शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण…; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान

शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण…; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी असा सल्ला त्यांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पूनावाला यांनी दिला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं. सायरस पूनावाला यांनी अशावेळी विधान केलं आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांसह गेलेल्या नेत्यांचंही शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी असं मत जाहीरपणे मांडलं आहे. त्यातच आता सायरस पूनावाला यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे. 

सायरस पूनावाला यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचं कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी शरद पवारांना निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला. शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. त्यांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घ्यावी असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत. 

“शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. त्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते फार हुशार असून, जनतेची सेवा करु शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घ्यावी,” असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.

शरद पवारांनी जाहीर केली होती निवृत्ती

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी (2 मे 2023) निवृत्ती जाहीर केली होती. राजकीय जीवनात तीन वर्षे शिल्लक असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवारांनी केली होती. शरद पवारांच्या या निर्णयाला मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण यावरुन अजित पवार नाराज झाले आणि बंड पुकारत भाजपात सहभागी झाले. 

तुम्ही निवृत्त कधी होणार? अजित पवारांनी केली होती विचारणा

अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारल्यानंतर शरद पवारांना तुम्ही निवृत्त कधी होणार आहात? अशी विचारणाच केली होती. “कॉर्पोरेट नोकरीत निवृत्तीचं वय 58 असतं. अधिकाऱ्यांसाठी 60 वर्षं आहे. भाजपात 75 वर्षानंतर निवृत्त केलं जातं. मग तुम्ही निवृत्त कधी होणार? 2 मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो सांगितलं होतं. मग अचानक निर्णय मागे का घेतला? मागे घ्यायचा होता तर मग राजीनामा कशाला दिला?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली होती. 

“शरद पवार यांना नेमका कशाचा हव्यास आहे? वय वर्ष 82 झालं तरी ते थांबण्याचं नाव घेत नाहीत. ते निवृत्त का होत नाही?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली होती. 

 

शरद पवारांचं उत्तर

अजित पवारांच्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिलं होतं. “कुणी 82 म्हणो की 92 … मी जोपर्यंत सक्षम आहे, माझं काम जोमाने करत राहणार, इथे थांबणे नाहीच”, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. 





Source link

संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं

संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं


कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगमनेरच्या (sangamner) कोल्हेवाडी गावातील एका तरुणाचा ठरलेला विवाह गावातीलच एका व्यक्तीने मोडून स्वतःच लग्न त्याच मुलीबरोबर ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्या तरुणाला बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर  तरुणाने टोकाचा निर्णय घेत थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

कोल्हेवाडीतील नितीन सिताराम खुळे (वय 32) या तरुणाने सोमवारी वडगावपान शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी या तरुणाने त्याच झाडाखाली बसून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर नितीनने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

याशिवाय त्याच्याजवळ एक डायरी देखील आढळून आली आहे. या डायरीमध्ये नितीनला इतक्या टोकाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणाऱ्या काही लोकांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी तब्बल 30 तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. शेवटी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास संगमनेर पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

नितीन खुळे याला लग्नासाठी त्याच्या कुटुंबियांनी मुलगी पाहिली होती. मात्र मुलीच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडले, असे सांगितले. मात्र त्याच मुलीचे लग्न संदीप शिवाजी दिघे याच्या बरोबर होणार असल्याचे कळाल्याने नितीन यास राग आला. नितीनने संदीप याला शिवीगाळ केली. त्यानंतर नितीनला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून घेण्यात आले होते. त्यावेळी नितीनला अमोल अप्पासाहेब दिघे, राजेंद्र देवराम दिघे, जालिंदर मच्छिंद्र दिघे, राहुल भास्कर दिघे, सुधाकर बलसाने यांनी बोलावून दमदाटी केली. थोड्या वेळात नितीन रडत बाहेर आला. त्यानंतर त्याने जंगलातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

“पोलीस निरीक्षकांकडे मी त्या दिवशी सुद्धा रात्री आलो होतो. मला लोकांनी इतका त्रास दिलेला आहे. राजकारणाचा धाक दाखवून गावातील लोकांवर अन्याय करण्यात आला आहे. माझी आत्महत्या करण्याची इच्छा नाही. आई वडिलांचे माझ्यानंतर काय होईल याचीही मला कल्पना नाही. पण या लोकांनी मला एवढा त्रास दिला. ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नाही. मी एक सर्वसामान्य अतिशय गरीब घरातील मुलगा आहे. माझ्यासोबत गावातील कोणीही व्यक्ती नाही. माझी विनंती आहे की कोणत्याही राजकारणाला बळी न पडता माझ्या आई वडिलांना न्याय देण्यात यावा,” असे नितीन खुळे याने शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“नितीनचं लग्न जमलेलं असताना गावातील एकाने त्या मुलीला पाहिलं. त्या मुलीला आम्ही मोबाईल आणि 50 हजार रुपये दिले होते. मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीने मुलीला त्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवले. त्यानंतर दोघांचे लग्न जमलं आणि आम्हाला नकार दिला. त्यामुळे वाद वाढत गेला. त्यानंतर आम्ही वाद मिटवून घेतला. सगळं सुरळीत चाललं होतं. पण त्यांनी मुलाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवून घेतलं आणि दम दिला. दम दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली,” असे नितीनच्या आईने सांगितले.

कुटुंबियांच्या फिर्यादीवरून प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध कलम 306, 504, 506, 34 प्रमाणे संगमनेर‌ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

‘ट्विन टनेल’ फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट

‘ट्विन टनेल’ फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट


Eknath Shinde : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच ‘ट्विन टनेल’ उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नीति आयोगाच्या मदतीनं मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं येत्या डिसेंबरमध्ये मुंबई विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडण्यात येईल, अस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता 

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीनं मुंबईचा विकास करण्यासाठी नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली.  त्याशिवाय मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे उभारणार

गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केल्याने अनेक विकास कामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळालेय. 2024 पर्यंत त्यातले अनेक प्रकल्प पूर्ण होतील. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंक तसेच कोस्टल रोड अशी उदाहरणे दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे लवकरच उभी राहतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

मरीन ड्राईव्हप्रमाणे पूर्व सागरी किनाराही विकसित करणार

केंद्राच्या समन्वयाने मुंबई आणि परिसराचा आर्थिक विकास करण्यासाठी प्राधान्याने पाऊले टाकली जातील. पोर्ट ट्रस्टकडे केंद्राच्या मालकीची भरपूर जागा आहे. तिचा सुयोग्य वापर करून मुंबईच्या आर्थिक विकास प्रक्रियेत मोठा उपयोग करून घेता येऊ शकतो. केंद्राशी याबाबतीत समन्वय ठेऊन पाठपुरावा केला जाईल. मरीन ड्राईव्हप्रमाणे पूर्व सागरी किनाराही विकसित आणि सुंदर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ठाणे – भिवंडी – कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाचा आढावा 

मुंबई मेट्रो मार्गिका 4, 4 ए, आणि 11 साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे – भिवंडी – कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करणार

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.





Source link

तुम्ही ‘असे’ पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त

तुम्ही ‘असे’ पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त


Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.

5 जुलै रोजी कर्नाटक येथून एक टेम्पो बनावट पनीर घेऊन पुण्यात येत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक 1 ला मिळाली. या टेम्पोला कात्रज चौकात गाठायचा निर्णय घेण्यात आला. नियोजन ठरले. त्यानुसार दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी, अन्न-प्रशासन विभागातील कर्मचारी सज्ज झाले. त्यांनी कात्रज चौकात सापळा रचला आणि मोठ्या शिताफिने टेम्पो ताब्यात घेतला. 

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी पंचासह टेम्पोची पाहणी केली. यामध्ये त्यांना टेम्पोत तब्बल 4 हजार 970 किलोग्रॅम सुट्टे पनीर आढळले. हे पनीर पुण्यातील विविध भागांमध्ये पोहोचवले जाणार होते. त्याआधीच ही कारवाई करण्यात आली.

‘दान द्या’ म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार

यानंतर पनीरचे सॅम्पल तपासणीसाठी नॅशनल ऍग्रीकल्चर अँड फूड अनॅलिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बाणेर येथे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

या कारवाईत दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक 1 ने कर्नाटक येथून पुण्यात आणले जाणारे 10 लाख किमतीचे 4 हजार 970 किलोग्रॅम बनावट पनीर जप्त केलं आहे.

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

यातील काही पाकिटामधील पनीर हे भेसळ असल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यानुसार हे पनीर नष्ट करण्यात येणार आहे.

ही कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील यांनी केली.





Source link

चोरवाटेने गेला आणि जीव गमावून बसला; खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर घडली विचित्र घटना

चोरवाटेने गेला आणि जीव गमावून बसला; खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर घडली विचित्र घटना



खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर बंदी असतानाही पर्यटक येथे जात आहेत. नजर चुकवून येथे आलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 



Source link

‘काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…’, ‘भाजपाच्या पलंगावर…’; अजितदादांवर हल्लाबोल

‘काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…’, ‘भाजपाच्या पलंगावर…’; अजितदादांवर हल्लाबोल


Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील आपल्या भाषणामध्ये केलेल्या, ‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही’ या विधानावरुन उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. अजित पवार हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कधी बारामतीच्या होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही अशी आठवण ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून करुन दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकलेत हे बारामतीकरांना ठाऊक असल्याचंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

‘शाहू, फुले, आंबेडकरांचे हे विचार नक्कीच नाहीत’

“विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले? बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, ‘‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत’’. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता. शाळांतून द्वेषाचे धडे कसे दिले जात आहेत ते उत्तर प्रदेशातील एका प्रकरणावरून उघड दिसते. शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम विद्यार्थ्यास शाळेतल्या त्याच्या वर्गमित्रांनी बेदम मारहाण केली. असे विष आज समाजात सर्वत्र पसरवले जात आहे व हे शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार नक्कीच नाहीत,” असा टोला ठाकरे गटाने अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ घेत भाजपाला लगावला आहे.

अजित पवारांना सत्काराचे वेड जडले

“आज सर्वच पातळ्यांवर संविधानाची मोडतोड करून एक प्रकारे हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला आहे. त्यामुळे भाजपासोबत गेलेले अजित पवार हे डॉ. आंबेडकरांचा कोणता विचार पुढे नेऊ इच्छितात हे त्यांनी महाराष्ट्राला खुलेपणाने सांगायला हवे. शनिवारी बारामतीत अजित पवार यांचे जंगी स्वागत झाले. बारामतीच्या होमग्राऊंडवर अशा स्वागताचा थाटमाट करून घ्यावा असे अजित पवार यांना का वाटावे? आतापर्यंत किमान चारवेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व शरद पवार यांच्या कृपेने त्यांना ही सर्व सत्तेची पदे मिळत गेली. त्यावेळी अजितदादांनी होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही. उलट त्यांनी कार्यकर्त्यांना जरबेत सांगितले की, ‘‘सत्कार, हारतुरे  वगैरे नकोत. कामाला लागायचे आहे.’’ पण भाजपाच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे वेड जडले आहे,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…

“महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अजित पवार यांची फिरकी घेतली आहे. ‘‘अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात. मला त्यांची दया येते.’’ कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांची अशी खिल्ली उडवू नये. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर बसून त्यांनी राजकारण केले. तो त्यांचा कंडू अद्यापि शमलेला दिसत नाही. अजित पवार यांनी भगतसिंहांना चोख उत्तर द्यायला हवे, पण तेवढे बळ त्यांच्यात आहे काय? भाजपा जे लिहून देईल त्याच अजेंड्यावर त्यांना काम करायचे आहे व शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार त्या अजेंड्यावर नाहीत. पुन्हा कोश्यारी यांना अजित पवार यांची दया येते, पण फौजदाराचे हवालदार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची दया येत नाही. अजित पवार यांचे जे सांगणे आहे की, मला सत्तेची हाव नाही. ते खरे असेल तर त्यांनी आमदारांना गोळा करून आपल्या काकांचा पक्ष का फोडला? जो पक्ष काकांनी स्थापन केला त्याच काकांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून का हाकलले? आता सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे की, ‘‘अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,’’ सत्तेची हाव नसल्याचे हे लक्षण अजिबात नाही. अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारण संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी स्वतःचा नवीन जागतिक पक्ष स्थापन करून वेगळे राजकारण केले असते, पण अजित पवारांना सर्वच आयते मिळाले,” असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

शिंदे व अजित पवार उदात्त विचाराने बाहेर पडलेले नाहीत

“एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाने जे अचाट, पण बुळेगिरीचे काम करून घेतले तेच काम अजित पवारांकडून करून घेतले. मुळात शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष राहू शकतो. मात्र भाजपाने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ‘घाव’ घातला म्हणून तुमची ही सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली आहे, हे या पक्षांवर बेगडी दावा सांगणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे. शिंदे व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते,” असं या लेखात म्हटलं आहे.

‘‘आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा…”

“प्रश्न राहिला विकासाचा वगैरे. शिंदे-अजित पवारांच्या विकासाच्या व्याख्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची फसवणूक आणि लूट आहे. आपापल्या गटातील फुटीर आमदारांनाच कोट्यवधीचा निधी द्यायचा व त्या निधीच्या कमिशनबाजीतून महाराष्ट्रात बेइमानाचे बीज वाढवायचे. जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही, तेथील मतदारांना विकासापासून दूर ठेवायचे अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपाच्या गोठ्यात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ‘‘आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील.’’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल! सत्तेची भूक तोपर्यंत सगळ्यांनीच शमवून घ्यावी हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला!,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp