by Hansraj Agrawal | Nov 23, 2024 | Trending News
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी म्हणून चर्चेत आलेले पराग शहा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार राखी हरिश्चंद्र जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 22, 2024 | Trending News
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 22, 2024 | Trending News
Today Fuel Price: महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं असून दोन्ही राज्यांमधील निकाल 23 तारखेला म्हणजेच उद्या लागणार असून त्यापूर्वीच मोठी घोषणा करण्यात आली असून याचा फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 21, 2024 | Trending News
Missing Link : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 21, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि सीमेपलिकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्राकडून शीतलहरींचा प्रवाह मागील काही दिवसांमध्ये वाढल्यामुळं हा प्रवाह आता महाराष्ट्रापर्यंत परिणाम दाखवताना दिसत आहे. तिथं दक्षिण भारतही हा शीतलहरींनी प्रभावित होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचा झोत वेगानं राज्यात येत असल्यामुळं नाशिक, विदर्भात तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील काही भागही इथं अपवाद ठरत नाहीय.
सध्याच्या घडीला राज्यात थंडीला पोषक हवामान असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा शेवट थंडीनंच होणार असल्याचा अंदाज आहे. तिथं नाशिकमध्ये तापमान 12.4 अंशांवर पोहोचला आहे, तर जळगावात 13.2 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 13.2 अंश, साताऱ्यात 14.5 अंश, कोल्हापुरात 17.2 अंश इतकं तापमान आहे. विदर्भातही हीच स्थिती असून, नागपुरात पारा 13.6 अंश, गडचिरोली इथं 14 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमालय क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात अर्थात एक तीव्र थंड हवेचा झोत सक्रीय असल्यामुळं उत्तर भारतात थंडी वाढली आहे. याच उत्तर भारतीय राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीचं प्रमाण येत्या दिवसात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्येही वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानाच घट होताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून आणि येत्या काही दिवसांमध्येही देशासह राज्यात थंडीसाठी पूरक वातावरण राहणार असून, महाराष्ट्रात शीतलहरींमध्ये अडथळे आणणारे कोणतेही घटक सक्रिय नसल्यामुळं गुलाबी थंडी बोचऱ्या थंडीचं रुप धारण करू शकते. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळे पंजाब, हरयाणा आणि राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
मुंबईच्याही कमाल तापमानात घट
फक्त पुणे, नाशिक, नागपूरमध्येच नव्हे, तर आता मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असं असलं तरीही मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारी उष्मा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावं लागत आहे. पुढील 48 तासांनंतर थंडीचं हे प्रमाण शहरासह राज्याच्या बहुतांश भागात आणखी वाढेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 20, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे ते निकालाकडे. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देशभर गाजलेले दोन मुद्दे चांगलेच चर्चेत आले. देशभरात गाजलेले हे दोन मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार का? या ममुद्द्यांचा मतदारांवर परिणाम किती परिणाम झाला? जाणून घेऊया.
बटेंगे तो कटेंगे
महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. या पैकी व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे हे दोन मुद्दे चांगलेच गाजले या दोन मुद्द्यांपैकी बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा सर्वाधिक वादग्रस्त ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. योगी आदित्यनाथ यांनी राज्यात झालेल्या एका सभेत बटेंगे त कटेंगेचा नारा दिला होता.. मात्र त्यांच्या या नाऱ्याला भाजपमधूनच विरोध पहायला मिळाला. यामुळे या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका झाली.
व्होट जिहाद
लोकसभा निवडणुकीतील निकालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा जोर देऊन मांडला. फडणवीसांनी मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवत महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आऱोप केला. आता फडणवीसांच्या आरोपांना खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी बटेंगे तो कटेंगेचा विचार मांडणं देशासाठी घातक असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
कुठल्या मुद्यांवर किती मतदान?
महागाईच्या मुद्द्यावर 30 % मतदान झाले. बेरोजगारीच्या मुद्द्यावर 25%, भ्रष्टाचार च्या मुद्द्यावर 20% , व्होट जिहादच्या मुद्द्यावर 15% तर, बटेंगे तो कटेंगे या मुद्दयावर 10% मतदान झाले.
गाजलेल्या मुद्द्यांचा मतदारांवर किती परिणाम झाला?
‘बटेंगे तो कटेंगे’चा मतदांरांवर 40% सकारात्मक परिणाम झाला तर, 50 टक्के नकारात्मक प्रभाव पडला. तर, 10 % मतदारांनी तटस्थ भूमिका घेतली.
‘एक है तो सेफ है’ या मुद्द्याचा 70% सकारात्मक परिणाम झाला. तर 20% नकारात्मक झाला तर 10% मतदार तटस्थ राहिले.
Source link