by Hansraj Agrawal | Nov 22, 2025 | Trending News
Vijay Wadettiwar on MNS: मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. मात्र भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी मोर्चात एकत्र, निवडणूक वेगळी का लढवता? अशी विचारणा केली होती. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं होतं.
Add Zee News as a Preferred Source
“मनसेची आणि आमची विचारधारा जुळत नाही. त्यामुळे तो विषय आला असावा. पण शरद पवारांनी आपण आघाडीत लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. आपण सर्वांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी, या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दरम्यान दडपशाही करणा-यासंबोत काँग्रेस जाणार नाही असं वक्तव्य काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी दिली होती. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र वडेट्टीवारांनी मात्र भाजप विरोधात मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्यामुळे मनसेवरुन काँग्रेसमध्ये दोन प्रवाह असल्याचं समोर येत आहे.
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, “मुंबई एक असं शहर आहे जिथे सर्व राज्यातील लोक असतात आणि मुंबईच्या विकासात प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही”.
शरद पवारांनी काय म्हटलं?
मुंबईत मनसे पक्षाला सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक आहेत. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं शरद पवार यांचं मत आहे. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? असा स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं आहे.
शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन
शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला होता. मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार यावरती स्पष्टता नव्हती.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 21, 2025 | Trending News
वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Nov 21, 2025 | Trending News
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते ‘झी 24 तास’मध्ये ‘डेप्युटी न्यूज एडिटर’ म्हणून कार्यरत आहेत.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Nov 20, 2025 | Trending News
महाराष्ट्र सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लागू झाली झाले अशावेळी लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 20, 2025 | Trending News
Eknath Shinde Meet Amit Shah: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरु असून यावरुनच शिंदे गट आणि भाजपामध्ये मंगळवारी नाराजीनाट्य घडलं. निवडणुकीआधी कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरुन राजकारण तापलेलं असतानाच अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली.
Add Zee News as a Preferred Source
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिंदेंनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान शिंदेंनी थेट नाव घेऊन महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची तक्रार अमित शाहांकडे केली. या व्यक्तीमुळेच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी सांगितल्याचं समजतं. खास बाब म्हणजे ही व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांपैकी एकही नाही. शिंदेंनी नेमकी कोणाविरुद्ध आणि काय तक्रार केलीये याचा तपशील समोर आलाय.
नाराजी नाट्य काय? मुख्यमंत्र्यांबद्दलही शिंदे सेनेत नाराजी
शिवसेनेनेच्या महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असूनही पक्षाची, मंत्र्यांची कोंडी केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असून उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे आम्हालाही गृहत धरु नका असा संदेश देण्यासाठीच शिवसेना मंत्र्यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याबद्दल शिवसेनेते नाराजी आहे.
शिंदेंनी अमित शाहांकडे कोणाची तक्रार केली?
शिंदेंनी बुधवारी सायंकाळी जवळपास 50 मिनिटे अमित शाहांशी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. यावेळी शिंदेंनी शहा यांच्याकडे राज्यातील भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची तीव्र प्रतिक्रिया महायुतीमध्ये उमटली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही जास्त न ताणता नमते घेण्याची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला. मात्र असं असलं तरी अमित शाहांच्या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रार करताना गंभीर आरोप केल्याचे समजते.
भाजपचे काही नेते जाणीवपूर्वकपणे…
चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. निवडणुकांमध्ये महायुतीला पोषक वातावरण असताना भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून विरोधकांना आयते कोलित मिळत असल्याचे शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. भाजप नेत्यांच्या गोंधळामुळे महायुतीत उगाचच बिघाडी होत असल्याचेही शिंदे यांनी सांगितल्याचे समजते.
एकमेकांवर टीका टाळली पाहिजे
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याने मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं शिंदेंनी अमित शाहांशी झालेल्या चर्चेत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 19, 2025 | Trending News
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
…Read More
Source link