सात नद्यांचे उगमस्थान असलेले जगातील एकमेव ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच, धार्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!

सात नद्यांचे उगमस्थान असलेले जगातील एकमेव ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच, धार्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!


Shri Panchganga Mandir: महाराष्ट्र हा विविधतेने नटलेले प्रदेश आहे. कोकणातील समुद्र, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य पाहायला देश-विदेशातून लोक महाराष्ट्रात येतात. निसर्गसौंदर्याबरोबरच राज्यात तीर्थस्थळही आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत राज्यात अनेक पर्यटक येतात. माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर यासारखी थंड हवेचे ठिकाणं आहेत. यातीलच एक महाबळेश्वरला निसर्गाबरोबरच धार्मिक परंपराही लाभली आहे. महाबळेश्वर हिलस्टेशन असले तरी अनेक इथे अनेक ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. तसंच, येथील पंचगंगा मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. एकाच ठिकाणी सात नद्यांचा उगम झालेले जगातील हे पहिलेच ठिकाण असावे. 

महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो म्हणूनच या पंच नद्यांच्या संगमाला पंचगंगा असं नाव दिलं आहे. पंच म्हणजे पाच आणि गंगा म्हणजे नदी. या सर्व नद्या दगडांच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या मुखातून बाहेरील कुंडात पडतात. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे, या पाच नद्यांच्या व्यतिरिक्त सरस्वती आणि भागीरथी या दोन नद्यांचाही संगम होतो. मात्र, एका विशिष्ट वेळी. 

पंचगंगा मंदिरात पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ बाराही महिने वाहत असतो. मात्र, सरस्वती नदीचा ओहोळ 60 वर्षांनी वाहतो. आता थेट 34 वर्षांनी सरस्वती नदीचे दर्शन होणार आहे. तर, भागीरथी नदीचा ओहोळ प्रत्येक 12 वर्षांनी दर्शन देतो. आता 2016 मध्ये श्रावण महिन्यात नदीचे दर्शन होणार आहे. हे चमत्कारित मंदिर पाहण्यासाठी आणि नद्यांचे दर्शन घेण्यासाठी दुरवरुन लोक येतात. 

पंचगंगा मंदिराला ऐतिहासिक वारला लाभला आहे. पंचगंगा मंदिर साधारण 600 वर्षांपूर्वी बांधले असल्याची नोंद समोर येते. यामंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम या मंदिरातून झाला असल्याचे पुराणात आढळते. तर, धार्मिक मान्यतेनुसार, दर बारा वर्षांनी उत्तरेकडून भागीरथी कृष्णेस भेटायला म्हणून येते. तर, साठ वर्षांनी सरस्वती नदी गायत्रीस भेटायला येते. या पाच नद्यांच्या प्रवाहाबरोबर या नद्यांही काही काळासाठी प्रवाहित होतात. या नद्यांचे पाणी गोमुखातून एका कुंडात सोडले जाते. त्यास ब्रह्मकुंड असंही म्हणतात. तर, त्याच्या शेजारी विष्णुकुंडदेखील आहे. या विष्णुकुंडात सात बहिणी गुप्त होऊन श्रीमहाबळेश्वर मंदिरात एकत्र येतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Source link

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता


Maharastra Weather Update : हिवाळ्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने आता शेतकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर तीन दिवसानंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलीये. अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी संकट कोसळल्याचं समोर आलंय. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 

राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याचीही शक्यता आहे. जळगावात सर्वात कमी 12.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तर धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मंगळवारी यलो अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, महाराष्ट्रमध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. तर पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो.





Source link

आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या

आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या


Mhada Plots News: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (म्हाडा) मुंबई बोर्डाने प्लॉटचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. म्हाडाला जो सर्वाधीक ऑफर देईल त्याला ती जमीन देण्यात येईल. सर्व विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या प्लॉटची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्लॉटची माहिती मिळाल्यानंतर त्या क्षेत्रानुसार त्याची किंमत ठरवली जाईल. किंमत ठरवल्यानंतर त्याचा लिलावासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. हे प्लॉट मुंबईतील वेगवेगळ्या भागात असणार आहेत, अशी माहिती म्हाडाने दिली. 

मुंबईत म्हाडाच्या अनेक प्लॉटवर शाळा, कॉलेज, रुग्णालय, खेळाची मैदाने आणि मनोरंजन कार्यांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र, हे प्लॉट गेल्या कित्येक वर्षांपासून विनावापर पडून आहेत. या जामिनींवर कोणतेही निर्माण कार्य करण्यात आलेले नाहीये. त्यामुळं या खाली जमीनींवर अतिक्रमण करण्यात येते. त्यामुळं हे अतिक्रमण हटवण्यासाठी व अन्य समस्यांचा सामना म्हाडाला करावा लागतो. त्यामुळं या समस्यांपासून सुटका करण्यासाठी म्हाडाने काही अटी व शर्तीसह आपले आरक्षित प्लॉट विकण्याची योजना आखली आहे. 

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्लॉटच्या विक्रीनंतरही तिथे आरक्षण जारी असेल. ग्राहकांनी प्लॉट घेतल्यानंतर आरक्षणाअंतर्गंतच त्या जमीनीचा वापर करावा लागेल. प्लॉटच्या विक्रीनंतर मुंबई बोर्डाच्या आर्थिक स्थिती सुधारणाही होऊ शकते. मागील वर्षी म्हाडाच्या मुंबई बोर्डाने 4 हजार 082 घरांची लॉटरी काढली होती. या वर्षी जवळपास 2 हजार घरांसाठी लॉटरी जारी करण्याचा प्रयत्न असून त्यावरच काम सुरू आहे. 

600 घरांसाठी म्हाडा लॉटरी काढणार 

मुंबईत हक्क्याच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई मंडळ लवकरच पुन्हा एकदा लॉटरी काढणार आहे. मुंबई मंडळ 600 घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा करण्याती शक्यता आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणाऱ्या लॉटरीमधून शिल्लक राहिलेल्या 600 घरे नव्या लॉटरीमध्ये सहभागी करणार आहेत. मुंबई बोर्डाने या योजनेसाठी परीक्षणदेखील करण्यात सुरुवात केली आहे. एप्रिलमध्ये लाँच होणाऱ्या या नव्या लॉटरीमध्ये अन्य काही घरांना सामील केले जाता येईल की नाही याचे परीक्षण करण्यात येणार आहे. 

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात म्हाडा मुंबई मंडळाने 4 हजार 82 घरांसाठी लॉटरी काढली आहे. यासाठी 1 लाख 22 हजार अर्जदारांनी घरासाठी अर्ज केले होते. पहाडी गोरेगाव पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत 22 हजार 472 अर्ज प्राप्त झाले होते. तसंच, उत्पन्न गटानुसार, अत्यल्प उत्पन्न गटातील 843 घरांसाठी 28,862 अर्ज प्राप्त झाले आहेत. 





Source link

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!


Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये शुक्रवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांना स्वेटर काढून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. तर पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील पाच दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

दरम्यान, पुण्याच्या चाकण परिसराला आज रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने झोपलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी या पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची ही तारांबळ उडाली. नगरच्या नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पावसाने उभी कांदा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.





Source link

महाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर सावधान! घोड्यांमुळे ओढावलंय भयानक संकट

महाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर सावधान! घोड्यांमुळे ओढावलंय भयानक संकट


-तुषार तपासे

Mahabaleshwar Health Issues & Horse Connection: थंडीच्या दिवसातच नाही तर 12 महिने महाराष्ट्रातील पर्यटकांबरोबरच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या महाबळेश्वरमध्ये एक अजब संकट समोर आलं आहे. येथील वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या घोडे सफारीमुळे वेण्णा तलावात घोड्यांची विष्ठा जात असल्याने महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे.

कोणी केला अभ्यास?

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि सायन्सने परीक्षण केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या भागातील घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफाइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांमध्ये या आजारांचं प्रमाण वाढल्याचंही या संशोधनामध्ये स्पष्ट झालं आहे.

कोणते विषाणू आढळून आले

महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे वेण्णा लेक भागात घोडे सफरीचा आनंद घेत असतात. मात्र, या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी भागात एक समस्या निर्माण झाली आहे. महाबळेश्वर,पाचगणी भागाला याच वेण्णा तलावातून पाणीपुरवठा होतो. मात्र आता या तलावासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडल्याचे समोर आले आहे.

कोणता त्रास होतो?

ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म यासारख्या विषाणूंमुळे येथील स्थानिक नागरिकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग असं आजार होत आहेत. घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळत असल्याने या भागातील नागरिकांना पोटांसंदर्भातील गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं आहे. या अहवालाला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दुजोरा दिला आहे. 

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

“वेण्णा तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून पोटासंदर्भातील रोगांमध्ये वाढ दिसत आहे,” असं जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी म्हटलं आहे.

प्राण्यांच्या माध्यमातून रोगप्रसार

प्राण्यांच्या माध्यमातून रोगप्रसार तशी फार सामान्य बाब आहे. बर्ल्ड फ्लू, कोरोना, स्वाइन फ्लू यासारख्या गोष्टींचा फैलाव प्राण्यांमधून माणसांना होतो. थेट प्राण्यांशी संपर्क येणे, प्राण्यांच्या विष्ठेतील अंश जलसाठ्यांच्या माध्यमातून पसरणे यासारख्या गोष्टींमधून आजारांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. सध्या महाबळेश्वरमध्ये असाच प्रकार घडला आहे.

घोड्यांच्या विष्ठेमुळे होणारे आजार

> अतिसार 
> श्वसनाचा संसर्ग
> टाइफाइड
> पोटविकार
> लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस
> बुरशीजन्य संसर्ग





Source link

शेतकऱ्यांनो सावधान? तुमच्या शेतातला पंप गेलाच म्हणून समजा…..

शेतकऱ्यांनो सावधान? तुमच्या शेतातला पंप गेलाच म्हणून समजा…..


पुढील
बातमी

मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे ‘ही’ मोहिम घेणार हाती





Source link

YouTube
Instagram
WhatsApp