अशोक खरातचे पदराने पाय पुसले, अन्…. प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचे आतापर्यंतचे वाद

अशोक खरातचे पदराने पाय पुसले, अन्…. प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचे आतापर्यंतचे वाद


Rupali Chakankar : महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण भोवल्याप्रकरणी चहुबाजुंनी टिका होत होती. अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर कायम चर्चेत राहिल्या. यामध्ये कोणते वाद त्यांना भोवले ते पाहूया.  

Add Zee News as a Preferred Source

नेमका वाद काय आहे?

अशोक खरात हा नाशिकचा माजी मर्चंट नेव्ही अधिकारी होता. तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ/ज्योतिषी म्हणून ओळखवत असे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, ब्लॅकमेलिंगॉ आणि अश्लील व्हिडिओ बनवण्याचे गंभीर आरोप आहेत. खरातच्या कार्यालयातून जवळपास 58 हून अधिक महिलांच्या अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह सापडल्याचे वृत्त आहे. अतिशय फिल्मी पद्धतीने अशोक खरातला अटक झाली आहे आणि SIT (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) तपास करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून हे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबतचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये खरातचे पाद्यपूजन करताना किंवा त्याला गुरु मानताना दिसतात. त्या श्री शिवनिका संस्थान/ट्रस्टशी देखील संबंधित होत्या, जिथे खरातचा संबंध होता. या व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 20 मार्च 2026 रोजी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.

(हे पण वाचा – महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर चाकणकरांचा आणखी एक मोठा निर्णय; पोस्ट करुन दिली माहिती, ‘मी सुनेत्रा पवारांशी….’) 

रुपाली चाकणकरांची या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया 

राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी सांगितले की, खरात हा त्यांचा आध्यात्मिक गुरु होता. संबंध फक्त धार्मिक/आध्यात्मिक होते. व्हायरल व्हिडिओ/फोटो ५-६ वर्ष जुने आहेत. त्या वेळी त्यांच्या कुटुंबाने त्यांना गुरु मानले होते. खरातच्या दुसऱ्या बाजूची म्हणजे आरोपित कृत्यांची माहिती नव्हती. जेव्हा खुलासा झाला तेव्हा त्या आश्चर्यचकित आणि दुखावल्या गेल्या. त्यांच्यावर महिला असल्याने जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी निष्पक्ष तपासासाठी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे. या पाठोपाठ 27 मार्च रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. 

(हे पण वाचा – रुपाली चाकणकरांनी अनू मलिकलाही वाचवलं’, सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत दिला पुरावा) 

इतर आरोप आणि विरोध

शिवसेना (UBT) च्या सुषमा अंधारे यांनी काळ्या जादू (ब्लॅक मॅजिक), तंत्र-मंत्र आणि पीडित महिलांना धमकावल्याचे आरोप केले. त्यांच्या बोटाला जखम झाल्याच्या फोटोवरूनही विवाद झाला. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांना सेक्स रॅकेटचे मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी केले आणि अटकेची मागणी केली. या पाठोपाठ तृप्ती देसाई, रंजना गवांडे यांनी देखील त्यांच्यावर भोंदू बाबांना संरक्षण दिल्याचे आणि तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप केले. यापूर्वीही चाकणकर विवादात राहिल्या आहेत. उदाहरणार्थ, 2025 मधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात चारित्र्य हननाचे आरोप करण्यात आले होते. 





Source link

देशात 10-15 दिवसांचा लॉकडाऊन लागणार? संजय राऊतांच्या सूचक विधानानं वेधलं लक्ष

देशात 10-15 दिवसांचा लॉकडाऊन लागणार? संजय राऊतांच्या सूचक विधानानं वेधलं लक्ष


Sanjay Raut On India Lockdown : मागील काही दिवसांपासून भारतात लॉकडाऊन या शब्दानं एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. इंधन तुटवड्याच्या समस्येशी जवळपास निम्मं जग सामना करत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्याचसंदर्भातील सूचक विधान केलं. खरात प्रकरणापासून देशातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तीन लीटर पेट्रोलच्या मुद्द्यापर्यंत महत्त्वाच्या मुद्दयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. 

Add Zee News as a Preferred Source

भारतात लॉकडाऊनची शक्यता? 

शुक्रवार, 27 मार्च 2026 ला माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास उशीर केला असा निशाणाही राऊतांनी साधला. लॉकडाऊनची शक्यता आणि चर्चा सुरु असल्याचं पाहता ही शक्यता राऊतांनी नाकारली नाही. ज्या पद्धतीनं देशात सध्या सरकारच्या एकंदर हालचाली सुरू आहेत त्या, पाहता पंतप्रधान मोदी पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन लावू शकतात असं विधान राऊतांनी केलं. ‘मोदींच्या मनात असे विचार येतच असतात’, या त्यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. 

‘आपण देशाचे नेते आहात, पक्ष किंवा कोणत्या राज्याचे नाही’

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं राऊत म्हणाले. ही परिस्थिती पंतप्रधान मोदी यांच्या हातातून बाहेर जाताना दिसत आहे. ‘लोकांना आता रॉकेलच्या रांगेत उभे राहावे लागणार आहे. मोदींनी आम्हाला परत रॉकेलच्या रांगेत आणलं. 50 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती होती जेव्हा धान्य आणि रॉकेलच्या रांगा लावाव्या लागत होत्या त्याच रॉकेलच्या रांगेमध्ये मोदींनी मोदींनी देशाला, जनतेला उभे केले. ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणार आहे कारण प्रधानमंत्री मोदींच्या काळात भारताला एकही मित्र (राष्ट्र) नाही. शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाही आणि बाहेरही नाही जे. मित्र होते ते आपण गमावले. अशा वेळेला मोदींना राजांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागत आहे. मात्र, या चर्चेसाठी सत्तावीस दिवस का लागले?’ असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या दिवशी परिस्थिती हाताबाहेर गेली, ती क्षणोक्षणी बिघडत गेली तेव्हाच त्यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवणं अपेक्षित होतं. त्या बैठकीला त्यांनी स्वतः उपस्थित राहिला हवं होतं. त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री याशिवाय राज्याराज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यांनाही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. आपण देशाचे नेते आहात आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी, असा खोचक टोला लगावत आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्याशी चर्चा करत आहात, त्यामुळं बघू या चर्चेमध्ये काय निष्पन्न होतं असा कटाक्ष राऊतांनी टाकला. 

तीन लिटर केरोसीन, अंधभक्तांसाठी तीर्थ…

‘तीन लीटर केरोसीन वाटपावर टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत तीन लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे. मोदी ते लेटर रॉकेल देत आहेत हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचे तीर्थ आहे पण या देशातील सामान्य गोरगरीब जनता मध्यवर्ती जनता यांना देखील तीन लिटर रॉकेलवर निर्वाह करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे नेतृत्वहीन कारभारामुळे आली आहे’, असा घणाघात राऊतांनी केला. 

लॉकडाऊनच्या चर्चा आणि दिशेवर राऊत थेटच म्हणाले… 

आता खरात तुरुंगामध्ये आहे त्यामुळं आपल्या राजाच्या मुख्यमंत्र्यांनी आता दुसरे कोण बुवा महाराज असतील तर राज्यामध्ये काय चाललं आहे समजून घ्यावं, सरकारला हात असेल तर सरकारचा हात दाखवून घ्यावा, अशा शब्दांत निशाणा साधला.

देशात ठिकठिकाणी अस्वस्थता असून, देशभरामध्ये लोक रॉकेलच्या रांगेच उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केली आहे असं म्हणत तुम्ही रॉकेलची तुंग काढल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाल्याची बाब अधोरेखित केली. तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशांमध्ये फ्रान्स सारख्या देशांमध्ये साधारण चार महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा. मात्र या क्षणी आणि आपल्याकडे एक आठवड्याचाही साठा उरलेला नाही ही माझी माहिती आहे. परिणामी आता तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे असं आवाहन सत्ताधाऱ्यांना केलं. 





Source link

कोकणात पडला गारांचा पाऊस; ऐन कडाक्याच्या उन्हात राज्यात मेघगर्जनेसह कोसळणार; कधी? कुठे? जाणून घ्या!

कोकणात पडला गारांचा पाऊस; ऐन कडाक्याच्या उन्हात राज्यात मेघगर्जनेसह कोसळणार; कधी? कुठे? जाणून घ्या!


Hailstorm Hits Konkan: सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत आंशिक ढगाळ वातावरण आहे. ही स्थिती पुढील एक आठवडाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर स्थानिक स्वरूपात वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस मुख्यतः कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरील भागांत जास्त दिसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात अचानक गारांचा पाऊस पडला. तसेच राज्यात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

राज्यातील विविध भागात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान लांजा, रत्नागिरीसह काही भागात आज गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याला नुकताच आलेला मोहर यामुळे गळून पडलाय. आता काय नुकसान भरपाई मिळणार? याची आंबा बागायतदार वाट पाहत आहेत. 

30 मार्चला कोणत्या भागांत वादळी पाऊस आणि गारपीट?

30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आभाळ दाट होऊन विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पाऊस पडेल. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होऊ शकतो. या दिवशी शेतकऱ्यांना विशेष सावधानी बाळगावी लागणार आहे कारण पिकांना नुकसान होण्याची भीती आहे.

31 मार्चलाही हवामानाचा प्रभाव कायम

31 मार्च रोजी देखील राज्याच्या काही भागांत हीच वादळी हवामानाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यांचा परिणाम काही जिल्ह्यांत दिसू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही स्थिती मुख्यतः दुपारनंतर निर्माण होईल. शेतकऱ्यांनी हवामान अपडेट नियमित तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन

हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवा. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे काढणी झालेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवा किंवा चांगल्या प्रकारे झाकून ठेवा, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट आवाहन केले आहे की,  वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्या. शेतीची कामे हवामानानुसार आखा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

शेतकरी बांधवांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या बातम्या नियमित ऐकाव्यात किंवा अॅपद्वारे तपासाव्यात. पिके कापल्यानंतर लगेच सुरक्षित ठिकाणी नेणे गरजेचे आहे. वादळी पावसामुळे पिके भिजू नयेत किंवा गारांनी नष्ट होऊ नयेत यासाठी योग्य व्यवस्था करा. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, 30 आणि 31 मार्च या दोन दिवसांत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा प्रकारे सर्व शेतकरी सज्ज राहिले तर नुकसान टाळता येईल, असा सल्ला देण्यात आलाय. 





Source link

Narhari Zirwal Viral Video: झिरवाळांच्या बेडरुममधील व्हिडीओने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ

Narhari Zirwal Viral Video: झिरवाळांच्या बेडरुममधील व्हिडीओने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ



Narhari Zirwal Viral Bedroom Clip: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अडचणीत येण्याचं सत्र सुरुच असून आता नव्याने अडचणीत आलेत ते नरहरी झिरवाळ



Source link

पार्थ पवारांवर चौकशीची टांगती तलवार; पुणे जमीन गैरव्यवहारावर खारगे समितीच्या अहवालात तेजवानी, दिग्विजय पाटलांवर ठपका

पार्थ पवारांवर चौकशीची टांगती तलवार; पुणे जमीन गैरव्यवहारावर खारगे समितीच्या अहवालात तेजवानी, दिग्विजय पाटलांवर ठपका



Pune Land Deal : पुण्यातील मुंढवा इथं जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीच्या अहवालात समोर आला आहे. यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांवर ठपका ठेवण्यात आला आहे. 



Source link

नवी मुंबई विमानतळावरून आता आणखी दोन जिल्ह्यांना कनेक्टीव्हिटी; 5 तासांचा प्रवास फक्त एका तासावर!

नवी मुंबई विमानतळावरून आता आणखी दोन जिल्ह्यांना कनेक्टीव्हिटी; 5 तासांचा प्रवास फक्त एका तासावर!



Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी विमानांना सुरुवात झालेली असतानाच आता महाराष्ट्रातील आणखी दोन जिल्ह्यांमध्ये इथून विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp