by Hansraj Agrawal | Apr 26, 2025 | Trending News
Pune-Bengaluru Expressway: मुंबईतून आता फक्त 6 तासांत आता बंगळुरु पोहचता येणार आहे. मुंबई आणि बंगळुरु दरम्यान ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. याच पुणे बंगळुरु द्रुतगती महामार्गाचे (Pune-Bengaluru Expressway) काम अती जलद गतीने सुरु आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे ते बंगळुरू दरम्यान सुमारे 700 किमी लांबीचा ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारला जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या रिंग रोडपासून एक वळण लागेल आणि तिथून हा हायवे सुरु होणार आहे. आयटी हब असलेल्या पुणे आणि बंगळुरु या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला जात आहे. या सुपफास्ट हायवेच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे.
सध्या मुंबईतुन बंगळुरुला जाण्यासाठी 18 ते 19 तास लागतात. तर, पुणे ते बंगळुरु हा प्रवास 15 – 16 तासांचा आहे. नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे-बंगळुरु प्रवास फक्त 5 ते 4 तासांत होणार आहे. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईहून बंगळुरुला फक्त 6 तासांत पोहचता येणार आहे.
नवा द्रुतगती महामार्ग अॅक्सेस-कंट्रोल ग्रीनफिल्ड स्वरुपाचा असणार आहे. या द्रुतगती मार्गावर 2 आपत्कालीन हवाई पट्टी, 55 उड्डाणपूल 22 इंटरचेंज असणार आहेत. यावर फक्त हायस्पीड वाहनांना परवानगी असेल. या एक्स्प्रेस वेवर वाहन ताशी 120 किमी वेगाने वाहने धावणार आहेत.
बंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकातील 9 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रात हा मार्ग पुणे रिंगरोडवरील कांजळे येथून सुरू होऊन पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. कर्नाटकात, बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगलोर ग्रामीण या जिल्ह्यांतून हा महामार्ग बंगळुरु शहरात संपणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) देखरेखीखाली हा द्रुतगती मार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग 8 लेनचा असणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 26, 2025 | Trending News
Pakistanis living in Maharashtra: जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येतंय. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या करारात अनेक निर्बंध आणले. यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानींना देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांना 48 तासांचा अल्टीमेटमही देण्यात आला.
महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. अल्पकालीन व्हिजा म्हणजेच शॉर्ट टर्म व्हिसा असलेले एकूण 55 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार ठाणे शहरात 19, नागपूरमध्ये 18, जळगांवमध्ये 12, पुणे शहरात 3, मुंबईत 1, नवी मुंबईत 1 आणि रायगडमध्ये 1 पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर असल्याचे समोर आलंय.
भारतात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातून समोर आला, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सार्क व्हिजा, टुरिस्ट व्हिजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचा आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे . या प्रकारानंतर जिल्हा पोलीस दल सक्रीय झालं असून जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी तसेच चौकशी सुरू करण्यात आली आहे. 327 पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये टुरिस्ट व्हिजा घेऊन राहत असल्याची बाब समोर आली आहे, या संदर्भात शासनाचे कारवाई संदर्भातले जे आदेश येतील त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी ही माहिती दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी जळगावत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जळगाव शहरात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी सिंधी बांधव राहत असल्याचा समोर आलं होतं. संबंधितांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, मात्र नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या सरकारच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचा संबंधित व्यक्तींकडून पालन होत नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो असं गजानन मालपुरे यांनी म्हटलं आहे. राजकीय दबाव असल्यामुळे संबंधितांकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील गजानन मालपुरे यांनी केला आहे. दरम्यान, संबंधित नियम अटींचं पालन करत नसल्यामुळे भविष्यात अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील गजानन मालपुरे यांनी उपस्थित केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 25, 2025 | Trending News
Ripe Mango Juice: उन्हाळा सुरु असून आंब्याचा सिझनदेखील सुरु झालाय. आमरस प्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे. तुमच्या वाटीत येणारा आमरस खरंच अस्सल ताज्या आंब्यांपासून बनलेला असेल याची काही खात्री नाही. पिवळाजर्द दिसणारा आमरस कदाचित सडक्या आंब्यांपासूनही बनवलेला असू शकतो. यामागे कारणही तसंच आहे. कारण नवी मुंबईत अशा एका गलिच्छ आमरस कारखान्याचा पर्दाफाश झालाय.
उन्हाळ्यात आमरस म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शहरात अनेकजण अगदी कितीही पैसे मोजून आमरस विकत आणतात आणि तो खातात. मात्र ही दृश्य बघितली तर पुन्हा तुम्ही बाजारातून आमरस विकत आणायचं धाडस करणार नाही. नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेनं धाड टाकली. तेव्हा अतिशय धक्कादायक दृश्य समोर आलं. एका चाळीतल्या खोलीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. याच सडक्या आंब्यांपासून आमरस बनवला जायचा. या आमरसचं श्रीजी या नावानं ब्रॅण्डिंग करुन नवी मुंबई आणि आसपासच्या शहरात विकलं जात होतं.
या सडलेल्या खराब झालेल्या आंब्यांसपासून रोज तब्बल 6 हजार लिटर आमरस बनवला जातो. धक्कादायक म्हणजे या आमरस बनविणाऱ्या कारखान्याकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स.. मात्र बिनबोभाट नागरिकांच्या आयुष्याशी खेळ सुरू होता.
मनसेनं या घाणेरड्या आमरस कारखान्याचा भांडाफोड केला. त्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिली मात्र मनपा अधिकारी कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यामुळं या अधिकाऱ्यांना कारवाई टाळण्यासाठी कोणती मलाई खाऊ घालण्यात आलीय. असा सवाल उपस्थित होतोय.
आजकाल कोणताही अन्नपदार्थ शुद्ध, चांगल्या प्रतिचा मिळेल याची कोणतीच खात्री नाही. चार पैसे कमावण्यासाठी असं घाणेरडं आमरस बनवून ते शेकडो घरात ताजं, रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह विरहीत म्हणून विकलं जातंय. किमान आतातरी अशा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाने आणि कंपन्यांवर तात्काळ कठोर केली जाणार असा सवाल आता नागरिकच विचारताहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 25, 2025 | Trending News
Wai Tention Over Pahalgam Attack: देशरामध्ये काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यात सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची दाट शक्यता असून भारताने तातडीने निर्णय घेत पाकिस्तानसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारी स्तरावर या प्रकरणावरुन घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे मयत पर्यटकांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून भारतीयांचे डोळेही पाणावले आहेत.
पहलगाममधील हल्ल्यातील मयत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीमधील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा समावेश आहे. सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील दोन दिवसांमध्ये विशेष विमानाने काश्मीरमध्ये अडकलेले 500 हून अधिक पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून थेट पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे.
नेमकं घडलं काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वाईमध्ये राहणाऱ्या शुभम कांबळे नावाच्या युवकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटसला थेट पाकिस्तानचा झेंडा ठेवला. इतकंच नाही, तर भारत देशाबद्दल शुभमने स्टेटला आक्षेपार्ह मजकूरही पोस्ट केल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे शुभम राहत असलेल्या गावात आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
मित्रानेच दाखल केली तक्रार
सदर प्रकाराची माहिती आरोपी शुभमच्या मित्रालाच मिळाली आणि त्यानेच वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शुभमला ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शुभमने नेमकं असं का केलं? यामागील त्याचा उद्देश काय आहे याबद्दलची चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे.
साताऱ्यातील मुस्लीमांनी जाळला पाकिस्तानी झेंडा
साताऱ्यात मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पहलगाम येथील घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा ध्वज जाळला. साताऱ्यातील पोवई नाक्यावर पाकिस्तानचा विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज फाडून जाळण्यात आला. निरपराध नागरिकांना मारणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी, सकल मराठा मुस्लिम समाज संघटनेच्या अरबाज शेख यांनी केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 24, 2025 | Trending News
Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना आणण्यावरुन महायुती सरकारमध्येच चढाओढ सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मदत व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये जाण्याअगोदरच एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमधून बचावकार्य सुरु केलंय. शिंदे समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप शिवसेना UBTनं केलाय. तर विरोधकांच्या या टीकेचा सरकारनं समाचार घेतलाय.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले हजारो पर्यटक तिथंच अडकून पडलेत. या सगळ्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीनं हालचाली सुरु झाल्यात. उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानानं श्रीनगरमध्ये गेले. त्यापूर्वीच श्रीकांत शिंदेंचे काही कार्यकर्ते श्रीनगरमध्ये मराठी माणसांच्या मदतीसाठी लागले होते.
दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरमध्ये पाठवलंय. त्यांनीही मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात धाडण्यासाठी व्यवस्था केलीये. शेवटचा मराठी माणूस महाराष्ट्रात जाईपर्यंत श्रीनगरमध्ये थांबण्याचा त्यांनी निर्धार केलाय. एकाच महायुती सरकारचं एकत्र बचावकार्य अपेक्षित होतं. पण शिवसेना आणि भाजपचं वेगवेगळं बचावकार्य सुरु असल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. विरोधक मराठी माणसाच्या मदतीतही राजकारण करत असल्याचा पलटवार गुलाबराव पाटलांनी केलाय. महायुती सरकार एकदिलानं एकजुटीनं मदतकार्य करत असल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलंय.
मदतीच्या कामात कुणी राजकारण करु नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलाय. सत्ताधा-यांच्या उणिवा काढणं हे विरोधकांचं कामच आहे. मराठी पर्यटकांच्या बचावकार्यातही महायुतीत नसलेली एकी विरोधकांना ठळकपणं जाणवली.. तोच मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय.
मदतीवरुन शिवसेना विरुद्ध शिवसेना
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शिवसेनेनं श्रीनगरमध्ये मदतकार्य़ सुरु केलंय. या मदतकार्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही नेता दिसत नसल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एकही नेता मुंबई विमानतळावरही दिसला नसल्याचा आरोप पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी लगावलाय.एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. मराठी माणसांना मदत न करता घरात बसून बोलणं सोप्पं असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय.शिवसेनेनं मराठी माणसांना श्रीनगरमधून आणण्यासाठी विमानं पाठवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चार सीटर गाडी तरी पाठवली का असा सवालही शिवसेनेंनं विचारलाय.शिवसेना फुटल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. श्रीनगरमधील मदतीच्या मुद्यावरही ठाकरेंच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडली नाही. पण या टीकेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरच बुमरँग झालंय.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 24, 2025 | Trending News
Mumbai News Today: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सुखाचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Source link