कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा


Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे. 

रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं (Raktachandan). .महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभागही 24 तास अलर्ट असतो. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिदुर्मिळ झाडासाठी चोख सुरक्षा आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी
रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात (Intenation Market) अतिशय महत्त्व आहे. बाजारामध्ये जवळपास 5 ते सहा हजार रूपये किलो दरानं रक्तचंदनाची विक्री होते. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः चीनमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे.. उंची दारू, आयुर्वेदिक औषधं, मूर्तींसाठी रक्तचंदनाचा वापर होतो. तसंच सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा वापर केला जात असल्याची माहिती आयुर्वेदात आढळते. त्यामुळेच या झाडाला कोट्यवधी रुपयांची किंमत असते. 

कोकणात हे झाड आलं कसं
कोकणच्या देवराईत दीडशे वर्षांचं हे झाड डौलात उभं आहे. पण इथे हे रक्तचंदनाचं झाड आलं कसं याची माहिती कोणाकडेच नाही.  जंगलात खोलवर ही झाडं सापडतात. रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. 

खूप वर्षांपूर्वी कोकणातला कातकरी समाज जंगलात जायचा. त्यांच्या बैलाची प्रकृती बिघडली की हा समाज या झाडाची साल उगाळून बैलाला देत असतं, त्यानंतर बैल ठणठणीत होत असल्याने हे झाड औषधी आहे अशी ख्याती कोकणात पसरली. हे झाड तोडण्याचाही प्रयत्न झाला. पण हे झाड औषधी आणि दुर्मिळ असल्याने तोडायचं नाही असा निर्णय एकमुखाने घेतला गेल्याचं इथले गावकरी सांगतात. काही अभ्यासकांनी यावर अभ्यास करत हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं सांगितलं. पण हे झाड कुणी लावलं, इथं कसं आलं याची काहीच माहिती नाही, पक्षाच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांच्या काळात हे झाड लावलं गेलं असावं असा अंदाज असल्याचं गावकरी सांगतात. 

झाडाला 24 तास सुरक्षा
झाडाची ख्याती पसरल्यानतंर हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर पोलीस, गावकरी आणि महसुलविभागामार्फेत ठराविक अंतराने या ठिकाणी गस्त घातली जाते. महसुल विभागाचं या झाडावर विशेष लक्ष असतं. 





Source link

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित


पुढील
बातमी

PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण





Source link

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा


सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं प्राचीन मंदिर आहे. काळाराम मंदिराप्रमाणेच नाशिकमध्ये गोराराम मंदिरही (GoraRam Mandir) आहे. नाशिक शहरातील पंचवटीत (Nashik) असलेलं हे मंदिरही प्राचीन आहे. पण या मंदिराची जीर्ण अवस्था झाली आहे. 

या मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचं सांगत तीन संशयित आरोपींनी मदतीचा बहाणा करून मंदिराच्या महंतांना चाळीस लाख रुपयांना गंडवल्याच प्रकार उघडकीस आला आहे. 

अशी झाली ओळख 
पंचवटीत असलेले काळाराम मंदिर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र याच ठिकाणी गोराराम मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर प्राचीन असून मंदिराची सध्या दुरावस्था झाली आहे. या मंदिराचा जीर्णोधार व्हावा अशी अपेक्षा इथं असलेले महंत राजारामदास गुरु श्री शालिग्रामदास वैष्णव (रा. गोरेराम मंदिर, पंचवटी) यांची आहे. मात्र जिर्णोद्धारसाठी पैसे कमी पडत होते. याच मंदिरात भारती युवराज शर्मा (रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, नाशिक) हा व्यक्ती रोज दर्शनासाठी येत होता. या दरम्यान त्याची महंत राजारामदास गुरु यांच्याशी ओळख झाली. 
भारती शर्मा याने महंतांची राजू अण्णा चौघुले, रोहन राजू चौघुले (दोघे रा. चौघुले निवास, अशोकनगर, सातपूर) यांची भेट करून दिली. 

अशी झाली फसवणूक
संशयित आरोपींची ओळख झाल्यानंतर मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करणार असल्याचं तीनही संशयित आरोपींनी महंतांना सांगितलं. बिल्डर आपल्या ओळखीचे असून त्यांच्याकडून कमी खर्चात काम करून देण्याचे आश्वासन देऊन महंतांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळं कारण सांगून राजू चौघुले याने महंतांकडून 25 लाख रुपये घेतले. यानंतर खाजगी कामाकरिता त्यांची इनोव्हा कार सुद्धा घेऊन गेले. पुन्हा आर्थिक अडचण असल्याचे सांगून इनोव्हा कार गहाण ठेवली. 

गुन्हा दाखल 
राजू चौघुले यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याच लक्षात आल्यानंतर महंतांनी राजू चौघुले, भारती शर्मा आणि रोहन चौघुले या तिघांविरुद्ध विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

मोबाईलवर बोलता बोलता रेल्वे रुळांवर उतरला अन्…, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

मोबाईलवर बोलता बोलता रेल्वे रुळांवर उतरला अन्…, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ


Navi Mumbai Local Train Video: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मोबाइलवर बोलता बोलता एक मध्यम वयाचा व्यक्ती थेट रुळांवर उतरला. मात्र, त्याचवेळी समोरुन भरधाव वेगाने लोकल आली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अंगावर काटा आणणारे हे दृश्य असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

प्रवासी अनेकदा जीवावर उदार होऊन लोकल रुळ ओलांडतात. रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा याबाबत घोषणा व प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, तरीही असे प्रकार सुरूच आहेत. तसंत हल्ली जगात असा एखादा व्यक्ती सापडेल जो मोबाईलचा वापर करत नसेल,बहुतांश नागरिक मोबाईलचा वापर करतात मात्र हाच मोबाईल अनेक घटनेत आपल्या जीवावर बेतला असल्याचे समोर आले आहे. 

नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. 14 जानेवारी म्हणजेच चार दिवसांपूर्वीची ही घटना आहे. एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असताना रेल्वे रुळांवर उतरते. तितक्यात समोरुन भरधाव ट्रेन येत होती. मात्र त्या व्यक्तीला ट्रेन येत असल्याचे समजलेच नाही. ट्रेन धडक देत पुढे निघून गेली. या घटनेत व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव व ओळख अद्याप कळू शकलेली नाहीये. मात्र त्याला एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जायचे होते. मात्र समोरील मात्र समोरील पादचारी पुलाचा वापर करण्या ऐवजी त्याने मोबाईलवर बोलता बोलता उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रूळ पार करून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच ट्रॅकवर येणारी रेल्वे त्याला समजली नाही. हा व्यक्ती मोबाईलमध्ये इतका मग्न झाला होता की शेवटी एका हाताने बोलत असलेला मोबाईल कानाला असताना लोकलने त्याला चिरडले.

लोकलचा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले. या घटनेनंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांनी तात्काळ आरडाओरडा केली. व ही  घटना रेल्वे अधिकारी गजेंद्र सिंग यांना कळवण्यात आली.  त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली मात्र तोपर्यंत त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले होते. 





Source link

'लग्न, घटस्फोट कठीण पण…' अखेर सानिया मिर्झाने सोशल मीडियातून मांडली भूमिका

'लग्न, घटस्फोट कठीण पण…' अखेर सानिया मिर्झाने सोशल मीडियातून मांडली भूमिका



Sania Mirza Post: सानिया मिर्झाची इन्स्टा स्टोरी पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता पुन्हा रंगू लागल्या आहेत. 



Source link

राज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

राज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार


Maharastra Govt delegation in Davos : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील (CM Eknath Shinde) राज्याचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्री दावोसला रवाना झालं. आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या (Magnetic Maharastra) अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर 25 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी श्री जैन यांची चर्चा झाली.

जिंदाल यांच्यासमवेत 41 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या

देशातील एक मोठा उद्योगसमूह असलेल्या बीसी जिंदाल यांच्याशी 41 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे 5000 नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स 4000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रकल्प सुरू होईल. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. 

महाराष्ट्राच्या दालनात या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता आणि सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp