by Hansraj Agrawal | Feb 26, 2025 | Trending News
नाशिकच्या कुंभमेळ्यावरुन महायुतीत कोल्ड वॉर सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आज फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी होती. तर काही दिवसांपूर्वी शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजनांनी देखील दांडी मारली होती.
– नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक
– बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवारांची गैरहजेरी
– दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरम्यान या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी कुंभमेळासंदर्भात नाशकात घेतलेल्या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित नव्हते.
कुंभमेळ्यावरुन महायुतीत कोल्ड वॉर?
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते.
तर 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजन गैरहजर होते
भाजपच्यी बैठकीची तयारी करायची होती त्यामुळे गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिलं होतं…
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली.. त्यावर एक नजर टाकुयात…
महाकुंभबाबत बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे –
– गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन
– प्रयागराज महाकुंभला भेट देऊन आलेल्या अधिकाऱ्याकडून व्यवस्थेचे सादरीकरण
– नियोजन आणि समन्वयासाठी प्रशासन कुंभ प्राधिकरण स्थापन करणार
– कुंभमेळाबाबतचे विधेयक अधिवेशनात मांडलं जाणार
– AI चा अधिकाधिक वापर करावा, तंत्रज्ञान महाकुंभ असं स्वरूप द्यावं
– संपूर्ण नियोजनात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी सौजन्य पाळावे
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. दरम्यान या कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भाविकांची नाशकात मोठी गर्दी होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 26, 2025 | Trending News
Pune News Today: एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 25, 2025 | Trending News
Kalyan Police Station Firing: कल्याण पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून गेला होता.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 25, 2025 | Trending News
Chhaava Movie Controversy: ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वाददेखील उफाळून आले आहे. छ्त्रपती संभाजी महाराज यांना औंरगजेबाने कैद करुन अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. गणोजी आणि कान्होजी यांनी फितुरी केल्यामुळं संभाजी राजे औंरगजेबाच्या हाती लागले, असं चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मात्र, चित्रपटातील याच दृश्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा घेतला निर्णय त्यांनी घेतला आहे.
छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणे आक्रमक झाले आहेत. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीयांतील सदस्यांनी एकत्र येत गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. मंदिरात शिरकाई देवीची आरती आणि पूजा करत छावा चित्रपटाचा दिग्दर्शकांच्या विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा उभा राहतोय, शिर्के घराण एकत्र येतंय, त्यामुळं वातावरण तापण्याआधीच लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ वगळवा, अशी मागणी शिर्के कुटुंबीयांनी केली आहे. आम्ही छत्रपती यांचे मावळे आहोत, गनिमीकाव्याने लढा लढणार, लढा कसा असणार हे आत्ता सांगणार नाही, त्यांना वेळोवेळी तो कळेल आणि त्यांना तो सहन होणारं नाही, असा इशारा यावेळी शिर्के कुटुंबियांतर्फे देण्यात आला आहे.
शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांच्या छावा कांदबरीवर आधारित आहे. कांदबरीत गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचे कुलदैवत या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. पण या चित्रपटात मी त्यांचं नावही घेतलं नाहीये. गावही दाखवलेले नाहीये. गणोजी आणि कान्होजी या एकेरी नावाने चित्रपटात उल्लेख केला आहे, असं लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे. एका रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकर यांनी भूषण शिर्के यांच्याशी संपर्क केला आणि अजाणतेपणी कुटुंबाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माफी मागतो, असंही लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 24, 2025 | Trending News
जमीन खरेदी विक्रीत अडथळा ठरणारा तुकडाबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारकडे हा कायदा रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 24, 2025 | Trending News
Chhatrapati Shivaji Maharaj Fort: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तर, त्यांचा वास्तवाने पावन झालेले गड-किल्ले महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाहीत. छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांना आता जागतिक दर्जा मिळू शकतो. यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना वारसिक दर्जा मिळावा यासाठी शिवप्रेमी आग्रही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी होत आहे. गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला तर जागतिक पातळीवरील पर्यटक महाराष्ट्रात गडकिल्ले पाहण्यासाठी येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथादेखील जगासमोर येईल.
महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (मराठा मिलीटरी लँडस्केप ऑफ इंडिया) या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे. गेले कित्येक वर्षे हे किल्ले ताठ मानेने इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. मोगल आणि इतर परकिय आक्रमणांमुळं काही किल्ल्यांची पडझड झाली आहे. या किल्ल्यांच्या डागडुजीसाठी पुरातत्व विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. रायगडावर पुरातत्व विभागाकडून कित्येक वर्षांपासून ही कामे सुरू आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व गोवा या राज्यांतील किल्ल्यांचाही समावेश आहे. शिवाजी महाराज यांनी समुद्रातदेखील किल्ल्यांची उभारणी केली.
Source link