मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत गाठा नवी मुंबई विमानतळ; आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त प्लान
मुंबईतून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या जबरदस्त पर्याय सुचवण्यात आला आहे.
Source link
मुंबईतून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या जबरदस्त पर्याय सुचवण्यात आला आहे.
Source link
Beed News Today: एकीकडे गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्या देशात चर्चेत आहे तर दुसरीकडे आता बीड जिल्ह्याच्या आष्टीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अफवांचा बाजार सुरू आहे. या अफवांचा आष्टीमधील एका कुटुंबाला मोठा मानसीक त्रास सहन करावा लागला आहे. एका अफवेमुळं एका संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा बीड चर्चेत आलं आहे.
बीडच्या आष्टीमधील एका कुटुंबांला HIVच्या अफवेमुळे वाळीत टाकण्यात आलं आहे. या कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला, तो मृत्यू HIVमुळे झाल्याची माहिती गावात पसरली आणि गावाने या कुटुंबाला वाळीत टाकलंय. मात्र ही माहिती खोटी असून पोलीस आणि वैद्यकीय अधिका-यांनी अफवा पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. मुलीचे सासरच्यांच्या सांगण्यावरून पोलीस आणि आरोग्य विभागाने अफवा पसरवल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे.
गावकऱ्यांनी कुटुंबाला वाळीत टाकल्याने या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर या त्रासातून महिलेनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात आलाय. पीडित कुटुंबाने डॉक्टर आणि पोलिसांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली आहे.
‘खोटा आजार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळं आमच्या जवळ कोणी येत नाही. मुलंदेखील जवळ येत नाहीत. एड्स असल्याचे त्यांनी सांगितलं पण रिपोर्टमध्ये तसं काही नाही,’ असं मृत तरुणीच्या आईने म्हटलं आहे. तर, ‘आम्हाला बघितलं की लोकं लांब लांब जातात. आम्हाला एचआयव्ही आहे असं समजून आम्हाला वाळीत टाकण्याचा प्रकार केला आहे. सासरच्या लोकांवर आम्ही केस केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन पोलिस आणि डॉक्टरांना सांगून हा प्रकार केला आहे,’ असं पीडितेच्या पालकांनी म्हटलं आहे.
मुलीचा मृत्यू झाला होता तिच्या सासरच्यांनी तिला मारहाण केली होती. माहेरवरुन पैसे आणावे म्हणून मारहाण केली होती, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केली होती. मुलीला बेदम मारहाण केल्यानंतर ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा आरोप सासरच्या मंडळींवर येऊ नये म्हणून अशा पद्धतीची अफवा पसरवल्याचा दावा मुलीच्या पालकांनी केला आहे.
धक्कादायक म्हणजे मुलीच्या अत्यंसंस्काराच्या वेळी पोलिसांच्या काही ऑडिओ क्लिपदेखील समोर आल्या आहेत. मुलीच्या अत्यंसंस्कारावेळी आलेल्या काही लोकांना पोलीस सांगत होते की तुम्ही मुलीच्या जवळ तर गेला नाहीत ना. तुम्ही ब्लड टेस्ट करुन घ्या, मुलीला एचआयव्ही होता, असं सांगतानाच्या ऑडिओ क्लिप समोर येत आहेत. मात्र त्या खऱ्या आहेत की खोट्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.
Pandharpur Aashadhi wari: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय टेक्नॉलॉजी चा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.
Source link
Donald Trump Net Worth: डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. संपूर्ण अमेरिकेत उत्साहाचं वातावरण आहे. ट्रम्प यांच्या शपतविधीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील विविध देशांमध्ये ट्रम्प यांची मालमत्ता आहे. भारतातही ट्रम्प यांच्यानावर आलिशान बंगल्यापासून टॉवर्सपर्यंत सर्व काही आहे. महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. जाणून घेऊया ट्रम्प यांची भारतात कुठे कुठे संपत्ती आहे. ..
बिझनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सोमवारी 865 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 7,100 कोटी रुपये) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्या भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त ट्रम्प टॉवर असतील अशी देखील चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबध आणकी चांगले होणार आहेत.
भारतात अनेक नवीन प्रकल्पांमध्ये ट्रम्प गुंतवणूक करणार आहेत. नोएडा, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक टॉवर, कार्यालयीन इमारती, व्हिला तसेच गोल्फ कोर्स यांचा समावेश आहे. 2014 मध्ये मुंबईत ट्रम्प टॉवरचे लाँचिंग झाले. यावेळी ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती ट्रिप ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी दिली.
भारतात असलेल्या चार टॉवरची किंमत 7500 कोटी रुपये
सध्या भारतात चार ट्रम्प टॉवर आहेत. 30 लाख स्क्वेअर फूटाच्या या टॉवरमध्ये 800 आलिशान निवासी सदनिका आहेत. त्यांची किंमत 6 कोटी ते 25 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चार प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात एक ट्रम्प टॉवर आहे. तेथेही एक नवीन कॉम्पलेक्स बांधले जाणार आहे. यात निवासी टॉवरसह, ऑफिस स्पेस, असणार आहेत. याशिवाय नोएडा, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये ट्रम्प ब्रँडेड गोल्फ कोर्स आणि व्हिला बांधण्याची योजना आहे.
बारामतीच्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा चर्चेत आसला आहे. हा घोडा बघायला गर्दी लोटली आहे.
Source link
Maharashtra Guardian Ministers : बहुप्रतीक्षित पालकमंत्रिपदांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केलं आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.
सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.
बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल. पालकमंत्री पदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा असते. कोणाला कुठला पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहुयात अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.