TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार


TMC Job 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये बंपर भरती सुरु असून उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून या भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड येणार आहे.

ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी. पदव्युत्तर पदवी, डी.एन.बी. पदव्युत्तर पदवी. डिप्लोमा,FCPS, एम.बी.बी.एस पदवी आणि दंतचिकित्सा बी.डी.एस. पदवीसह एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे एकत्रित विद्यावेतन लागू राहणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत M.M.C/M.S.D.C चे वैध प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हे जोडले नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

राखीव संवगीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास या जागेवरील नेमणुकणीकीसाठी इतर उपलब्ध उमेदवारांची गुणानुक्रमे नेमणुक करण्यात येणार आहे. 

SEBC/EWS संवर्गातील अर्जदारास शासन निर्णयानुसार पुरावा सादर करावा लागेल. तसेच (विजा / भज, इमाव, विमाप्र या उमेदवारांनी नुतनीकरण झालेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्या. 

ठाणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट www.thanecity.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पात्र अर्जदारांची निवड यादी महानरपालिकेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. 

उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार 144 रुपये ते 76 हजार 587 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना ठाण्यात नोकरी करावी लागेल. थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे येथे उपस्थित रहावे लागेल. अर्ज अपूर्ण असल्यास तो रद्द ठरविण्यात येईल.

आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती

आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. आयआयटी मुंबईच्या नोटिफिकेशननुसार, प्रोजेक्ट रिसर्च सायन्टिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुख्यतः प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. आयआयटी बॉम्बेने वरील-उल्लेखित पदासाठी फक्त 1 रिक्त जागा सोडली आहे. 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पात्रता आणि अनुभवानुसार रु. 42,000 ते रु 84,000 (लेव्हल PR-O2) पर्यंत मासिक पगार मिळेल. निवडलेल्या उमेदवाराला “लक्ष्यित उपसंच निवड आणि सक्रिय अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण वापरून भाषण ओळखण्यात निष्पक्षता” या शीर्षकाच्या प्रकल्पावर काम करावे लागेल.





Source link

‘स्पेशल 26’ पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला

‘स्पेशल 26’ पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला



क्राईम पट्रोल, सावधान इंडिया सारखे क्राईम शो पाहून गुन्ह्यांचे प्लानिंग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता नवी मुंबईत एका गँगने  ‘स्पेशल 26’ चित्रपट पाहून 34 लाखांचा डल्ला मारला आहे. 



Source link

पाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

पाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज


Maharashtra Weather News : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच थैमान घालणाऱ्या पावसानं आता अखेरच्या टप्प्यातही धुमाकूळ घातल्यानंतर काहीशी उसंत घेतल्याचं चिन्हं आहे. सतत बरसणाऱ्या वरुणराजानं रविवारीसुद्धा मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विश्रांती घेतली. हे असंच काहीसं चित्र येत्या दिवसांमध्येही पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं लख्ख सूर्यप्रकाशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेकांनाच मोठा दिलासाही मिळणार आहे. थोडक्यात हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर काही अंशी कमी होणार आहे. ज्यामुळं विस्कळीत झालेलं जनजीवन पुन्हा एकदा रुळावर येईल. 

पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील घाटमाथा आणि कोकण पट्ट्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर, विदर्भामध्येही पाऊस नमतं घेण्याची चिन्हं आहेत. जुलै महिना गाजवणारा हा पाऊस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये किमान बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणांवरून पूर ओसरून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. 

उर्वरित राज्यात काय परिस्थिती?

कोकणाच्या काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांच मध्यम पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ठाणे, पालघर, पुणे, सातारा भागातही अशीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मराठवाड्यात पुढच्या 24 तासांच पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज आहे. 

एकाएकी महाराष्ट्रात कुठून आलेला इतका पाऊस? 

जुलै महिन्यात पावसानं जोर धरला आणि अनेकांनाच धडकी भरली. काहींना तर, हा पाऊस आला तरी कुठून असा प्रश्नही अनेकांनीच केला. हवामान खात्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं. मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये जेव्हा खंड येतो तेव्हा हिमालयाच्या पायथ्यासह सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्याभागांमध्ये पाऊस वाढते असं त्यांनी स्पष्ट केलं. तज्ज्ञांच्या मते पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये सरासरी ओलांडली असून, ही आकडेवारी खालीलप्रमाणे…. 

मुंबई – 71.41 टक्के 
शहर- 70.26 टक्के 
उपनगर – 68.85 टक्के 

दरम्यान, पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळं आजारपणंही दूर जातील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र ही परिस्थिती आटोक्यात येण्याचं चित्र आहे. त्यामुळं पावसा आता तू जरा विश्रांती घेच!, असाच सूर अनेकजण आळवताना दिसत आहेत. 





Source link

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?


Dharmveer Anand Dighe: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) हे नाव तसं महाराष्ट्राला परिचित आहे. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत आहे. बंड पुकारल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आनंद दिघे यांच्याही नावाचा उल्लेख करत आहेत. पण यानिमित्ताने अनेक जुने मुद्देही उरकून काढले जात आहेत. नुकतंच संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्या निधनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही माणूस हजर का नव्हता? अशी विचारणा केली आहे. तसंच ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाही, ते बदला घेतील असं म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाण साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता याची चर्चा सुरु झाली आहे. 

संजय शिरसाट काय म्हणाले आहेत?

“खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. काल भाषणात अनेकांनी दिघे यांचे नाव घेतले. माझा प्रश्न आहे त्यांना, जेव्हा दिघे साहेब गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही माणूस हजर का नव्हता ते सांगा. त्यांच्या अंत्ययात्रेला जायला वेळ नव्हता का? काय कारण होतं? त्यांना माहिती होतं की, अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगडाने मारतील.  म्हणून आम्हाला शिकवू नका,” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. 

“ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. ते बदला घेतील. दिघे साहेबांचं कर्तृत्व यांना पुसता येणार नाहीय दिघे साहेबांचा घातपात झाला हे ठाणेकरांना माहित आहे. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला,” असा जाहीर आरोपच संजय शिरसाट यांनी केला आहे. 

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सूपूत्र निलेश राणे यांनीही आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते, असा आरोप केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांनीही आनंद दिघे यांच्या निधनासंबंधी बोलताना योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही असं विधान केलं होतं. 

आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला?

एकनाथ शिंदे यांनीच आनंद दिघे यांचं निधन कसं झालं याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, “गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांचा 19 ऑगस्टला अपघात झाला. ते पहाटेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांकडे फिरत असत. त्याचवेळी हा अपघात झाला होता. कारमधून जात असताना एसटी आणि कारचा अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले होते. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांच निधन झालं अशी माहिती समोर आली” 

दरम्यान नेत्यांची वेगवेगळी विधानं, आरोप-प्रत्यारोप यामुळे आनंद दिघेंच्या निधनाबाबत नेहमी उलटसुलट चर्चा रंगत असतात. सध्या संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे ही चर्चा नव्याने सुरु झाली आहे. 





Source link

Uddhav Thackeray: ‘राष्ट्रपतींना संवेदना आहेत का? महिलांची अब्रू लुटली तरी..’; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ कडाडली!

Uddhav Thackeray: ‘राष्ट्रपतींना संवेदना आहेत का? महिलांची अब्रू लुटली तरी..’; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ कडाडली!


पुढील
बातमी

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी





Source link

YouTube
Instagram
WhatsApp