जालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजेंचा थेट गृहमंत्र्यांना इशारा, ‘खुलासा करा नाहीतर…’

जालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजेंचा थेट गृहमंत्र्यांना इशारा, ‘खुलासा करा नाहीतर…’


Sambhajiraje On jalana voilence : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना जालनामध्ये (Jalana News) घडली आहे. आंदोलक आणि पोलिसात झालेल्या बाचाबाचीनंतर तणाव वाढला आणि पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. तर संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाला संभाजीराजे?

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला आणि शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. 

मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात ‘शांतता राखा’

जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आणखी वाचा – जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवार म्हणतात ‘गृहमंत्र्यांची सूचना असावी’

जालन्यात एवढा राडा झाला तेव्हा गृहमंत्रालय झोपलं होतं का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. गरज पडल्यास शरद पवार जालन्याला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.





Source link

‘आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका’; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला

‘आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका’; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला


Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली. या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अधिवेशनासंदर्भात चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपलं

3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपलेले असतानाच ऐन गणेशोत्सवाच्या काळात बोलवण्यात आलेल्या या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून नवीन संसदभवनामधून कामकाज सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे. तर अन्य एका चर्चेनुसार जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप देण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन केलं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिवाळी अधिवेशन नव्या संसदभवनामध्ये होणार हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र या विशेष अधिवेशनाच्या कालावधीवर आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.

आव्हाड यांनी साधला निशाणा

आव्हाड यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ‘एक्स’वरुन (ट्विटवरुन) केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि त्याच वेळेला नेमकं लोकसभेचे अधिवेशन लागले आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आव्हाड यांनी, “आता सण-उत्सवसुद्धा साजरे करायचे नाहीत अशी भूमिकाच दिसतेय हिंदुत्ववादी पक्षांची. आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका म्हणजे नशीब,” असा टोला आव्हाड यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता लगावला आहे.

विरोधकांना धक्का देण्याच्या तयारीत सरकार?

‘अमृतकाळात होणाऱ्या या विशेष अधिवेशनामध्ये फलदायी चर्चेची अपेक्षा आहे,’ असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र सरकारकडून या अधिवेशनासंदर्भातील सविस्तर तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. गुरुवारी मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीचा पहिला दिवस असतानाच सायंकाळच्या सुमारास या विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्याने या अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत सरकार आहे की काय अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. अधिवेशनाचा कार्यकाळ संपवण्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.





Source link

दोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले

दोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले


पराग ढोबळे, झी मीडिया

Nagpur News: नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने अंदाजे आठ ते दहा वर्षे वयाच्या चिमुकलीला घरात डांबून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीला घरात डांबून तिच्याकडून घरातील कामे करुन घेत असतं. तसंच, तिला चटके देत शारीरिक त्रास देण्यात आल्याचा संतापजनक आणि चिड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. (Nagpur Crime News)

शेजारच्यांनी या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपासून दाम्पत्य चिमुकलीकडून घरकाम करून घेत होते. तसंच, तिला विनाकारण बेदम मारहाणही करण्यात आली होती. चिमुकलीच्या संपूर्ण शरीरावर चटके दिल्याच्या जखमा दिसत होत्या. मुलीला इतका अमानुषपणे त्रास दिलेल्या दाम्पत्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

शेजाऱ्यांनी उघडकीस आली घटना

काही दिवसांपूर्वी या दाम्पत्याच्या कचाट्यातून सुटून खिडकीबाहेर आली होती. त्यावेळी तिथे असलेल्या शेजाऱ्यांना तिने तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. शेजाऱ्यांनी मुलीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लगेचच चाइल्ड लाइन संस्थेच्या माध्यमात तक्रार केली. त्यानंतर या सगळ्या घटनेचा तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन वर्षांपासून हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतल अथर्व नगरी तीन मध्ये एक दाम्पत्य भाड्याने राहत होते. त्यांच्या घरात अंदाजे आठ ते दहा वर्ष वयाची ही चिमुकली साधारण दोन वर्षांपासून राहत होती. ती मुलगी कोण आहे व कुठून आणली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मुलीच या दाम्पत्याशी काय नात आहे. याचाही शोध अद्याप लागलेला नाही. 

बाथरुममध्ये ठेवले होतो कोंडून

मागील चार-पाच दिवसांपासून कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांनी चिमुकलीला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवलेलं होतं. तिथून ती कशीबशी सुटून घराच्या खिडकीमधून बाहेर पडली. त्यानंतर तिने ही सगळी हकीगत शेजारच्या कुटुंबीयांना सांगितली. तिच्या शरीरावर प्रत्येक भागावर गरम तव्याच्या, सिगारेटच्या चटके दिल्याच्या खुणा पाहून शेजारच्यांचे मन हेलावून गेलं. पोलिसांनी या मुलीवर अत्याचार करणाऱ्या दांपत्याला शोधून कठोर कारवाईची मागणी केली.





Source link

शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण…; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान

शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण…; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी असा सल्ला त्यांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पूनावाला यांनी दिला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं. सायरस पूनावाला यांनी अशावेळी विधान केलं आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांसह गेलेल्या नेत्यांचंही शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी असं मत जाहीरपणे मांडलं आहे. त्यातच आता सायरस पूनावाला यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे. 

सायरस पूनावाला यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचं कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी शरद पवारांना निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला. शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. त्यांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घ्यावी असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत. 

“शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. त्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते फार हुशार असून, जनतेची सेवा करु शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घ्यावी,” असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.

शरद पवारांनी जाहीर केली होती निवृत्ती

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी (2 मे 2023) निवृत्ती जाहीर केली होती. राजकीय जीवनात तीन वर्षे शिल्लक असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवारांनी केली होती. शरद पवारांच्या या निर्णयाला मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण यावरुन अजित पवार नाराज झाले आणि बंड पुकारत भाजपात सहभागी झाले. 

तुम्ही निवृत्त कधी होणार? अजित पवारांनी केली होती विचारणा

अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारल्यानंतर शरद पवारांना तुम्ही निवृत्त कधी होणार आहात? अशी विचारणाच केली होती. “कॉर्पोरेट नोकरीत निवृत्तीचं वय 58 असतं. अधिकाऱ्यांसाठी 60 वर्षं आहे. भाजपात 75 वर्षानंतर निवृत्त केलं जातं. मग तुम्ही निवृत्त कधी होणार? 2 मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो सांगितलं होतं. मग अचानक निर्णय मागे का घेतला? मागे घ्यायचा होता तर मग राजीनामा कशाला दिला?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली होती. 

“शरद पवार यांना नेमका कशाचा हव्यास आहे? वय वर्ष 82 झालं तरी ते थांबण्याचं नाव घेत नाहीत. ते निवृत्त का होत नाही?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली होती. 

 

शरद पवारांचं उत्तर

अजित पवारांच्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिलं होतं. “कुणी 82 म्हणो की 92 … मी जोपर्यंत सक्षम आहे, माझं काम जोमाने करत राहणार, इथे थांबणे नाहीच”, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. 





Source link

संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं

संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं


कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगमनेरच्या (sangamner) कोल्हेवाडी गावातील एका तरुणाचा ठरलेला विवाह गावातीलच एका व्यक्तीने मोडून स्वतःच लग्न त्याच मुलीबरोबर ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्या तरुणाला बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर  तरुणाने टोकाचा निर्णय घेत थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

कोल्हेवाडीतील नितीन सिताराम खुळे (वय 32) या तरुणाने सोमवारी वडगावपान शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी या तरुणाने त्याच झाडाखाली बसून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर नितीनने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

याशिवाय त्याच्याजवळ एक डायरी देखील आढळून आली आहे. या डायरीमध्ये नितीनला इतक्या टोकाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणाऱ्या काही लोकांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी तब्बल 30 तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. शेवटी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास संगमनेर पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

नितीन खुळे याला लग्नासाठी त्याच्या कुटुंबियांनी मुलगी पाहिली होती. मात्र मुलीच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडले, असे सांगितले. मात्र त्याच मुलीचे लग्न संदीप शिवाजी दिघे याच्या बरोबर होणार असल्याचे कळाल्याने नितीन यास राग आला. नितीनने संदीप याला शिवीगाळ केली. त्यानंतर नितीनला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून घेण्यात आले होते. त्यावेळी नितीनला अमोल अप्पासाहेब दिघे, राजेंद्र देवराम दिघे, जालिंदर मच्छिंद्र दिघे, राहुल भास्कर दिघे, सुधाकर बलसाने यांनी बोलावून दमदाटी केली. थोड्या वेळात नितीन रडत बाहेर आला. त्यानंतर त्याने जंगलातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

“पोलीस निरीक्षकांकडे मी त्या दिवशी सुद्धा रात्री आलो होतो. मला लोकांनी इतका त्रास दिलेला आहे. राजकारणाचा धाक दाखवून गावातील लोकांवर अन्याय करण्यात आला आहे. माझी आत्महत्या करण्याची इच्छा नाही. आई वडिलांचे माझ्यानंतर काय होईल याचीही मला कल्पना नाही. पण या लोकांनी मला एवढा त्रास दिला. ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नाही. मी एक सर्वसामान्य अतिशय गरीब घरातील मुलगा आहे. माझ्यासोबत गावातील कोणीही व्यक्ती नाही. माझी विनंती आहे की कोणत्याही राजकारणाला बळी न पडता माझ्या आई वडिलांना न्याय देण्यात यावा,” असे नितीन खुळे याने शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“नितीनचं लग्न जमलेलं असताना गावातील एकाने त्या मुलीला पाहिलं. त्या मुलीला आम्ही मोबाईल आणि 50 हजार रुपये दिले होते. मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीने मुलीला त्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवले. त्यानंतर दोघांचे लग्न जमलं आणि आम्हाला नकार दिला. त्यामुळे वाद वाढत गेला. त्यानंतर आम्ही वाद मिटवून घेतला. सगळं सुरळीत चाललं होतं. पण त्यांनी मुलाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवून घेतलं आणि दम दिला. दम दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली,” असे नितीनच्या आईने सांगितले.

कुटुंबियांच्या फिर्यादीवरून प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध कलम 306, 504, 506, 34 प्रमाणे संगमनेर‌ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

‘ट्विन टनेल’ फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट

‘ट्विन टनेल’ फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट


Eknath Shinde : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच ‘ट्विन टनेल’ उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नीति आयोगाच्या मदतीनं मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं येत्या डिसेंबरमध्ये मुंबई विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडण्यात येईल, अस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता 

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीनं मुंबईचा विकास करण्यासाठी नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली.  त्याशिवाय मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे उभारणार

गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केल्याने अनेक विकास कामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळालेय. 2024 पर्यंत त्यातले अनेक प्रकल्प पूर्ण होतील. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंक तसेच कोस्टल रोड अशी उदाहरणे दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे लवकरच उभी राहतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

मरीन ड्राईव्हप्रमाणे पूर्व सागरी किनाराही विकसित करणार

केंद्राच्या समन्वयाने मुंबई आणि परिसराचा आर्थिक विकास करण्यासाठी प्राधान्याने पाऊले टाकली जातील. पोर्ट ट्रस्टकडे केंद्राच्या मालकीची भरपूर जागा आहे. तिचा सुयोग्य वापर करून मुंबईच्या आर्थिक विकास प्रक्रियेत मोठा उपयोग करून घेता येऊ शकतो. केंद्राशी याबाबतीत समन्वय ठेऊन पाठपुरावा केला जाईल. मरीन ड्राईव्हप्रमाणे पूर्व सागरी किनाराही विकसित आणि सुंदर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ठाणे – भिवंडी – कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाचा आढावा 

मुंबई मेट्रो मार्गिका 4, 4 ए, आणि 11 साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे – भिवंडी – कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करणार

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp