Weather Update : विदर्भात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Weather Update : विदर्भात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


Weather Update: नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तितकासा पाऊस झाला नसताना आता आज गुरुवारी पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे. दरम्यान उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने कोकणात हाहा:कार माजवला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता आहे. त्यानंतर विदर्भातही पावसाने जोर धरला. अकोला, वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. 

 पावसाळ्यात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान

एकीकडे मुसळधार पाऊस पडत असतानाच अलिबाग येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबागमध्ये 32.1 अंश सेस्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. इतर भागात कमाल तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले होते.दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 
 
हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी

गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात, जिथे पावसामुळे वाहतूक, शाळा, कार्यालय यांच्यावर मोठा परिणाम होतो. तिथे हवामान अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचं दिसत आहे. 2020 ते 2024 या चार वर्षांत मुंबईतील मुसळधार पावसाचा फक्त 46 टक्के अंदाज अचूक ठरला आहे. याच माहितीनुसार, 41 टक्के अंदाज पूर्णतः चुकीचे होते. अनेक वेळा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. तर कधी अंदाज दिलाच गेला नाही. आधुनिक तंत्रज्ञान असूनही अंदाज चुकत असल्याने हवामान खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.





Source link

'गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकलं जातंय…'; गिरणी कामगारांवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, 'माझं सरकार पाडलं नसतं तर…'

'गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकलं जातंय…'; गिरणी कामगारांवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, 'माझं सरकार पाडलं नसतं तर…'


Uddhav Thackeray : मराठी माणूस आणि गिरणी कामगारांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत. शिवसेना UBTआणि मनसेनं गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं गिरणी कामगारांच्या आजझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा दिला. गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरं द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.

शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं?

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर कायम एक आरोप होतो शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं. हा आरोप अर्थातच खोटा आहे. माझं सरकार जर यांनी पाडलं नसतं तर, साहजिकच यांना सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, पोलिसांनादेखील घरं द्यायला सुरुवात केलीच होती. पण विशेषत: गिरणी कामगारांना मुंबईत घरं दिली असती. आज आमची हीच मागणी आहे, एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबईबाहेर फेकला जातोय. त्यांना सेलू आणि वांगणीला पाठवलं जातंय. धारावीच्या माध्यमातून अदानींना अख्खे मुंबई आधण दिली जातेय. 

तर आमची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या आणि अदाणींचं टॉवर सेलू आणि वांगणीला उभी करा. जाऊ द्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर अदानीने  टॉवर उभारले तरी काही हरकत नाही. त्यांना तिथं टॉवर हवं तर करुन द्या. नाही तरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालाच आहे. तो टीडीआर त्यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवर आणि शेलू, वांगणीवर वापरावा. पण ज्यांनी हक्काने मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याऐवजी त्यांना धारावीत घरं द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही.

शिक्षकांच्या आंदोलनावर काय बोलले उद्धव ठाकरे?

विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे म्हणाले की शिक्षकांना आम्ही न्यायासाठी सोबत असल्याचे वचन दिलं आहे. कामगारांचा संप अजूनही तांत्रिक दृष्ट्या सुरू आहे. त्यांना इतर काम देऊन वेडवाकडं वापरून घेतात. मराठीचा मुद्दा आता गरम झालाच आहे. फक्त हिंदी सक्तीचा जीआरला विरोध करुन चालणार नाही. मराठी माणूस आता एकवटला आहेच. आमचा कोणता भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे. 

मराठी माणसाच्या मुळावर येणा-यांना मुळासकट उखडून टाकू!

मराठी माणसासाठी आम्ही ठाकरे बंधू शनिवारी एकत्र आलो असं उद्धव यांनी म्हटलं. मराठी माणसाच्या मुळावर येणा-यांना मुळासकट उखडून टाकू असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिलाय. 





Source link

महाराष्ट्राच्या राजकराणातील सर्वात मोठा मास्टरप्ला! ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीच्या तीन्ही नेत्यांनी बनवला जबरदस्त फॉर्म्युला

महाराष्ट्राच्या राजकराणातील सर्वात मोठा मास्टरप्ला! ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीच्या तीन्ही नेत्यांनी बनवला जबरदस्त फॉर्म्युला


Maharashtra Politics : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर महायुती अलर्ट झाली असून ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन पालिका सुरू केल्याची माहिती आहे. विविध समुदायाच्या लोकसंख्येनुसार पालिका निवडणुकांचा फार्म्युला ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे.  मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती देखील अलर्ट मोडवर आली. ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आलीय, मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे.

महायुतीचा कोणता फॉर्म्युला? 

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिका निवडणुकीत मराठी- अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.  पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे.  दादांच्या राष्ट्रवादीकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शिंदेंच्या शिवसेनेकडे मराठी मतं वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. त्यामुळे मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे. मात्र, याच मुद्द्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांनी भाजपर निशाणा साधलाय. भाजपला राज्यात हिंदी-मराठीचं नरेटिव्ह सेट करायचाय असा आरोप सावंत यांनी केला.  मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी झाली. तर, अमराठी माणसांची संख्या मागील काही दिवसात वाढलीय. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरच पालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत कोण किती टक्के?

मुंबईत 32 टक्के मराठी माणसं आहेत. 14 टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे. इतर अमराठींची संख्या ही 54 टक्के आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. दरम्यान शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येतंय. त्यामुळे महायुतीचा या मिशनचा किती फायदा होणार? हे पालिका निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. 

 





Source link

महाराष्ट्रात ठाकरेंनी ताकद दाखवली… मनसेच्या सपोर्टसाठी डायरेक्ट रस्त्यावर उतरले शिवसेनेचे कार्यकर्ते

महाराष्ट्रात ठाकरेंनी ताकद दाखवली… मनसेच्या सपोर्टसाठी डायरेक्ट रस्त्यावर उतरले शिवसेनेचे कार्यकर्ते


MNS Mira Bhayandar Morcha : मीरारोडमध्ये आज मराठी माणसाची ताकद दिसून आली..मराठी माणसांसाठी मनसेने हा मोर्चा काढण्याची घोषणा केली. सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मनसैनिकांची धरपकड करण्यात आली. मात्र मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली.  आमच्यावर अन्याय का? आमच्या मोर्चाला परवानगी का नाकारली ? असे प्रश्न उपस्थित केले. अखेर मोर्चाला परवानगी मिळाल्यानंतर मनसेने मीरारोडमध्ये मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकर्ते, आंदोलक. मराठी माणूस ,सहभागी झाला. बघता बघता मीरारोडमध्ये रस्ता दिसेनासा झाला.. सगळीकडे मनसे आणि शिवसेना UBT पक्षाच्या कार्यकर्त्यांनी , मराठी प्रेमींनी मोर्चात सहभाग घेतला.  संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे लोकलने प्रवास करत या मोर्चात सहभागी झाले. 

मीरा भाईंदरमधील मोर्चातून भाजप नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधलाय.. मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचं षढयंत्र रचल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केलाय.. त्यामुळे नरेंद्र मेहतांना मराठी माणूस जागा दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले.  पोलिसांनी कितीही दडपशाही केली अगदी दीड हजार लोकांना नोटीस पाठवली. तरीही हा मोर्चा इतका यशस्वी झाला. जर पोलिसांनी यामध्ये कारवाई केली नसती तर हा आकडा पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचला असता. मीरारोडचा एक आमदार सांगतो की, येथे 12 ते 14 टक्केच मराठी माणूस आहे. पण हा एवढाच मराठी माणूस पुरेसा आहे. हा मोर्चा जर ठाण्यात झाला असता तर काय झालं असतं? असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला. 

महाराष्ट्रात मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर कानाखालीच बसेल, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मला असं वाटतं, जो संदेश आपल्याला द्यायचा होता. इथे 2000 मैलावरुन येऊन दादागिरी नाही करायची. हा महाराष्ट्र इथे काय होणार? आणि काय होणार हे आम्ही मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात ना गपचुप धंदा करा. उगाच कावकाव करु नका. नरेश, सुरेश पडेल… कानाखालीच पडेल. मराठी असल्याचा फक्त गर्व नाही तर माज आहे असं संदीप देशपांडे यांनी मीरारोड येथील मोर्चात म्हटलं आहे. 

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती यांचे राजन विचारे यांनी आभार मानले आहेत. हिंदी सक्तीचा जीआर रद्द करुन सरकारला नमावं लागलं. आणि हाच मराठी एकजुटीचा परिणाम आहे. मीरारोड येथे व्यापाऱ्यांचा मोर्चा निघू शकतो पण मराठी भाषेसाठी मोर्चा निघू शकत नाही. मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असते का? नोटीस देऊन अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने तुम्ही मनमर्जीपणा करत असाल तर हा महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांच राज्य आहे. तसेच महिलांवर अत्याचार होत आहेत. व्यवसाय महाराष्ट्रातून काढून बाहेर जात आहेत, या सगळ्यावर UBT चे नेते राजन विचारे यांनी आपलं मत मांडल आहे. 





Source link

Nothing Phone (3): फोनमध्ये 'या' ठिकाणी कधीच पाहिला नसेल कॅमेरा; फीचर्स, किंमत ऐकून वाटेल आश्चर्य!

Nothing Phone (3): फोनमध्ये 'या' ठिकाणी कधीच पाहिला नसेल कॅमेरा; फीचर्स, किंमत ऐकून वाटेल आश्चर्य!


Nothing Phone 3: नथिंगने भारतीय बाजारात त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन नथिंग फोन 3 लाँच केलाय. हा स्मार्टफोन फोन 1 आणि फोन 2 पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आलीय. या फोनच्या मागील बाजूस Glyph Matrix जोडण्यात आलाय. जो iPhone च्या डायनॅमिक आयलंडप्रमाणे काम करेल. असे असले तरी नथिंग फोनच्या फिचर्समध्ये फारसा बदल झालेला नाही. यात फ्लेक्सिबल अमोलेड डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी आहे. याचे आणखी फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया. 

नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये फोन 2 पेक्षा वेगळे काय?

कंपनीने नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये पूर्णपणे बदल केला आहे. ग्लिफ मॅट्रिक्स डिझाइन सर्वात खास आहे. वेगवेगळ्या टूल्स म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच ग्लिफ मिरर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला मागील डिस्प्लेद्वारे परिपूर्ण सेल्फी काढता येतो. यात डिजिटल घड्याळ, बॅटरी इंडिकेटर, स्टॉपवॉच आणि इतर अनेक गोष्टी मिळतात. नव्या फोनमध्ये कॅमेऱ्याचे प्लेसमेंट पूर्णपणे बदलण्यात आले आहे.

नथिंग फोन 3 चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.67-इंचाचा फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे आणि रिझोल्यूशन 1260 x 2800 पिक्सेल आहे.  नथिंगचा हा फोन स्नॅपड्रॅगन 8एस जेन 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने त्यात 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनी फोनसोबत 5 वर्षांपर्यंत अँड्रॉइड अपडेट आणि 7 वर्षांपर्यंत सिक्युरिटी पॅच अपडेट देत आहे.

नथिंग फोन 3 चे कॅमेरा फीचर्स

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50 एमपी पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5500 एमएएच आहे, ज्यामध्ये तुम्हाला 65 वॅट फास्ट चार्जिंग मिळते. यात 15 वॅट वायरलेस चार्जिंग आणि 7.5 वॅट रिव्हर्स वायर्ड चार्जिंग आणि 5 वॅट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला आयपी 68 रेटिंग मिळते. सुरक्षेसाठी त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

नथिंग फोन 3 ची किंमत आणि ऑफर

कंपनीने नथिंग फोन 3 लाख 79 हजार 999 रुपयांना लाँच केलाय. ही किंमत त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. त्याच वेळी त्याच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89 हजार 999 रुपये आहे. त्याची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. प्री-बुकिंग सुरू झाले आहे आणि त्यावर 5 हजार रुपयांची सूट मिळत आहे.





Source link

…म्हणून काँग्रेसला महाविकास आघाडीत राज ठाकरे नकोत? खरं कारण समोर; म्हणाले, 'ठाकरे बंधूंचे…'

…म्हणून काँग्रेसला महाविकास आघाडीत राज ठाकरे नकोत? खरं कारण समोर; म्हणाले, 'ठाकरे बंधूंचे…'


Maha Vikas Aghadi On Raj Thackeray: हिंदीच्या मुद्द्यावरुन तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच राजकीय मंचावर दिसून आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने विरोधकांना आणि महाविकास आघाडीला बळ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता राज ठाकरेंसोबत जाण्यात काँग्रेस तयार नसल्याचं चित्र दिसत आहे. उलट राज यांच्यामुळे महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. 

काँग्रेसचा एकही नेता मेळाव्याला नव्हता

मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला आहे. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येत आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड असे नेतेही हजर होते. 

…म्हणून काँग्रेसचा राज ठाकरेंना नकार?

राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. दरम्यान, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथे काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. 
एकनाथ शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’

शरद पवार गटाबरोबर आघाडी?

काही महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसची समविचारी पक्ष असलेल्या शरद पवार गटाबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करूनच घेतला जाणार आहे.

काँग्रेस नेत्यांचं म्हणणं काय?

निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने लढवायच्या याची पक्षात चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, “त्यांची मविआबरोबर लढण्याची तयारी असेल तर लढायचे की नाही हे ठरवू, ठाकरे बंधूंचे काय ठरते त्यानंतरच आम्हाला आमची भूमिका ठरवता येईल,” असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

‘शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’

सत्तेत असूनही कॉमन मॅन सारखाच वागणारा नेता एकच, तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हीच सामान्यांची भावना आहे. आपल्या कामातून खऱ्या अर्थाने “मराठी माणसाचे हृदयसम्राट” बनले आहात, अशी भावना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली.





Source link