कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई


Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. केडीएमसी प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याची चौकशी देखील करण्यात येत आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड या मोहने ,अंबिवली, टिटवाळा प्रभाग क्षेत्र “अ”परिसरात पाहणी करत होत्या. याच वेळी धर्मेंद्र सोनवणे हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी दुचाकीवरून आयुक्तांच्या कारचा पाठलाग करत होता. आयुक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला थांबवले. तसेच त्याच्या चौकशीचे आदेश दिले.

यानंतर प्रशासनाने त्याला कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र त्याने त्याचे समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.आयुक्त जाखड यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू केला असून त्या पाहणी दरम्यान कुठे कुठे जातात याची माहिती हा कर्मचारी देत त्रयस्थ व्यक्तीला देत असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, आता ऑन ड्युटी असतांना इतर ठिकाणी आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशा इशारा या माध्यमातून देण्यात आलाय.

पोलीस बंदोबस्त करत असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलची केली आमदार दंगेकारांनी चौकशी 

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग बाहेर आज शिक्षकांचा मोर्चा होता. आणि या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलला ड्युटी लावण्यात आली. हातात लहान बाळ घेऊन ही महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य बजावत होती. कर्तव्य बजावत असताना लहान मुलगा रडत होता. मुलगा रडत असताना पाहून आमदार रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी या महिला कॉन्स्टेबलची विचारपूस केली. विचारपूस केली असता महिला कॉन्स्टेबलने वरिष्ठ त्रास देत आहेत. लहान बाळ असतानाही बंदोबस्ताच्या ड्युट्या लावत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना फोन लावून याबाबत विचारणा केली. विचारणा केली असताना हा प्रकार चुकीचा झाला आहे. याबाबत पोलिस आयुक्तांना आपण भेटणार असून पाटील यांना टाकीत देण्याचा सूचना देणार आहोत. सावित्रीच्या लेकीला अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर गृहमंत्री काय करतायेत असा प्रश्न आमदार धंगेकारांनी उपस्थित केला. वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रार करूनही उपयोग होत नाही.लहान मुलाला घेऊन मला ड्युटी करावी लागते माझ्यासारख्या अनेक महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचं महिला कॉन्स्टेबल यांनी सांगितलं. 

 





Source link

'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर…'; ठाकरेंचे फटकारे

'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर…'; ठाकरेंचे फटकारे



Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं विद्यापिठाने जाहीर केलं आहे.



Source link

राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत

राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत



राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय, विशेषत उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित झालंय. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. 



Source link

महाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?

महाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?


Maharashtra weather updates : पहाटेची गुलाबी थंडी नेमकी काय असते याचा अनुभव सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत आहे. इतकंच नव्हे, तर मुंबईतही रात्री उशिरानं तापमानात घट नोंदवली जात असून, झोंबणारे गार वारे सुखद अनुभव देऊन जात आहेत. सध्या शहरामध्ये किमान तापमान 24 अंशांवर पोहोचलं असून, त्यातही घट नोंदवली जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाच चढ- उतार होत असले तरीही उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीची लाट कायम आहे. परिणामी येत्या काळात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सोमवारी धुळ्यामध्ये तापमान 8 अंशांवर होतं, तर पुण्यात किमान तापमान 11.7 अंशांवर पोहोचलं होतं, निफाडमध्ये पारा 8.7 अंशांवर पोहोचला होता. तर, साताऱ्यामध्ये तापमान 13 अंशांवर होतं. पाचगणी आणि महाबळेश्वर भागामध्येही तापमानाचा आकडा 11 अंशांवर पोहोचल्यामुळं इथं रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा मारा होत असल्याचं पाहायला मिळालं. सध्या राज्यात निफाड, धुळे, परभणी आणि जळगाव भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी असून, आठवड्याअखेरपर्यंत ते कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

मुंबईत धुकं की धुरकं? 

इथं मुंबईला थंडीची चाहूल लागली असली तरीही शहरामध्ये सध्या दृश्यमानता प्रचंड कमी असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे थंडीचं वातावरण आहे, म्हणून हे धुकं आहे असा तुमचा समज होत असेल तर तसं नाहीये. कारण, शहरावर सध्या धुक्याची नव्हे धुरक्याची डादर पसरली असून, प्रदूषणानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. 

सध्या मुंबईत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं धुलिकण हवेतच स्थिरावले आहेत. ज्यामुळं शहराचा श्वास पुन्हा एकदा गुरमरू लागला आहे. 

दरम्यान, सध्या देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. काश्मीरमध्ये शीतलहर आली असून, इथं तापमान उणेच्याही खाली पोहोचलं आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रांमध्येही हीच परिस्थिती, तर मैदानी क्षेत्रामध्ये कुठे अचानकच बरसणारा पाऊस आणि दातकिळी बसवणारी थंडी असं चित्र पाहायला मिळत आहे. 





Source link

महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण


Covid Update: महाराष्ट्रात सोमवारी करोनाचा संसर्ग झाल्याची 28 नवी प्रकरणं समोर आली आहेत. याचसोबत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. सर्वाधिक प्रकरणं मुंबई (77), ठाणे (29), रायगड (17) आणि पुण्यातील (23) आहेत. राज्यात करोनाचा नवा व्हेरियंट  JN.1 चा संसर्ग झालेले 10 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण ठाण्यातील आहेत. ठाण्यात 5 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून, सर्वजण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

धनंजय मुंडेंनाही करोनाची लागण

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. “नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, “माझे मंत्रिमडळातील सहकारी धनंजय मुंडे यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. प्रशासन राज्यात योग्य ती पावलं उचलत असून, प्रसार रोखण्यासाठी अधिकार्यांना योग्य ते आदेश देण्यात आले आहेत” 

रविवारी 50 नव्या प्रकरणांची नोंद

बीड जिल्ह्यात तिघांना करोनाची लागण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसंच आरोग्य विभागाने लोकांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी करोनाची एकूण 50 नवी प्रकरणं आढळली आहेत. 

दरम्यान, JN.1 चे व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य आवश्यक उपकरणांची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.  केंद्र सरकारने राज्यांना व्हायरसच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व नमुने पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

 





Source link

मुंबई महानगरपालिकेचा स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवविणार

मुंबई महानगरपालिकेचा स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवविणार


CM Eknath Shinde : स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. याच भावनेने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राइव्ह सुरु केली आहे. त्याद्वारे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होत आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा एकूणच स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्‍वी होत असून हा पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्‍यमंत्री . एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई महानगरातील सर्व रस्‍ते काँक्रिटकरणाचे होवून ते खड्डेविरहीत होतील, त्या दिशेने कामे सुरु आहेत, असेही मुख्‍यमंत्री महोदयांनी नमूद केले.

राज्‍याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री शदीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, आमदार  यामिनी यशवंत जाधव, आमदार  कालिदास कोळंबकर, आमदार  मनीषा कायंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष  यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ २) . रमाकांत बिरादार यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर यानिमित्ताने उपस्थित होते.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या दोन परिमंडळ मिळून तीन प्रशासकीय विभाग अर्थात तीन वॉर्डांमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. परिमंडळ २ मध्‍ये जी दक्षिण आणि एफ दक्षिण, परिमंडळ १ मध्‍ये ई विभागातील मोहिमेत सहभाग नोंदवतानाच स्वच्छतेच्या कामांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तसेच, ठिकठिकाणी स्‍वच्‍छता कर्मचारी, शालेय विदयार्थी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. विविध मंदिरांना भेटी देत दर्शनही घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्‍या वारक-यांचेही त्‍यांनी आभार मानले. स्वच्छतेचे संदेश झळकावणाऱया, तसेच स्वच्छता विषयक घोषणा देणाऱया विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना देखील मुख्यमंत्री महोदयांनी प्रोत्साहित केले.

जी दक्षिण विभागातील वरळी नाका येथील संतदर्शन शिल्‍पाचे लोकार्पण करून मुख्यमंत्री महोदयांनी दौ-याचा प्रारंभ केला. त्यानंतर अॅनी बेझंट मार्गावरील डॉ. हेडगेवार चौकात स्वच्छतेची पाहणी केली. वरळी नाका येथील आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे चौकातील रस्‍ता जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन स्वच्छ केला. आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे यांचा पुतळा, चौथ-याची देखील त्यांनी पाणी फवारणी करून स्‍चच्‍छता त्‍यांनी केली. डॉ. ई. मोझेस मार्गावरील जिजामाता नगर, माता रमाई चौक येथे स्‍वच्‍छतेची पाहणी करत महानगरपालिका प्रशासनास आवश्यक त्या सूचनाही केल्‍या. रस्ते, पदपथ, सार्वजनिक भिंती यांच्यासह मुंबईतील बेस्ट बसेससाठी असणारे सर्व बस थांबे देखील स्वच्छ करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

मुंबई सेंट्रल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य आगाराबाहेर सुरु असलेली पदपथ रंगरंगोटी, रस्ते स्वच्छता यांची देखील मुख्यमंत्री महोदयांनी पाहणी केली. स्थानिक नागरिकांना वाहतूक, वाहनतळ याविषयी भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱयांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.

ई विभागातील माझगाव येथील महाराणा प्रताप चौकास भेट दिल्यानंतर प्रारंभी मुख्‍यमंत्री महोदयांनी महाराणा प्रताप यांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर, चौकातील रस्‍ते स्‍वच्‍छता केली. तसेच, स्वतः पाईप हाती घेत जेट स्प्रेच्या सहाय्याने रस्ता पाण्याने धुतला. याप्रसंगी स्थानिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. या ठिकाणी जमलेल्‍या नवाब टँक महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री महोदयांनी हस्तांदोलन केले. स्वच्छता जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी झळकावलेले संदेश पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

दौ-याच्‍या अखेरीस,  एफ दक्षिण विभागातील नायगाव येथे एस. एस. वाघ मार्गावरील महात्‍मा गांधी चौकात पदपथ जेट स्प्रेच्या सहाय्याने पाण्याने धुवून धूळमुक्त करण्यात आला. यानंतर स्वच्छता कामांची पाहणी करताना तेथेही रस्ते स्वच्छता करुन, स्थानिक नागरिकांशी संवाद साधून दौऱयाची सांगता झाली. 

दौऱयाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांना संबोधित करताना मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषणमुक्‍त मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ मुख्‍यमंत्री, पालकमंत्री किंवा बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची राहिलेली नाही. आता मुंबईकर नागरिक, शालेय विद्यार्थी, स्‍वयंसेवी संस्‍था या मोहिमेत मोठया संख्‍येने सहभागी होत आहेत. स्‍वच्‍छतेची चळवळ आता लोकचळवळीमध्ये रुपांतरित होवून यशस्‍वी होताना आढळते आहे. या मोहिमेमुळे वायू प्रदूषण कमी होवून मुंबई प्रदूषणमुक्‍त करण्यास मदत होणार आहे. पर्यायाने, नागरिकांचे आरोग्य सुधारेल. लोकं सदृढ, निरोगी राहतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देश – विदेशातूनच नव्‍हे तर जगभरातून लोक मुंबईत येतात. मुंबई जशी त्यांना अपेक्षित आहे, तशीच मुंबई साकारण्याचे शासनाचे ध्येय आहे. येत्या दोन-अडीच वर्षात मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होवून मुंबईतील रस्त्यांवरुन खड्डेविरहीत प्रवास व्हावा, या दिशेने कामे सुरु आहेत. मुंबई महानगरात विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरु आहेत. रस्ते दुभाजकांमध्ये तसेच चौक, वाहतूक बेटं आणि शक्य असेल त्या मोकळ्या जागांवर रोपं, झाडे लागवड करणे, हिरवळ फुलवणे, हरित पट्टे व नागरी वने तयार करून पर्यावरण पूरक वातावरण तयार करणे, अशा चौफेर पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

स्‍वच्‍छता कर्मचारी हे मुंबईचे खरे नायक अर्थात हिरो असल्‍याचा पुनरूच्‍चार करत मुख्‍यमंत्री महोदय म्‍हणाले की, मुंबई स्वच्छ, सुंदर ठेवण्‍याचे काम स्‍वच्‍छता कर्मचारी करतात. स्वच्छता कर्मचा-यांच्या वसाहतीमधील सोयी-सुविधांच्या समस्या तसेच त्यांच्या निवासस्‍थानांचा प्रश्‍न मार्गी लावला जात आहे. कामगारांच्या वसाहतींमध्‍ये आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत. त्‍यांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यास सर्वोच्‍च प्राधान्‍य दिले जात आहे.स्‍वच्‍छता कर्मचाऱयांच्‍या तसेच एकूणच महानगरपालिकेच्या सर्वच कर्मचा़रंयाचा गटविम्‍याचा प्रश्‍न व्यक्तिशः लक्ष घालून हाती घेतला आहे. नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात, त्या आधी शक्य तेवढी स्वच्छतेची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरु असून त्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱयांचे योगदान सर्वाधिक मोलाचे आहे. मुंबईकरांना अपेक्षित असलेली सर्वांगीण स्‍वच्‍छतेची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरीस नमूद केले.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp