शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू; नांदेडमधील घटनेने एकच खळबळ
Nanded News Today: शेताला लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Source link
Nanded News Today: शेताला लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Source link
nashik bans mobile phones for teachers : मोबाईल ही काळाची गरज आहे.. संवाद साधण्यासाठी, महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र याच मोबाईलच्या वापराचा अतिरेकही दिसून येतो. अनेक जण कुठेही, केव्हाही मोबाईल वापरतात. मात्र, त्याचा त्रास इतरांना होतो. अगदी शाळेतही मोबाईलचा वापर होऊ लागलाय. मात्र नाशिक महानगरपालिकेने यावर मोठा निर्णय घेतलाय. शाळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे.
शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हा इशारा विद्यार्थ्यांना नाही तर थेट गुरुजींनाच देण्यात आलाय. ऐकून धक्का बसला ना. मात्र, हे खरं आहे. नाशिक महानगरपालिकेने गुरुजींना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी करण्यासाठी पाऊल उचललंय. महानगरपालिकेच्या शाळेत गुरुजींना मोबाईल बंदी लागू होणार आहे.
अनेक गुरुजी शाळेमध्ये शिकवण्याऐवजी मोबाईलवर व्यस्त असतात.. मोबाईलवर बोलत राहणे, शेअर मार्केटचे व्यवहार करणे, गेम खेळणे, चॅटिंग करणे यात आपला वेळ वाया घालवत असल्याचं समोर आलंय.. त्यामुळे आता मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना शिकवत असताना फोन आल्यावर शिकवण्यात अडचण येऊ शकतो. वर्गात मोबाईलवर बोलणा-या शिक्षकांमुळे विद्यार्थीही त्याचं अनुकरण करु शकतात. शिक्षकांसारखेच विद्यार्थीही वर्गात मोबाईल वापरू शकतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या प्रयत्नात व्यत्यय येऊ शकतो.
या निर्णयामुशे गुरुजींनी शाळेत येताना आपले मोबाईल मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जमा करण्याची सक्ती करण्यात आलीय.. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिका-यांनी तसे आदेशच जारी केलेत… याची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली जाणार आहे.. शाळांमध्ये अचानक पाहणी करून वर्ग सुरू असताना शिक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याआधी सोलापुरात शाळेच्या वेळेत गुरुजींना मोबाईल वापरण्यावर निर्बंध लादण्यात आलेत. त्याच्या शिक्षेचं स्वरुपही ठरवण्यात आलं होतं.
शाळा व्यवस्थापन समिती दंडाची रक्कम ठरवणार. पहिल्यांदा नियम मोडल्यास 100 रुपयांचा दंड वसूल करणार. दुस-यांदा नियम मोडल्यास 200 रुपयांचा दंड वसूल करणार. दोनवेळा दंडात्मक कारवाई होऊनही मोबाईल वापरल्यास मोबाईल जप्त करणार शिक्षकांना शाळेत तर मोबाईल घेऊन येता येईल. मात्र, शिकवताना किंवा शाळेच्या व्हरांड्यात मोबाईल वापरण्यास मनाई असेल.. विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेऊन याचं अनुकरण करु नये म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आलंय..
Maharashtra Reservation : धुळ्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेलाय. धुळ्यात आंदोलन करत असताना मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला आहे.
Source link
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली वक्तव्ये चर्चेत येत आहेत.
Source link
Kalyan News : कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. एका गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी महापालिका रुग्णालयाने चक्क नकार दिला. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या महिलेची प्रसुती झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली.
कल्याण स्कायवॉकवर राबिया साधू सिद नावाच्या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तेव्हा नागरिकांनी तसंच स्टेशनवरच्या हमालांनी पोलिसांच्या मदतीने एका हातगाडीवर या महिलेला मनपा रुग्णालयात आणलं. मात्र तिथल्या डॉक्टर्सनी या महिलेला दाखल करुन करुनही घेतलं नाही.. तसंच स्टाफ नसल्याचं सांगत प्रसुती करण्यासही नकार दिला. अगदी पोलिसांची विनंतीही रुग्णालयाने धुडकावून लावली. अखेर महिलेची प्रसुती रुग्णालयबाहेर झाली आणि तीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.. मात्र रुग्णालयाच्या या मुजोर कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
कल्याणच्या रुक्मिणीबाई महापालिका रुग्णालयात आता ठाकरे गट आणि मनसेनं ठिय्या आंदोलन केले. या रुग्णालयाने एका गरोदर महिलेच्या प्रसुतीला नकार दिला होता. त्यानंतर महिलेची रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती झाली. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालीय. जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ठाकरे गट आणि मनसेने दिला आहे.
कल्याण स्कायवॉकवर एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी हमालाच्या मदतीने तातडीने त्या महिलेला हातगाडीवर टाकून महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने रुग्णालयात स्टाफ नसल्याचे कारण देत तिची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलिस आणि हमालांनी विनंती करुन देखील रुग्णालयाने महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही.अखेरी त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली आहे. प्रसूती झालेल्या महिलेचे नाव राबिया साधू सिद असे आहे. तिला मुलगी झाली आहे. या घटनेवरुन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
राबिया सीद ही महिला गराेदर होती. तिला स्टेशन परिसरातील स्कायवॉकर प्रसूतीच्या वेदना सुरु होताच हा प्रकार नागरीकांनी पाहिला. तिची अवस्था पाहून नागरीकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉकगाठला. तिची अवघडलेली अवस्था पासून तातडीने तिला हातगाडीवर ठेवले. हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुक्णीबाई रुग्णालयात आणले. त्याठिकाणी रुग्णालयातील उपस्थितीत स्टाफने त्यांच्याकडे प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. अहो महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती पश्चातही रुग्णालय बधले नाही.
या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही. महिलेची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाली आहे. प्रसूतीनंतर रुग्णालयाने तिला तिच्या नवजात मुलीसह एका लहान रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले.
दरम्यान घडल्या प्रकाराविषयी रुग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कुणाला बांधिल नाही. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय आम्ही कोणाला उत्तरे देणार नाही. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार नकार दिला.
Bogus Seeds of Indrayani Rice : बोगस बियाणांचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पसरलंय. मावळमध्ये चक्क इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकण्यात आलं. त्यामुळं शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान कसं झालं असून गरीब शेतकरी देशोधडीला लागला आहे.
Source link