Big News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Big News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?


Local Body Election In Maharashtra Supreme Court Case: अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) प्रलंबित निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली.  कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.  25 फेब्रुवारी 2025 ला पुढील सुनावणी होणार आहे.  यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.  राज्य सरकार आणि आहे कोर्टाला सागितलं की हा विषय पूर्ण झाला आहे. कुठल्याही पक्षात मतभेद नाहीत. 5 फेब्रुवारी सुरुवातीला कोर्ट म्हणाल होत मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत. त्यामुळं आता कोर्टाने 25 फेब्रुवारी तारीख दिली आहे. तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या बाजूने सांगितल की मी तासाभरात माझं मत मांडतो. मात्र, आज कोर्टाला जास्त वेळ नसल्याने पुढील तारीख पडली आहे. 92 नगरपालिका मधे ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल. पुढील सुनावणी नंतर प्रशासक राज्य बाजूला होऊन निवडणुका होतील. पंजाब केसाचा देखील दाखला आम्ही आज सुनावणीवेळी दिला अशी माहिती ॲड देवदत्त पालोदकर यांनी दिली. 

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत आज फैसला येण्याची शक्यता  वर्तवली जात होती. सुप्रीम कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत निर्णय देण्याची शक्यता होती. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण  प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सुप्रिम कोर्टात याबाबत सुनावणी झाली. त्यामुळे 2 वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त लागणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.  त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. 

मागच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे ॲड देवदत्त पालोदकर व ॲड अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशांमुळे व कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली आहे. राज्य शासनातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सदर प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून यामध्ये अनेक याचिका व अर्ज सादर करण्यात आले असल्याचे सांगितले.
त्यानंतर ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना तसेच राज्य शासनाने निर्गमित केलेले अध्यादेश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी सादर झालेल्या याचीका, त्यात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश विचारात घेऊन याचिकाकर्ते, राज्यशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे प्रकरणातील मुद्दे कायम करणे आवश्यक आहे, ज्यायोगे प्रकरणात पुढील तारखेस योग्य ते निर्देश देता येतील असे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्याला सर्व वकिलांनी सहमती दर्शविली. 

सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरण दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी ‘डायरेक्शन्स‘ साठी ठेवण्याचे तसेच तोपर्यंत ‘जैसे थे‘ आदेश कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. 2021 साली राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ केली होती. राज्यातील 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका तसेच 13 नगरपंचायती संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावरच पूर्ण केली होती. मात्र 4 ऑगस्ट 2022 रोजीच्या अध्यादेशान्वये सदस्य संख्येत करण्यात आलेली वाढ व निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली होती. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.





Source link

नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान

नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान



खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय..



Source link

'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास…' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं…

'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास…' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं…



Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत ‘छावा’च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे. 



Source link

Drug-free diabetes care

Drug-free diabetes care


A hundred million Indians are affected by type-2 (non-auto immune) diabetes; one in every five diabetic patients worldwide is an Indian. Knowing the mechanics of diabetes is crucial in designing the best treatment methods. In this, researchers at the Indian Institute of Science, Bengaluru, have tasted success.

First, here is what is already known about diabetes. Cells, known as beta-cells, in the pancreas produce and store insulin, a hormone that keeps glucose levels in blood under check. However, alongside insulin, the beta-cells also produce a protein called ‘islet amyloid polypeptide’, or IAPP. 

Sometimes IAPPs aggregate, which ends up killing beta-cells — the consequent dip in insulin production leads to diabetes. In a way, beta-cells end up creating their Frankenstein’s monster. 

What prevents this from happening is the body’s defence mechanism known as ‘extracellular vesicles’ (EVs). These are ‘bubbles’ released by cells that transport molecules such as proteins and RNA from one cell to another. The EVs are produced by ‘multivesicular bodies’ (MVB) inside cells. When beta-cells are stressed, the MVBs produce EVs, which prevent the harmful accumulation of amyloid proteins. 

IISc research

In their study, researchers at the IISc’s Department of Developmental Biology and Genetics (DBG), led by Nikhil R Gandasi, compared the functions of two secretory vesicles in the insulin-producing beta-cells of the pancreas. 

Using a technique called ‘fluorescent tagging’, they showed that MVBs were low in beta-cells of type-2 diabetics, compared with normal individuals. “This showed that loss of insulin secretion in type-2 diabetic beta-cells could also be driven by decrease of MVBs, leading to beta-cells dysfunction, and hence lower number of insulin secretory granules,” says a write-up from IISc. 

What does this mean in terms of a potential cure? The discovery paves the way for a new method of treatment — using ‘small molecules’ (less than 900 daltons) that can be sent inside cells, past the cell wall (membrane), to interact with, and influence the functioning of proteins, DNA, RNA and other cellular components. 

The use of small molecules has been attempted in many other treatments but is relatively new in the context of diabetes. The IISc finding promises just that. Importantly, this would be a drug-free approach to tackling diabetes, by strengthening the body’s natural defence mechanisms. 

Now the researchers are focusing on developing small molecules that can do the trick. If successful, it could protect beta-cells by enhancing their ability to clear toxic protein aggregates and step up insulin secretion. 

Discovering the right small molecule for this task may not be all that difficult with the assistance of AI, but research must check for unintended effects on other cells, and whether EV production is scalable.





Source link

निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात

निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात


Public Holidays On Sunday: आज देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी दिल्लीतील कर्तव्यपथापासून ते खेडेगावांमधील शाळांमध्येही ध्वजारोहण करुन हा राष्ट्रीय सण साजरा केला जात आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे यंदा 26 जानेवारी (26 January) रविवारी आल्याने एक हक्काची सुट्टी गेल्याची भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे. सामान्यपणे आठवड्यातील मधल्या वारी 26 जानेवारी असेल तर राष्ट्रीय सण म्हणून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. मात्र यंदा प्रजासत्ताक दिन रविवारी आल्याने एका हक्काच्या सुट्टीला कात्री लागल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. मात्र ही केवळ वर्षाची सुरुवात असून यंदा वर्षभरामध्ये अशा अनेक हक्काच्या सुट्ट्या रविवारी आल्याचं दिसत आहे. या सुट्ट्या कोणत्या आणि कधीकधी अशाप्रकारेच सार्वजनिक सुट्ट्या रविवारी आणि शनिवारी आल्यात पाहूयात…

राज्य सरकारनेच जाहीर केली आहे सुट्ट्यांची यादी

महाराष्ट्रामध्ये 4 डिसेंबर 2024 रोजी 2025 च्या सार्वजनिक सुट्ट्या कशा असतील यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. राज्य सरकारने 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या सरकारी कार्यालयांबरोबरच सार्वजनिक उपक्रम क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही जागू असतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीशीसंबंधित कामगारांनाही या 24 सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. मात्र या सुट्टयांपैकी स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच अन्य तीन सुट्ट्या रविवारी येणार आहेत. तर एक सुट्टी शनिवारी येत असल्याने पाच दिवस काम करणाऱ्यांना एकूण चार सुट्ट्यांचा फटका बसला आहे.

रविवारी येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या

26 जानेवारीप्रमाणेच मार्च महिन्यामध्ये 30 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टीही रविवारीच आली आहे. या शिवाय त्याच्या पुढचा रविवार म्हणजेच राम नवमीही (6 एप्रिल) रविवारीच आली आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 6 तारखेला येणारी मोहरमची सुट्टीही रविवारीच आली आहे. म्हणजेच 30 मार्च, 6 एप्रिल आणि 6 जुलैची सुट्टी रविवारी आली आहे.

शनिवारी आणि सोमवारी आलेल्या सुट्ट्या कोणत्या?

7 जून रोजी बकरी ईदची सुट्टी आहे. मात्र ही सुट्टी शनिवारी आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी रविवारला लागूनही काही सार्वजनिक सुट्ट्या आहेत. ज्यामध्ये 31 मार्च (रमजान-ईद), 14 एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध पौर्णिमा (12 मे) या सुट्ट्या सोमवारी आल्या आहेत. 

लाँग विकेंड देणाऱ्या सुट्ट्या

सोमवारप्रमाणेच यंदाच्या वर्षी शुक्रवारीही बऱ्याच सुट्ट्या आल्या आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा लाँग विकेंड मिळण्याची संधी असलेल्या या सुट्ट्या पुढील प्रमाणे : 14 मार्च (होळी, दुसरा दिवस), गुड फ्रायडे (18 एप्रिल), स्वातंत्र्य दिन तसेच पारसी नववर्ष (15 ऑगस्ट), ईद-ए-मिलाद (5 सप्टेंबर)





Source link

पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर


Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पद्म पुरस्काराने सम्नान केला जातो. पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश आहे.  दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. 

राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार,  ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, यांना जाहीर करण्यात आले.  महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.

देशातील 49 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरीकास ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’     जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देशातील 09 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत. 

महाराष्ट्राच्या नागपूर मधून डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. होमिओपॅथीच्या क्षेत्रात समर्पण भावनेने केलेली रुग्णसेवा, रुग्णसेवा करताना जपलेली नैतिक मूल्ये, समाज आणि रुग्णांप्रति असलेली आस्था व जबाबदारीची ठेवलेली जाणीव आदी बाबी विचारात घेऊन डॉ. विलास डांगरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हरिमन शर्मा, जुम्दे योमगम गॅमलिन, जॉयनाचरण बथारी, नरेन गुरुंग, विलास डांगरे, सैखा एझ अल सबा, निर्मला देवी, भीम सिंग भावेश, राधा बहन भट्ट, सुरेश सोनी, पंडी राम मानवी, जोनास मासेट्टी, जगदीश जोशिला, हरविंदर सिंग, भेरू सिंह चौहान, वेंकप्पा अंबाजी सुगतकर, पी दच्चनामूर्ती,  निरजा भाटला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा, सॅली होळकर, गोकुळ चंद्र दास, चैत्राम पवार  यांना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp