HSC Result 2026 : 12 वीचा निकाल काही तासात होणार जाहीर! मोबाईलवरून कसा तपासाल, जाणून घ्या सविस्तर

HSC Result 2026 : 12 वीचा निकाल काही तासात होणार जाहीर! मोबाईलवरून कसा तपासाल, जाणून घ्या सविस्तर


When and where can the HSC result be checked : 12 वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक नक्कीच वाढली असेल. निकाल जाहीर व्हायला काही तास शिल्लक असताना कोणाला किती टक्के पडणार या बाबत विद्यार्थ्यांना तर चिंता असतेच त्यापेक्षा जास्त पालकांच्या चेहऱ्यावर निकालाची चिंता दिसून येते. मागील काही दिवसांपासून 12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत चर्चा होती. काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एचएससी निकालाची तारिख आणि वेळ जाहीर केली आहे. पण हा निकाल कोणत्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार आहे, या 2 तारखेला 1:00 वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार यासंदर्भात जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

12 वीचा निकाल या वेबसाइटवर पाहता येणार

2 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे, हा निकाल विद्यार्थी results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org या वेबसाइटवर पाहू शकणार आहेत. मंडळाने यासंदर्भात माहिती दिली आहे, याबद्दल मंडळाने सांगितले की या परिक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी हे या पोर्टल्सवरून त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. त्याचबरोबर असेही सांगितले आहे की डिजीलॅाकर ॲप्लिकेशनद्वारे निकालपत्र विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये देखील लॉगिनद्वारे मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहेत. 

हे ही वाचा 

‘आधी ‘अमृतांजन बाम’ लावावा लागत होता, आता ‘टायगर बाम’ उपाय केलाय;’ एकनाथ शिंदेंचं ‘कनेक्टिंग लिंक’ उद्घाटनादरम्यान विधान

मंडळाची पत्रकार परिषद आणि घोषणा प्रक्रिया

मंडळ 2 मे रोजी निकाल जाहीर करणार आहे, त्याआधी 2 मे ला 11 वाजता पुणे कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये दुपारी 1 वाजता निकालाची लिंक सक्रिय करण्याआधी त्याचबरोबर परिक्षा आणि विद्यार्थीच्या कामगिरीशी संबंधित महत्वाचा तपशील दिला जाणार आहे. 2026 मध्ये बारावीची परीक्षा ही यंदा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये मंडळांमार्फत घेण्यात आली होती. 

पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध

निकाल लागल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका किंवा निकालामध्ये शंका असल्यास त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 3 मे ते 17 मे ही वेळ देण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट देखील सादर केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्याच्या विभागामधील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. 





Source link

जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टची स्थापना

जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टची स्थापना


Mumbai News :  अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो. या क्षेत्रात मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो. पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असते ते आपल्याला कधीही दिसत नाही. अशा या जेष्ठ कलाकारांसाठी दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख यांसारख्या कलाकारांनी एकत्र येऊन जेष्ठ कलाकारांचे दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचे आजारपण यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी CAWT सारखा एक मंच तयार केला असून या संस्थेतर्फे केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत केले.

Add Zee News as a Preferred Source

सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT)आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने CAWT च्या स्थापनेत आणि CINTAA – CAWT टॉवरच्या उभारणीत ज्या विश्वस्थ कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य, दारासिंह या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी त्या कलाकारांचे फोटो आणि माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाटन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळेस ते बोलत होते. 

रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो चांगला काळ ओसरला कि सरत्या काळात त्या कलाकारांकडे कुणी पाहत नाही. त्यांची कुणी चौकशी करत नाहीत. असे जवळपास ९ ते १० हजार कलाकार सध्या अभिनय क्षेत्रात आहेत. अशा कलाकारांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे असते. यामध्ये अभिनय क्षेत्रात काम करणारे इतर कामगार यांची संख्या देखील मोठी आहे. याना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती मला CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी मला आज दिली. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.  तसेच CAWT ला जेष्ठ कलाकारांकरिता मी कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील माझी स्वतःची एक एकर जागा देण्यास तयार आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रविंद्र चव्हाण यांच्या सोबत जेष्ठ अभिनेत्री व CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू, ट्रस्टच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, संस्थेचे खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. 





Source link

'…म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वत: निवडणूक लढवली नाही!' भाजपाने सांगितलं कारण; पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण?

'…म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वत: निवडणूक लढवली नाही!' भाजपाने सांगितलं कारण; पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण?


Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा बळी दिल्याचा आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या…

Add Zee News as a Preferred Source

स्वाभिमान गमावून ‘गुलामी’चे राजकारण

काँग्रेससमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची लाचारी सुरु असल्याचा आरोप बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर काँग्रेससमोर लाचारी पत्करल्याचा आरोप करण्यात आला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर झुकत राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. महिला आरक्षण विधेयकाच्या वेळी काँग्रेसने साथ दिली नाही, तरीही त्यांची लाचारी केली जाते, हे दुर्दैवी असल्याची टीका बन यांच्याकडून करण्यात आली.

देशात मोदींचे नेतृत्व ठाम, विरोधक स्वप्नात

राऊत आणि काँग्रेसवर टीका करताना, विरोधक फक्त स्वप्नरंजन करत असल्याचे बन यांच्याकडून सांगण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाचा ठाम विश्वास असल्याचे बन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेली ‘कॉमेडी सर्कस’ असल्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला.

स्थानिक नेतृत्वाला डावलण्याचे राऊतांचे धोरण

काँग्रेस नेत्यांचा अपमान सुरूच असल्याचा टोला लगावत बन यांनी राऊतांना लक्ष्य केलं. संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना डावलण्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांना योग्य मान न दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच राऊत यांना धडा शिकवेल, असा इशारा बन यांच्याकडून देण्यात आला आहे.

महायुतीचं ‘सरप्राईज’ शक्य

दानवे फक्त उबाठा गटाचे उमेदवार असल्याचंही बन यांनी म्हटलं आहे. अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे नव्हे, तर केवळ उबाठा गटाचे उमेदवार आहेत. काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्यास समीकरणे बदलतील. महायुतीकडून देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी होऊ शकतात, असं सूचक विधान बन यांनी केलं आहे.

सुषमा अंधारे नाराज

सुषमा अंधारे यांच्या नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर बन यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पक्षासाठी काम करूनही त्यांना संधी न देणे, आणि दानवे यांना पुन्हा संधी देणे, यावरून पक्षातील अंतर्गत राजकारण स्पष्ट होत असल्याची टीका बन यांनी केली आहे. राऊत यांनीदेखील अंधारे यांची खिल्ली उडवल्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला आहे. पक्षातील दुय्यम वागणुकीवरून नाराजी असल्याचं बन म्हणालेत.

जनतेतून निवडून येण्याचे राऊतांना आव्हान

राऊत यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर बन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राऊत यांनी कधीही थेट निवडणूक लढवली नाही, असा आरोप करत त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आव्हान देण्यात आले. जनतेच्या मतांचा आधार नसताना टीका करण्याचा अधिकार नाही, असे बन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंचा राजकीय बळी टळला

दानवे यांना पुढे करून अंतर्गत संघर्ष झाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही, असा गंभीर आरोप बन यांच्याकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे जिंकले असते, पण त्यामुळे राऊत यांच्या राज्यसभा महत्त्वाकांक्षेला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे अंतर्गत दबाव टाकून अंबादास दानवे यांना पुढे करण्यात आले. काँग्रेस उमेदवार दिल्यास या संघर्षाचा परिणाम अधिक तीव्र होईल आणि आघाडीचे अंतर्गत मतभेद उघड होतील, असं बन यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएम योग्य, पराभवाची शक्यता दिसली की…

पराभव दिसला की शंका उपस्थित करण्याचा आरोप बन यांनी विरोधकांवर केला आहे. निवडणूक जिंकली तर ईव्हीएम योग्य, पराभवाची शक्यता दिसली की त्याच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्याची विरोधकांची भूमिका असल्याचे बन यांच्याकडून सांगण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातही राऊत यांनी केवळ वक्तव्ये केली, पण प्रत्यक्ष प्रचारासाठी गेले नाहीत, अशी टीका बन यांच्याकडून करण्यात आली.





Source link

मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला

मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला


Pratap Sarnaik Vs Narendra Mehta : मुंबईच्या वेशीवर असलेलं मिरा भाईंदर शहर सध्या राजकीय वादामुळे चर्चेत आले आहे. या शहरात महायुतीचा मंत्री विरुद्ध महायुतीचा आमदार असा संघर्ष निर्माण झालाय. शिवसेनेचे ओवळा माजिवड्याचे आमदार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मिरा भाईंदर मतदारसंघाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या विस्तवही जात नाही. दोघांमधील वादाची ठिणगी दहिसर ते काशीगाव मेट्रोचे उद्घाटनादरम्यान पडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मेट्रोतून प्रवास करताना सरनाईकांनी मेहतांची थेट मुख्यमंत्र्यांकडं तक्रार केली.

Add Zee News as a Preferred Source

मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील हा वाद इथंच थांबेल असं वाटलं होतं. पण दोघांमधील वाक् युद्धाची ही तर सुरुवात होती. प्रताप सरनाईकांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत मेहतांवर आरोपांचा बॉम्बगोळा टाकला. सरनाईकांचा शाब्दिक हल्ला मेहतांनी लगोलग परतावून लावला.

या वादानंतर  नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर भाईंदरपाड्यातील भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करत ठाणे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस बजावली आणि या जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही. त्यामुळे बदनामी करणे थांबवावे. अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसीद्वारे दिला. या घटनेमुळे सरनाईक-मेहता यांच्यातील जुन्या वादाला नव्यानं हवा मिळाली. 

सरनाईक-मेहता वादावर भाजपनं  सारवासारव केलीय. हे पेल्यातलं वादळ आहे ते लवकरच शांत होईल असा विश्वास भाजपनं व्यक्त केला. सरनाईक आणि नरेंद्र मेहता दोघंही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. येत्या काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यताच जास्त वाटू लागलीये.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली

भाईंदरपाडाप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. भाईंदरपाड्यातील जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही. त्यामुळे बदनामी करणे थांबवावे. अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसीद्वारे दिला आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणे पोलिसांकडे केली होती. याविरुद्ध आता विहंग ग्रुपनेही मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आरोप थांबवून प्रकल्पाच्या कामातील हस्तक्षेप थांबवावा, सात दिवसांत तक्रारीही मागे घ्याव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 





Source link

Vidhan Parishad Election 2026: तटकरेंचे निकटवर्तीय की पार्थ पवारांचा बेस्ट फ्रेंड? सुनेत्रा कोणाला देणार उमेदवारी? NCP कडून 5 नावं चर्चेत

Vidhan Parishad Election 2026: तटकरेंचे निकटवर्तीय की पार्थ पवारांचा बेस्ट फ्रेंड? सुनेत्रा कोणाला देणार उमेदवारी? NCP कडून 5 नावं चर्चेत


Vidhan Parishad Election 2026 Ajit Pawar NCP 5 Expected Candidates: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी आहे. मात्र असं असलं तरी भारतीय जनता पार्टी वगळता सत्ताधारी पक्षातील कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना एक जागा लढवणार असून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवणार आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी 24 तासांचा वेळ शिल्लक असतानाही उमेदवार जाहीर केलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षाचा उमेदवार कोण असावा यासाठी मंगळवारी रात्री उशीरा ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमधील इनसाइट स्टोरी समोर आली असून कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

या पाच नावांची झाली चर्चा

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत बैठक मंगळवारी रात्री उशीरा पार पडली. या बैठकीमध्ये विविध नावांवर चर्चा झाली. चर्चा झालेल्या नावांमध्ये राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, जिशान सिद्धकी यांचा समावेश आहे. सूत्रांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडेही उपस्थित होते. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पक्षात सध्या प्रचंड विरोध होत असल्यामुळे त्यांच्या नावासहीत अन्य नावांबाबत देखील बैठकीत खल झाल्याची माहिती मिळत आहे.

राजेंद्र जैन कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी आमदार आणि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (GDCCB) सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले अध्यक्ष आहेत. ते माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यात आणि स्थानिक विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.

सुरेश बिराजदार कोण?

सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ‘भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना’ आणि ‘भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँके’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (DCCB) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून अडचणीत असलेल्या बँकेला सावरण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची संघटना पुन्हा बांधण्यात योगदान दिले आहे.

चर्चेत असलेले उमेश पाटील कोण?

उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मुख्य प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय चर्चांमध्ये (Debates) पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू पद्धतीने मांडण्यासाठी ओळखले जातात.

जिशान सिद्धकींचा अल्पपरिचय

जिशान सिद्धकी हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, त्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी जिशान यांच्या खांद्यावर आहे.

माजी खासदाराच्या पुत्राचाही समावेश

माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेले विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आणि बालपणीचे मित्र मानले जातात. ते पुण्यातील रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाशी संबंधित असून त्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव पुणे क्षेत्रापुरताच मर्यादित असला तर पार्थ पवारांच्या गटाचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.





Source link

विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; भाजपचे धक्कातंत्र, 5 नव्या नावांची घोषणा

विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; भाजपचे धक्कातंत्र, 5 नव्या नावांची घोषणा


Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर झाली आहे. भाजपने 5 जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधानपरिषद पोटनिवडणूक प्रज्ञा सातव यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने यादी जाहीर केलेली नाही. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे विवेक कोल्हे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

भाजपच्या यादीची  वैशिष्ट्ये पाहिली असता विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे.  सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.

 निवृत्त आमदारांचा पत्ता कट झाला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारत संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार  निवृत्त होत आहेत.  

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राणा आणि कडू यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यानरवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.  बच्चू कडून यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी रवी राणा मदत करणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीचा संभ्रम अद्याप कायम आहे. कारण विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस बाकी आहेत. असं असताना महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जावं असा मविआ नेत्यांचा आग्रह आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.. तर ठाकरेंच्या मनधरणीसाठी शिवसेना UBT नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे संजय राऊत म्हणतायत की पेढे मिळणार, मात्र हे पेढे देणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला आठ जागा मिळाल्या.  तर, विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला एक जागा वाट्याला येणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका भाजपच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्यांकडून घेण्यात आसी आहे. असे  असले तरी, शिवसेनेच्या नेतृत्वाकडून दहावा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी  एकीकडे काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यात आला आहे, तर दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून राष्ट्रवादी (SP) पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळीही खेळण्यात येणार असल्याचे समजतंय. मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे ठाकरेंना फटका बसणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

राज्यातल्या राजकारणात पुन्हा हालचाल वाढलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नंदनवन निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, महत्त्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद निवडणूक हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.. त्याचबरोबर पक्षात सुरू असलेली नाराजी, काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.  शिंदे स्वतः यावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp