नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू…लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू…लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन


Nagpur Heavy Rain : नागपुरात मध्यरात्रीपासून पावसानं हाहाकार माजवलाय. मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस (Cloudburst) पडलाय.. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शहरात कहर केलाय. कधी नव्हे इतका पाऊस नागपुरात (Nagpur) झालाय. अनेक भागात पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलंय. मोरभवन बसस्थानकात 12 ते 15 बसेस पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या. यात मध्यरात्री हॉल्ट करून थांबलेले चालक वाहक सुद्धा बसमध्ये अडकले होते त्यांची आता सुटका करण्यात आलीय. तर झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज जाणाऱ्या मार्गावरून चक्क नदी प्रवाहीत होऊन शहरात पाणी शिरलं.

युद्धपातळीवर बचावकार्य
ढगफुटीसारख्या पावसानं उपराजधानी नागपूर जलमय झालीये. नागपूरच्या अंबाझरी (Ambazari) भागातील परिस्थीती हाताबाहेर गेल्यानं इथं मदतकार्यासाठी लष्कराला बोलावण्यात आलंय.. लष्कराची एक तुकडी या भागात दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यावर अंबाझरी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. वर्मा ले आउट  ,समता ले आउट या भागात 10 ते 15 फूट पाणी साचलंय. या भागात घरांचा पहिला माळा पाण्याखाली गेलाय. तिथे अनेक लोक अडकलेत..घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय

अनेक घरात पाणी
नागपुरातील अंबाझरी भागात घराघरांमध्ये  पाणी शिरलं. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जमिनीपासून पाच फूट पाणी घरात शिरल्याने सर्वत्र चिखल झालेला दिसून येतोय. तसंच घरातील सोफे, खुर्च्या पाण्यावर तरंगत असल्याचंही नागरिकांनी सांगितलं.

मुसळधार पावसानं नागपूर रेल्वे स्थानकावरही पाणी शिरलंय. रेल्वे स्टेशनवरी प्लॉटफॉर्म क्रमांक 1चा भाग पूर्णपणे पाण्यात बुडाला होता.. तिकीट काउंटर परिसर आणि फलाटावर असल्यानं प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसलाय..पाण्याचा प्रवाह इतका होता की रेल्वे फलाटावर जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली होती.

नागपुरात शाळांना सुट्टी
नागपुरात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नागपुरात 4 तासांत 106 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. .शहरातील रस्ते जलमय झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्यामुळे नागपूर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आलीय. जिल्ह्यातील शाळांना जिल्हा प्रशासन आणि मनपाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीय..

फडणवीसांकडून परिस्थितीचा आढावा
नागपूरतील पूर परिस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढाव घेत आहेत. नागपुरात आतापर्यंत 400 जणांचं स्थलांतर करण्यात आलं असून अडकलेल्यांचं रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच पुरामुळे एक महिलेच मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी नागपुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार असन कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे. 

विरोधीपक्षांचा आरोप
नागपुरात पाणी साठेपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारानी विचारलाय.. हवामान विभागानं यलो अलर्ट दिला असतानाही प्रशासनानं लोकांना का अलर्ट केलं नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला





Source link

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा


सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : VO – वर्क फ्रॉम होम करुन पैसे कमवा, यू ट्युब व्हिडिओ लाईक करुन मालामाल व्हा, ऑनलाईन व्यवसाय सुरु करा लाखो कमवा, घरबसल्या कमाई करा, असे फोन तुम्हालाही आले असतील आणि तुमच्या मनातही झटपट पैसे कमवण्याचा विचार क्लिक झाला असेल, हे करुन बघूया असं तुम्हालाही वाटलं असेल तर सावधान व्हा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते.

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) चोरीचा नवा फंडा शोधलाय. घरबसल्या पैसे देण्याचं आमिष दाखवत गुन्हेगार तुम्हाला लुटतायत. तंत्रज्ञान जसं बदललं तसं गुन्हेगारीचं स्वरुपही बदललं आहे. मुंबई पोलीसमधून (Mumbai Police) बोलतोय, कुरिअरमध्ये ड्रग्स सापडलंय, पैसे पाठवा नाहीतर कारवाई करु असे बनावट कॉल केले जातायत. पोलिसांच्याच नावे कॉल येत असल्याने सामान्य माणूस फसला जातोय.

एटीएम कार्ड बदलायचं आहे, लिंकवर क्लिक करा.  वीजबील न भरल्याने वीज तोडण्यापासून वाचण्यासाठी लिंकवर दिलेल्या वेबसाईटवर माहिती भरा. क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्याचे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात वाढलेत. बनावट वेबसाइट उघडून लोकांना लुबाडणं, सिमकार्ड क्लोन करून ओटीपी मिळवणं या प्रकारातही मोठी वाढ झालीय. एकट्या पुण्यात गेल्या आठ महिन्यात एक हजारपेक्षा जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झालीय. यात 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आलीय.

ऑनलाईन फसवणूकीची प्रकरणं
टास्क फ्रॉडची 209 प्रकरणे
मनी ट्रान्स्फरची 56 प्रकरणे
KYC अपडेट करा या गुन्ह्यांचे 42 
क्रीप्टोकरन्सीत गुंतवणूक करुन फसवणुकीचे 58
इन्शुरन्स फसवणुकीचे 10
घरबसल्या कमाईच्या फसवणुकीचे 31
शेअर मार्केट फ्रॉडचे 27
कर्ज देणार सांगून फसवणुकीचे 29
ऑनलाईन विक्री-खरेदीत फसवणुकीच 62
फेक प्रोफाईलचे 85
फेसबुक हॅकिंगचे 34
सेक्सटॉर्शनचे 35
अशा एकूण 1 हजार 114 तक्रारी फक्त 8 महिन्यात आल्यात.

आपण फसवले गेले याची जाणीव होईपर्यंत सायबर ठग ते पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवलेले असतात. तेव्हा ते मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.. म्हणूनच सायबर गुन्हेगारीपासून सावध राहणंच गरजेचं आहे. डिस्काऊंट कूपन मिळतंय.. कॅशबॅक मिळतंय. अशा फसव्या जाहिरातींपासून दूर राहणं गरजेचं आहे. नोकरीसाठी कोणी पैसे घेत असल्यास संशय आला पाहिजे. कोणी पार्सल आल्याचा फोन केल्यावर खरंच ते आपलं पार्सल आहे का याची खातरजमा केली पाहिजे.





Source link

श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव

श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव


कुणाल जमादाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर दरोडा (robbery) आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला देखील जखमी केले होते, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र आता या दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पत्नीनेच पतीची हत्या करत बनाव रचल्याचे पोलीस (Shrirampur Police) तपासात समोर आलं आहे.

एकलहरे गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दरोडा पडल्याची माहिती मृताच्या पत्नीने दिली होती. दरोडेखोरांनी पती नईम रशीद पठाण (40) यांचा गळा आवळून खून केल्याचा दावा पत्नी बुशराने केला होता. दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला केल्याचे बुशराने पोलिसांना सांगितले. तसेच त्यांनी घरातून रोख सात लाख रुपये व सोन्याचे दागिने लांबविण्यात अशी माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

नईम पठाण यांस पत्नीने बुशरानेच संपवल्याची हादरवणारी माहिती समोर आली आहे. पती नईमची हत्या केल्यानंतर बुशराने दरोड्याचा बनाव केला होता. बुशराने नईमला झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर त्याचा साडीने गळा आवळल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे.

पोलिसांनी नईमची पत्नी बुशरासह आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रकरणानंतर अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. 

एकलहरे- बेलापूर रस्त्यालगत नईम पठाण यांची शेतवस्ती आहे. नईम हे पत्नी बुशरा व दोन मुलांसह घरी होते. बुधवारी मध्यरात्री रात्री एक ते दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात गेल्या तेव्हा बाहेर दबा धरून बसलेले चार पुरुष व एका महिलेने नईमच्या त्यांना फरफटत घरात आणले आणि जबर मारहाण केली. आरडाओरडा होताच नईम यांना दरोडेखोर घरात आल्याचे दिसले. मात्र काही कळायच्या आत दरोडेखोरांनी ओढणीने त्यांचा गळा आवळला, अशी माहिती बुशराने तिच्या वडिलांना सांगितली होती. बुशराचे वडील अन्वर चिराग शेख यांनी घरी पोहोचून पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला होता. पोलिसांनी सखोल तपास केला असता बुशराने पतीची हत्या केल्याचे समोर आलं आहे. 





Source link

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम



धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.



Source link

‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका


Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत  झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील सामनातून करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत घेतलेल्‍या महत्त्वाच्या निर्णयांमुळेच देशातील सामान्‍य माणसाचे पाठबळ हे केंद्र सरकारच्‍या पाठीशी आहे. परंतु ज्‍यांच्‍या पक्षाला आमदार सोडून गेले, त्‍या पक्षाची आता विश्‍वासार्हता राहिलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वृत्‍तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ उरला नाही,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

“माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक होते. ते आज हवे होते. त्यांनी संजय राऊतचं कर्तृत्व कसं आहे ते सांगितलं असतं. मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचं प्रकरण सुरु आहे. असे लोक माझ्यावर जर आरोप करत असतील तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बोलायचं? अशा लोकांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते हेच आश्चर्यकारक आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे,” असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

विखे पाटलांनी फेटाळले आरोप

“ज्या विरोधकांनी आमच्यावर कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचे आरोप केले आहेत, ते गेली अनेक वर्ष असे आरोप करत आहेत. त्यांच्या अनामत रकमा देखील कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी जप्त केल्या आहेत. प्रवरा शेतकरी सहकारी सोसायटी एवढी मोठी स्थापन केली, ती अवसायनात काढली. तिचं वाटोळं झाले आहे. याला जबाबदार असणारे लोक आता आमच्यावर आरोप करत आहेत. या म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” असे विखे पाटील म्हणाले.

संजय राऊतांनी काय म्हटलं?

“विखे पाटलांवर अनेक आरोप आहेत. विखे पाटलांचे अनेक उद्योग आहेत. या संदर्भात आपण या आधीच बोललो आहे, पण प्रवरा सहकारी साखर कारखान्यात झाकीर नाईककडून आलेले पैसे हा कळस आहे. याची माहिती आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना कळवली असून सरकार बरोबर असलेल्या अनेक मंत्री आमदारांनी आणि साखर सम्राटांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. या सगळ्या घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.





Source link

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात… चार जणांविरोधात गुन्हा दाखल

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात… चार जणांविरोधात गुन्हा दाखल


सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन नाही तर चक्क चारजणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे अपवादात्म प्रकरण असल्याने राज्याभरात चर्चेचं कारण ठरलं आहे. 

काय आहे नेमकी घटना?
पोलीस ठाण्यात  शर्टचं बटन उघडे ठेऊन येणं चार जणांना चांगलंच अंगलट आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी (Public Places) असभ्य वर्तन केल्याच्या कलमाखाली चार जणांविरोधात चक्क गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशनमधील (Loha Police) ही घटना आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी लोहा पोलीस ठाण्यात हे चार जण आले होते.  कुणी केसच्या संदर्भात आले होते, तर कुणी काही कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आले होते. पण यावेळी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांना या व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये शर्टचं वरचं बटन उघडे ठेऊन आल्याचं दिसलं. 

या चौघांविरुदध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी कलम 110, 112 आणि 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तसंच शिस्तीचे ठिकाण आहे. या ठिकाणी शर्टचं बटन उघडे ठेऊन आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निर्माण निरीक्षक ओमकांत चींचोलकर यांनी सांगितलं.

मित्राच्या खुनाचा उलगडा
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी एका खुनाची उकल केली आहे. पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने दोन मित्रांनी आपल्याच एका मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच मृतदेह पिंपरीच्या नाशिक फाट्यावरुन खाली फेकून दिला. सहा महिने या हत्येबाबत कोणालाही थांगपत्ता लागला नाही. पण सहा महिन्यांनी मृत तरुणाच्या आईने वाकिस पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी मृत दिनेश कांबळे हा मृत्यूच्या दिवशी सिद्धांत पाचपंडे आणिक प्रतीक सरवदे या दोन मित्रांबरोबर दारू पित होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सिद्धांत आणि प्रतीक या दोन मित्रांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसी खाक्या दाखवतात दोघांनी दिनेश कांबळेच्या हत्येची कबुली दिली. सिद्धांत प्रतीक आणि मृत दिनेश कांबळे काळेवाडी परिसरात दारू पित असताना दिनेशने प्रतिकच्या पत्नी बद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे संतापलेल्या प्रतीकने दिनेशच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने हल्ला केला. जखमी दिनेशला त्यानंतर थेट नाशिक फाट्याच्या पुलावरून खाली फेकून दिलं. त्यांच्या अंगावर अनेक गाड्या गेल्याने त्याला ओळखणे ही अवघड झाले होतं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp