मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल


Maratha Reservation : मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या सगसोयरे अधिसुचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अधिसुचनेसंदर्भात कोणी न्यायालयात गेले तर आमचं म्हणणं पहिलं ऐकूण घ्यावं यासाठी वकील राजसाहेब पाटील यांचं मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने कुणबी समाजासाठी काढलेल्या अधिसुचनेसंदर्भात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत. 

कुणबी दाखल्यासंदर्भातल्या नव्या जीआरमध्ये गरज भासल्यास बदल करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. भुजबळ जे आक्षेप घेतील त्याबाबत सुधारणा करून त्यात बदल केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं.  भाजप सत्तेत आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. 

 सगसोयरे अध्याधेश मराठा समाजाची शुद्ध फसवणूक – एकनाथ खडसे

सरकारी अध्यादेश हा मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याची प्रतिक्रिया, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिली. रक्ताच्या नात्याचा सबंध असल्याशिवाय दाखला न देण्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या सूचना आहेत. कायद्यात तशी तरतूद आहे. तसंच सगेसोयरेची व्याख्या स्पष्ट नमूद केलेली नसल्यानं, प्रमाणपत्र मिळणं अवघड असल्याचं खडसे म्हणाले. 

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा गुणरत्न सदावर्तेंचा इशारा 

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय.. कायद्यानुसार हे आरक्षण टिकणारं नाही असंही ते म्हणालेत. रक्ताचं नातं असलेलेच सगेसोयरे या श्रेणीमध्ये येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 

‘सगेसोरये’ म्हणजे नेमकं काय? 

मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार गणगोतात, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली होती.  आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाचे नातेवाईक विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागात आहेत. ज्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून आधीपासून दाखल आहेत. त्यामुळे सरकारने आश्वासन देताना ‘रक्तातील सगेसोयरे’ हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावं अशी भूमिका जरांगे यांनी मांडली होती. मराठा समाजातील महिलांच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील सासरच्या आधारावर कुणबी दाखला मिळवा. मातृसत्ताक पद्धत म्हणत असाल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली. 

 

 

 





Source link

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha Election 2024 mahavikas aghadi became the seat allocation formula in Marathwada Most seats)





Source link

'भाजपच्या दबावाला जेव्हा…', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

'भाजपच्या दबावाला जेव्हा…', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!


Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.

काय म्हणाले रोहित पवार?

आपल्याला अडचण ठरू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी सरकारे पाडणे, केंद्रीय यंत्रणा अथवा इतर मार्गाचा अवलंब भाजपकडून केला जातोय, परंतु ज्यांचा वैचारिक पाया भक्कम आहे, त्यांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणार्थ कुठल्याही दबावाला बळी न पडता भाजपसोबत संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे, असं रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

आज बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून बिहारची स्वाभिमानी जनता तेजस्वी यांच्यासोबत भक्कमपणे उभी राहील आणि तेजस्वी उद्या नक्कीच बिहारचा भरोसादायक चेहरा म्हणून पुढे येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

तेजस्वी यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. 243 जागांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 79 आमदार आहेत. त्यांना काँग्रेसचे 19 आमदार आणि 16 कम्युनिस्ट पक्षांचाही पाठिंबा आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव 2022 मध्ये एकत्र आले होते. तब्बल 17 महिने त्यांचं राजकीय समीकरण टिकलं.

दरम्यान, वेगवेगळ्या दबाव तंत्राचा वापर करून, व्यापाऱ्यांना धमकावून मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांना सुरतमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडलं पण शेवटी पदरात काय पडलं? मुंबई हे नैसर्गिक व्यापार केंद्र आहे. जागतिक व्यापाराला पूरक असं वातावरण मुंबईत आहे, त्यामुळे केवळ मोठमोठ्या बिल्डींग उभारून मुंबईचा व्यापार स्थलांतरीत करण्याचे मनसुबे देशाच्या हिताचे नाहीत. हे असले मनसुबे रचणाऱ्यांनी आणि त्यांना साथ देण्यासाठी मूग गिळून गप्प बसणाऱ्या महाराष्ट्र धर्म विरोधी गद्दारांनी लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.





Source link

Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त…', अजित पवारांवर खोचक टीका!

Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त…', अजित पवारांवर खोचक टीका!


Jitendra Awhad On Rohan Bopanna : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धमाकेदार विजय मिळवत रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. गुडघ्याचं दुखणं, सावरत्या वयामुळे रोहन बोलन्ना जिंकेल की नाही? यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, त्याने करून दाखवलं अन् ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीचं सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. अशातच आता  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्ना याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्नाला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते याचं उदाहरण त्याने दिलंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.  

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन..! रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांनी वय बघून आता राजकारणातून संन्यास घ्यावा असं अजित पवार यांनी वेळोवेळी बोलून दाखवलंय. मात्र, शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षीही राजकारणात सक्रीय आहेत. गेल्या 4 दशकाहून अधिक त्यांची राजकीय कारकीर्द राहिलीये. त्यामुळे  काही नेते वयस्कर झाले तरी बाजूला होत नाहीत, तरूणांना संधी देत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी ताजं उदाहरण देऊन अजित पवारांवर निशाणा साधलाय.





Source link

Delhi Crime : दिल्लीमध्ये 'मुळशी पॅटर्न', भर बाजारात तरुणाची हत्या, CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ!

Delhi Crime : दिल्लीमध्ये 'मुळशी पॅटर्न', भर बाजारात तरुणाची हत्या, CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ!


Youth chased shot In Delhi : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीत पुण्यासारखा मुळशी पॅटर्न पहायला मिळतोय. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क (Shastri Park) परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नेमकं काय झालं? 

नॉर्थ ईस्ट दिल्लीमधील शास्त्री पार्कमधील बाजारात ही घटना घडली. झालं असं की, नेहमीप्रमाणे व्यापारी आपला व्यवसाय करत होते. तेव्हा बाजारात काहीतरी गोंधळ सुरू असल्याचं लोकांना कळालं. सर्वत्र गोंधळाचा आवाज येऊ लागला. एक मुलगा बाजाराच्या रस्त्यावरून पळत होता. तर त्याच्या मागे काही तरुण पोरं पळत होते. काहींच्या हातात चाकू होता तर काहींच्या हातात चक्क देशी पिस्तुलं होती. तर दोन पोरं गाडीवरून तरुणाचा पाठलाग करत होते.

काही अंतरावर आरोपींनी तरुणाला अडवलं अन् त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी तरुणाला धु धु धुडतं… एवढंच नाही तर गोळी देखील चालवली. त्यानंतर देखील नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपींचं मन भरलं नाही. त्यांनी तरुणावर चाकूचे वार केले अन् घटनास्थळावरून पळ काढला. 

तरुणावर हल्ला होत असताना आपसापच्या व्यापाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यांनी आपपालं दुकान आटोपून बंद केले. आरोपींनी पळ काढल्यानंतर देखील तरुणासमोर कोणीही जाण्याचं धाडस केलं नाही. काही वेळाने पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीच तरुणाला रुग्णालयात हलवलं. सध्या तरुण जगण्यासाठी झुंज देत आहे.

दरम्यान, नवी दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक आयुक्ताच्या मुलाचं किडनॅपिंग केलं गेलं होतं आणि त्यानंतर 23 जानेवारी रोजी मुलाला कालव्यात ढकलून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्ष्य हा दिल्ली पोलिसातील एसीपी यशपाल सिंग यांचा मुलगा होता. लक्ष्य यांचं मित्रासोबत पैशावरून वाद झाल्यानं त्याच्या मित्रानं अपहरन करून हत्या केल्याचे समोर आलंय.





Source link

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?


Meaning Of SageSoyare : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. ‘आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ’, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलंय. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच सगेसोरये म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

मनोज जरांगे यांनी सगेसोयरे या शब्दाची व्याख्याही पत्रकार परिषदेत वाचून दाखवली होती. मराठा समाजाच्या नजरेत सगेसोयरे यांची व्याख्या नेमकी आहे तरी काय? यावर जरांगे यांनी उत्तर दिलं होतं. समाजातील सगेसोयरे व्याख्येनुसार, सर्वांना आरक्षण प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

‘सगेसोयरे’ची व्याख्या काय पाहुया…

मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार गणगोतात, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी जरांगे यांची आहे. आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाचे नातेवाईक विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागात आहेत. ज्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून आधीपासून दाखल आहेत. त्यामुळे सरकारने आश्वासन देताना ‘रक्तातील सगेसोयरे’ हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावं.

पहिल्यांदा सरकारने आमची मागणी मान्य केली होती. मात्र, आता त्यांनी मागे हटू नये. सरकारने आमची ही व्याख्या घेतली नाही. त्यात फक्त पितृसत्ताक टाकलं, मग आम्ही म्हटलं मातृसत्ताकही टाका.. मात्र, त्यांनी अजून आमची मागणी मान्य केली नाही, असं जरांगे यांनी म्हटलं होतं.

मराठा समाजातील महिलांच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील सासरच्या आधारावर कुणबी दाखला मिळवा. मातृसत्ताक पद्धत म्हणत असाल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या, अशी मागणी जरांगे यांची आहे. पण सरसकट पद्धतीने जर वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली जाऊ शकत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र  लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp