मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा


Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचा लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं, सरकारने मजा पाहू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू होणार असून, गावागावात आमरण उपोषण (Hunger Strike) केलं जाणार आहे. आमरण उपोषणात कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार असेल असं जरांगे म्हणालेयत. तर आरक्षणासाठी मराठा आमदार, खासदारांनी एकत्र यावं. समाजासाठी आमदार, खासदार मंत्री एकत्र येणार नाहीत त्यांना गावबंदी केली जाईल, बाहेर फिरूही देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.

आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या
एकीकडे आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Marahta Reservation) तरुणांच्या आत्महत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीए. बीडच्या अंबाजोगाईच्या गिरवली गावाक मराठा आरक्षणासाठी 42 वर्षीय व्यक्तीने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडला. या तरुणाच्या आत्महत्यनेतंर मराठा समाज आक्रमक झाला, मृतदेह छत्रपती शिवाजी चौकात ठेऊन मराठा समाजाने आंदोलन केलं. 

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली इथं एका 42 वर्षांच्या व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मराठा समाजाने त्या व्यक्तीचा मृतदेह अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवला आणि आंदोलन सुरु केलं.  मृत तरुणाचं नाव शत्रुघ्न काशीद असं होतं. मराठा आरक्षणासाठी शत्रुघ्न पाण्याच्या टीकावर चढले. पोलसांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. पण शत्रुघ्न यांनी पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत शत्रघ्न यांनी पाण्याच्या टाकीवरुन थेट खाली उडली मारली. यात शत्रुघ्न यांचा जागीच मृत्यू झाला.

शत्रुघ्न काशीद यांनी आत्महत्या केल्यानंतर गावातील मराठा समाज आक्रमक झाला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. शत्रुघ्न काशीद यांच्या पश्चात आईृ-वडिल, पत्नी आणि दोन मुलं आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काशीद यांचा सक्रीय सहभाग होता. 

चोवीस तासात दुसरी आत्महत्या
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी चोवीस तासात आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.  श्री क्षेत्र आळंदी इथल्या इंद्रायणी नदीत मराठा सेवकाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती.  व्यंकट नरशिंग ढोपरे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. लातूर जिल्ह्यातील उंबरदरा गावचे ते माजी सरपंच होते. सध्या पुणे जिल्ह्यातील नरे आंबेगाव इथं वास्तव्यास होते. इंद्रायणी नदीत उडी मारल्याची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री आठ वाजल्यापासून पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरु केली. आज दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. 





Source link

मुंबईतील ‘या’ विभागात पाणी पुरवठा बंद; जलवाहिनी दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम


Mumbai Water Shortage : मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी  के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे. 

 के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गा वरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटी जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे  नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम,  वेरावली जलाशय १ व २ चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुमारे १५ तास के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण  विभागातील खालील नमूद परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

१) के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर,जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राउत रस्ता , पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग , साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग , श्रद्धानंद  मार्ग , नेहरू  मार्ग , तेजपाल  मार्ग , शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व , अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग , मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग , पारसी पंचायत मार्ग , आर. के. सिंग रस्ता , निकोलसवाडी परिसर. 

२) के पश्चिम विभाग – जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग , सहकार मार्ग , बांदिवली हिल.  

३) पी दक्षिण –  राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा) 

पाणी पुरवठा वेळेत बदल 

के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.





Source link

मराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव, तर नांदेडमध्ये खासदाराच्या गाड्या फोडल्या



Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला तर नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्या. हिंगोलीत माजी सहकारमंत्र्यांना गावबंदी करण्यात आली.



Source link

शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा ‘तो’ Video


Maharastra Politics : शिर्डीतील (Shirdi) जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. माजी कृषीमंत्री राहिलेल्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी (Narendra Modi) केली. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला.

पंतप्रधान मोदी राष्ट्र बळकटीचं काम करत आहेत. म्हणून विकासाचा हाच धागा पकडून आपण भाजसोबत गेल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. शिर्डीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मोदींचं कौतूक केलं. मात्र, मोदींनी अजित पवारांसमोर काका शरद पवार यांना टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात (Mahrastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.

किती हा विरोधाभास, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं जयंत पाटील म्हणतात.

पाहा Video

2024 मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. मोदी पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं शिंदेंनी शिर्डीतील जाहीर सभेत बोलताना सांगितलं. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. कितीही लोकं एकत्र आले तरी इंडिया आघाडी मोदींचं काहीच बिघडवू शकत नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.

आणखी वाचा – Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची लवकरच सुटका होणार आहे. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेच आज पंतप्रधानांकडून लोकार्पण होणार आहे. 





Source link

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन



Baba Maharaj Satarkar Death: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.



Source link

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!


Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत आम्हाला त्याला शोधावं लागेल, असं सूचक विधान जरागेंनी केलंय. त्यामुळे आरक्षणापासून मुख्यमंत्र्यांना अडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

मराठा आरक्षणासाठी शपथ घेतल्याबद्दल जरागेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय असं म्हणत चर्चांचा धुरळाही उडवून दिला. त्यामुळे जरांगे-पाटलांचा रोख नक्की कुणाकडे आहे याची चर्चा सुरु झालीय. काही तरी आत शिजतंय. नाही तर त्यांनी शपथ घेतली नसती. 40 दिवस घेतले नसते. विरोध करणारे कोणी तरी आत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

आमच्या अशाच पिढ्या जाणार का शोधायला? त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला तर ते पाळतात हे त्यांची ख्याती आहे. त्यांनी शपथ घेतली. त्याचं कौतुक आहे. आदर आहे. पण आमच्या लेकराबाळांचाही प्रश्न आहे. त्यामुळे थांबणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगेंना सरकारने उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. मात्र जरांगेंनी ती फेटाळून लावलीय. मंत्री गिरीश महाजनांनी उपोषणाला बसलेल्या जरांगेंना फोन केला. उपोषण मागे घेण्याची विनंती महाजनांनी जरांगेंना केली. मात्र सरकारने दोन दिवसांत गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काहीच झालं नाही मग आरक्षणाचं कसं होणार असा सवाल जरांगेंनी महाजनांना केलाय. लेकरांच्या पोटाचा प्रश्न असल्याने आता हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.

आरक्षण घेऊनच या…

दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिल्लीला गेला आहात तर निर्णय घेऊन या. दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही वेळ देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp