राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट


Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटाला जोरदार बॅटिंग करुन गेलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झालेला दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. पण पावसाळा सुरु असताना जोरदार पावसाच्या सरी कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे. हवामान खात्याने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो. पण जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्यांना 18 ऑगस्टपर्यंत वाट पाहायला लाहू शकते.

राज्यात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या आठवड्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर अनेक जिल्ह्यांतही विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात करेल.

25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे.असे असले तरीही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

दरम्यान 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार नाही. मध्य महाराष्ट्रासहित पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या पावसाच्या शक्यतेचे प्रमाण कमी असणार आहे.

जुन, जुलैमध्ये पडलेल्या पावसामुळे शहरात पाणी पुरवठा करणारे अनेक ठिकाणचे तलाव भरले आहेत. पण पाऊस सतत पडत राहणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांवर पावसाचा थेट परिणाम होत नसला तरी शेतकऱ्यांना पिकासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कमी पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू शकतो. लाखो शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस गायब झाल्यास त्यांच्या उत्पादनात घट येऊ शकते अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. 





Source link

Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Rain Update: राज्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी पावसाने हाहाःकार माजवला होता. यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई या भागात मोठा पाऊस झाला. राज्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला होता. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.

कोणत्या भागात पाऊस?

आज दिलेल्या अंदाजानुसार 18  ते 24 ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर वरुणराजाची कृपा होऊ शकते. तर 25 ते 31 ऑगस्टदरम्यान कोकण, विदर्भ तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

आणखी वाचा – क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?

पुढील सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासहीत पश्चिम आणि दक्षिण भारतात पाऊस बरसणार आहे. मराठवाडा भागामध्ये पावसाचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. शेतकरी हवालदील झालेले असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही पुढील सात दिवसांमध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे पिकांचं काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागांतील पावसाची विश्रांती मात्र संपलेली दिसत नाही. मुंबई, नवी मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातही पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं. विदर्भाच्या नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मराठवाड्याची तहानही हा पाऊस भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे.





Source link

लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की…

लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की…



Nanded Honour Killing : मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते.



Source link

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी



Independence Day:  राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.



Source link

सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की…

सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की…


पुढील
बातमी

ऐन गणेशोत्सवात कांदा रडवणार, गृहिणींचे बजेट कोलमडणार; किती असेल भाववाढ?





Source link

YouTube
Instagram
WhatsApp