Mahad Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य
गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर
Updated: Feb 7, 2023, 10:12 PM IST
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक; बहिणीला छेडल्यामुळं याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर आणि त्याच्या बहिणीवर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील सिडको भागातील बुरकुले हॉल परिसरात घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामध्ये दोघंही बहीण- भाऊ जखमी झाले. भाऊ उमेश भुजबळ याला या हल्ल्यात हातवर, कमरेवर आणि डोक्यावर मार लागला आहे. तर, बहीण प्रीती हिच्या हातावर कोयत्याचा वार लागला आहे. (Nashik News)
हल्ल्यानंतर जखमी उमेश भुजबळ आणि त्याच्या बहिणीला जिल्हा शासकीय रुग्णायलाय नेत त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टोळक्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रीती क्लासवरून घरी परतत असताना काही मुलं सिडको परिसरातील बुरकुले हॉलच्या भागात बसली होती. यावेळी प्रीतीला पाहून त्यांनी अश्लील हावभाव केले, तिला चिडवलंही. घडला संपूर्ण प्रकार तिनं तिच्या भावाला सांगितला. भाऊ जेव्हा बहिणीसोबत घडल्या प्रकरणाचा जाब विचारायला गेला तेव्हा तिथं बसलेल्या तावळखोरांनी आपल्याजवळ असलेला कोयता बाहेर काढला आणि त्याला मारायला सुरुवात केली.
भावाला होणारी मारहाण पाहून या तरुणीनं टोळक्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यावेळी या टवाळखोरांनी तिच्यावरदेखील कोयत्यानं हल्ला चढवला. ज्यामध्ये तीसुद्धा जखमी झाली. घटना इतकी गंभीर होती, की यातून ती अद्यापही सावरलेली नाही.
नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचताच त्यांच्याकडून आता या टोळक्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांत्याकडून आणि हल्ल्यात जखमी झालेल्या भाऊ- बहिणीकडून करण्यात येत आहे. सदरील घटना पाहता सध्याच्या घडीला गुंडगिरी आणि हुल्लडबाजांना कुठंतरी धडा शिकवला पाहिजे असाच सूर नागरिकांमधून आळवला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. इतकंच नव्हे तर, पोलिसांचा धाक गुंडांना राहिला आहे की नाही..? हा प्रश्नही संतप्त नागरिकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.
Updated: Feb 6, 2023, 08:29 PM IST
Balasaheb Thorat ,Nana Patole,
Pune Bypoll: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या भाजप (BJP) पूर्ण प्रयत्न करतान दिसत आहे. तर दुसरीकेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विनंती केली होती. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्विट करत त्यांनी (Maharastra Political News) माहिती दिली आहे. (Pune Bypoll Election Kasba Peth and Chinchwad Bypoll Election will not uncontested Nana Patole tweeted Maharastra Political News)
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election) विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असं नाना पटोले (Nana Patole Tweet) यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 5, 2023
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची (BJP candidates) घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने (Hemant Rasne) आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांच्या ट्विटमुळे (Nana Patole On Pune Bypoll) आता निवडणुकीचा थरार पहायला मिळणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती. तर राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्राचा कागद दाखवून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीनेही (MVA) निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या इगतपुरीमध्ये (Nashik Igatpuri) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेचा (superstition) डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार समोर आलाय. भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना गाव सोडण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे.
इगतपुरीच्या धारगावमधल्या भोरवाडी आदिवासी पाड्यावर एका लहान बालकाचा मृत्यू झाला. मात्र, या बालकाचा मृत्यू भूतबाधा केल्यानं झाल्याचा आरोप करत एका कुटुंबाने इतर आठ कुटुंबांची झोप उडवली. हे कुटुंब नेहमी शिवीगाळ करुन भांडण उकरून काढत होतं. अखेर या आठ कुटुंबांना राहतं घर सोडण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थितीसमोर हतबल या आठ कुटुंबांनी घराची मोडतोड करत पाठीवर संसार घेत स्थलांतराला सुरुवात केली. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली.
मुलाच्या मृत्यूनंतर भुताटकी केली जात असल्याचे कारण देत सातत्याने होणाऱ्या छळास वैतागून इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी येथील आठ कुटुंबांनी आपल्या घरांची मोडतोड करीत स्थलांतर केले आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील आदिवासींच्या मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूतअजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
भोरवाडी येथील एका कुटुंबातील आजारी असणाऱ्या बालकाचा मागील महिन्यात मृत्यू झाला. भुताटकी केल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या परिवाराने गावात आठ कुटुंबांचा छळ सुरू केला. सातत्याने होणाऱ्या वादास वैतागलेल्या या आठ कुटुंबांनी अखेर वाद वाढल्याने याबाबत घोटी पोलिसांत धाव घेतली आणि आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या गावातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगूबाई खडके, शांताराम खडके यांच्यासह अन्य दोन कुटंबांनी आपल्या राहत्या घरांची मोडतोड करीत पाठीवर संसार साहित्य घेत स्थलांतर केले. या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यातील अंधश्रद्धेच्या प्रकाराची नव्याने चर्चा सरु झाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील भूतकाळ भूताटकीच्या प्रकाराने छळ झाल्याने ग्रामस्थांनी घर सोडून पलायन केले. या घटने विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करून आरोप करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर, स्थानिक महिलांनीही याबाबत न्याय देण्याची मागणी केली आहे.