नागपूरः 11 वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण कळताच कुटुंबीय हादरले

नागपूरः 11 वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण कळताच कुटुंबीय हादरले



Nagpur News Today:  लहान मुलांना लागलेला मोबाइलचा नाद इतका भयंकर वाढला आहे की मोबाइल न मिळाल्यामुळं एका मुलाने आत्महत्या केली आहे. 
 



Source link

सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय


देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ‘मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगार, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.  अलीकडच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊन, येथील अडीअडचणी समजावून घेणारे, मुख्यमंत्री शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचीही प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली.  त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर  हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन पाळयां मध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालये, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.’ आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गिरगाव चौपाटी येथे प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई करण्यात यावीत असे निर्देश दिले होते.  काल देखील त्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली होती. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याच्या सूचना केली होती.





Source link

‘तू 18 वर्षांची झाल्यावर तुझ्यासह…’, मेसेजसह मुलीला पाठवले न्यूड फोटो, नंतर ब्लेडने….; ठाण्यातील धक्कादायक घटना

‘तू 18 वर्षांची झाल्यावर तुझ्यासह…’, मेसेजसह मुलीला पाठवले न्यूड फोटो, नंतर ब्लेडने….; ठाण्यातील धक्कादायक घटना



मुलीने काही महिन्यांपूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवरुन इंस्टाग्रामला अकाऊंट सुरु केलं होतं. मुलीने यानंतर आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती. 
 



Source link

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस


Maharashtra Rain : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात ही परतीच्या पावसाने होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 48 तास मुसळधार पाऊस बरसणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असल्यामुळे याचा परिणाम पुण्यावर देखील होणार आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता तेथे वर्तवण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जोर धरला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोर धरला आहे. 

मुंबईतला पाऊस 

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुपार आणि संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो, असे हवामान तज्ज्ञांनी सूचित केले आहे. मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची बरसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या कडकडाटामुळं सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असं चित्रही शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि ते आजही दिसेल. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

परतीचा पाऊस 

भारतात नैऋत्य मान्सून वारे म्हणजेच मान्सूनच्या पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो. राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. ४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

रेड अलर्ट 

कोकण किनारपट्टीला मात्र हवमान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय. महाराष्ट्राच्या उत्तर, मध्य, पश्चिम मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर भागाल यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे.





Source link

पालघरमध्ये अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले आणि… प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

पालघरमध्ये अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले आणि… प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला


Mumbai Central – Ahmedabad Passenger Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर जवळील वैतरणा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले. थोडक्यात मोठा अपघात टळला आहे.  प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद पेसेंजर ट्रेनचा थोडक्यात अपघात टळला आहे. नेहमीप्रमाणे ही गाडी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात थांबली होती. गाडी पुन्हा पुढील स्थानकात जाण्यास सुटली असता अचानक गाडीचे इंजिन डब्ब्यांपासून वेगळे होऊन पुढे गेले. 

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा आरडा ओरडा

स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चालकाच्या लक्षात येऊन त्याने तत्काळ इंजिन थांबविले. दरम्यान अर्धा ते पाऊण तासांनी इंजिन पुन्हा डब्ब्याना जोडून वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, गाडी वेगात असताना असा प्रकार घडला असता तर भीषण अपघातजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकली असती.

पनवेल वसई रेल्वे मार्गावर  मालगाडी घसरली

पनवेल वसई रेल्वे मार्गावर शनिवारी दुपारी मालगाडी घसरली. वसईकडे निघालेल्या मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. यामुळं पनवेल वसई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp