…तर मी अमेरिकेला निघून जाईन; ‘तो’ विषय काढताच बच्चू कडू चिडले

…तर मी अमेरिकेला निघून जाईन; ‘तो’ विषय काढताच बच्चू कडू चिडले


Bacchu Kadu : भाजपचे बडे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्य मंत्रीमडळाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑगस्ट महिन्यातच  शिंदे-फडणवीस-अजित पवार या महायुतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादील 9 मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप तसेच शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अपक्ष आमदार   बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाबाबतची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. 

सरकारनं आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये – बच्चू कडू यांची भूमिका

मंत्रिमंडळ विस्तारावर आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केलीय. सरकारनं आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये. मंत्रीमंडळ विस्तार केलाच तर अमेरिकेला निघून जाईन, अशी खदखद आमदार कडू यांनी बोलून दाखवलीय. यापुढे सरकानं आणखी चार जणांना दुखावू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. तर आमच्यात कुणीही नाराज नाही आणि असलंच तर त्यांची समजूत घातली जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटल आहे. 

15 ऑगस्टआधीच मंत्रिमंडळ विस्तार? 

15 ऑगस्टआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाहांसोबतच्या बैठक पार पडली. या बैठकीत विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय.. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच पालकमंत्री घोषित होतील अशीही माहिती मिळत आहे. 

तुम्ही खूप उशीर केलात – अजित पवार यांच्याबाबत अमित शाह यांचे मोठं विधान 

अजितदादा तुम्ही ब-याच काळानं योग्य ठिकाणी बसलात, खरं तर तुम्ही खूप उशीर केलात असं मोठं विधान अमित शाहांनी केलंय. पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शाहांनी जाहीरपणे हे विधान केलाय. अजितदादा तुमची जागा इथेच आहे असंही अमित शाहांनी म्हंटलंय.

जयंत पाटील अमित शाहांना भेटल्याची चर्चा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अमित शाहांना भेटले अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती मात्र या चर्चांना खुद्द पाटलांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, आपण भाजपसोबत जाणार नाही. अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतली अशा चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला. तर, दुसरीकडे सुमन पाटील यादेखील शरद पवारांच्या गटातच आहेत. त्या राष्ट्रवादी सोडणार नाहीत असं स्पष्टीकरण त्यांचे सुपत्र रोहित पाटील यांनी दिले. 





Source link

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा


Cabinet Expansion: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार हा 15 ऑगस्टपुर्वीच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात नुकतीच यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ते केंद्रीय सहकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यांच्याहस्ते केंद्रीय सहकार संस्थेनं निर्माण केलेलं पोर्टलचं लॉन्चिंग होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केल्याचं बोललं जातं आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडुंची नाराजी 

तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं बोललं जातं आहे. मात्र यावर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन. मी मंत्रिमंडळ विस्ताराला हजर राहणार नसल्याची खदखद बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. 

आता सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करू नये. आता जस आहे तस चालू ठेवावे. मंत्रिमंडळ विस्तार करुन विनाकारण चार लोकांना दुखावू नये, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

सध्या सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आता जे मंत्री आहे ते सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार खरच होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

Nitin Desai News: ‘माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना…’, नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!

Nitin Desai News: ‘माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना…’, नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!


Manasi Desai On Nitin Desai Death: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येनंतर आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नितीन देसाई यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत असताना आता नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाईने (Nitin Desai’s daughter) भावनिक आवाहन केलं आहे. एएनआयला प्रतिक्रिया देताना मानसी देसाई भावूक झाल्याचं दिसून आली. 

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स (ECL finanace) कंपनीच्या एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा झालाय. खालापूर पोलीस ठाण्यात कलम 306 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झालीये, अशातच आता माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं आवाहन मानसी देसाईने केलं आहे.

नेमकं काय म्हणाली मानसी देसाई?

माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता, असं मानसी देसाई म्हणते. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला, कर्ज फेडण्यासाठी दोन वर्ष त्यांनी कंपनीसोबत मिटिंग घेतल्या होत्या. लोन सेटलमेंट किंवा रीस्ट्रक्चर बाबत कंपनीने आश्वासन देखील दिलं होतं. इन्व्हेस्टर बाबांची मदत करायला तयार होते, मात्र त्यांनी त्यांना मदत करु दिली नाही, असा आरोप मानसी देसाईने केला आहे.

माझ्या बाबांनी खूप मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे. त्यांनी खूप कष्टाने त्यांचं नाव कमवलंय, त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं मानसी नाईक म्हणते. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, सरकारने या प्रकरणात लक्ष घालावं. त्याचबरोबर त्यांच्या शेवटच्या इच्छानुसार, सरकारने या स्टुडियोचा ताबा घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा, असं आवाहन मानसी देसाईने केलं आहे.

दरम्यान, चित्रपटसृष्टीत नितीन देसाई उत्तम अभिनेते आणि निर्माते म्हणूनही ओळखले जायचे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय.





Source link

राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर ‘या’ भागावर फक्त काळ्या ढगांची चादर

राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर ‘या’ भागावर फक्त काळ्या ढगांची चादर


Maharashtra rain updates : चार ते पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही अद्यापही पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. काही भागांमध्ये तर, पाऊस फक्त तोंडओळख करून देण्यासाठीच आला होता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. असा हा पाऊस पुढील चार दिवसांमध्ये विदर्भासह कोकण भागामध्ये मुसळधार बरसणार आहे. रागयग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

एकिकडे जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोकणातील बहुतांश भागांमध्येही पावसानं उघडीप दिली. पण, आता मात्र या भागावर पुन्हा एकदा काळ्या ढगांची चादर आल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी कोकणाला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती? 

कोकणाल मुसळधारीचा अंदाज असतानाच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागालाही पाऊस ओलाचिंब करणार आहे. तर, राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरावरही पावसाची कृपा राहणार असून, इथं दाट धुक्यांची चादर पाहायला मिळणार आहे. (Kolhapur, Satara) कोल्हापूर, साताऱ्यातही परिस्थिती काहीशी अशीच असेल. 

 

(Mumbai, Navi Mumbai, Thane) नवी मुंबई, मुंबई, पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर भागात आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, अधुनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. तिथं बांगलादेशच्या किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. वाऱ्यांचा हा प्रवास पश्चिम- वायव्य दिशेनं पुढे येत असल्यामुळं पुढच्या आठवड्याची सुरुवातही राज्यात पावसानं होण्याची चिन्हं आहेत.

पावसाळी पर्यटनस्थळांवर गर्दी 

पावसाचे एकंदर तालरंग पाहता महाराष्ट्रावर त्याची कृपाच असल्याचं चिन्हं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता वर्षा पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुंबई- पुण्यापासून नजीक असणारे अनेक धबधबे, धरणं आणि तत्सं जलप्रवाहांवर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. माळशेज घाट, आंबोली घाट, वरंध घाटही याला अपवाद ठरत नाहीयेत. पण, पावसाळी दिवसांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता पाहता सध्या प्रशासनही दरड प्रवण क्षेत्रांबाबत सतर्क असून, नागरिकांनाही अशा भागांवर न जाण्याचा सल्ला देताना दिसत आहे. बऱेच घाटरस्ते, धबधबे आणि पावसाळी सहलींच्या ठिकाणी हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. 





Source link

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा


CM Eknath Shinde: कोव्हीड काळात 300 रूपयांची बॅग 2 ते 3 हजारांना खरेदी करण्यात आली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन पालिका आणि ठाकरे गटावर केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली. 

कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटलला काम दिली. डॉक्टर नव्हते तरी कामे घेतली गेली. मढ्याच्या टाळूच लोणी खायचे काम करण्यात आल्याची टिका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मी सूड भावनानं काम करणार नाही पण वस्तुस्थिती धरून मात्र कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

आम्हाला गद्दार म्हणारे पत्र देतात आणि 50 कोटींची मदत मागतात. असे असले तरीही मी तात्काळ पैसे द्यायचे मान्य केले, असेही त्यांनी सांगितले. 

ज्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी देणेघेणे नाही, त्यांना शिवसैनिंकाचे काही पडले नाही. त्यांना फक्त पैसा हवाय, अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. 

विरोधकांमध्ये गोंधळलेली परिस्थितीत दिसते. त्यांच्यात आत्मविश्वास कमी दिसतो. जयंतराव आपल्या सोबत हवे असे मी आधीच म्हटले होते, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील  उद्योग बाहेर गेले असा आरोप करण्यात आला. त्यानंतर  आम्ही श्वेतपत्रिका काढली. अडीच वर्षात महाविकास आघाडी प्रकल्प थांबवले. हे सर्व प्रकल्प इगोमुळे प्रकल्प थांबविले. सगळीकडे आता प्रकल्प सुरू केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

आम्ही फेसबूक आणि घरी बसून काम करणारे सरकार नाही. 24 तास काम करणारे आमचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

दररोज सीएम बदलणार सरकार बदलणार असे बोलत होते. पृथ्वीराज आणि माझे जिल्ह्यातील चांगले संबंध आहेत तरीही सीएम बदलणार असे ते म्हणत राहीले. त्यानंतर आमचे सरकार अधिक मजबूत होत गेले असे मुख्यमंत्री म्हणाले.





Source link

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास



मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp