बाजारात एकाच कंपनीचा धुमाकूळ, 5 दिवसांत केली ₹12000Cr ची कमाई!, गुंतवणूकदार मालामाल, RIL-TCS सह सर्वांना टाकलं मागे

बाजारात एकाच कंपनीचा धुमाकूळ, 5 दिवसांत केली ₹12000Cr ची कमाई!, गुंतवणूकदार मालामाल, RIL-TCS सह सर्वांना टाकलं मागे



शेअर बाजारात गेल्या आठवड्यात, सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. तथापि, फक्त एकाच कंपनीने आपली ताकद दाखवून दिली आणि केवळ पाच दिवसांत गुंतवणूकदारांना 12 हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले.
 



Source link

रविवारचा दिवस थंडीचा, सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि 'इथं' मात्र उकाड्याचा… सुट्टीचे बेत फसणार? हवामान विभागाचा इशारा पाहाच…

रविवारचा दिवस थंडीचा, सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि 'इथं' मात्र उकाड्याचा… सुट्टीचे बेत फसणार? हवामान विभागाचा इशारा पाहाच…


Maharashtra Weather News : हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींमुळं देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट होत असून ही घट प्रामुख्यानं उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये लक्षणीयरित्या दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागांमध्ये हिमवर्षाव सुरू असतानाच इथं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये मात्र हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानात चढ- उतार नोंदवले जात आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार देशात पुढच्या 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण वाढणार असून, मध्य आणि दक्षिण भारतासह पूर्वोत्तर भारतामध्ये ही स्थिती पाहायला मिळेल. महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणात प्रामुख्यानं हवामान दमट राहणार असून आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, घाटमाथ्यावर पहाटेच्या वेळी धुकं आणि दवबिंदू अद्यापही गारठा कायम असेल असाच इशारा वर्तवत आहेत. सरासरी तापमानाच्या बाबतीत पुढील 24 तासांमध्ये काहीशी वाढ नोंदवली जाणार असून, यामुळं थंडीचं राज्यातील प्रमाण असमान असेल असा इशारा आहे. सागरी किनारपट्टी भागांमध्ये सूर्य मावळतीला गेल्यानंतर सोसाट्याचे आणि काहीसे थंड वारे वाहतील ज्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यात हवा कोरडी राहील. तर, सोलापूर, सातारा (पाचगणी, वाई) इथं पुढचे 24 तास गारठा कायम असेल. सध्या मध्यप्रदेशातील उत्तर पश्चिमेस चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळं बंगालच्या उपसागरातून ताशी 25 ते 30 किमी वेगानं आर्द्र वारे वाहत आहेत. ज्यामुळं मागील काही दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरणाचं वर्चस्व राज्यात पाहायला मिळत आहे. 

देशातील हवामानाची स्थिती आणि महाराष्ट्रावर होणारा परिणाम

केंद्रीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडील 5 राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार असून, त्यामुळं तापमानात आणखी घट होणार आहे. तर, पूर्व भारतातसुद्धा हवामान बिघडू शकतं. पश्चिमी झंझावात उत्तर भारतातील अनेक राज्यांवर परिणाम करत असून, काही राज्यांत लक्षणीय तापमान घट नोंदवली जाणार आहे. 26, 27 आणि 28 जानेवारी या दिवसांमध्ये एक नवा झंझावात उत्तर भारताच्या दिशेनं येत असून स्तायेच परिणाम पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थानचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशापर्यंत दिसून येईल. 

जम्मू आणि हिमाचलच्या मैदानी भागांमध्ये पावसाचा इशारा इसून, वाऱ्याचा वेगही अधिक राहणार आहे. तर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये अनपेक्षितपणे काही मैदानी भागांमध्येही हिमवर्षाव होणार असल्यानं इथं पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाही यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 





Source link

महाराष्ट्रात सोनं चांदीच्या किंमतीत भयानक दरवाढ! आजपर्यंत सगळे विक्रम मोडले, सोनं चांदीच्या अचानक किंमती वाढण्याचे कारण जाणून शॉक व्हाल

महाराष्ट्रात सोनं चांदीच्या किंमतीत भयानक दरवाढ! आजपर्यंत सगळे विक्रम मोडले, सोनं चांदीच्या अचानक किंमती वाढण्याचे कारण जाणून शॉक व्हाल



जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार  800 रुपये वर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 50 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. 



Source link

शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा, महापालिकेनंतर झेडपीमध्येही…; 'कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंज्याच उचला!

शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा, महापालिकेनंतर झेडपीमध्येही…; 'कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंज्याच उचला!


Shivsena GharaneShahi: लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुका,बहुतांश नेत्यांना आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींना उमेदवारी मिळावी ही अपेक्षा असते. ती नाही मिळाली की सुरु होते नेत्यांची नाराजी.त्यामुळे पक्ष सुद्धा सढळ हस्ते नेत्यांच्या घरात उमेदवाऱ्या देतो.पण आता नेते जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारीसाठी पुढे करतायत. शिंदेंच्या शिवेसनेमध्ये तर याची अनेक उदाहरणं आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त हातात झेंडे आणि गळ्यात पक्षाचे गमछे घालून फिरायचं का हा प्रश्न उपस्थित होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

विधानसभा लोकसभा लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांसाठी कार्यकर्ते राबराब राबतात.नेत्यासाठी, पक्षासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात.पालिका, जिल्हा परिषद , पंयायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. कारण इथे तरी सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुक प्रक्रियेचा भाग होता येतं, प्रतिनिधीत्व घेता येतं आणि जनतेचा कौल मिळाला तर सत्तेतही सहभागी होता येतं. पण राजकारण्यांची नेत्यांची भूक आता इतकी वाढलीये की इथे सुद्धा ते कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच घरातल्या सदस्यांना पुढे करतायत. कुणी भावा बहिणीला पुढे करतं, कुणी मुला मुलींना, कुणी आई किंवा बायकोला. पण उमेदवारी आपल्याच घरात कशी राहिल याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. पालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही हेच चित्र दिसतंय.. घराणेशाही सर्वच पक्षांमध्ये आहे पण शिंदेंच्या शिवसेनेतच याचा विशेष बोलबाला आहे.

शिवसेनेतली ‘घराणेशाही’

अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत.दुसरा मुलगा आमेर यांना जिल्हा परिषद उमेदवारी

खासदार संदिपान भुमरेंचे चिरंजीव विलास भामरे आमदार,पुतण्या शिवराज भुमरेंना जिल्हा परिषदेत उमेदवारी

धाराशिवच्या रविंद्र गायकवाडांचे चिरंजीव किरण सध्या उमरग्याचे नगराध्यक्ष तर पत्नी उषा यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी देण्यात आली

माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलीला पंचायत समितीची उमेदवारी

तानाजी सावंतांचा पुतण्या धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी

संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही महापालिकेत उमेदवारी

अर्जुन खोतकरांच्या मुलीलाही जालना महापालिकेत उमेदवारी

आमदार बालाजी कल्याणकरांचे चिरंजीव सुहास यांना नांदेड महापालिकेची उमेदवारी

नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंच्या मुलाला महापालिकेत उमेदवारी

आमदार संतोष बांगर यांच्या भावजय हिंगोलीच्या नगराध्यक्ष

 
आता ऐरवी सामान्य शिवसैनिकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतच फोफावलेल्या या घराणेशाहीबद्दल मात्र मंत्री शिरसाटांना काहीच वाटत नाही. इतरही पक्षात हेच चित्र असल्याचं ते सांगतात. तर शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी मात्र यावर टीका केलीये. 

हे झालं शिवसेनेतलं. पण सर्वपक्षांचा आपल्या घराणेशाहीसाठी कसा वापर केला जातो त्याचंही एक उदाहरण आहे. भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपकडून परभणीत नगरसेवक आहेत.मुलगा समशेर वरपुडकर, सून  प्रेरणा  आणि पुतण्या बोनी हे भाजपकडून जिल्हा परिषदेत उमेदवार आहे तर मुलगी सोनाली शिवसेना युबीटीकडून उमेदवार आहेत तर पुतण्या अनिल वरपुडकर काँग्रेसकडून उमेदवार आहे.म्हणजे पक्ष, कार्यकर्ते राहिले बाजुला पण सगळी पदं आपल्याच कुटुंबात कशी राहतील याची तजवीज महत्वाची.. त्यामुळेच एकाच घरात 6-6 पदं आहेत.

सर्वसामान्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता यावा अश्या पद्धतीने आपल्या लोकशाहीची रचना आहे. पण कार्यकर्त्याचा एकदा का प्रस्थापित नेते झाला की ते आपल्या कुटुंबातल्याच सदस्यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे करतात. पण सामान्य कार्यकर्ता मात्र आयुष्यभर हातात झेंडा घेऊन फक्त प्रचारापुरताच यांना लागतो.आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेते कुटुंबियांनाच पुढे करत असतील तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का?





Source link

बाळासाहेबांच्या 100 व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नव्या आरोग्य अभियानाची घोषणा

बाळासाहेबांच्या 100 व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नव्या आरोग्य अभियानाची घोषणा



Balashaheb Thackeray 100th Birth Anniversary :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक नव्या उपक्रमांची घोषणा केली. 
 



Source link

राज ठाकरेंना डावलून शिंदेंना पाठिंबा?

राज ठाकरेंना डावलून शिंदेंना पाठिंबा?


ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : कल्याण-डोंबिवलीमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिंदेंची शिवसेना आणि मनसेनं हातमिळवणी केलीय. पालिकेच्या निकालानंतर सत्तेसाठी शिवसेनेनं गणिताची जुळवाजुळव सुरू केली, यानंतर मनसेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय, मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय. राज ठाकरेंना देखील घडलेला प्रकार अमान्य असल्याचं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे राज ठाकरेंचा आदेश डावलून राजू पाटलांनी पाठिंब्याचा निर्णय घेतला का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर नाराजी व्यक्त केलीय. कल्याण डोंबिवलीत झालेला प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी म्हटलंय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जखमेवर मनसेनं चागलंच मीठ चोळलंय त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत, दरम्यान बाळा नांदगावकरांना देखील हा प्रकार आवडलेला नाही.

कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत टोकाची लढाई पाहायला मिळाली होती. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांवर कुरघोड्या करायला सुरूवात केली आहे.. दरम्यान यातच आता मनसेनं थेट शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं शिंदेंची शिवसेना बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. 

कल्याण-डोंबिवली
महानगरपालिका
एकूण जागा – 122
बहुमत – 62

केडीएमसीत भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना बहुमतासाठी 12 नगरसेवकांची गरज आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना बहुमतासाठी 9 नगरसेवकांची गरज आहे. मात्र, केडीएमसीत मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नॉट रिचेबल शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, त्यामुळे शिंदेंचे 53, मनसेचे 5 आणि ठाकरेंचे 4 मिळून एकनाथ शिंदे बहुमत गाठत आहेत. 

मनसेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली होती, मात्र, त्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मनसेनं केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यांनतर ठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय. दरम्यान यानंतर भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांनी संजय राऊतांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. 2019 मध्ये काँग्रेससोबत गेल्यावर तुमची नितीमत्ता कुठे होती असा सवाल भाजपनं राऊतांना केला आहे. 

सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात कोण काय करेल याचा विचारही कुणी करू शकत नाही. याची अनेक उदाहरणं मागील काही दिवसात महाराष्ट्रानं बघितलीत भाजपनं एमआयएम आणि काँग्रससोबत युती केल्याचं पाहिलं आता एकमेकांविरोधात उभे ठाकलेले मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकमेकांशी कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी जुळवून घेतलंय. मात्र, दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. मात्र, उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले एकनाथ शिंदेंना मनसेनं साथ दिल्यानं दोन्ही भावांमध्ये पुन्हा मतभेद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp