श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव

श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव


कुणाल जमादाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर दरोडा (robbery) आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला देखील जखमी केले होते, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र आता या दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पत्नीनेच पतीची हत्या करत बनाव रचल्याचे पोलीस (Shrirampur Police) तपासात समोर आलं आहे.

एकलहरे गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दरोडा पडल्याची माहिती मृताच्या पत्नीने दिली होती. दरोडेखोरांनी पती नईम रशीद पठाण (40) यांचा गळा आवळून खून केल्याचा दावा पत्नी बुशराने केला होता. दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला केल्याचे बुशराने पोलिसांना सांगितले. तसेच त्यांनी घरातून रोख सात लाख रुपये व सोन्याचे दागिने लांबविण्यात अशी माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

नईम पठाण यांस पत्नीने बुशरानेच संपवल्याची हादरवणारी माहिती समोर आली आहे. पती नईमची हत्या केल्यानंतर बुशराने दरोड्याचा बनाव केला होता. बुशराने नईमला झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर त्याचा साडीने गळा आवळल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे.

पोलिसांनी नईमची पत्नी बुशरासह आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रकरणानंतर अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. 

एकलहरे- बेलापूर रस्त्यालगत नईम पठाण यांची शेतवस्ती आहे. नईम हे पत्नी बुशरा व दोन मुलांसह घरी होते. बुधवारी मध्यरात्री रात्री एक ते दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात गेल्या तेव्हा बाहेर दबा धरून बसलेले चार पुरुष व एका महिलेने नईमच्या त्यांना फरफटत घरात आणले आणि जबर मारहाण केली. आरडाओरडा होताच नईम यांना दरोडेखोर घरात आल्याचे दिसले. मात्र काही कळायच्या आत दरोडेखोरांनी ओढणीने त्यांचा गळा आवळला, अशी माहिती बुशराने तिच्या वडिलांना सांगितली होती. बुशराचे वडील अन्वर चिराग शेख यांनी घरी पोहोचून पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला होता. पोलिसांनी सखोल तपास केला असता बुशराने पतीची हत्या केल्याचे समोर आलं आहे. 





Source link

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम



धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.



Source link

‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका


Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत  झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील सामनातून करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत घेतलेल्‍या महत्त्वाच्या निर्णयांमुळेच देशातील सामान्‍य माणसाचे पाठबळ हे केंद्र सरकारच्‍या पाठीशी आहे. परंतु ज्‍यांच्‍या पक्षाला आमदार सोडून गेले, त्‍या पक्षाची आता विश्‍वासार्हता राहिलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वृत्‍तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ उरला नाही,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

“माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक होते. ते आज हवे होते. त्यांनी संजय राऊतचं कर्तृत्व कसं आहे ते सांगितलं असतं. मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचं प्रकरण सुरु आहे. असे लोक माझ्यावर जर आरोप करत असतील तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बोलायचं? अशा लोकांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते हेच आश्चर्यकारक आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे,” असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

विखे पाटलांनी फेटाळले आरोप

“ज्या विरोधकांनी आमच्यावर कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचे आरोप केले आहेत, ते गेली अनेक वर्ष असे आरोप करत आहेत. त्यांच्या अनामत रकमा देखील कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी जप्त केल्या आहेत. प्रवरा शेतकरी सहकारी सोसायटी एवढी मोठी स्थापन केली, ती अवसायनात काढली. तिचं वाटोळं झाले आहे. याला जबाबदार असणारे लोक आता आमच्यावर आरोप करत आहेत. या म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” असे विखे पाटील म्हणाले.

संजय राऊतांनी काय म्हटलं?

“विखे पाटलांवर अनेक आरोप आहेत. विखे पाटलांचे अनेक उद्योग आहेत. या संदर्भात आपण या आधीच बोललो आहे, पण प्रवरा सहकारी साखर कारखान्यात झाकीर नाईककडून आलेले पैसे हा कळस आहे. याची माहिती आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना कळवली असून सरकार बरोबर असलेल्या अनेक मंत्री आमदारांनी आणि साखर सम्राटांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. या सगळ्या घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.





Source link

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात… चार जणांविरोधात गुन्हा दाखल

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात… चार जणांविरोधात गुन्हा दाखल


सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन नाही तर चक्क चारजणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे अपवादात्म प्रकरण असल्याने राज्याभरात चर्चेचं कारण ठरलं आहे. 

काय आहे नेमकी घटना?
पोलीस ठाण्यात  शर्टचं बटन उघडे ठेऊन येणं चार जणांना चांगलंच अंगलट आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी (Public Places) असभ्य वर्तन केल्याच्या कलमाखाली चार जणांविरोधात चक्क गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशनमधील (Loha Police) ही घटना आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी लोहा पोलीस ठाण्यात हे चार जण आले होते.  कुणी केसच्या संदर्भात आले होते, तर कुणी काही कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आले होते. पण यावेळी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांना या व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये शर्टचं वरचं बटन उघडे ठेऊन आल्याचं दिसलं. 

या चौघांविरुदध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी कलम 110, 112 आणि 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तसंच शिस्तीचे ठिकाण आहे. या ठिकाणी शर्टचं बटन उघडे ठेऊन आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निर्माण निरीक्षक ओमकांत चींचोलकर यांनी सांगितलं.

मित्राच्या खुनाचा उलगडा
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी एका खुनाची उकल केली आहे. पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने दोन मित्रांनी आपल्याच एका मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच मृतदेह पिंपरीच्या नाशिक फाट्यावरुन खाली फेकून दिला. सहा महिने या हत्येबाबत कोणालाही थांगपत्ता लागला नाही. पण सहा महिन्यांनी मृत तरुणाच्या आईने वाकिस पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी मृत दिनेश कांबळे हा मृत्यूच्या दिवशी सिद्धांत पाचपंडे आणिक प्रतीक सरवदे या दोन मित्रांबरोबर दारू पित होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सिद्धांत आणि प्रतीक या दोन मित्रांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसी खाक्या दाखवतात दोघांनी दिनेश कांबळेच्या हत्येची कबुली दिली. सिद्धांत प्रतीक आणि मृत दिनेश कांबळे काळेवाडी परिसरात दारू पित असताना दिनेशने प्रतिकच्या पत्नी बद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे संतापलेल्या प्रतीकने दिनेशच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने हल्ला केला. जखमी दिनेशला त्यानंतर थेट नाशिक फाट्याच्या पुलावरून खाली फेकून दिलं. त्यांच्या अंगावर अनेक गाड्या गेल्याने त्याला ओळखणे ही अवघड झाले होतं. 





Source link

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?



 कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे, पोलिसांनी यांना नोटीस देखील बजावली आहे. 



Source link

अवघ्या दीड दिवसात का केलं जातं गणरायाचं विसर्जन? ‘दीड दिवसांच्या गणपती’ची प्रथेची रंजक गोष्ट

अवघ्या दीड दिवसात का केलं जातं गणरायाचं विसर्जन? ‘दीड दिवसांच्या गणपती’ची प्रथेची रंजक गोष्ट


पुढील
बातमी

Viral Video : पाव्हणं जेवला काय? ‘या’ पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल





Source link

YouTube
Instagram
WhatsApp