'बाप म्हणून मला…' धनंजय मुंडे लेकीसाठी झाले व्यक्त, शेअर केली भावुक पोस्ट

'बाप म्हणून मला…' धनंजय मुंडे लेकीसाठी झाले व्यक्त, शेअर केली भावुक पोस्ट


माजी मंत्री धनंजय मुंडे आपल्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा त्यांच मंत्रीपद जाणं असो. याकाळात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तितक्याच महत्त्वाच्या होत्या.  पण या सगळ्यात जेव्हा धनंजय मुंडेंमधला बाप व्यक्त होतो तेव्हा… 

धनंजय मुंडे यांनी आपली दुसरी कन्या जान्हवी मुंडे हिच्या यशाबद्दल एक अभिमानास्पद पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जान्हवी मुंडेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली आहे. तसेच जान्हवी आता कोणती जबाबदारी सांभाळत आहे. तसेच परदेशात राहूनही बाप म्हणून मला तिच्या मेहनतीचा, संवेदनशीलतेचा आणि प्रगतीचा खूप अभिमान वाटतो, अशी भावना यामध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. 

काय आहे पोस्टमध्ये 

माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो!

जान्हवी सध्या Wesleyan University, USA मध्ये  Government आणि Literature या दोन विषयांमध्ये पदवी घेत आहे. मानवी हक्कांसाठी अभ्यास करणं हे तिचं खास क्षेत्र आहे.

कॉलेजच्या वृत्तपत्रात ती आधी फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख होती, आता ती संपूर्ण वृत्तपत्राची मुख्य संपादक झाली आहे!

CT Mirror या अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तसंस्थेत ती सध्या पत्रकार म्हणून काम करते आणि तिथे समाज, सरकार आणि लोकांच्या प्रश्नांवर ती संवेदनशीलपणे लिखाण करते.

शिक्षणासोबतच ती सोशल मिडिया आणि जेलमध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थेत संशोधन करत आहे.

बाप म्हणून मला तिच्या मेहनतीचा, संवेदनशीलतेचा आणि प्रगतीचा खूप अभिमान वाटतो.

ती जे काही करतेय, ते केवळ यशासाठी नाही, तर समाजासाठी आहे आणि हेच तिचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे!

Proud of you Janhavi! 

धनंजय मुंडे यांची खास पोस्ट 

धनंजय मुंडे यांना वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदीश्री मुंडे अशा तीन मुली आहेत. वैष्णवी मुंडे ही माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सर्वात मोठी मुलगी वैष्णवी मुंडे आहे. दुसरी मुलगी जान्हवी असून त्यांच्या धाकट्या मुलीचे नाव अधीश्री आहे. वैष्णवीने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. वैष्णवी मुंबईतील एका नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे.





Source link

शनि शिंगणापूरच्या माजी विश्वस्ताचं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवन

शनि शिंगणापूरच्या माजी विश्वस्ताचं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवन


लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर : शनि शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितिन शेटे यांनी आपलं जीवन संपवलंय. मागील काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. चौकशीच्या कारणामुळे नितीन शेटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललल्याची चर्चा सुरू आहे.

 शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे. नितीन शेटे यांनी घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. नितीन शेटे हे 2021 पासून शनी शिंगणापूर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभारासंदर्भात चौकशी सुरू आहे. आणि याच चौकशीमुळे शेटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

सध्या देवस्थानच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अँप प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

 तर या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.. आणि मुख्यमंत्रीत्र्यांनी शनी शिंगणापूरच्या गावकऱ्यांना देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

 शनी शिंगणापूर देवस्थानच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच माजी विश्वस्ताने आत्महत्या केल्यानं या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जातोय. मात्र असं असलं तरी या प्रकरणात नितीन शेटेंची कोणताही चौकशी करण्यात आली नसल्याचं पोलिसांनीहच स्पष्ट केलंय.. त्यामुळे आता या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केलीय. यातून काय समोर येतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

 





Source link

'तिघांच्या आयुष्याची भट्टी लागू दे…' अघोरी प्रकाराने कोल्हापूर पुन्हा हादरले! पतीने सोडचिठ्ठी द्यावी म्हणून स्मशानभूमीत…

'तिघांच्या आयुष्याची भट्टी लागू दे…' अघोरी प्रकाराने कोल्हापूर पुन्हा हादरले! पतीने सोडचिठ्ठी द्यावी म्हणून स्मशानभूमीत…


प्रताप नाईक, झी मीडिया

Kolhapur Crime News: कोल्हापूरात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याभरापूर्वी कोल्हापुरात अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पतीला सोडचिठ्ठी द्यावी, म्हणून हा अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरमधल्या स्मशानभूमीत हा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. 

कोल्हापुरात अंधश्रद्धेमुळे स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच पुरोगामी म्हणून असणारी जिल्ह्याची ओळख आता पुसट होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आलाय. एका महिलेने आपल्या पतीपासून ‘सोडचिठ्ठी’ देऊन वेगळं व्हावं आणि आणखी तिघांचे आयुष्य उद्ध्व्स्त होण्यासाठी हा अघोरी प्रकार केला गेल्याचा संशय आहे.

भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. काही मंडळी साफसफाईसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद मिळून आला. त्यावेळी तिथे एक कागददेखील सापडला. हा कागद उघडून वाचला असता त्यावर एका महिलेचे नाव नमूद करुन सोडचिठ्ठी द्यावी असा मजकूर लिहलेला आहे. 

तसंच, त्या चिठ्ठीत आणखी तिघांची नावं लिहून त्यांच्या आयुष्याची भट्टी लागवी म्हणजेच वाट लावावी असेही लिहिलं होतं. दरम्यान अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या प्रकारामुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसंच, संतापाची लाटदेखील गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कोल्हापुरात खळबळ

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीदेखील कोल्हापुरात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 





Source link

' आता नो सुई, नो उईउई'; इंजेक्शनची भीती वाटणा-यांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन

' आता नो सुई, नो उईउई'; इंजेक्शनची भीती वाटणा-यांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन



 नागपुरात सुई नसलेलं इंजेक्शन आलंय. बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडेंनी हे इंजेक्शन चिमुकल्यांना देऊन प्रात्यक्षिकही दाखवलं. इंजेक्शननंतरही मुलींच्या चेह-यावर हसू पाहायला मिळतंय. 



Source link

'मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी…' उद्धव यांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

'मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी…' उद्धव यांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?


Raj Thackeray Reaction: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या अचानक भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी या भेटीचे स्वागत केलंय तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज यांनी सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलीय. यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलंय. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला. ज्यावर ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या  बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’ असे कॅप्शन दिले. यातून राज ठाकरेंना काय सुचवायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागलाय. 

याआधी कशामुळे आले ठाकरे बंधू एकत्र?

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती, परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, “आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,” असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगितले.

पालिका निवडणुकीसाठी येणार एकत्र?

आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि सत्ताधारी महायुतीला (BJP-शिंदे गट) आव्हान देण्यासाठी ही जवळीक महत्त्वाची मानली जाते. असे असले तरी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शिवसेनेत असताना राज ठाकरेंना पक्षात दुय्यम स्थान दिले गेले आणि उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले गेले. यामुळे दोघांमधील राजकीय आणि वैयक्तिक तणाव वाढला. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली. 2006 नंतर अनेकदा राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, परंतु राजकीय मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील स्थानिक पातळीवरील संघर्षांमुळे युती शक्य झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, पण ती प्रत्यक्षात आली नव्हती.

राजकीय अस्तित्वाचे आव्हान आणि मराठी मतदारांचा पाठींबा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठाधक्का बसला, तर मनसेला निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश आले आहे. दोन्ही पक्षांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी मतदारांमध्ये इतर भाषिकांच्या वाढत्या प्रभावामुळे नाराजी आहे. राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा पारंपरिक जनाधार यांचा एकत्रित परिणाम सत्ताधारी महायुतीला आव्हान देऊ शकतो. तसेच मराठी मतदारांचा मोठा पाठींबा ठाकरे बंधुंना पाहायला मिळतोय.





Source link

वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ



संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र,  तुरुंगात वाल्मिक कराड मोबाईल फोन वापरत असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नवा वाद उफाळला आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp