IIT-Kanpur nurtures startups developing cutting-edge drones

IIT-Kanpur nurtures startups developing cutting-edge drones


A drone developed by EndureAir using the tandem rotor technology of helicopters

An object can be airborne in two ways. It can move very fast so that there’s an air pressure difference between its flat lower and curved upper surface, giving it a lift. This is how an aeroplane flies. Or it can get airborne by pushing air downwards, like a helicopter. It is basic aerodynamics that you can have one or the other, not both. That’s why we don’t have large aircraft taking off vertically, or helicopters carrying hundreds of passengers.

But when it comes to drones, there are ways of cheating aerodynamics. Two startups incubated at IIT-Kanpur have come up with innovative drone designs. Neither is a new concept, but involves fine-tuning for specific applications.

VU Dynamics, a company that has been acquired by Indore-based Prakash Asphaltings & Toll Highways (India) Limited, has developed catapult-launched fixed-wing kamikaze drones (that crash into enemy assets).

The drones are flung skyward by catapult systems developed by the company; once in the air, their engines take over. The technology has been tried before, for instance, in the aborted ‘Nishant UAV’ project of the Defence Research and Development Organisation. However, with drones staging a comeback in recent times, there are quite a few catapult-launched fixed-wing drones in India, including Alpha Defense’s Sky Striker, which was used to strike targets in Pakistan.

VU Dynamics has developed two variants, with differences in range, warhead capacity, launch weight, and communications radius.

Incidentally, the company has also developed rotary-wing drones that can lob a grenade on enemy territory.

Another startup, EndureAir, founded by Prof Abhishek and his students, has developed rotary drones that resemble a miniaturised US Chinook helicopter. With a tandem rotor configuration, the two rotors on either end spin in opposite directions (clockwise and anticlockwise), giving a higher ‘lift’. Tandem rotor is essentially a helicopter concept. EndureAir’s tandem rotor drones come in two variants — Sabal 20 and Sabal 40; the numbers indicate the payload capacity in kg. They are meant for defence logistics.

The company has also developed a tilt-rotor drone, where four rotors, after vertical lift-off, tilt from a vertical axis to a horizontal axis. We have seen such aircraft in the Arnold Schwarzenegger movie True Lies.

In EndureAir’s hybrid (fixed-plus-rotary) drones, the four rotors stand on two fixed wings and provide vertical lift-off. Once in flight, the rotors tilt — from skyward to the direction of flight — to function as propellers, and the drone resembles a small biplane.

Abhishek is working on drones that can land on moving objects like ships and trucks.

Helicopters can land on moving ships, but they are manned. To land an autonomous drone on a moving ship calls for computer vision and AI — the drone ‘observes’ the marked landing point for about 5 seconds and lowers itself on it. The ‘proof of concept’ has been done; the product is under development.

Both Abhishek and Prof Subrahmanyam Saderla, founder of VU Dynamics, told Quantum that it is no big deal for India to develop large drones, such as the Turkish Bayraktar TB-2 drones, if off-take is assured.

More Like This

Published on May 18, 2025



Source link

पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!

पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!


pune News Today:  महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच एक निर्णय पुण्यातील देवस्थानाबाबत घेण्यात आला होता. मात्र ग्रामसभेने हा निर्णय रद्द केला आहे. पुण्यातील नसरापूर ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय घेत ‘शर्ट काढून मंदिरात दर्शन घेण्याची ‘ प्रथा रद्द केली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. 

नसरापूर येथील प्रसिद्ध बनेश्वर महादेव मंदिरात पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेणे बंधनकारक करण्याची प्रथा अखेर ग्रामसभेच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर घेण्यात आलेला हा निर्णय लोकशाही प्रक्रियेचा सकारात्मक नमुना ठरला आहे. मंदिर ट्रस्टने काही महिन्यांपूर्वी शर्ट काढून दर्शन घेण्याचा नियम लागू केला होता. मात्र, 1 मे रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करत याला विरोध दर्शवला होता. अर्जात नमूद करण्यात आले की, ही नव्याने सुरू झालेली प्रथा भाविकांसाठी त्रासदायक ठरते, काहीवेळा महिला भाविकांनाही अस्वस्थतेला सामोरे जावे लागते.

ग्रामसभेत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. राजेश शामराव कदम यांनी सुचवलेला आणि प्रज्योत प्रताप कदम यांनी अनुमोदन दिलेला ठराव ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. या ठरावात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की, ‘भाविकांमध्ये भेदभाव न होता समान नियम लागू व्हावेत, आणि सध्याच्या सामाजिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर शर्ट काढण्याची अट अयोग्य आहे.’ ग्रामसभा सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण आणि सर्व सदस्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासोबतच हा ठराव धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे, जेणेकरून मंदिर ट्रस्टला योग्य त्या सूचना दिल्या जातील.





Source link

संजय राऊतांच्या पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारणात खळबळ, पण 'नरकातला स्वर्ग' हे नाव कोणी दिलं?

संजय राऊतांच्या पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारणात खळबळ, पण 'नरकातला स्वर्ग' हे नाव कोणी दिलं?


Sanjay Raut Book Name: राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या, ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन थोड्याच वेळात पार पडणार आहे.  या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वीच पुस्तकातील मजकूर चर्चेत असून राऊत यांनी पुस्तकामधून अनेक जुने-नवे किस्से सांगितलेयत. हे किस्से आता हळुहळू सोर येऊ लागले असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. यात त्यांनी अमित शाह, एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय. पण नरकातला स्वर्ग हे नाव कोणी दिलं? याबद्दल फार कमी जणांना माहितीय. राऊतांनीच एका मुलाखतीदरम्यान याची माहिती दिली. 

राज ठाकरेंबद्दलची खंत 

संजय राऊतांना आर्थर रोड तुरुंगामध्ये नेलं जात असताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका फोन कॉलवरुन कसं वाचवलं होतं याबद्दलची आठवण झाल्याचं पुस्तकात म्हटलं आहे. अमित शाहांना बाळासाहेबांनी कसं वाचवलं होतं याचा पूर्ण किस्साच राऊतांनी पुस्तकात सांगितला आहे. तसेच संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दलची एक खंत बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं म्हटलं आहे. “माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, ‘संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!’ खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही,” असं म्हणत खंत व्यक्त केली आहे.

अमित शाहंसोबत मध्यस्थीसाठी एकनाथ शिंदेंचा फोन

अटकेच्या आदल्या दिवशी मला एकनाथ शिदेंनी अमित शाह यांच्याशी बोलू का असा फोन केला होता. मी बोललो काही गरज नाही. मी म्हटलं, वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. काही गरज नाही, उद्या मला अटक होऊ द्या आणि तुरुंगात जोय आहे. मी पळून जाणार नाही. वरती बोलण्याची गरज नाही. मी बोलू शकतो वरती, मी समर्थ आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.यावेळी संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोपही केला. अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच शिवसेना आणि भाजपात दरी पडली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच भाजपा आणि शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली. अमित शाह यांना अरुण जेटली यांनीही असं करु नका असं समजावलं होतं. मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वत: बोलले होते, अमित भाई हे करणं योग्य नाही. ते आपले जुने सहकारी आहेत. आपल्याला त्यांच्यासह राहायचं आहे. अरुण जेटलींनीच मला सांगितलं होतं की, मी दोन वेळा त्यांना समजावलं आहे”.

नरकातील स्वर्ग नाव कोणी दिलं? 

या सर्वात नरकातील स्वर्ग हे नाव कोणी दिलं? असा प्रश्न अनेकांना पडलाय. नरकातला स्वर्ग हे नाव काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे सासरे आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी दिल्याची माहिती संजय राऊत म्हणाले.





Source link

धाराशिवमध्ये तब्बल 100 शिक्षक अपंग; सत्य समोर आल्यावर सगळेच हारदरले

धाराशिवमध्ये तब्बल 100 शिक्षक अपंग; सत्य समोर आल्यावर सगळेच हारदरले


ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव : नोकरीमध्ये बदली हा कामकाजाचा अविभाज्य भाग असतो. मात्र या बदलीचा काही जण विनाकारण बाऊ करतात. आणि मग बदली टाळण्यासाठी, तसंच आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वाट्टेल ते मार्ग शोधले जातात. कहर म्हणजे पिढी घडवणारे शिक्षकही याला अपवाद नाहीत. शिक्षकांनीच बदली टाळण्यासाठी अक्षरशः गैरप्रकाराचे धडे गिरवल्याचं समोर आलंय. अशाच काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन, सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतल्याच धक्कादायक वास्तव पाहायला मिळालाय. शिक्षकांच्या या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकणारा ‘झी २४ तास’चा हा पंचनामा. 

समाजाला आणि भावी पिढीला दिशा दाखवण्याचं काम शिक्षक करत असतो. त्यामुळंच नैतिकदृष्ट्या शिक्षकी पेक्षा सर्वोच्च समजला जातो. पण यात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारा एक बदली घोटाळा धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आलाय. आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करुन आवडत्या ठिकाणी बदली मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. त्यामुळं दुर्गम ठिकाणच्या शाळेवर जाण्यासाठी कायम नाखूष असलेल्या शिक्षकांची अडचण आली. काही शिक्षकांनी यावर नामी तोडगा शोधलाय. या शिक्षकांनी कँन्सर आणि ह्रदयरोगासारख्या आजाराची बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवली. काहींनी  तर स्वतःला हातापायानं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं. एकट्या धाराशिव जिल्ह्यात धडधाकट असलेल्या 100 जणांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

शिक्षकांनी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावात किंवा गावाजवळ बदली मिळवण्यासाठी केलेली धडपड शिक्षण विभागाच्याही लक्षात आली. त्यामुळं त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत काही धक्कादायक तथ्यं समोर आलीयेत.  त्यानुसार 39 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. तर 21 शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आपली बदली करवून घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यावर बोगसगिरी करणा-या मास्तरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही उपशिक्षणाधिका-यांनी दिलेत.

समाजाला नैतिकतेचे धडे देणारे शिक्षक आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी दिव्यांग झाल्याचं सोंग करतायेत. नैतिकदृष्ट्या अधोगतीकडे गेलेले शिक्षक समाजाला कसे वाट दाखवणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.





Source link

'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी….', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात…'

'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी….', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात…'


Sanjay Raut on Raj Thackeray: शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या विधानावर आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे.

– राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिले होते. परंतु त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडून मनसेची स्थापना केल्यावर अनेकांसोबतचे मैत्रीचे संबंध दुरावले. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबतीतही तेच घडले. एकाच पक्षात असताना मैत्री होती,परंतु नंतर राजकारणात दोघांनीही एकमेकांवर टिकेचे प्रहार केले. तरीही त्यांच्यातील जिव्हाळा कायम होता. त्यामुळंच संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून ती सल बोलून दाखवली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, ‘संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!’ खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही,” असं संजय राऊत म्हणला आहेत. 

‘ईडी अटकेच्या भीतीनं वायकर मातोश्रीवर रडले’

तुरूंगात जाण्याइतके माझ्यात बळ नाही. मला अटॅक येवून मी मरेन किंवा मला आत्महत्या तरी करावी लागेल असं हतबल होऊन रविंद्र वायकर बोलल्याचं संजय राऊतांनी आपल्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकात म्हटलं आहे. शिंदे गटाने दबाव टाकल्याने आणि भीतीने वायकर यांनी शिवसेना सोडल्याचा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केला आगे. 

“वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते,” असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचे पुस्तकात म्हटलं गेलं. या पुस्तकात ईडीचा गैरवापर करून वायकर यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 





Source link

तुर्कीये सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्याला धमकी; पुण्यातील व्यापा-यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन

तुर्कीये सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्याला धमकी; पुण्यातील व्यापा-यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन


भारत पाकमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र तुर्कीयेनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. भारत आणि तुर्कीये या देशात अनेक व्यापार होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या फळं बाजारात तुर्कीयेमधून सफरचंद येतात. भारताविरोधात पाकिस्तानला तुर्कीयेने साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सफरचंद व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पाकिस्तानमधून या व्यापाऱ्यांनाच धमकीचे फोन येत आहेत.

तुर्कीये सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्याला धमकी

पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन

पाकड्यांच्या पोकळ धमकीविरोधात व्यापाऱ्यांचा संताप

युद्धाच्या रणांगणात सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आता कुरबु-या सुरू झाल्यात. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कियेच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. पुण्यातून सुरू झालेली ही बहिष्काराची मोहीम आता देशभरात पोहोचलीये. तुर्कीयेची सफरचंद बॅन करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला होता. आता ज्या व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकलाय त्यांना थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येत आहेत. पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांनी निषेध केलाय. 

विशेष म्हणजे झी न्यूजचं लाईव्ह सुरू असतानाच धमकीचा कॉल आल्यानं व्यापारी आणखी चिडले आणि त्यांनी तिथेच तुर्कीयेची सफरचंद रस्त्यावर फेकून दिली. इतकंच नाही तर पाकिस्तान-तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.

दरम्यान, फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी या धमकी कॉलबाबत पुणे पोलिसात रितसर तक्रार दिलीय. तसंच यापुढे फक्त सफरचंदच नाहीतर इतर तुर्की पदार्थांवरही बहिष्कार घालण्याची घोषणा करून टाकलीय. तुर्कीत जेव्हा भूकंप झाला तेव्हा भारतानं सर्वात मोठी मदत पाठविली होती पण, तुर्कीयेनं आपले उपकार विसरून शत्रूला मदत करून पाठीत खंजीर खुपसला. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp