म्हाडा आणि MMRDA मध्ये तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवले यांचे आश्वासन

म्हाडा आणि MMRDA मध्ये तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवले यांचे आश्वासन



तृतीयपंथीयांसाठी एम एम आर डी ए ;म्हाडाच्या घरांमध्ये  काही घरे राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार अश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. 
 



Source link

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय


Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तीन दिवस तुळजापूर-सोलापूर महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी विभागनिहाय यंत्रणेकडून शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारीचा आढावा घेतला. तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर रोजी कालावधीत पार पडणार आहे. या काळात देशभरातून आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी असते. या यात्रेसाठी सोलापूरहून भाविक पायी चालत तुळजाभवानी मंदिरात येतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तुळजापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक गर्दीमुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. त्यामुळे आता या महामार्गावरुन बुधवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

“नवरात्र महोत्सवाची प्रशासन पातळीवर संपूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेच्या काळात नारळ, तेल, प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग येथून प्रवेश दिला जाणार आहे व बाहेर पडण्यासाठी मातंगी मंदिर, जिजाऊ महाद्वारमधून सोडण्यात येणार आहे. भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून तिन्ही पुजारी मंडळांकडून पुजार्‍यांची यादी मागविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत हंगामी व्यापार्‍यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान वेस या मार्गावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अतिक्रमणविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

कर्नाटक व इतर राज्यातील बसगाड्यांसाठी त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलीस व इतर कर्मचार्‍यांसाठी धर्मशाळा व शहरातील काही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था असणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 100 सीसीटीव्ही कॅमेरे, इतर राज्यातील भाविकांना समजण्यासाठी त्या-त्या भाषेत स्पीकर वरून माहिती सांगण्यात येईल, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.





Source link

‘आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं’; वंचितचा इशारा

‘आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं’; वंचितचा इशारा


पुढील
बातमी

निर्दयी बापाने चार मुलींपैकी एकीला संपवलं, कारण हादरवणारं… डोंबिवलीतली धक्कादायक घटना





Source link

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा


Ganesh Visarjan 2023 :  गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे.  पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला  लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि पळापळ झाली.  गणपती विसर्जन न करताच अनेकजण निघून गेले.

नेमकं काय घडले?

पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी धरणाच्यापाण्याजवळ आरती करत असताना मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला केला. यावेळी लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. त्यानंतर झालेल्या पळापळीत शेवटी गणपती विसर्जन न करताच निघून जाण्याची नागरिकांवर वेळ आली. नंतर हिर्डोशी येथील काही ग्रामस्थांनी धरणाच्या पाण्याशेजारी असलेल्या त्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले. भोर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या हिर्डोशी येथे गणेश विसर्जनावेळी आरती करताना अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यात अंदाजे 100 हून अधिक जणांना मधमाशांनी चावा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मधमाशांनी चावा घेतल्याने पळापळ झाली

हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी असलेल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्याच ठिकाणी विसर्जन मिरवणूक साडेतीन वाजण्याच्या पोहचली. गणेश विसर्जनापुर्वी आरती करत असताना अचानक मधमाशा घोंगाऊ लागल्या आणि आरती चालु असतानाच ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. विसर्जनासाठी लहान मुले, युवक, महिला, पुरुष असे अंदाजे दिडशे जण उपस्थित होते. त्या प्रत्येकाला मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे सर्व जण रानोमाळ पळू लागले. परंतु मधमाशा त्यांच्या मागे लागून चावत होत्या. शेवटी गणेश विसर्जन ठेवून लोकं निघून गेली. लहान मुलांना जास्त चावा घेतला. त्यामुळे त्यांना त्रास होत होता.

काही वेळाने मधमाशा गेल्यावर‌ स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामुनसे आदी ग्रामस्थांनी गणेश आणि गौरी विसर्जन केले.
हिर्डोशी येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर पदे रिक्त असल्याने या नागरिकांवर प्रथमोपचार करण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 





Source link

पुणे : गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट; घरातल्या कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू

पुणे : गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट; घरातल्या कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू



Pune Accident : पुण्यात ऐन गणेशोत्सवात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे झोपेतच होरपळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

जिवंत बाळाला बॅगेत भरले आणि… नवी मुंबईत घडली धक्कादायक घटना

जिवंत बाळाला बॅगेत भरले आणि… नवी मुंबईत घडली धक्कादायक घटना


Navi Mumbai Crime News :  नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवंत बाळाला बॅगेत भरुन सोडून देण्यात आले आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर या बॅगेत काय आहे ते उघडकीस आले. मात्र, बाळ असलेली बॅग ठेवून गुपचूप पलायन करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

नवी मुंबईतीस   घणसोली येथील सेक्टर 3 लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन जागेमध्ये ही बाळ असलेली बॅग ठेवण्यात आली.  बॅग मध्ये पाच दिवसाच्या नवजात  बालिकेला सोडून  गेल्याची घटना घडली आहे. 

काय आहे CCTV फुटेजमध्ये

बॅग सोडून जातानाची ही घटना सीसीटीव्ही मद्ये कैद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास  या बाळाला  बंद अवस्थेत  असलेल्या  बॅग मद्ये  ठेवण्यात आले होते. लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन जागे असलेल्या रॅकमध्ये बाळ असलेली बॅग ठेवण्यात आली. बॅग ठेवून एक व्यक्ती निघून गेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 

बाळाचा रडण्याचा आवाज आला

बाळाचा रडण्याचा आवाज आल्यावर  आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळले त्यांनी. बॅगेतून आवाज येत होता. नागरीकांनी बॅग उघडून पाहिली असताना जिवंत बाळ दिसले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी बाळाला रुग्णालयात नेले त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यावर   बाळाला  नेरुळ मधील विश्व बाळ केंद्रात   ठेवण्यात आले ,असून  कोपरखौरनणे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

नवी मुंबईत कचराकुंडीत आढळले नवजात अर्भक

नवी मुंबईतल्या तुर्भे इंदिरानगरमध्ये मनपा रूग्णालयाशेजारील कचराकुंडीत नवजात अर्भक आढळले होते.  सकाळी कचरा नेण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले असता त्यांना हे अर्भक दिसलं…त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याच मृत्यू झाला होता.

अर्भकाला नाल्यात फेकले

पिंपरी चिंचवडच्या बालाजीनगर भागातल्या नाल्यात  एका अर्भकाला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघड झाली. मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना नाल्यात कुत्रे काही तरी खात असल्याचं जाणवलं म्हणून पोलिसांना बोलवण्यात आलं.  पोलिसांनी पाहाणी केल्यानंतर  अर्भक असल्याचं उघड झालं.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp