'तिघांच्या आयुष्याची भट्टी लागू दे…' अघोरी प्रकाराने कोल्हापूर पुन्हा हादरले! पतीने सोडचिठ्ठी द्यावी म्हणून स्मशानभूमीत…

'तिघांच्या आयुष्याची भट्टी लागू दे…' अघोरी प्रकाराने कोल्हापूर पुन्हा हादरले! पतीने सोडचिठ्ठी द्यावी म्हणून स्मशानभूमीत…


प्रताप नाईक, झी मीडिया

Kolhapur Crime News: कोल्हापूरात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याभरापूर्वी कोल्हापुरात अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पतीला सोडचिठ्ठी द्यावी, म्हणून हा अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरमधल्या स्मशानभूमीत हा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. 

कोल्हापुरात अंधश्रद्धेमुळे स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच पुरोगामी म्हणून असणारी जिल्ह्याची ओळख आता पुसट होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आलाय. एका महिलेने आपल्या पतीपासून ‘सोडचिठ्ठी’ देऊन वेगळं व्हावं आणि आणखी तिघांचे आयुष्य उद्ध्व्स्त होण्यासाठी हा अघोरी प्रकार केला गेल्याचा संशय आहे.

भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. काही मंडळी साफसफाईसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद मिळून आला. त्यावेळी तिथे एक कागददेखील सापडला. हा कागद उघडून वाचला असता त्यावर एका महिलेचे नाव नमूद करुन सोडचिठ्ठी द्यावी असा मजकूर लिहलेला आहे. 

तसंच, त्या चिठ्ठीत आणखी तिघांची नावं लिहून त्यांच्या आयुष्याची भट्टी लागवी म्हणजेच वाट लावावी असेही लिहिलं होतं. दरम्यान अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या प्रकारामुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसंच, संतापाची लाटदेखील गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कोल्हापुरात खळबळ

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीदेखील कोल्हापुरात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 





Source link

' आता नो सुई, नो उईउई'; इंजेक्शनची भीती वाटणा-यांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन

' आता नो सुई, नो उईउई'; इंजेक्शनची भीती वाटणा-यांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन



 नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन आलंय. बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडेंनी हे इंजेक्शन चिमुकल्यांना देऊन प्रात्यक्षिकही दाखवलं. इंजेक्शननंतरही मुलींच्या चेह-यावर हसू पाहायला मिळतंय. 



Source link

'मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी…' उद्धव यांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

'मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी…' उद्धव यांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?


Raj Thackeray Reaction: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या अचानक भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी या भेटीचे स्वागत केलंय तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज यांनी सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलीय. यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलंय. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला. ज्यावर ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या  बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’ असे कॅप्शन दिले. यातून राज ठाकरेंना काय सुचवायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागलाय. 

याआधी कशामुळे आले ठाकरे बंधू एकत्र?

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती, परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, “आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,” असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगितले.

पालिका निवडणुकीसाठी येणार एकत्र?

आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि सत्ताधारी महायुतीला (BJP-शिंदे गट) आव्हान देण्यासाठी ही जवळीक महत्त्वाची मानली जाते. असे असले तरी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शिवसेनेत असताना राज ठाकरेंना पक्षात दुय्यम स्थान दिले गेले आणि उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले गेले. यामुळे दोघांमधील राजकीय आणि वैयक्तिक तणाव वाढला. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली. 2006 नंतर अनेकदा राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, परंतु राजकीय मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील स्थानिक पातळीवरील संघर्षांमुळे युती शक्य झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, पण ती प्रत्यक्षात आली नव्हती.

राजकीय अस्तित्वाचे आव्हान आणि मराठी मतदारांचा पाठींबा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठाधक्का बसला, तर मनसेला निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश आले आहे. दोन्ही पक्षांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी मतदारांमध्ये इतर भाषिकांच्या वाढत्या प्रभावामुळे नाराजी आहे. राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा पारंपरिक जनाधार यांचा एकत्रित परिणाम सत्ताधारी महायुतीला आव्हान देऊ शकतो. तसेच मराठी मतदारांचा मोठा पाठींबा ठाकरे बंधुंना पाहायला मिळतोय.





Source link

वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ



संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र,  तुरुंगात वाल्मिक कराड मोबाईल फोन वापरत असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नवा वाद उफाळला आहे.



Source link

अजित दादा आले, त्यांनी पाहिलं आणि झापलं, राष्ट्रवादीत चुका करणाऱ्यांवर कधी चिडणार?

अजित दादा आले, त्यांनी पाहिलं आणि झापलं, राष्ट्रवादीत चुका करणाऱ्यांवर कधी चिडणार?


कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या हिंजवडी दौऱ्या दरम्यान अधिकारी सरपंच यांना चांगलेच झापले… पण अधिकारी आणि छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांवर राग काढणारे अजित पवार त्यांच्या पक्षातील चुका करणाऱ्या आमदारांवर का चिडत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड बोलण्यासाठी कायम चर्चेत राहिले आहेत.आजही अजित पवार यांचा परखडपणा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवला.अजित पवार यांनी आज हिंजवडीचा भर पावसात सकाळी सहा पासून पाहणी दौरा सुरू केला.दौरा सुरू होताच अजित दादांची वक्रदृष्टी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर पडली. जांभूळकर यांनी अजित पवार यांच्याकडे विकास कामात मंदिर जात असल्याची तक्रार केली. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले. त्यांनी थेट सरपंचांना खडे बोल सुनावले….!

अजित दादांचे सरपंचांना काय म्हणाले?

अजित पवारांनी सरपंचाला सुनावल. ‘अहो असू द्या हो असू द्या हो साहेब,धरण करताना मंदिर जातातच की नाही….तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं.माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर.काय तुम्हाला पडलं नाही..बेंगलोरला हैदराबादला.कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत.हे केल्याशिवाय गत्यंतर नाही.ए कॅमेरा बंद कर.’

सरपंचाला बोलल्यानंतर अजित पवार यांनी पाहणी दरम्यान नाल्यावर बांधकाम करणाऱ्या एका विकासालाही झापले….! हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते. बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच ‘तुमच्यामुळे बस पाण्यात गेला तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची..’ असे अजित दादा म्हणाले. 

तिसऱ्या घटनेत अधिकाऱ्यांना बोलताना स्वतःचा दाखला देत त्यांनी ‘रस्ता अडवणाऱ्यांवर 357 चा गुन्हा दाखल करा’, अस सुनावले…

अजित पवारमध्ये आला तरी 353 टाका…!

-कोणालाही मध्ये येऊ देऊ नका,कोणतीही आडवा आडवी करू नका ,कोणी आडवा आल तर समजून सांगणार,एकदाच कामच करून टाकायचे, असे अजित पवार म्हणाले. एकीकडे अजित पवार अधिकारी सरपंच यांना झापताना दिसत आहेत.मात्र पक्षातील आमदाराना ते झापताना का दिसत नाहीत? असा सवाल उपास्थित केला जात आहे. सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते टाकणाऱ्या विजयकुमार घाडगेस मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण याला, तर विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना मात्र ते बोलताना दिसत नाहीत.तर भावाच्या गोळीबार प्रकरणी चर्चेत असलेले भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्यावर ही ते रागावले असल्याचे चित्र नाही…! वाल्मीक कराडच्या संबंधामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे हे तर त्यांच्या गळ्यातील अजून ही ताईत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना राग फक्त काही मोजक्या लोकांवर येतो का असा प्रश्न उपस्थित झालाय…!





Source link

खरंच मंत्र्यांचे फोटो टॅप होतात? टॅपिंगच्या भीतीनं मंत्र्यांनी मोबाईल बंद केल्याचा दावा

खरंच मंत्र्यांचे फोटो टॅप होतात? टॅपिंगच्या भीतीनं मंत्र्यांनी मोबाईल बंद केल्याचा दावा



महायुती सरकारवर विरोधकांनी आरोपांचे बॉम्बगोळे डागण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp