कसा उघडकीस आला? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचा दावा होता. आता मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
2 मनोज जरांगे पाटील यांनी कोणते आरोप केले आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए असून, त्याने आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेले. तिथे आरोपींना २ कोटी रुपये देण्याचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे आरोपींची एक तास वाट पाहत राहिले आणि गोळ्या पुरवण्याचे आश्वासन दिले. यात अंतरवाली परिसरातील बडे नावाच्या व्यक्तीसह एकूण १० ते ११ जणांचा समावेश आहे. मुंडे यांनी जरांगे यांना मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा आणि वाहनाला धडक देण्याची योजना असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
3 मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काय सांगितले?मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेने घ्या असे सांगितले. “तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार,” असे ते म्हणाले. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि समाजाला धीर दिला.