अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही

अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही



Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.



Source link

VIDEO : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात बेछूट गोळीबार

VIDEO : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात बेछूट गोळीबार



Slovak Prime Minister Attacked : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (Robert Fico) यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



Source link

मोदींना जिरेटोप घातल्याने वाद! शिवरायांचा अपमान केल्याची टीका; BJP म्हणते, 'यात मोदींचा..'

मोदींना जिरेटोप घातल्याने वाद! शिवरायांचा अपमान केल्याची टीका; BJP म्हणते, 'यात मोदींचा..'


Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून तिसऱ्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि त्यानंतरही भाजपाच्या सहकारी पक्षांचे म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. मोदींनी हा अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर जिरोटप घालण्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात जिरेटोपाला मानाचं स्थान आहे. त्यामुळेच एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरुन शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस गटानेही प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराजांचा अवमान केला; शरद पवार गटाचा दावा

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना हा जिरेटोप घातला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीकडून उपस्थित होते. यावेळेस मोदींना प्रफुल्ल पटेल यांनी स्वत:च्या हाताने हा जिरेटोप चढवला. पटेल मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालतानाचा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेलांवर टीका केली आहे. “जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे,” असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. 

जनता शांत बसणार नाही

“महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही,” असंही या पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 

संभाजी ब्रिगेडचा इशारा

पटेल यांच्या या कृतीवरुन संभाजी ब्रिगेडनेही नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरोटोप परिधान करु नेय असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यावरही जिरेटोप परिधान करण्याचा प्घात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. फक्त छत्रपतीच जिरेटोप परिधान करु शकतात. जिरेटोपाचा असा अपमान केला जाऊ नये,” असा इशारा दिला आहे.

भाजपा-शिंदे गटाची सारवासारव

दरम्यान, भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटाने या प्रकरणावर भाष्य करताना ‘यामध्ये मोदींचा दोष नाही’ असे म्हटले आहे. “जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? असाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही,” असं उद्योगमंत्री उदय सामंत या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले. तर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी, “प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जिरेटोपाला राज्याभिषेकातही होतं विशेष स्थान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबरोबरच त्यांच्या काही खास गोष्टींना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आणि मानाचं स्थान आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे जिरेटोप! 6 जून 1674 मध्ये राज्यभिषेकाच्या सोहळ्यातही या जिरेटोपाला विशेष स्थान होते. 





Source link

4 फूट मागे असते तर वाचला असता; घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू

4 फूट मागे असते तर वाचला असता; घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू


Mumbai Ghatkopar hoarding collaps​ : मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते.  कोसळलेलं होर्डिंग हे अडीचशे टनाचं बेकायदेशीर होर्डिंग असल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेत अनेक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आहे. याच दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू जाला आहे. जिथे ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाहून हा टॅक्सी चालक 4 फूट मागे असता तर त्याचा जीव वाचला असता. 

मी घरी येतोय.. आणि शेवटी त्यांचा मृतदेहच घरी आला

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत नालासोपा-यातल्या टॅक्सी चालकाचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. 51 वर्षांचे सतीश बहाद्दर सिंह एक भाडं मारण्यासाठी मुंबईत आले होते. मुंबईतलं भाडं संपवून ते ठाण्यामार्गे नालासोपा-याला येणार होते. मात्र, येताना वाटेत टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर आले आणि तिथेच काळाने घात केला. 

जेव्हा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं तेव्हा सतीश सिंह यांची टॅक्सी शेवटी उभी होती. जर 4 फूट अंतरानेही त्यांची टॅक्सी पंपापासून लांब असती तरी त्यांचा जीव वाचला असता. मात्र होर्डिंग कोसळल्यानंतर त्यांच्या टॅक्सीचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला. दुपारी तीनच्या सुमारास सतीश सिंह यांचं कुटुंबियांसोबत फोनवरुन अखेरचं बोलणं झालं होतं. घरी येत असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं. मात्र हे त्यांचं अखेरचं बोलणं ठरलं.  त्यांच्या पश्चात पत्नी शीला सिंह, मुलगा शुभम सिंह 29, शिवम सिंह 24 ,सत्यम सिंह, मुलगी सुप्रिया सिंह असा परिवार आहे.

होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेक जणांचा बळी गेला आहे संबंधित प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं तर अशी दुर्घटना झाली नसती. अशा बेकायदा व परवानगी असलेल्या होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करावे तसेच मृतांच्या नातेवाईकांना सरकारने योग्य ती मदत करावी अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी केली आहे.

घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग क्रेन्सच्या साहाय्यानं काढण्याचा एनडीआरएफचा प्रयत्न अयशस्वी ठरला. होर्डिंग्सचं वजन जास्त असल्यानं ते मध्येच तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी सरळ हँडकटरनी होर्डिंग काढायला सुरुवात केलीय. आधी 2 क्रेन्सच्या साहाय्यानं हे होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न एनडीआरएफनं केला, मात्र त्यात यश आलं नाही.. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग असल्यामुळे याठिकाणी एनडीआरएफला गॅस कटर किंवा इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्यानं होर्डिंग तोडता येत नाहीये.  त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. 

 





Source link

मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय… त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत. 



Source link

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार


Mumbai Weather Alert : मुंबईकरांनी मोठ्या वादळाचा सामना केला आहे. भर दिवसा मुंबईत काळोख पडला होता. तुफान वारा वाहत होता. यानंतर पाऊस देखील पडला आहे.  हवामान विभागाने मुंबईकरांना अलर्ट जारी केला आहे. 
पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत प्रतितास 40 ते 50 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे पाहणार आहेत. हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

मुंबईत भर दुपारी काळोख पडला

मुंबईमध्ये भरदुपारी काळोख पडला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांतही जोरदार पाऊस पडतोय. दादर सायन माटुंगा कुर्ला परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं… मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.  दरम्यान मुंबईत  दोन  दिवसांपासूनच वातावरणात बदल झालाय, ढगाळ वातावरण निर्माण झालंय. मुंबई शहर तसंच उपनगरात असह्य उकाडा जाणवतोय. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. 

विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

नागपूर,यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस होईल तसंच गारपिटीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशक हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भासाठी हा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आज सकाळपासून नागपुरातही ढगाळ वातावरण आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुस-या दिवशी अवकाळीने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकरी हवालदिल झालेत. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp