Sushmita Kaneri Success Story: उद्योग करण्याचा ध्यास घेतलेले अनेकजण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दिवसरात्र एक करतात. पुण्यातील सुष्मिता कानेरीची कहाणीदेखील अशीच आहे. तिचं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालं. पण तिला काहीतरी वेगळ करायचं होतं. सुष्मिताच्या कुटुंबातील सदस्य खूपच साधे आहेत. तिच्या पालकांनी नेहमीच कठोर परिश्रम आणि स्वावलंबनावर भर दिला. त्यांनी सुष्मिताला शहाणपणाचे निर्णय घेण्यास आणि दयाळू राहण्यास शिकवले. सुष्मिताने 2020 मध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) पुणे येथून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती नोकरी करण्यास तयार झाली. पण शालेय जिवनापासून सामाजिक उद्योजक बनण्याची कल्पना तिच्या मनात होती.
व्यवसायाची कल्पना कशी आली?
‘मी शाळेत क्लास मॉनिटर होते. मी एकदा निधी संकलन मोहीम चालवत असताना माझ्या मित्रांकडून पैसे गोळा करून ते एका अनाथाश्रमाला दान करण्याचा विचार केला. आम्ही 500 रुपये गोळा केले आणि अनाथाश्रमातील मुलांसाठी स्टेशनरी खरेदी केली. अनेक लोक अडचणींना तोंड देत असल्याचे मला जाणावले. तेव्हापासून मला समाजासाठी काहीतरी करण्याची आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाल्याचे’, सुष्मिता सांगते. या अनुभवामुळे तिला तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्याद्वारे बदल घडवून आणण्याचा विचार मनात आला. मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. तिच्याकडे नोकरीची ऑफर होती पण तिला तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्य एकत्र करून काहीतरी करायचे होते.
गुलकारीची सुरुवात?
2021 मध्ये नोकरी करण्याऐवजी सुष्मिताने ‘ गुलकारी’ नावाचा क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. त्यांचा उद्देश देणग्यांचा मागोवा घेणे आणि देणग्यांचा काय परिणाम होतो हे हे पाहणे हा होता. या उपक्रमामुळे लोकांना देणगी देण्याची संधी मिळाली पण फक्त देणगी देणे पुरेसे नाही, हे सुष्मिताच्या लक्षात आले. फक्त पैसे दान केल्याने काहीही होणार नाही. आपल्याला असे मार्ग शोधावे लागतील ज्याद्वारे लोक स्वावलंबी बनू शकतील आणि आयुष्यभर कमाई करू शकतील, हे माझ्या लक्षात आल्याचे सुष्मिका सांगते. यानंतर सुष्मिताने उपजीविकेवर आधारित क्राउडफंडिंगकडे लक्ष वळवले. गरजू लोकांना कायमस्वरूपी कमाईची संधी मिळू शकेल अशा मार्गांचा शोध तिने सुरू केला. भारतातील लुप्त होत चाललेल्या कलेकडे तिने लक्ष दिले.
2021 मध्ये बदल
2021 मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. ती तेलंगणाला गेली आणि तिथल्या निर्मल कलेच्या कलाकारांना भेटली. ही कला लाकडावर बनवली जाते आणि चित्रकलेच्या माध्यमातून कथा सांगितल्या जातात. ‘कलाकार अनेक पिढ्यांपासून ही कला साकारत आहेत. पण कोणालाही त्यांची कला आवडत नव्हती. त्यामुळे कलाकार निराश झाले. आपल्या कष्टांना योग्य किंमत मिळत नाही, असे त्यांना वाटल्याचे सुष्मिता सांगते. माझ्या मुलाला ही कला शिकवशील का? असे मी त्यातील एकाला विचारले तेव्हा तो रागावला. तुमच्या मुलाला नोकरी शोधण्यास सांगा, असा सल्ला त्याने दिला. आपल्याला या पारंपारिक कला जतन करायच्या आहेत आणि कलाकारांना शाश्वत कमाई करण्याची संधी द्यायच्या आहेत, याची त्या क्षणी जाणिव झाल्याचे सुष्मिताने सांगितले.
अशा प्रकारे झाली सुरुवात
निर्मल कलाच्या कलाकारांच्या अडचणी पाहून सुष्मिता खूप दुःखी झाली. तिने आणखी एक वर्ष देशभर प्रवास केला आणि इतर कलाकारांना भेटली. त्यानंतर तिने एप्रिल 2023 मध्ये “गुलकारी” सुरू केली. हे एक असे व्यासपीठ आहे जे कलाकारांना ग्राहकांशी जोडते. एकत्र कला निर्माण करते आणि लुप्त होत चाललेल्या कलेबद्दल जागरूकता पसरवते. तसेच त्या माध्यमातून कलाकारांना शाश्वत कमाई करण्यास मदत होते. पारंपारिक कलेला आदर आणि मान्यता देणे हा गुलकारीचा उद्देश असल्याचे सुष्मिता सांगते.
गुलकारीचे काम काय आहे?
गुलकारी पर्यावरणपूरक पॅकेजिंग वापरते. नाजूक उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी ते बबल रॅपऐवजी भुसासारख्या गोष्टी ते वापरतात. याशिवाय हस्तकलांची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी कंपनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखतेय. यामुळे ग्राहकांना ते खरे उत्पादने खरेदी करत असल्याचा आत्मविश्वास मिळेल. सुष्मिता भविष्यात गुलकारी आणखी मोठी करण्याचे स्वप्न पाहतेय. तिला समाजावर सकारात्मक परिणाम करायचाय.’आम्हाला कलाकारांना शाश्वत कमाई करण्याची, लुप्त होत चाललेली कलाकृती वाचवण्याची आणि जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी द्यायचीय. कलाकृती भारतीय संस्कृतीचा एक भाग राहील, याची आम्हाला खात्री करायची असल्याचे सुष्मिता सांगते.
15 कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी
2024 मध्ये गुलकारीने 4 हजारहून अधिक हस्तकला वस्तू विकल्या. फक्त 2 वर्षांतच त्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. ‘आम्ही 15 कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी केलीय. आम्ही त्यांना उत्पादनेच विकण्यासोबतच त्यांच्यासाठी कार्यशाळादेखील आयोजित करतो. या कार्यशाळांमध्ये कलाकार त्यांची कला समजावून सांगतात आणि त्यासाठी मोफत प्रशिक्षण घेतात, अशी माहिती सुष्मिताने दिली.
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकाराणात पुन्हा मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर गेलेले महादेव जानकर आता नवीन घरोबा करणार आहेत. इंडिया आघाडीसोबत जानकर जाणार असल्याची माहिती आहे. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केले. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचं स्पष्ट आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता महायुतीला रामराम करणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याचं वारंवार पाहायला मिळाले.आतातर ते नवा घरोबा करण्याच्या तयारीत दिसत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकर यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे.
या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादवांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधान करत महादेव जानकर यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याबाबतची घोषणा त्यांनी थेट दिल्लीतून केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल, असं जानकर म्हणाले.
दरम्यान आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकार यांना माहीत नसते, पण अखेर ते महायुतीतच येतील, ते स्वतःच वाटोळ करून घेणार नाही, असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकारसोबत आहेत.आता मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात आहे. आता जानकर महायुतीला रामराम करत आहेत. सध्या महायुतीत इतर पक्षांची गर्दी पाहता, युतीला फारसा फरक पडणार नाही. मात्र, आघाडीसोबत गेल्याने महादेव जानकर यांच्या पदरी काय पडेल हे पाहावं लागेल.
Pune Crime News : पुणे शहर हे विद्येचे माहेर घर मानले जाते. हजारो तरुण तरुणी शिक्षणानिमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात. होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन पुण्यात राडा झाला आहे. एका महिलेने या संशयिताच्या कानाला चावा घेतला आहे.
पुण्यातील होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने एका व्यक्तीला मारहाण केली. या सुनेने त्याच्या कानाचा चावा घेतला. यात त्याच्या कानाला पाच टाके बसलेत. संबंधित व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात होस्टेलचालकासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना होस्टेल मधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने तरुणाला मारहाण केली. सुनेने कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले.
याबाबत मिलिंद वसंत कोठारी (वय ४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) व त्यांची सुन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करुन घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स होस्टेल चालविणारे सुरेश विठ्ठल कांबळे आणि त्यांची सुन आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले.
तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली. त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी तपास करीत आहेत.
अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप समोर आलाय. सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न या शाळांकडून करण्यात आला. दरम्यान यानंतर या शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय. अमरावती महानगरपालिकेच्या आठ शाळांमध्ये खिचडी घोटाळा झाल्याचं समोर आलंय. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये खिचडी वाटप करण्यात येते, मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे त्या दिवशी विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचं दाखवून पैशांवर डल्ला मारायचा होता असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. संबंधित पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या माहितीतून या घोटाळ्याचा भांडाफोड झालाय.
विद्यार्थ्यांची खिचडी कोणी खाल्ली?
14 एप्रिल रोजी अमरावतीमधील सर्व सरकारी शाळांना सुट्टी होती
मात्र, पालिकेच्या 8 शाळांमध्ये त्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवल्याचं समोर आलं
सुट्टीच्या दिवशी शाळेत विद्यार्थी नसताना खिचडी शिजवल्याचं दाखवल्यानं हा घोटाळा समोर आला
दरम्यान सुट्टीच्या दिवशी खिचडी शिवजणाऱ्या शाळांमध्ये महापालिका मराठी शाळा बेनोडा, महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3 महापालिका, मराठी शाळा अकोली संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर 20, नवाथे नगर असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदनी चौक, अमरावती महापालिका उर्दू प्रायमरी, स्कूल नंबर 5 फ्रेजरपुरा अमरावती याचा समावेश आहे. खिचडी घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मुख्यध्यापकांना खुलासा देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
फक्त अमरावतीच नव्हे तर इतर जिल्ह्यात देखील अशेच प्रकार निदर्शनास आल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांची हक्काची खिचडी डल्ला मारणं कितपत योग्य आहे, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत..
Advocate Vipul Dushing Shocking Details: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात बुधवारपासून सुरु झाली आहे. या सुनावणीचा पहिलाच दिवस गाजला तो हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशींग यांनी युक्तीवादादरम्यान केलेल्या काही खळबळजनक आरोपांमुळे आणि विधानामुळे. सुनावणीनंतर विपुल दुशींग यांनी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशीही संवाद साधल्याने ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. असं असतानाच आता विपुल दुशींगेचा पूर्व इतिहास समोर आला आहे. ‘नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही,’ असा युक्तीवाद करणाऱ्या विपुल दुशींगेंवरही यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
वकिलांवरच दाखल आहे गुन्हा
हगवणेंचे वकील विपुल दुशींगविरोधात वडगांव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशींग हे 2022 साली एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला. याच वादातून पुढे दुशींग यांनी सरकारी वकिलाला मारहाण केली.
कॉलर पकडून मारहाण
सुनावणीदरम्यान अचानक चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 353/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.
न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना वैष्णवीचं चारित्र्यहनन
आरोपींचे वकील असलेल्या विपुल दुशींग यांनी बुधवारी न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,” असं आरोपीचे वकील म्हणाले. “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही,” असा युक्तिवादही आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीच्या अंगावरील व्रणांसदर्भात बोलताना केला. कोर्टाने वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.