महाराष्ट्रातील रहस्यमय मंदिर! मूर्तीवरुन हात फिरवल्यावर…, 5000 वर्षांपूर्वीची…; गूढ आजही कायम

महाराष्ट्रातील रहस्यमय मंदिर! मूर्तीवरुन हात फिरवल्यावर…, 5000 वर्षांपूर्वीची…; गूढ आजही कायम


Maharashtra Tourist Places Mysterious Temple: महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. याचबरोबर अनेक अशीही ठिकाणं आहेत जी लोकांना ठाऊक नाहीत. महाराष्ट्रातही अशी अनेक मंदिरं आणि गावं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना कल्पनाही नाही. मात्र या गावांमध्ये काही रहस्य दडलेली आहेत. ही रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत. असेच एक रहस्यमय आणि रंजक मंदिर महाराष्ट्रात आहे. या मंदिरामधील मुर्तींवर हात फिरवला किंवा टीचकी मारली तर त्यातून सप्तसूर बाहेर पडतात. नाही आम्ही गमंत नाही करत आहोत खरंच महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे. हे मंदिर कुठे आणि त्याचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात…

Add Zee News as a Preferred Source

कुठे आहे हे मंदिर?

ज्या मंदिराबद्दल आपण बोलतोय ते सोलापूरमध्ये आहे. जिल्ह्यातील वेलापूर येथे अगदीच दुर्लक्षित असलेलं हे मंदिर आहे अर्धनारीनटेश्वराचं! या मंदिरामधील मुर्तींसंदर्भात एक चमत्कारिक अनुभव घेता येतो. मंदिरातील बहुतांश मूर्ती या पुरातत्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात ठेवल्यात. याच संग्रहालयातील काही मुर्तींवर हात फिरवला किंवा टीचकी वाजवली तर त्यातून सप्तसूर निघतात. मात्र हे का होतं याचं कारण संशोधकांना अद्यापही सापडलेलं नाही. हे रहस्य आजही कायम आहे.

कसं आहे हे मंदिर?

खरं तर या ठिकाणी ऐतिहासिक वीरगळांचं संग्रहालय आहे. युद्धात धारातिर्थी पडलेल्या विरांच्या युद्धाचे प्रसंग या संग्रहालयातील वीरगळांवर कोरलेले दिसतात. या संग्रहालयातील वीरगळांची संख्या दिडशेहून अधिक आहे. येथील मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीच महादेवाची पिंड असून येथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्यांनी नटवलेले अर्धनारीनटेश्वर आहेत. हेमाडपंथी पद्धतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील इटालियन हिल सिटी: मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच आहे हे सुंदर ठिकाण; कसं जाल? कुठे राहाल?

वीरगळ म्हणजे काय?

वीरगळ हा शब्द दोन मूळ शब्दांपासून तयार झालेला आहे. ‘वीर’ म्हणजे शूर आणि ‘गळ’ म्हणजे दगड. त्यामुळे वीरगळचा अर्थ शूरवीरासाठी उभारण्यात आलेला दगड असा होतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वीरगळ परंपरेचा उगम कर्नाटकात झाला. त्यानंतर ती महाराष्ट्रात पसरली. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य यांसारख्या राजघराण्यांच्या काळात वीरगळाचा प्रसार झाला. वीरगळ हे साधारणपणे तीन ते साडेतीन फूट उंचीचे दगड असतात. या दगडांवर योद्ध्याचे शौर्य, युद्ध, मृत्यू आणि देवलोकात जाण्याची प्रक्रिया कोरलेली असते. वर चंद्र आणि सूर्यही कोरलेले असतात. म्हणजेच चंद्र-सूर्य असेपर्यंत या वीराची क्रांती कायम राहील असं त्यातून सुचवण्याचा हेतू असतो. हे  वीरगळ जुन्या गावांमध्ये, मंदिरांच्या परिसरात, पाराजवळ किंवा शेतात आढळतात. अनेकदा अशा  वीरगळांवरील कोरीव काम हे देवाच्या मूर्ती समजून त्यांना शेंदूर लावून त्यांची पूजा केली जाते.

मंदिरावरील शिलालेखात काय?

1271 ते 1310 या काळात यादव राजा रामचंद्र याचे शिलालेख या मंदिराच्या भिंतीवर पाहायला मिळतात. मंदिरासमोरच पाण्याचं एक मोठं कुंड असून त्यात 12 महिने पाणी असतं. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो. 

कधी असते यात्रा?

चैत्र पौर्णिमेला ग्रामदेवता असलेल्या श्री अर्धनारीनटेश्वराची यात्रा भरते. शुद्ध पंचमीला हळद, अष्टमीला लग्न आणि पौर्णिमेला वरात असते. वद्य अष्टमीला मुख्य सोहळा असं दरवर्षी येथे आयोजित केलं जातं. 





Source link

पुण्यात रेल्वेचा 10 दिवसांचा सर्वात मोठा मेगाब्लॉक! मुंबई, सातारा, सोलापूरसह भारताच्या विविध राज्यांत जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द

पुण्यात रेल्वेचा 10 दिवसांचा सर्वात मोठा मेगाब्लॉक! मुंबई, सातारा, सोलापूरसह भारताच्या विविध राज्यांत जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

महाराष्ट्रात आणखी एक अत्यंत धक्कादायक युती! जे भाजपने केले तेच महाराष्ट्रातील आणखी दोन मोठ्या पक्षांनी केले

महाराष्ट्रात आणखी एक अत्यंत धक्कादायक युती! जे भाजपने केले तेच महाराष्ट्रातील आणखी दोन मोठ्या पक्षांनी केले


MIM Alliance In Maharashtra : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढलाय. भाजपने काँग्रेस आणि एमआयएमसोबत केलेली हातमिळवणी चर्चेत असतानाच, आता शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही एमआयएमशी युती केली आहे. परळी नगरपालिकेत गटनेता निवडीसाठी हे नवे समीकरण उदयास आलंय. 
परळी नगरपरिषद गट नेत्याची निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आलीय. या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस 16 , शिवसेना – 2,एमआय एम – 1,अपक्ष – 4 अशा 24 जणांचा समावेश आहे. 

Add Zee News as a Preferred Source

या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश असून उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांचा समावेश आहे. खरंतर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आला आहे, पण आता या निर्णयाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

अकोट शहराच्या विकासासाठी भाजपला वगळून इतर कोणालाही पाठिंबा देण्याची एमआयएमची भूमिका

अकोट शहरात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेल्या युतीचा मुद्दा चांगलाच गाजला. या युतीवर जोरदार राजकीय टीका झाल्यानंतर आता ही युती तोडण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र सादर करण्यात आलं असून, त्यामध्ये एमआयएमच्या उमेदवारांचा स्वतंत्र, नवा गट तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे तसेच अकोट विकास मंचमधून बाहेर पडत असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

या संदर्भात बोलताना एमआयएमच्या उमेदवारांनी सांगितलं की, अकोट शहराच्या विकासासाठी आम्ही तिसरी आघाडी तयार केली होती. मात्र, या आघाडीत भाजपचा समावेश असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही या आघाडीतून बाहेर पडलो. एमआयएमचे नेते युसुफ पुंजांनी यांनी उमेदवारांना कारवाईचा इशाराही दिला होता.विचारधारा जुळत नसल्याने आणि विकासाला प्राधान्य देत आम्ही या युतीतून बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया एमआयएमच्या उमेदवारांनी दिली आहे. शहराच्या विकासासाठी भाजपला वगळून इतर कोणालाही पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पक्षापेक्षा जनता मोठी आहे, त्यामुळे आम्ही थेट जनतेत जाऊन चर्चा करू आणि जनता जो फैसला देईल, तो आम्हाला आणि आमच्या पक्षाला मान्य असेल, असंही उमेदवारांनी सांगितलं आहे

 





Source link

BMC Election: भाजपाची मोठी कारवाई! तब्बल 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन, वाचा यादी

BMC Election: भाजपाची मोठी कारवाई! तब्बल 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन, वाचा यादी



BJP Suspends 26 from Party: मुंबईत महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना, भाजपाने पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे. भाजपाने 26 जणांना पक्षातून हाकललं आहे. 
 



Source link

शिंदेंचा बिनविरोधचा मास्टर प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; उपमुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच कशी दिली शह? एकदा वाचाच

शिंदेंचा बिनविरोधचा मास्टर प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; उपमुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच कशी दिली शह? एकदा वाचाच



Thane Politics Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन उमेदवार सहज बिनविरोध निवडून येणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी एक डाव टाकला आणि सारा खेळ फिरला…



Source link

2,71,85,00,000 रुपयांची संपत्ती! मुंबई नाही तर 'या' जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल

2,71,85,00,000 रुपयांची संपत्ती! मुंबई नाही तर 'या' जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल


Maharashtra Municipal Election :  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागासाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून माजी महापौर व माजी नगरसेवक कोट्याधीश असल्याची माहिती उजेडात आली आहे. यात अनेकांच्या संपत्तीत दुपटीने ते पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार गडगंज असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
शिवसेना शिंदे गटातील उमेदवार समाधान सरवणकर यांची सद्याची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल 46 कोटी 59 लाख रुपये आहे. त्यांची 2017 ला 9 कोटी 43 लाख रुपये होती. ते व्य़ावसायिक आहेत. शिवसेना (ठाकरे) गटाच्या श्रदधा जाधव यांची मालमत्ता 46 कोटी रुपये होती. त्यांची 2024 ला 44 कोटी रुपये मालमत्ता होती म्हणजे एका वर्षात साडेतीन कोटीने वाढली आहे.

Add Zee News as a Preferred Source

 भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे यांची सध्याची संपत्ती 17 कोटी 63 लाख रुपये आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची 5 कोटी 26 लाख रुपये आहे. 2017 साली 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार शैलेश फणसे यांची स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल 25 कोटी रुपये एवढी आहे. शिवसेना (शिंदे) पक्षातील दिप्ती वायकर यांची संपत्ती 22 कोटी 1 लाख 71 हजार इतकी आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले उमेदवार रवी राजा यांची स्थावर व जंगम मालमत्ता सद्याची मालमत्ता 10 कोटी 12 लाख 17 हजार इतकी आहे. 2017 साली ती 5 कोटी 12 लाख 84 हजार इतकी होती. म्हणजे 8 वर्षात दुपटीने वाढली आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना स्वतःची, पत्नीची तसेच अवलंबितांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक ठेवी, शेअर्स, दागिने आणि कर्जाची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत काही माजी नगरसेवकांच्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घर, फ्लॅट, व्यावसायिक गाळे, भूखंड यासह बँक ठेवी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याची नोंद आहे. काही माजी नगरसेवकांनी उत्पन्नाचे स्रोत व्यवसाय, शेती, भाडे उत्पन्न आणि पगार असल्याचे नमूद केले असले तरी, मालमत्तेतील झपाट्याने झालेली वाढ मतदारांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

 ‘या’ जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबईत गडगंज श्रीमंत उमेदवार असले तरी पुण्यातील श्रीमंत उमेदवारांसह बरोबरी करु शकत नाही. पुण्यात 41 जागांसाठी 1166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 271.85 कोटींच्या आसपास आहे. तर, सायली वांजळे या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 77.12 कोटींच्या आसपास आहे. 
मुंबईत कोणाची किती संपत्ती वाढली
माजी महापौर किशोरी पेडणेकर एकूण मालमत्ता – यांची 5 कोटी 26 लाख
2017 साली –  1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती.

माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक 202)
एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता : 46 कोटी
विधानसभा निवडणूक 2024 लढवली होती. त्यावेळी एकूण मालमत्ता 44 कोटी होती
वाढ : एका वर्षात 2 कोटी

माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. 191)
स्थावर – जंगम मालमत्ता: 21 कोटी 83 लाख
2017  मध्ये : 14 कोटी 37 लाख
वाढ : 7 कोटी

यामिनी जाधव (प्रभाग 209)
एकूण मालमत्ता : 14 कोटी 57 लाख
विधानसभा 2024 लढवली : 10 कोटी 10  लाख
वाढ : 1 वर्षात 4 कोटी

नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. 107)
एकूण मालमत्ता : 9 कोटी
२०१७ मध्ये : 1 कोटी 99 लाख
वाढ : 8 वर्षात 7 कोटी

तेजस्वी अभिषेक घोसाळकर (प्रभाग क्र. 2)
 एकूण मालमत्ता : 5 कोटी
२०१७ मध्ये : 25 लाख
वाढ : 8 वर्षात 4. 75 कोटी

शैलेश फणसे – एकूण मालमत्ता 25 कोटी
दीप्ती वायकर  – 22 कोटी 1 लाख 71 हजार

समाधान सरवणकर – 46 कोटी 59 लाख
2017 मध्ये – 9 कोटी 43 लाख

यशवंत किल्लेदार एकूण मालमत्ता – 7 कोटी 5 लाख

रवी राजा एकूण मालमत्ता – 10 कोटी 12 लाख 17 हजार
2017  मध्ये – 5 कोटी 12 लाख 84 हजार

भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे एकूण मालमत्ता – 17 कोटी 63 लाख रुपये





Source link

YouTube
Instagram
WhatsApp