4 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत झाली खिळखिळी, इमारतीतील 16 कुटुंब भीतीच्या छायेखाली

4 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत झाली खिळखिळी, इमारतीतील 16 कुटुंब भीतीच्या छायेखाली



पैठण तालुक्यातील फारोळा गावची ही इमारत असून ही इमारत कोसळू नये म्हणून अशा प्रकारे या इमारतीच्या खांबांना जॅकचा आधार देण्यात आलाय.



Source link

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण


Uddhav Thackeray India Alliance Meeting: उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. 

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक बेकायदेशीर गोष्टी झाल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर रात्री राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावर प्रेजेंटेशन दिलं तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मागे कसं बसवू शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरे एक असतानाही त्यांना मागच्या रांगेत बसवल्याने अनेक अंदाज लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आलं होतं. कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याने ते आता जास्त लाडके झाले आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत जागा कशी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

राज ठाकरेंशी जवळीक इंडियाला नापसंत?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची राज्यात चर्चा सुरु आहे. मुंबई महापालिका आणि त्यानंतर कदाचित विधानसभा निवडणुकीतही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतील असे अंदाज बांधले जात आहे. तसं झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडतील असेही दावे केले जात आहेत. दरम्यान ठाकरे बंधूंची ही जवळीक इंडिया आघाडीच्या नाराजीचं कारण ठरतीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

उद्धव ठाकरे उशिरा पोहोचले?

उद्धव ठाकरे उशिरा पोहोचल्याने त्यांना मागच्या रांगेत बसवलं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या नेत्यासाठी जागा राखीव ठेवली नव्हती का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

दरम्यान इंडिया आघाडीच्या या बैठकीत बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर आणि उपराष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार उभा करण्यावरही चर्चा झाली. तसंच राहुल गांधी 17 तारखेपासून बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे ते या मुद्द्यांवर जनतेमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत.





Source link

'राहुल गांधींची चिप चोरीला, हार्डडिस्क करप्ट,' CM देवेंद्र फडणवीसांनी सगळंच काढलं

'राहुल गांधींची चिप चोरीला, हार्डडिस्क करप्ट,' CM देवेंद्र फडणवीसांनी सगळंच काढलं


Devendra Fadnavis on Rahul Gandhi: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला असून, महाराष्ट्रात मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत वाढले नाहीत तितके मतदार गेल्या 5 वर्षात वाढले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं असून त्यांची चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली असल्याचं म्हटलं आहे. 

राहुल गांधींनी मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं सांगायचं तर मतांची चोरी ना महाराष्ट्रात, ना भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून त्याच गोष्टी रोज बोलतात. रोज खोटं बोलतात, पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात”.

“मागच्या वेळी महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढल्याचं म्हणाले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता आपली जमीन संपली असल्याचं समजलं आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही. बिहारमध्येही निवडून येणार नाहीत. म्हणून हे कव्हर फायरिंग आहे,” असा आरोप त्यांनी केला. 

“माझा एक प्रश्न आहे की, तुम्ही वारंवार मतदारयादीत गोंधळ आहे म्हणता. मग जर निवडणूक आयोगाने बिहारच्या यादीची व्यापक सुधारणा सुरु केली आहे तर त्याला विरोध का आहे? कित्येक वर्षी आम्ही व्यापक सुधारणेची मागणी करत आहोत. 2012 साली तर मी याचिका केली आहे. मग सुधारणा होणार कशी? आपल्या कायद्यात काय आहे? निवडणूक आयोगाने पुनरावलोकन करणं हेच महत्त्वाचं आहे. त्यालाही विरोध करायचा आणि मतदार यादी खराब असल्याचंही म्हणायचं. एका प्रकारे भारताच्या आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत, त्यावरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, लोकशाही प्रक्रियांवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे आणि अराजक झालं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसत आहे. कारण त्यांना पुढे पक्षाचं भविष्य दिसत नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे. 

‘एकाच पत्त्यावर 46 मतदार’

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मतदानाची संख्या वाढली. पोलिंग आणि ओपिनियम पोलमध्ये डाटा वेगळा दिसतोय मात्र निकाल वेगळाच आहे. वोटर लिस्टमध्ये एका पत्त्यावर 46 मतदार सापडले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

‘एक लाखांहून अधिक मतांची चोरी’

मतदार यादीत बोगस नावं जोडण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी कर्नाटकची मतदार यादी दाखवत दावा केला की, बंगळुरूमध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात मतांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली झाली. महादेवपुरा क्षेत्रात 6.5 लाख मतांमध्ये एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. 

‘एका व्यक्तीची चार मतदार कार्ड’

एका व्यक्तीने चार वेगवेगळ्या ठिकाणाचे मतदार कार्ड बनवण्यात आले. एकच मतदार तीन राज्य कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये रजिस्टर करण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

 

FAQ

1) राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर कोणते आरोप केले आहेत?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात जोडलेल्या मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांतील वाढीपेक्षा जास्त आहे. तसेच, एकाच पत्त्यावर ४६ मतदार, एका व्यक्तीची चार मतदार कार्डे आणि एकच मतदार कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात नोंदवले गेल्याचा आरोप केला.

2) राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा कसा केला?

राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात ६.५ लाख मतांपैकी १ लाखाहून अधिक मतांची चोरी झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदानाची संख्या अचानक वाढली आणि पोलिंग व ओपिनियन पोलच्या डेटापेक्षा निकाल वेगळे आले.

3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना काय उत्तर दिले?

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना खोडून काढताना म्हटले की, मतांची चोरी झालेली नाही. त्यांनी राहुल गांधींची “चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली आहे” अशी टीका केली. तसेच, राहुल गांधी रोज खोटे बोलतात आणि सनसनी निर्माण करण्यासाठी वेगवेगळे आकडे देतात, असा आरोप केला.





Source link

महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय भूकंपाची दिल्लीत तयारी! ठाकरे बंधूंच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा?

महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय भूकंपाची दिल्लीत तयारी! ठाकरे बंधूंच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा?


No match is being played.

Aug 04, 2025 | 3rd T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 189/4

VS

WI

176/6(20 ov)

Pakistan beat West Indies by 13 runs
Full Scorecard →

Aug 03, 2025 | 2nd T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 133/9

VS

WI

135/8(20 ov)

West Indies beat Pakistan by 2 wickets
Full Scorecard →

Aug 01, 2025 | 1st T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 178/6

VS

WI

164/7(20 ov)

Pakistan beat West Indies by 14 runs
Full Scorecard →





Source link

महाराष्ट्रातील शाळेत पहिली-दुसरीच्या पुस्तकातील ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ कवितेमुळे गोंधळ, काय आहे नेमकं प्रकरण?


Same poem Controversy: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी तयार केलेल्या पुस्तकातील कवितेमुळे गोंधळ निर्माण झालाय. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येतेय. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ असे या कवितेचे नाव आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईच्या धर्तीवर नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. मात्र, या नवीन पुस्तकांमध्ये ही कविता दोन्ही वर्गांमध्ये जशीच्या तशी समाविष्ट करण्यात आल्याने यामागील हेतू आणि नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एकच कविता, फक्त चित्रात बदल?

‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 28 वर आहे. तर दुसरीच्या पाठ्यपुस्तकात तीच कविता पान क्रमांक 16 वर आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी कवितेचा मजकूर एकसमान आहे; केवळ त्यासोबतच्या चित्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कवितेची पुनरावृत्ती दोन्ही वर्गांमध्ये का झाली?, याबाबत बालभारतीकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. यामुळे पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये याबाबत नाराजी आणि गोंधळाचे वातावरण आहे.

पालकांचा संभ्रम आणि प्रश्न काय?

पालकांचे म्हणणे आहे की, दोन वेगवेगळ्या वर्गांसाठी एकच कविता समाविष्ट करणे यातून पाठ्यपुस्तक निर्मितीतील निष्काळजीपणा दिसून येतो. एका पालकाने सांगितले, “पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगळा असायला हवा. एकच कविता दोन्ही वर्गांत समाविष्ट करून मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मर्यादित होते.” दुसऱ्या एका पालकाने प्रश्न उपस्थित केला की, “ही कॉपी-पेस्टची चूक आहे की बालभारतीची ही काही खास रणनीती आहे? याबाबत स्पष्टता हवी.

सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम?

यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सीबीएसईच्या धर्तीवर एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. या नवीन अभ्यासक्रमात भाषा, गणित, इंग्रजी आणि ‘खेळू, करू, शिकू’ या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. या अंतर्गत, इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्तींमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द, अक्षरे, त्यांचे उच्चार, कविता गायन, साध्या सूचना समजणे आणि स्वतःबद्दल बोलणे यासारख्या कौशल्यांचा समावेश आहे. मात्र, ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता दोन्ही वर्गांमध्ये समाविष्ट झाल्याने या एकात्मिक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बालभारतीची भूमिका काय?

बालभारतीकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ही कविता दोन्ही वर्गांमध्ये समाविष्ट करण्यामागे काही शैक्षणिक हेतू आहे की ही निव्वळ चूक आहे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काही शिक्षकांचे मत आहे की, ही कविता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असू शकते, परंतु दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीच कविता पुन्हा समाविष्ट करणे अनावश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्यातील उत्साह आणि आव्हान कमी होऊ शकते.

FAQ

पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता का समाविष्ट आहे?

‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात (पान क्रमांक 28) आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकात (पान क्रमांक 16) समाविष्ट आहे. यामागे बालभारतीचा काही शैक्षणिक हेतू आहे की ही चूक आहे, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

या कवितेत काय बदल आहे?

दोन्ही वर्गांमधील कवितेचा मजकूर एकसमान आहे. केवळ कवितेसोबत असलेल्या चित्रांमध्ये बदल करण्यात आला आहे.

ही कविता दोन्ही वर्गांमध्ये समाविष्ट करण्यामागील कारण काय आहे?

बालभारतीने याबाबत कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही. ही कॉपी-पेस्टची चूक असावी किंवा काही शैक्षणिक उद्दिष्ट असावे, याबाबत माहिती नाही. पालक आणि शिक्षकांनी याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

यंदा अभ्यासक्रमात काय बदल झाले आहेत?

यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) आणि सीबीएसईच्या धर्तीवर एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी आणि ‘खेळू, करू, शिकू’ या विषयांचा समावेश आहे.





Source link

'बंद करा, बंद करा' मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात अन् प्रेक्षकांतून घोषणाबाजी; महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारावेळी नेमकं काय घडलं?

'बंद करा, बंद करा' मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात अन् प्रेक्षकांतून घोषणाबाजी; महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारावेळी नेमकं काय घडलं?


Khalid Ka Shivaji Cinema Controverversy: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा नुकताच वरळीत पार पडला. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना देण्यात आला. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत असताना 2 प्रेक्षकांनी घोषणाबाजी केली. यामुळे थोडावेळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला

मुख्यमंत्री भाषण करायला गेले आणि…

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडले. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे असताना प्रेक्षागृहातून दोन इसम उभे राहिले आणि मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. या इसमांच्या हातामध्ये फलक होते. ‘बंद करा. बंद करा. इतिहासाचे विकृतीकरण बंद करा’ अशा घोषणा ते देत होते. यानंतर काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय. कार्यक्रम खराब करु नका.’  या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

काय आहे नेमकं प्रकरण?

‘खालिद का शिवाजी’ बंद करा अशी घोषणाबाजी 2 इसमांनी केली. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. पण सिनेमा प्रदर्शनाआधीच वादात सापडलाय. चित्रपट महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केल्याने या सिनेमाची पुन्हा चर्चा झाली.

ते कोणत्या संघटनेचे?

घोषणा देणारे ते दोघे कोणत्या संघटनेचे होते? याची माहिती समोर आली नाही  असे असले तरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 

‘खालिद का शिवाजी’ला कोणाचा विरोध?

मराठी चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागृती समिती यांसारख्या हिंदू संघटनांनी या चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवणे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. या वादामुळे मुंबई पोलिसांनी सकल हिंदू समाजाच्या व्हॉट्सअॅप गटाच्या प्रशासकाला नोटीस बजावली आहे, ज्यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे.

वादाचे कारण काय?

‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित काही दाव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात खालील बाबी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत:  35% सैन्य मुस्लिम होते: चित्रपटात दाखवले आहे की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते.  शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधल्याचा दावा.  यात करण्यात आल्याचा आरोप आहे. शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, असा उल्लेख, असल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आलाय. 

हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं काय? 

हिंदू जनजागृती समितीने या दाव्यांना ऐतिहासिक आधार नसलेले आणि खोटे ठरवत चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. त्यांचा असा दावा आहे की, शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले, आणि त्यांना धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) दाखवणे हे इतिहासाचे विकृतीकरण आहे.या संघटनेने चित्रपटात खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या मनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आंदोलनाची हाक दिली, ज्यामुळे मुंबई पोलिसांना नोटीस जारी करावी लागली.  या संघटनेने चित्रपटातील दावे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांना झालेल्या विरोधाचा दाखला देत ‘खालिद का शिवाजी’वर बंदीची मागणी केली आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp