1 मे रोजी बँका बंद असतील की सुरू, शेअर बाजार बंद असणार का? जाणून घ्या

1 मे रोजी बँका बंद असतील की सुरू, शेअर बाजार बंद असणार का? जाणून घ्या


Bank Holiday on May 1: 1 मेच्या दिवशी तुम्ही बँकेचे कोणते काम करण्यासाठी जात असाल तर आत्ताच ही बातमी वाचा. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँक बंद राहणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकानुसार 1 मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, मेमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असणार आहेत. यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि 4 रविवार यांचाही समावेश आहे. RBIच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुट्टीच्या यादीत वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात येतात. 

महाराष्ट्राव्यतिरिक्त या राज्यातही बँका बंद

1 मे रोजी कामगार दिन असल्यामुळं महाराष्ट्राव्यतिरिक्त इतरही राज्यात बँका बंद असणार आहेत. बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, कोलकाता, पणजी, पटना आणि थिरुअनंतापुरम या राज्यातही बँका बंद असतील. 

1 मेला शेअर बाजारही बंद 

1 मे रोजी BSE आणि NSE देखील बंद असणार आहेत. या दिवशी शेअर बाजाराचे कोणतेही काम होणार नाही. शेअर बाजार बंद असणार आहे.  

30 मे रोजीही बँका बंद

30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बेंगळुरूत बँका बंद असणार होत्या. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळं या दिवशी सराफा दुकानात मोठी गर्दी होते. 





Source link

IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत… 'या' दिवशी सुरू होणार

IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत… 'या' दिवशी सुरू होणार


Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour: लवकरच महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही रेल्वे टूर सुरू करण्यात येत आहे. आयआरटीसीकडून भारत गौरव ट्रेनअंतर्गंत ही टूर सुरू होणार आहे. या टूरच्या माध्यमातून तुम्ही महाराजांचे गडकिल्ले, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. आयआरसीटीसीने पाच दिवसांच्या टूरची घोषणा केली आहे. 9 जून 2025 पासून ही टूर भारत गौरव पर्यटक ट्रेनअंतर्गंत आयोजित करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत प्रमुख ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या टूरची किंमत किती आणि कोणती स्थळे पाहता येणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही टूर मुंबईतील सीएसएमटी येथून सुरू होईल आणि तिथूनच या टूरची सांगता होणार आहे. मात्र प्रवासी दादर, ठाणे येथेही बोर्डिंग करु शकणार आहात. आयआरटीसीकडून या टूरची सविस्तर माहिती समोर आली आहे.

या स्थळांना भेट देऊ शकणार

रायगड किल्लाः स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक स्थळ

पुण्यातील लाल महाल आणि कसबा गणपतीः छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्यात गेले. तर, कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता ग्रामदेवता आहे.

शिवनेरी किल्लाः शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला

प्रतापगड किल्लाः सातारा जिल्ह्यात हा किल्ला असून येथेच शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला

पन्हाळा किल्लाः हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. 

कोल्हापूरातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचादेखील या टूर पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

ही संपूर्ण यात्रा पाच दिवसांची असून सहाव्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. तर, प्रमुख स्थळांमध्ये मुंबई, रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापुर, पन्हाळा या शहरांचा समावेश आहे. 

या टूरमध्ये तीर्थक्षेत्रांचाही समावेश

भीमाशंकर येथे भगवान शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. 

कोल्हापूरः महालक्ष्मी मंदिराला पौराणिक महत्त्व असून स्थानिक अंबाबाईच्या रुपात पुजतात. 

टूरची किंमत किती?

ही टूर तीन श्रेणींमध्ये असणार आहे. 

इकोनॉमी (स्लीपर क्लास): 13,155 रुपये 
कम्फर्ट (3AC): 19,840 रुपये
सुपीरियर (2AC): 27,365 रुपये

पॅकेजच्या आधारेच AC/Non Ac हॉटेलमध्ये नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. ऑनबॉर्ड आणि ऑफबोर्ड असताना शाकाहरी जेवण देण्यात येणार आहे.





Source link

'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा…'

'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा…'



कोकणातील दोन मंत्री नितेश राणे आणि योगेश कदम आपापसात भिडले आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांची भांडणं समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे. 
 



Source link

'ती येत नाही तोपर्यंत…', इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….

'ती येत नाही तोपर्यंत…', इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….


वाल्मिक जोशी, झी मीडिया

Jalgaon Crime News: जळगावात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. प्रेमभंग झाल्याच्या कारणातून विद्यार्थ्याने कॉलेजच्या आवारातच गळफास घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थी सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटसदेखील या तरुणाने पोस्ट केले होते. जळगाव येथे ही भयंकर घटना घडली आहे. सत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

प्रेमभंगाच्या दुःखातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट जळगावच्या सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सत्तू कोळी असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील एका दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी सत्तू कोळी याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटस देखील पोस्ट केले होते.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने स्टेटसदेखील ठेवले होते. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मला खाली उतरवू नका आणि माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असा व्हिडिओ केला होता. त्यानंतर त्याने महाविद्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. सकाळी कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

जळगावात बापाकडून मुलीची हत्या

जन्मदात्या बापानेच मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. त्याच रागातून मुलीच्या बापाने तिच्यासह जावयावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती पाठीत गोळी घुसल्याने गंभीर जखमी झाला आहे, त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तृप्ती अविनाश वाघ असे मयत 24 वर्षीय तरुणीचे नाव असून अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव असून ते सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे.





Source link

UPSC, MPSC करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो मुलं पुण्यातील या एकाच ठिकाणी का येतात? ठिकाणाचं नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल

UPSC, MPSC करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो मुलं पुण्यातील या एकाच ठिकाणी का येतात? ठिकाणाचं नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल


Pune Sadashiv Peth UPSC MPSC Classes : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदाच्या परीक्षेत 577 मुलं आणि 182 मुलींसह एकंदर 759 जणांची आयएएएस, आयपीएस, आयएफएस सह इतर सेवांसाठी निवड करण्यात आली आहे.  या परिक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील चांगले यश मिळवले आहे. अशातच चर्चेत आले आहे ते पुण्यातील एक ठिकाण जिथं महाराष्ट्रातील लाखो मुलं UPSC, MPSC  करण्यासाठी येतात. /e ठिकाणाचं नाव आणि येथे येण्याचे कारण जाणून शॉक व्हाल. 

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात अनेक नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालये आहेत. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी देखील अभ्यासासाठी पुण्यातच येतात. UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात सोईचे ठिकाण म्हणजे सदाशिव पेठ. पुण्याच्या सदाशिव पेठेतून फेरफटका मारताना जुने वाडे, जुन्या इमारती यांच्यासह लक्ष वेधून घेतात ते स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणाऱ्या संस्थांचे बोर्ड आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे घोळके.

पुणे हे कायम शिक्षणाचं मुख्य केंद्र अआहे. मेडिकल, इंजिनियरींग प्रमाणेच आता पुणे  UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आकर्षित करत आहेत.  पुण्याची सदाशिव पेठ हे UPSC, MPSC परिक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र आहे. 

बीड, लातुर, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावतीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी UPSC, MPSC परिक्षेची तयारी करण्यासाठी सदाशिव पेठेत येतात. UPSC, MPSC ची शिकवणारी घेणाऱ्या अनेक नामांकित संस्था सादशिव पेठेत आहेत. सदाशिव पेठेत फिरताना असा प्रकारचे क्लासेस मोठ्या संख्येने पहायला मिळतात. 

यामुळेच सदाशिव पेठेत मोठी आर्थिक उलाढाल देखील होते. लाखो विद्यार्थी विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. क्लासेस चालक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतात. लाखो विद्यार्थी UPSC, MPSC परीक्षेची तयारी करत असले तरी यातील फक्त हजारच्या आसपासच विद्यार्थी अधिकारी बनतात. 

सदाशिव पेठेत UPSC, MPSC चा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अनेकांना रोजगार मिळतो. मुलांची राहण्याची व्यवस्था, मेस असे अनेक व्यवसाय येथे चालतात. फक्त  UPSC, MPSC चे क्लासेस घेणाऱ्या संस्थाच लाखो रुपयांची कमाई करत नाहीत तर यांच्यासह मुलांना रहाण्यासाठी PG चालवणारे, खानावळ इतकचं नाही तर सकाळी मुलांना चहा आणि नाश्ता विकणारे देखील बक्कळ कमाई करतात. एकूणच काय तर UPSC, MPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या लाखो मुलांमुळे सादशिव पेठेत कोट्यावधीची उलाढाल होते.   

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp