अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 जणांचा मृत्यू; वाचा संपूर्ण यादी आणि सविस्तर माहिती

अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 जणांचा मृत्यू; वाचा संपूर्ण यादी आणि सविस्तर माहिती


Ahmedabad Plane Crash Maharashtra Victim: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 240 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी जीव गमावला आहे. हे सहा जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये तीन क्रू मेम्बर आणि एक पायलट तसंच एक दाम्पत्य आहे. त्यांची नावं दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (गोरेगाव), सुमित सभरवाल (पवई), महादेव पवार (सोलापूर), आशा पवार (सोलापूर), रोशनी सोनघरे (डोबिंवली) आणि मैथिली पाटील (नवी मुंबई) अशी आहेत.

1) दीपक पाठक 

दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडिया नोकरीला होता. त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. आज सकाळीच टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट केलं होतं. 

2) अपर्णा महाडीक

चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (35) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे. 

अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. 

3) सुमित सभरवाल

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को-पायलट सुमित सबरवाल याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल याचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्याने सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमितच्या पश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे. 

4) महादेव पवार आणि आशा पवार 

मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील पवार दांपत्याचा विमान अपघातात समावेश आहे. महादेव पवार ( वय ६७) आशा पवार ( वय ५५) यांनी त्यांचा जीव गमावला आहे. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे.

5) रोशनी सोनघरे

अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. 

रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोषणाईचा दुर्दैवी मृत्यू झालाय..

6) क्लाईव्ह कुंदर 

क्लाईव्ह कुंदर पायलट इन कमांड सुमित सभरवाल सह-पायलट होता. मुंबईतील पश्चिम उपनगरात तो वास्तव्यास होता.





Source link

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?



Maharashtra Political News: राज्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असताना आज मुंबईमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं.



Source link

नाशकात पोलिसांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे कडक कधी होणार?

नाशकात पोलिसांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे कडक कधी होणार?



Nashik Crime: नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागाच थेट बळकावण्याचा प्रयत्न समोर आलाय.



Source link

आणखी किती दिवस उन्हाचा चटका सहन करावा लागणार? मान्सून 'या' दिवशी जोर धरणार, आज यलो अलर्ट जारी

आणखी किती दिवस उन्हाचा चटका सहन करावा लागणार? मान्सून 'या' दिवशी जोर धरणार, आज यलो अलर्ट जारी


Maharashtra Weather Update: जून महिन्यातच पावसाने ब्रेक घेतल्यामुळं उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. अनेक जिल्ह्यातील कमाल तापमान चाळीशीपार पोहोचले आहे. विदर्भात उन्हामुळं काहिली होत आहे. असे असतानाच आज 11 जानेवारी रोजी मात्र सातारा, सांगली सह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 

विदर्भात काही जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत चालला आहे. नागपूर येथे राज्यातील उच्चांकी 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम,नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान विभागाने आज दक्षतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसासाठी आणखी तीन ते चार दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत असल्याने 14 जूनपर्यंत मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मान्सूनची चाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 14 जूनपर्यंत मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे. 

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13-16 June दरम्यान कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात, ज्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते, कदाचित स्थानिक पूरामुळे पूल झाकले जाऊ शकतात, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.

विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा

विदर्भात अजूनही मान्सूनची प्रतीक्षा सुरू असून नागपुरात तर 43 अंश सेल्सिअस पर्यंत पारा पोहचला होता.  त्यामुळे विदर्भात मान्सूनच्या प्रतीक्षेत अजून ही उन्हाचे चटके बसत बसत आहे. दरम्यान -बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा हा 12 जून नंतर मान्सून विदर्भात घेऊन येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 





Source link

Success Story : 26 पोस्टमनमध्ये एकच महिला 'पोस्टवुमन'; वडिलांच्या एका इच्छेखातर…

Success Story : 26 पोस्टमनमध्ये एकच महिला 'पोस्टवुमन'; वडिलांच्या एका इच्छेखातर…


Akanksha Gaikwad Success Story: आजही आपल्या समाजात महिलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पण तरीही काही महिला आहेत ज्या या अडचणींवर मात करून एक आदर्श निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आकांक्षा गायकवाडची आहे, जी आज सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे तसेच चर्चेचा विषय आहे. तिची कहाणी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ च्या लिंक्डइन पेजवर शेअर करण्यात आली आहे.

“मी एक पोस्टमन आहे – आणि हो…”

आकांक्षा तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “तुम्ही हा कोट, खाकी बॅग आणि पत्र पाहताय का? मी एक पोस्टमन आहे! हो, आम्ही अजूनही अस्तित्वात आहोत आणि हो, मी एक महिला पोस्टमन आहे.” आकांक्षाने गणितात पदवी मिळवली होती. तीन वर्षांपूर्वी तिने इंडिया पोस्टमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने कधीही विचार केला नव्हता की ती पोस्टवुमन होईल. ती म्हणाली, “वडिलांनी मला सरकारी नोकरी करायला सांगितले होते. मला वाटले की ते डेस्क जॉब असेल. पण तिथे सांगण्यात आले – ‘तुम्हाला पत्रे पोहोचवावी लागतील.’ मला आश्चर्य वाटले.”

आकांक्षा सांगते की त्या ऑफिसमध्ये एकूण २६ डिलिव्हरी कर्मचारी होते, त्यापैकी ती एकटी मुलगी होती. सुरुवातीला, तिचे पालक देखील काळजीत होते – “आता मुलगी फिरून पत्रे पोहोचवेल?” आकांक्षा स्वतः देखील विचार करू लागली, “लोक अजूनही पत्रे पाठवतात का?” पण पहिल्या महिन्यातच तिचा दृष्टिकोन बदलला. तासन्तास चालणे आणि घरोघरी जाऊन पत्रे पोहोचवणे सोपे नव्हते, परंतु या काळात तिला खूप चांगले लोक भेटले. एकदा एका म्हाताऱ्या काकूने दार उघडले आणि म्हणाल्या, “मला माहित नव्हते की महिला देखील पत्रे पोहोचवतात!” तिने तिला प्यायला पाणी दिले आणि जेवणही दिले.

आकांक्षाने एक सुंदर क्षण शेअर केला, “एके दिवशी ऑफिसमधून परतताना, जवळच्याच एका लहान मुलीने मला म्हटले- ‘दीदी, मलाही पोस्टवुमन व्हायचे आहे.’ तो क्षण मला भावला.” आतापर्यंत आकांक्षाने १ लाखाहून अधिक पत्रे वाटली आहेत. तिच्या पालकांनाही आता तिचा अभिमान आहे. आकांक्षा म्हणते, “पत्रे मिळाल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य हा माझा आनंद आहे. मला वाटते की मी लोकांना जोडण्याचे काम करते.” संपूर्ण पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा-

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 

आकांक्षाची ही कहाणी व्हायरल झाली आहे. एका युझरने लिहिले, “तू फक्त पत्रे वाटत नाहीस, तर लोकांच्या हृदयात जागा निर्माण करतेस” दुसऱ्याने म्हटले, “तुझं हास्य सगळं काही सांगून जातं.”





Source link

रेलमंत्री की रिलमंत्री?, आदित्य ठाकरेंचं रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र

रेलमंत्री की रिलमंत्री?, आदित्य ठाकरेंचं रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र


मुंबई : लोकल दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. तर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुंबईतल्या दिव्या आणि मुंब्रादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. या लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 9 प्रवासी हे जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर आता सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. देशाचे रेलमंत्री नव्हे तर रिलमंत्री असल्याचं शरसंधान आदित्य ठाकरेंनी साधलं. तर दुर्घटनेची जबाबदारी ही रेल्वे विभागाचीच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. 

तर दुसरीकडे लोकल दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील रेल्वे प्रशानावर खापर फोडलं आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि बाहेरून येणारे लोंढ्यामुळे मुंबईची ही परिस्थिती झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.  दरम्यान या घटनेची रेल्वे मंत्रालयांकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. 

दिवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान ही घटना घडल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिव्यापासून काही लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच कल्याण, डोंबिवलीमध्येच लोकल फुल होतात त्यामुळे दिवा, कळवा, मुंब्र्यात प्रवाशांसाठी जागाच शिल्लक राहतात नाही. त्यामुळे लोक जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.

लोकल दुर्घटनेची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. कसारा, खोपली, पालघर, विरारवरून मुंबईत येण्यासाठी एकमेव पर्याय हा लोकलच आहे. या परिसरात देखील गर्दी वाढतेय. मात्र, लोकल मर्यादितच आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रशासन कसं नियंत्रण मिळवणार? असा देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना रेल्वे प्रशासनानं कराव्यात जेणेकरून वारंवार अशा घटना होणार नाहीत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp