Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं
विरारमध्ये मद्यधुंद तरुणींनी भरस्त्यात धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत तुफान राडा घातला. मोबाईलमध्ये शूट कऱण्यात आलेला त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Source link
Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं. पण अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं आणि चांदी महागलं आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोने-चांदीच्या दरात जळगावच्या सुवर्ण नगरीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोनं आणि चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
काही दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात प्रतिकिलो 1100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता चांदीचा दर प्रतिकिलो 82 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. तर सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोनं आता प्रतितोळा 72 हजार 300 रुपयांवर पोहोचलं आहे.
धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे. यादिवशी जर एखादं शुभ काम करायचं असेल तर त्यासाठी मुहूर्ताची गरज नाही. यादिवशी सोने-चांदी खरेदीपासून लग्न, शुभ कार्य. गृहप्रवेश आणि मुंडन, कार किंवा घर खरेदी करण्यात येते.
हा दिवश खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू होतं अशी मान्यता आहे. पण यादिवशी सोनं खरेदी का केलं जातं? हे समजून घ्या
अक्षय्य तृतीयेबद्दल अशी मान्यता आहे की, यादिवशी केलेल्या शुभ कार्याला चौपट फळ म्हणजे अक्षय प्राप्त होतं आणि त्या वस्तूची कधीही कमतरता पडत नाही. हिंदू धर्मात सोनं आणि दागिने हे लक्ष्मीचं भौतिक रुप मानलं गेलं आहे. त्यामुळे लक्ष्मीची आपल्या आणि आपल्या घरावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणून यादिवशी सोनं खरेदीला महत्त्व आहे. एका पौराणिक आख्यायिकेच्या मान्यतेनुसार या दिवशी घेतलेलं सोनं परिधान केल्यास अकाली मृत्यू टळतो.
दुसऱ्या एका कथेनुसार या दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचं संरक्षण बनवण्यात आलं होतं. त्यामुळे अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी करुन कुबेराची पूजा करण्यात येते. यामुळे घरात कायम सुख समृद्धी नांदेत, असा विश्वास आहे.
पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी शुक्रवार 10 मे 2024 पहाटे 4.17 वाजेपासून शनिवारी 11 मे 2024 पहाटे 02:50 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार शुक्रवार 10 मे 2024 अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे.
सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त – रात्री 12:18 पासून दुपारी 01:59 वाजेपर्यंत
रात्री शुभ मुहूर्त – 09:40 वाजेपासून 10:59 वाजेपर्यंत
जळगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुंटुंबातील चार जण ठार झाले आहेत.
Source link
Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आनंद महिंद्रांनी केवळ हा व्हिडीओ शेअर केला नाही तर या मुलाला एक ऑफरही दिली आहे.
Source link
Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच मुंबईच्या घाटकोपरमध्ये मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप करण्यात येतोय.. घाटकोपरच्या गुजरातीबहुल सोसायटीत संजय दिना पाटील यांची प्रचार पत्रक वाटायला कार्यकर्त्यांकडून मज्जाव झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
गुजरातीबहुल सोसायटीत मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचारासाठी येऊ देणार नाही अशी भाषा करण्यात आली, भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांची पॅम्प्लेट्स सोसायटीत वाटण्यात आली असा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.. दरम्यान मुंबईत मराठी माणसाविरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केला.
तर, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्यानं ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरु असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. मराठी-गुजराती वादाच्या 2 घटना मुंबईत समोर आल्यात. विशेषत: लोकसभा निवडणूक ऐन रंगात असताना या घटना समोर आल्यात. मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहितीये. या दोन घटनांच्या निमित्तानं मराठी-गुजरात वादाला फोडणी मिळाल्याची चर्चा सुरु झालीय.
गुजराती-मराठी वादावरून राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. मुंबईत मराठी माणसाविरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केला. तर, शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांची जहरी टीका केली. बुळचट शिवसेना काय करतेय? असा सवाल करत राऊतांनी टीका केलीय. तर, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याने ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला.
निवडणुकीत घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पुन्हा पेटला आहे. घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटीत मविआचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. गुजराती बहुल सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही अशी भाषा वापरण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तर, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने मराठी-गुजराती वाद निर्माण करतायत असा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केलाय.
भाजप सत्तेवर आल्यास महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांना हीच वागणूक मिळेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय. गुजरातच्या एका जाहिरातीत ग्राफीक्स डिझायनरसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र त्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असा उल्लेख करण्यात आला होता. तर गुजरातीबहुल सोसायटीत मविआच्या संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांना पत्रकं वाटायला मनाई केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे मराठी तरुणांना अशा पद्धतीची वागणूक देणं हे चुकीचं असल्याचं आदित्य म्हणाले.