'ही' व्यक्ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेत असलेली घडामोड

'ही' व्यक्ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेत असलेली घडामोड


Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. त्यातच याविषयी एक महत्त्वाची अपडेट  समोर आली आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.

राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर शिवसेना UBT आणि मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली होती. त्यातच दोन दिवसांपासूर्वी उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केले. उद्धव यांचं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जातंय.

राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्युनिअर ठाकरे आदित्य आणि अमितही या युतीसाठी सकारात्मक असल्याचा पाहायला मिळालं. मात्र पुढलं पाऊल कोण टाकणार असी चर्चा असताना ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. आता या मनोमिलनामध्ये त्यांना कितपत यश येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही बंधूंकडून युतीसाठी  सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ठाकरेंची मामा चंदूकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळताहेत. गेली अनेक वर्ष  राज आणि उध्दव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदू मामा यांनी म्हटलंय. 

 





Source link

'नितेशने जपून आणि भान ठेवून बोलावे, निलेश राणेंचा नितेश राणेंना सल्ला

'नितेशने जपून आणि भान ठेवून बोलावे, निलेश राणेंचा नितेश राणेंना सल्ला


Nilesh Rane And Nitesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारण सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेते आक्रमक होताना दिसत आहेत. ज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील नेत्यांमध्ये बाचाबाची आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळत आहेत. 

दरम्यान, अशातच सतत आपल्या हटके आणि आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असणारे राणे कुटुंब हे देखील चर्चेत आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आल्या आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या बंधू भाजप नेते आणि मंत्री निलेश राणेंना एक सल्ला दिला आहे. 

नितेश राणे यांचं वक्तव्य

आगामी निवडणुकांमुळे अनेक नेते भाषणांमध्ये आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री राज्यात बसला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं मोठे बंधू निलेश राणे यांनी बंधू नितेश राणेंना एक्सवर ट्विट करत एक सल्ला दिला आहे. 

‘नितेशने जपून बोलावे, बोलताना भान ठेवायला हवे’

नितेश ने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिला आहे. तर यावर नितेश राणे यांनी निलेशजी तुम्ही tax free आहात असं मिश्किल उत्तर निलेश राणेंना एक्सवर ट्विट करत दिलं आहे. 





Source link

पुण्यात पुन्हा धडकी भरवणार पाऊस! माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला

पुण्यात पुन्हा धडकी भरवणार पाऊस! माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला


Jun 06, 2025 | LIVE

ICC CWC League 2, 2023-27

Jun 04, 2025 | Match 75

ICC CWC League 2, 2023-27

NED

(49.1 ov) 225

VS

NEP

226/5(47.1 ov)

Nepal beat Netherlands by 5 wickets
Full Scorecard →

Jun 03, 2025 | Final

Indian Premier League, 2025

RCB

(20 ov) 190/9

VS

PBKS

184/7(20 ov)

Royal Challengers Bengaluru beat Punjab Kings by 6 runs
Full Scorecard →

Jun 03, 2025 | 3rd ODI

West Indies in England, 3 ODI Series, 2025

WI

(40 ov) 251/9

VS

ENG

246/3(29.4 ov)

England beat West Indies by 7 wickets (DLS method)
Full Scorecard →





Source link

दिवसाला 20 ते 30 हजार अन् महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवणारा मुंबईचा रिक्षावाला; बिझनेस मॉडेल थक्क करणारं

दिवसाला 20 ते 30 हजार अन् महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवणारा मुंबईचा रिक्षावाला; बिझनेस मॉडेल थक्क करणारं


Mumbai Auto Driver Earning Rahul Rupani: मुंबईमधील एक रिक्षावाला महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमवतो असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? एवढी कमाई तर अनेक आयटी कंपन्यांमधील डायरेक्टर्स, सीए किंवा सीएस अथवा आयआयटीमधून पास झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही नसते. बरं आता ही कमाई हा रिक्षावाला कोणत्याही राईड बुकिंग अॅप्लिकेशनवरुन, शेअर मार्केटमधून किंवा रिक्षा चालवून करत नाही तर केवळ एका जागी बसून करतो असं सांगितल्यास तुमचं त्याच्याबद्दलचं कुतूहल नक्कीच वाढेल यात शंका नाही. पण हे खरं आहे. हा रिक्षावाला मुंबईतील नामांकित कॉर्परेट परिसर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसी येथे आहे. हा रिक्षावाला काय करतो ते वाचल्यानंतर तुम्ही खऱोखरच त्याच्या डोकॅलिटीला सलाम कराल यात शंका नाही.

बिझनेस मॉडेलची चर्चा

हा रिक्षावाला बीकेसीमधील अमेरिकन काऊन्सिलेटच्या बाहेर उभा असतो. त्याचा बिझनेस मॉडेल अगदी सोपा आहे. तो कोणतंही अॅप्लिकेशन, आर्थिक सहाय्य किंवा इतर कोणतंही तंत्रज्ञान वापरत नाही. काऊन्सिलेटमध्ये येणाऱ्या व्यक्तींचं समान सांभाळण्याचं साधं काम तो करतो. लेन्सकार्टमध्ये प्रोडक्ट लीडर म्हणून काम करणाऱ्या राहुल रुपाणी यांनी स्वत: या रिक्षावाल्याची मदत घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लिंक्डइनवर या रिक्षावाल्याच्या बिझनेस मॉडेलची स्टोरी सविस्तरपणे पोस्ट केली आहे. अमेरिकी व्हिसासाठी काऊन्सिलेटमध्ये भेट दिलेल्या रुपाणी यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि हा रिक्षावाला काय काम करतो हे आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

तो रिक्षावाला काय म्हणाला?

“सुरक्षारक्षकांनी मला सांगितलं की मला माझी बॅग काऊन्सिलेटमध्ये नेता येणार नाही. आतमध्ये लॉकर किंवा इतर कोणतीही सोय उपलब्ध नसल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावेळी काय करावं हे मला कळेना. गोंधळून मी फुटपाथवर उभा असताना एका रिक्षाचालकाने मला अगदी सोपा पर्याय सुचवला. “सर बॅग माझ्याकडे द्या. मी ती सुरक्षित ठेवतो. हे माझं रोजचं काम आहे. मी हजार रुपये घेईन” असं रिक्षाचालक मला म्हणाला,” अशी माहिती रुपाणी यांनी पोस्टमध्ये दिली आहे.

रिक्षा जागेवरुन हालतही नाही

मात्र नंतर रुपाणी यांना हा रिक्षावाला या माध्यमातून बक्कळ कमाई करत असल्याचं समजलं. हा रिक्षावाला रोज अमेरिकी काऊन्सिलेटबाहेर रिक्षा पार्क करतो आणि येथे येणाऱ्यांना जेव्हा सोबत सामान, बॅग आत नेऊ शकत नाही असं सांगितलं जातं तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावतो. तो प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेतो. दिवसभरात त्याला असे 20 ते 30 ग्राहक सहज मिळतात. म्हणजेच त्याची दिवसाची कमाई 20 ते 30 हजार रुपये आहेत. म्हणजेच रिक्षा एका जागी उभी करुन हा रिक्षा चालक महिन्याचे पाच ते आठ लाख रुपये कमवतो.

पोलिसांची घेतो मदत

रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये हा रिक्षावाला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेत असल्याचं म्हटलं आहे. “त्याला एकाच वेळी रिक्षात 30 बॅग ठेवता येणार नाहीत. त्यामुळे तो स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतो. या पोलीस अधिकाऱ्यांना लॉकर सुविधा देण्यात आलेली असते. या बॅग तिथेच ठेवल्या जातात. ही कायदेशीर, सुरक्षित आणि जास्त ताप नसलेली पद्धत आहे. रिक्षा हे केवळ माध्यम आहे,” असं रुपाणी यांनी म्हटलं आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचं या रिक्षाचालकाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असल्याचं रुपाणी यांनी नमूद केलं आहे. “तो एमबीए शिकलेला नाही, त्याचं कोणतं स्टार्टअप नाही केवळ त्याच्याकडे तत्काळ उद्भवणाऱ्या समस्येचं सोल्यूशन आहे,” असं रुपाणी यांनी म्हटलं आहे.

अशा गोष्टी पुस्तकात शिकवत नाहीत

“अशा गोष्टींबद्दल उद्योगांसंदर्भातील पुस्तकांमध्ये शिकवलं जात नाही. मात्र याबद्दल आधीच शिकवलं असतं तर बरं झालं असतं असं नक्कीच वाटतं. खाऱ्या उद्योजकांला कायम काही प्रस्ताव मांडण्यासाठी मंचाची आवश्यकता असते असं नाही कल्पना असेल तर तुम्हाला पार्किंग लॉटही पुरेसा आहे,” असं रुपाणी यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp