महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले? शिवसेना आणि मनसे यांची युती झाली? आदित्य ठाकरेंनी दिला मोठा पुरावा

महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले? शिवसेना आणि मनसे यांची युती झाली? आदित्य ठाकरेंनी दिला मोठा पुरावा



गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सूर जुळण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळाले.



Source link

सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या अंबानींच्या इंटरनॅशनल स्कूल ची फी किती?

सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या अंबानींच्या इंटरनॅशनल स्कूल ची फी किती?


Ambani School Fees : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये नीत अंबानी यांनी केली होती. मुलांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी हे स्कूल ओळखले जाते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या स्कूलची उपाध्यक्ष आहे. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते. यामुळे या स्कूलचे नाव भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यांच्या नावावर आहे. 

मुलांना चांगले शिक्षण देण्यावर भर

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल IGCSE, ICSE आणि IBDP कार्यक्रमांच्या मदतीने बालवाडी ते 12 वी पर्यंतच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण देते. त्याचबरोबर हे स्कूल मुलांना शिक्षणापलीकडे जाऊन सर्वांगीण विकासावर आणि त्यांना चांगले मानव आणि प्रौढ नागरिक बनवण्यावर लक्ष देते. 

2024 मधील शैक्षणिक वर्षात, बालवाडीसाठी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी 1,400,000 ते 12 वी साठी 20,00,000 पर्यंत आहे. या फीमध्ये मुलांना पुस्तके, स्टेशनरी, गणवेश आणि वाहतूक यासारख्या आवश्यक वस्तूंचा देखील समावेश आहे. तसेच स्कूलमधील गरजू मुलांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील दिली जाते.

किती आहे वार्षिक फी? 
 
एलकेजी ते सातवी पर्यत 1,70,000 रुपये. तर आठवी ते 10 पर्यंत 5,90,000 रुपये. अकरावी आणि बारावी पर्यंत 9,65,000 रुपये फी आहे. अंबानींच्या या स्कूलमध्ये मुलांना देण्यासाठी खूप काही आहे. जसे की संगणकांसह विज्ञान प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या आहेत. जिथे मुलांना नवीन गोष्टी शिकता येतात. त्यासोबतच मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान आणि ग्रंथालय देखील आहे. 

धीरुभाई अंबानी यांच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये आकाश अंबानी, ईशान धवन आणि श्लोका मेहता, खुशी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, न्यासा देवगन, अनन्या पांडे यासारख्या अनेक सेलिब्रिटीच्या मुलांनीही येथे शिक्षण घेतले आहे. 





Source link

Traffic Rules: वाहतूक पोलीस तुमच्या बाईकची चावी काढू शकतात का? असं झाल्यास काय करायचं?

Traffic Rules: वाहतूक पोलीस तुमच्या बाईकची चावी काढू शकतात का? असं झाल्यास काय करायचं?


Maharashtra Traffic Rules: वाहतूक पोलिसांनी तपासणीवेळी अचानक तुमच्या बाईकची चावी काढली तर अशा परिस्थितीत तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही अशी अनेक प्रकरण पाहिली असतील ज्यात वाहतूक पोलिस असे करतात. अशा परिस्थितीत काय करायचे, असे करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? नसेल तर मग आपण काय करायला हवे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पोलिसांकडून जर असे केले गेले तर तुम्ही काय करायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, वाहतूक पोलिसांना बाईकची चावी काढण्याचा अधिकार नाही. पण तुमच्यासोबत असे झाल्यास तुम्ही वाहतूक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकता. बाईकची चावी फक्त विशेष परिस्थितीतच काढता येते. जर तुमच्या बाईकची चावी काढली असेल तर या गोष्टी करा.

शांत राहा

सर्वप्रथम शांत राहा आणि पोलिसांशी आदराने बोला. त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.

कारण जाणून घ्या

तुमची चावी का काढली गेली आहे आणि तुम्ही कोणता नियम मोडला आहे हे पोलिसांना विचारा. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ज्यामुळे तुम्ही कोणती चूक केलीय, हे तुम्हाला समजेल.

दंड भरा

जर तुम्ही कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला चलन काढावे लागेल आणि दंड भरावा लागेल.

तक्रार दाखल करा

जर तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी तुमच्या वाहनाची चावी बेकायदेशीरपणे आणि चुकीच्या पद्धतीने काढून घेतलीय तर तुम्ही संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता. किंवा उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.





Source link

मोठी बातमी! पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी, अनेक अर्जदार अपात्र ठरणार!

मोठी बातमी! पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी, अनेक अर्जदार अपात्र ठरणार!



Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.



Source link

डिलिव्हरी करताना महिलेच्या पोटात राहिला कापडाचा तुकडा, पुढे जे झालं…

डिलिव्हरी करताना महिलेच्या पोटात राहिला कापडाचा तुकडा, पुढे जे झालं…


Washim Crime: रुग्णांसाठी डॉक्टर देवदुताप्रमाणे असतो. पण कधीकधी डॉक्टरांच्या चुकीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. वाशिममध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. 

सोनोग्राफीद्वारे तपासणी

वाशिम च्या रिसोड शहरातील अमोल नरवाडे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये 10 मे 2024 रोजी एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. ती प्रसूती व्यवस्थित करण्यात आली असून त्या महिलेला कोणताही त्रास जाणवला नव्हता. त्यानंतर महिलेला थोडा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने सोनोग्राफीद्वारे तपासणी केली. मात्र त्यातही काहीही आढळले नव्हते.

मॉब काढण्यात आला

तब्बल 1 वर्षाच्या कालावधीनंतर त्या महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागला. नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्या महिलेला संभाजी नगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या पोटातून एक मॉब काढण्यात आला.

डॉक्टरांचं स्पष्टीकरण

मात्र हा मॉब आम्ही जेव्हा सिझेरियन केलं त्या वेळी पोटात नव्हता.दरम्यान च्या काळात कुठे तरी त्यांनी शस्त्रक्रिया केली असता त्या वेळी तो रहाला असेल.यासाठी आमची कोणती ही चूक नसल्याचं डॉक्टर नरवाडे यांनी सांगितलं.

डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी 

याप्रकरणी रिसोड येथील खासगी रुग्णल्याचे डॉक्टर अमोल नरवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पीडित महिलेचे पती गणेश काबरा यांनी डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केलीय. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

विवाहितेला दोरीने बांधून चटके 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके दिले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम अब्दुल शेख राहणार चौका वाडी आणि नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आरोपीचे नाव असून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

Maharashtra Weather : पहिल्या दोन दिवसात जोरदार बॅटींग करणाऱ्या पावसाची गती मंदावली; आता भेट थेट…

Maharashtra Weather : पहिल्या दोन दिवसात जोरदार बॅटींग करणाऱ्या पावसाची गती मंदावली; आता भेट थेट…


Maharashtra Weather Update : राज्यात 26 मे रोजी दाखल झालेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मान्सून यंदा काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पण आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी चार दिवस पावसाची ओढ कमी झाली आहे. सरकारने आता शेतकऱ्यांना पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे प्रवाह सध्या कमकुवत होत असल्यामुळे राज्यभरात पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. खास करुन कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडणार असून, मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

मान्सूनची गती मंदावण्याचे कारण काय? 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत देशात लवकर आगमन केलं. पावसाने रचलेल्या विक्रमामुळे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र आता प्रवाह मंदावल्याने पुढील चाल धिमी झाली आहे. 12 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस दडी मारणार असल्याच हवामान विभागाने सांगितलं आहे. 

पावसाची तीव्रता कमी झाली असून काही जिल्ह्यांना मात्र यलो अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांना काही भागात पेरणी थांबवण्याचा सल्ला दिला आहे. कारण विदर्भात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी असल्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतू 12 जूननंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. 

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि इतर काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp