भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू
Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं… घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप… पाहा मोठी बातमी
Source link
Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं… घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप… पाहा मोठी बातमी
Source link
Competition Guardian Ministership:
Source link
राज्यात पुढील दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होताना दिसणार आहे. मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्यांची झालर पसरली होती. पण येत्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे वेध शाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे. आणि यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असल्याने इशान्येकडील राज्यांत व विदर्भात पुढील दोन पावसाची शक्यता आहे.
24 आणि 25 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 25 ते 29 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. 26 ते 8 डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यंदा नाताळात थंडी नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. पण पुन्हा 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मुंबईसह कोकण सोडून इतर महाराष्ट्रात 24 डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 4 अंशाने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशाने खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी आहे. मुंबईचे किमान तापमान 19 अंश असून, रात्रीसह पहाटेच्या वातावरणातील गारवा कायम आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस थंडीची लाट कायम राहील. राजस्थान आणि पंजाबमध्ये दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, येथेही थंडीच्या लाटेबाबत इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, थंडीची लाट लक्षात घेता, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान खूप थंड असेल. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात थंड लाटेचा प्रभाव नंतर कमी होईल, परंतु 23 डिसेंबरपासून पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून येईल. या दोन्ही राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
Source link
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.
Source link
Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) ताब्यात घेण्यात आलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल्यानंतर अखिलेश शुक्लाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण तापलं होतं आणि तेव्हापासून अखिलेश शुक्ला गायब झाला होता. अखेर दोन दिवसांनी तो समोर आला असून व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. दरम्यान याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस इमारतीत बुधवारी झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी वास्तव्यास आहे. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. शुक्ला याने आपल्या मित्रांना बोलावून अभिजीत देशमुख यांना मारहाण केली. या वादात हस्तेक्षेप करण्यास गेलेल्यांनाही शुक्लाने मारहाण केली. या प्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यावरुन निवेदन केलं आहे.
“अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्ला हा एमटीडीसीमधे काम करणारा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. पुढे बोलताना फडणवीसांनी, “जे माज करतात त्याचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला? वसई विरारला कोणाच्या काळात मराठी माणूस गेला याचा शोध घ्यायला हवा,” असा टोलाही लगावला.
“दोन दिवसांपासून माझ्या संबंधी प्रकरण व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं आहे मला सांगायचं आहे. एक वर्ष आधी मी माझ्या घराच्या इंटिरिअरचं काम केलं. यावेळी मी माझा शू रॅक उजव्या बाजूला घेतला. यावर देशमुख, काळवीट्टे कुटुंब यांनी आक्षेप घेतला. ते आम्हाला एका वर्षापासून त्रास देत होते. आम्ही हा तोडून फेकू अशी धमकी देत होती. माझ्या बायकोलाही ते त्रास देत होते. शिवीगाळ करत होते. मी ऑफिसमधून आल्यानंतर पत्नी मला याबाबत सांगायची. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो,” असा दावा अखिलेश शुक्लाने केला आहे.
“परवा माझ्या बायकोने घराबाहेर धूप लावला होता. काळविट्टे कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. आम्ही तुम्हाला येथे राहू देणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी माझ्या बायकोला शिवीगाळ केला. मी आल्यावर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर देशमुख कुटुंब आलं आणि बायकोला शिवीगाळ केली. त्यांनी जोरजोरात दरवाजा आपटला आणि बायकोचे केस ओढून कानाखाली मारली. मी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मलाही शिवीगाळ कऱण्यात आली,” असाही त्याचा दावा आहे.
“व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात भांडण दिसत आहे. पण त्याआधी काय घडलं हे कोणाला माहिती नाही. देशमुख कुटुंब एक वर्षांपासून त्रास देत होते. माझ्या मराठी मित्रांनी मला सहकार्य केलं आणि वाचवलं. आमची पाचवी पिढी महाराष्ट्रात असून, आम्ही अमराठी आहोत असं कधी वाटलं नाही. त्यांनीच आम्हाला तुम्ही भय्या आहात, आम्ही तुमचं काय करतो पाहा अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या मराठी मित्रांनी मला वाचवलं. मीदेखील महाराष्ट्रीयन आहे. मी स्वतःला मराठी भाषिक समजतो,” असंही त्याने म्हटलं आहे.
शुक्ला याने यावेळी आपल्या जुन्या शेजारीपणाच्या वादाला राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. त्याने या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे.