महाराष्ट्राचे राजकारण हे असचं आहे! कार्यकर्ते राहिले बाजूला… आमदार, मंत्र्यांची मुलं, भाऊ, पत्नी, आई यांनाच मिळाली उमेदवारी

महाराष्ट्राचे राजकारण हे असचं आहे! कार्यकर्ते राहिले बाजूला… आमदार, मंत्र्यांची मुलं, भाऊ, पत्नी, आई यांनाच मिळाली उमेदवारी


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

20 एकरमधील MHADA इमारती…; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय

20 एकरमधील MHADA इमारती…; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय


Maharashtra Cabinet Meeting: राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षित युती घडत असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. यादरम्यान राज्य मंत्रिमंडळाने आज बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती, शिक्षकांची 232आणि शिक्षकेतर 107 पदांना मान्यता देण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मंत्रिमंडळ बैठकीत नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि विधि व न्याय विभागासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

1) नगर विकास विभाग

राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण

2) गृहनिर्माण विभाग
बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार

3) मदत व पुनर्वसन विभाग
भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती. यामुळे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकऱणांचा जलदगतीने निपटारा होणार

4) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती. शिक्षकांची 232आणि शिक्षकेतर १०७ पदांना मान्यता

5) महिला व बाल विकास विभाग
महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९ या अधिनियमातील कलम ९ व कलम २६ मधील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळणार

6) विधि व न्याय विभाग
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा कऱण्यास मान्यता





Source link

बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, यांचे नाव जाणून शॉक व्हाल

बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, यांचे नाव जाणून शॉक व्हाल


Balasaheb Thackeray And Sharad Pawar Relation :  हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेते शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. यांचे नाते मात्र, मैत्रीपलिकडचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई आहे. शरद पवारांचा जावई हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती देखील आहे. यांचे नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई कसा झाला. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे सोयरीक कसे जुळले जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

सदानंद भालचंद्र सुळे…. यांच्या नावाची फारशी चर्चा होत नाही. मात्र, सुप्रिया सदानंद सुळे म्हंटले की सदानंद सुळे हे नाव देखील चर्चेत येते.  सदानंद सुळे महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती आहेत. सदानंद सुळे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे पती आहेत. बाळासाहेब ठाकरे हे सदानंद सुळे यांचे मामा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण सुधा सुळे यांचे सदानंद हे सुपूत्र आहेत. 

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख कशी झाली?

 सुप्रिया सुळे यांचं 12 वी पर्यंत शिक्षण पुण्यातच झालं. 12 वी नंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद काँलेजमधून मायक्रोबायलाॅजी विषयात Bsc केली. त्यावेळी शऱद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि पवार कुंटुंबाचे चांगले संबध होते.  याच दरम्यान फॅमिली फ्रेंडच्या माध्यमाथून सुप्रिया यांची सदानंद सुळे य़ांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळेस संदानद सुळे हे अमेरिकेमध्ये नोकरी करत होते. 

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या दोघांचा स्वभाव शांत आणि मनमिळावू असल्यामुळे यांच्या मैत्रीचं रूपातंर प्रेमात झालं. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर होती. मात्र असं असलं शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. हीच मैत्री त्यांनी राजकारणापलिकडे जपली होती.पवारांचं आणि ठाकरे कुटुंबियांच पूर्वी पासून एकमेकांच्या घरी येण जाण असायचं. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि प्रतिभाताई पवार यादेखील सख्ख्या मैत्रिणी होत्या. 

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे मनं जुळले होते. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी लग्न ठरवण्यास पुढाकार घेतला. या लग्नाला तसा कोणाचा विरोध नव्हताच. सगळं जुळून आलं. तारीख ठरली गेली. शरद पवारांनी स्वत: अनेक गावात जाऊन सुप्रियाताईच्या लग्न पत्रिका वाटल्या.  देशभरातून दिग्गज नेते या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. लाखो लोकांच्या उपस्थितीत 4 मार्च 1991 मध्ये हा दिमाखदार लग्ना सोहऴा पार पडला.

लग्नानंतर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे अमेरिकेत गेले. सदानंद सुळे यांची नोकरी तिथं सुरू होती.  काही काळानंतर सदानंद सुळे यांची सिंगापुरला बदली झाली. सुप्रिया आणि सदानंद सुळे काही काळ तिथे राहिले. त्यानंतर जकार्ताला काही ते नोकरीला होते. मात्र त्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर सदानंद सुळे यांनी व्यवसाय क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं. तर, सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्या. 

 





Source link

महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बस भाड्यासंदर्भात सरनाईकांची मोठी घोषणा!

महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बस भाड्यासंदर्भात सरनाईकांची मोठी घोषणा!


Discount on bus fare:  राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस खूप उपयोगी पडते. शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी हा पर्याय स्वस्त आणि उत्तम ठरतो.दरम्यान महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात गुड न्यूज दिलीय. काय म्हणाले प्रताप सरनाईक? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी राज्य रस्ते वाहतूक महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी यंदा मोठ्या संख्येने नव्या बस उपलब्ध करुन देणार आहे. याशिवाय सहलीच्या भाड्यात 50 टक्के सूटदेखील मिळणार आहे. दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थी उत्साहाने सहलीची वाट पाहत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी ही योजना असल्याचे असे मंत्री म्हणाले. 

दररोज 800 ते 1000 बस 

एमएसआरटीसीचे 251 डेपो दररोज शाळा-कॉलेजांना 800 ते 1000 नव्या बस देणार आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय. या व्यवस्थेमुळे शैक्षणिक प्रवास सोपा होणार असल्याचे सरनाईक म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी परवडणारी आणि सुरक्षित सहल ही आमची प्राथमिकता आहे. राज्य सरकार या सहलींना पूर्ण पाठिंबा देत असून त्यात 50% भाडेसवलत देणार असल्याची घोषणा यावेळी सरनाईकांनी केली. यामुळे विद्यार्थी ऐतिहासिक-धार्मिक स्थळांना सहज भेट देऊ शकणार आहेत. 

मागील वर्षीची आकडेवारी:

नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत एमएसआरटीसीने शैक्षणिक सहलीसाठी 19 हजार 624 बस पुरवल्या. यातून सरकारला 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ही यशस्वी कामगिरी पाहता यंदा आणखी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मंत्री सरनाईक यांनी 2025-26 साठी डेपो व्यवस्थापक आणि स्टेशन प्रमुखांना शाळा-कॉलेजांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत.

प्राचार्यांशी साधणार संपर्क

डेपो प्रमुख आणि स्टेशन अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांना भेटून सहलीची योजना आखण्यास सांगितले आहे. ते राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना भेटीचे आयोजन करणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कृतीची ओळख होण्यास मदत होईल. सरकारने घेतलेल्या या पुढाकारामुळे शैक्षणिक सहलींना चालना मिळेल यासोबतच एमएसआरटीसीला अधिक महसूल मिळणार आहे. 

योजनेचा उद्देश काय?

एमएसआरटीसीने केलेली ही घोषणा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. स्वस्त भाडे आणि नव्या बसांमुळे पालकांचा भार कमी होणार आहे. तर विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना याचा थेट लाभ होणार आहे.

FAQ 

१. महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक सहलीसाठी किती टक्के भाडेसवलत जाहीर केली?

उत्तर: शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसाठी भाड्यात ५० टक्के सूट देण्यात येईल. ही सवलत एमएसआरटीसीच्या बसांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांना स्वस्त-सुरक्षित प्रवास मिळावा हा उद्देश आहे.

२. एमएसआरटीसी किती नव्या बस उपलब्ध करणार आणि कधीपासून?

उत्तर: एमएसआरटीसीचे २५१ डेपो दररोज ८०० ते १००० नव्या बस शाळा-कॉलेजांना देणार. ही सुविधा यंदाच्या वर्षी (२०२५-२६) सुरू होईल, दिवाळी सुट्टीनंतर सहलींना प्राधान्य.

३. मागील वर्षी किती बस पुरवल्या आणि महसूल किती?

उत्तर: नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत १९,६२४ बस उपलब्ध करून ९२ कोटी रुपये महसूल मिळाला. यंदा डेपो प्रमुख शाळा-प्राचार्यांशी समन्वय साधून ऐतिहासिक-धार्मिक स्थळांच्या सहली आयोजित करतील.





Source link

मुंबई ते अलिबाग… 2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग, अंतर डायरेक्ट 50 Km ने कमी होणार

मुंबई ते अलिबाग… 2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग, अंतर डायरेक्ट 50 Km ने कमी होणार


Mumbai To Alibaugh In 10 Min Revas Karanja Bridge : मुंबईते अलिबाग हा सध्या दोन तासांचा प्रवास आहे. मात्र, हाच  2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग  बांधला जाणार आहे.  मुंबई-एमएमआर प्रदेशात वाहतूक सुलभ करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात लांब मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक ब्रिज उघडल्यानंतर, रायगड जिल्ह्यात किनारी संपर्क वाढवण्याचे काम आता सुरू आहे. धरमतरजवळील खाडीवर रेवस-करंजा पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, ज्यामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास सोपा होणार आहे.  

Add Zee News as a Preferred Source

2.04 किमी लांबीचा हा पुल असेल. सुरुवातीला एमएसआरडीसीने 2,079  कोटी रुपयांचा हा प्रकल्प सादर केला होता.   परंतु कालांतराने त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. पुढील तीन वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  20.04 किमी लांबीच्या या पुलामुळे अंतर 50 किमीने कमी होईल. रायगड जिल्ह्यातील किनारी शहर असलेल्या अलिबागला जाण्यासाठी मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अंदाजे 120 किमी रस्त्याने प्रवास करावा लागतो. रेवस आणि कारंजा दरम्यान 2.04 किमी लांबीच्या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, मुंबईहून एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे अलिबागचे अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.

सध्या, रेवस आणि कारंजा दरम्यान सुमारे 70 किमी अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, रेवसहून करंजा येथे फक्त 10 मिनिटांत पोहोचता येते. सध्या रेवस आणि कारंजा दरम्यान फेरी सेवा चालतात, परंतु त्यामध्ये चारचाकी वाहने बसत नाहीत. पावसाळ्यात, खराब हवामानामुळे फेरी सेवा विस्कळीत होतात. 
अलिबाग ते जेएनपीटी दरम्यानचे अंतर 25 किमीने कमी होणार आहे. एकदा समुद्री पूल रेवस आणि कारंजा यांना जोडला की, अलिबागहून जेएनपीटीला सहज पोहोचता येईल. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागमधील रस्ते अंतर अंदाजे 55 किमीवरून फक्त 30 किमीपर्यंत कमी होईल. याव्यतिरिक्त, नियमित वाहनचालकांना मुंबई आणि अलिबागमधील जड वाहतुकीपासून मुक्तता मिळेल. सध्या, मुंबईहून अलिबागला थेट प्रवास करण्यासाठी रो-रो सेवा उपलब्ध आहेत, परंतु त्या खूप महाग आहेत. 

रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक 4 वर हा चार पदरी पूल बांधला जाईल. 29.50 मीटर रुंदीच्या या पुलावर वाहने ताशी 80  किमी वेगाने प्रवास करू शकतील. त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड बांधला जाईल, तर रेवसमध्ये 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता स्टिल्टवर बांधला जाईल. 

FAQ

प्रश्न 1: रेवस-करंजा समुद्री पुलाचे बांधकाम कधी सुरू होणार आहे?
उत्तर: रेवस-करंजा समुद्री पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

प्रश्न 2: हा पुल किती लांबीचा असेल?
उत्तर: हा पुल 2.04 किमी लांबीचा असेल.

प्रश्न 3: या पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास किती कमी होणार आहे?
उत्तर: या पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास 2 तासांवरून 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

 





Source link

मुलाच्या बर्थ-डेची तयारी करतानाच गाठले अन्…; नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या

मुलाच्या बर्थ-डेची तयारी करतानाच गाठले अन्…; नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या


Nagpur Crime News: नागपुरात शनिवारी भरदिवसा धारदार शस्त्राने वार करत भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. सचिन उर्फ सोनू साहू असं मयत व्यक्तीचे नाव आहे. यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस येथे हा थरार घडला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सचिन साहू असं मृताचं नाव असून तो उत्तरं नागपुरातील वार्डचा अध्यक्ष होता. जुन्या पैशाच्या देवाण घेवाणचा वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक सचिनच्या मुलाचा वाढदिवस होता. तो मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेला होता. घरी परतत असतानाच वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

दोन दुचाकींवर आलेले चार मारेकरी पूर्ण तयारीनिशी आल्याचा संशय पोलिसांना आहे. सोनुच्या खूनानंतर चौघेही फरार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आर्थिक वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठीदेखील बोलवले होते.

मारेकरी नेमके कोण होते? हत्येमागाचे नमेके कारण काय? याचा तपास सुरू असून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहेत. तीन ते चार जण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच, मृतक सचिन शाहूचा गणपतीच्या दरम्यान काही लोकांशी वाद झाला होता त्यामुळे याच्या हत्येमागे त्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

FAQ

प्रश्न 1: नागपुरात शनिवारी कोणत्या व्यक्तीची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे?

उत्तर: सचिन उर्फ सोनू साहू या भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची धारदार शस्त्राने वार करत भरदिवसा हत्या करण्यात आली आहे.

प्रश्न 2: ही घटना नागपुरात कोणत्या ठिकाणी घडली?

उत्तर: यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात हा थरार घडला आहे.

प्रश्न 3: मृत सचिन साहू कोणत्या पक्षाचे व कोणत्या भागाचे अध्यक्ष होते?

उत्तर: मृत सचिन साहू हे उत्तर नागपुरातील भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.

प्रश्न 4: हत्येमागे प्राथमिक संशयित कारण काय आहे?

उत्तर: प्राथमिक तपासात, ही हत्या जुन्या पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp