<p>आमदार अपात्रता प्रकरणावर अपक्ष आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिलीये. आम्ही अपक्ष नाही आमचा प्रहार पक्ष आहे आणि आमचे दोन आमदार आहेत.. त्यामुळे बंडखोरीचा प्रश्नच येत नाही.अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलीय..तसंच अमरावतीत सध्या नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. &nbsp;नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्य़ा आरोपांमुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ माजली..यावरही कडूंनी प्रतिक्रिया दिलीय. &nbsp;नवनीत राणा यांनी पैसे दिल्याच्या आरोपांबाबत पैसे कोणी दिले कोणी घेतले याबाबत आम्ही चौकशीची मागणी करू. अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिलीये.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link