by Hansraj Agrawal | Mar 4, 2024 | Trending News
Mumbai BMC to make underground Water Tunnel : मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण सध्या 4,200 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) मागणीच्या तुलनेत मुंबईला 3,950 एमएलडी मिळते. या 250 एमएलडीच्या तुटवड्याव्यतिरिक्त, असमान वितरण आणि अधूनमधून होणारा पुरवठा यामुळे शहराच्या पाण्याचा ताण वाढतो. गेल्या काही वर्षांत मुंबईला पावसाळ्यात उशीर झाल्यामुळे 10-15 टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागला आहे. याचपार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुडवण्यासाठी मास्टर प्लान केला आहे. नेमका हा मास्टर प्लान काय आहे? ते जाणून घ्या..
मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलवाहिनी या ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे मुंबईकरांना वारंवार पाणी गळतीला सामोरे जावे लागते. याच पाण्याची गळती रोखण्यासाठी मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी येवई जलाशय ते मुलुंड दरम्यान 21 किमी लांबीचा जल बोगदा बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेतला आहे. हा जलबोगदा भूमिगत असणार आहे.
हा जलबोगदा दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 4,500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा बोगदा 7 वर्षात तयार होईल. तसेच नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील तलावांमधून मुंबईला दररोज पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. भूमिगत बोगदा बांधल्याने पाइपलाइनमधील गळती आणि चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.
तसेच मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध धरणातून होतो. भातसा धरणातून मुंबईद्वारे पुरविण्यात येणाऱ्या दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी 1365 दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते.
त्यानंतर मुंबईत पाण्याचे पाइप उपलब्ध होतो. मात्र मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंड दरम्यान जादा क्षमतेचा जलबोगदा बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिका पाणी बोगद्य पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यास सुरुवात करेल.
असा असेल जलबोगदा
पहिल्या टप्प्यात येवई जलाशय ते कशेळी (भिवंडी) असा 14 किमी लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात कशेळी ते मुलुंड असा 7 किमी लांबीचा बोगदा बांधण्याची BMCच्या पाणीपुरवठा योजना विभागाची योजना आहे. त्याच्या बांधकामासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. दोन्ही जलबोगद्याच्या उभारणीसाठी 7 वर्षांचा कालावधी लागणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2024 | Trending News
धुळ्यात एका बिबट्याचे डोकं कळशीक अडकले. बिबट्या पाण्याच्या शोधात येथे आला होता.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2024 | Trending News
पुढील
बातमी
‘महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका’; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन
Source link
by Hansraj Agrawal | Mar 2, 2024 | Trending News
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. नुकतंच भाजपने लोकसभेसाठी (Loksabha Election) रनशिंग फुंकलं असून 195 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. अशातच आता युती असेल किंवा आघाडी गेल्या काही दिवसापासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. जागा वाटपात बाबती युती आणि आघाडी जवळपास अंतिम टप्प्यांमध्ये आलेले आहेत. कधीही आचारसंहिता घोषित होईल, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे. त्यामुळेच महत्त्वाच्या नेत्यांसोबतच आता राजकीय पक्षातील युवक आघाडी देखील गतिमान झाल्याचं पहायला मिळतंय.
नुकतीच महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष मेहबूब शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह तिन्ही पक्षातील युवक आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी काळ हा महाविकास आघाडीच्या दृष्टीने सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शिवाय लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं तर ते पुढील राजकीय लढाईसाठी महाविकास आघाडीला बळ देणारा असणार आहे त्यामुळेच युवक आघाडीची महाविकास आघाडीतील भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे या दृष्टीने विविध मुद्द्यांवरती मुंबई झालेल्या या बैठकीत महत्त्वाची चर्चा झालेली आहे त्यामुळे प्रमुख वरिष्ठ नेत्यांसोबत आता युवा फळी ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेली पाहायला मिळतेय.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीवरून महायुतीत धुमसान पहायला मिळतंय. तर महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली पहायला मिळत आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये रंगतदार भिडत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
मविआचा फॉर्म्युला ठरला
मविआचा लोकसभा फॉर्म्युला (Loksabha Formula) जवळपास निश्चित झालाय. ठाकरे गट-18, काँग्रेस-17, शरद पवार गट- 10 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वंचितला 2 आणि राजू शेट्टींना 1 जागा मिळणार आहे. वंचितला अकोला आणि नांदेड, अमरावती किंवा हिंगोली यापैकी एक तर राजू शेट्टींसाठी (Raju Shetty) हातकणंगलेची जागा सोडण्यात येणार असल्याचं समजतंय.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 1, 2024 | Trending News
मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. 500 मीटर परिसर मोकळा करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 1, 2024 | Trending News
Shinde Group Conflict: शिंदेच्या आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॅाबीत राडा झाल्याचे वृत्त आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मंत्री दादा भुसे भिडल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर भरतशेठ गोगावले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी मधस्थी केली. दोघांच्या भांडणानं विधीमंडळाच्या लॅाबीत खळबळ माजली. रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या राड्यावरुन शिंदे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान असं काही झालंच नसल्याचा दावा शंभुराज देसाई यांनी केलाय. विधिमंडळात राडा झाल्याचा काय पुरावा आहे? तिथे कोणताही कॅमेरा नाही. मग राडा झाला असं कोण म्हणत? असा उलटप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला. आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली नाही. चर्चा करताना दोघांचा आवाज वाढला असे, शंभुराज देसाई म्हणाले.
आताही सुरुवात आहे. पिक्चर अजून बाकी आहे. निवडणुका होईपर्यंत अजून काय काय होतंय हे पाहा, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले. या सरकारमध्ये कोणाला शिस्त नसल्याचे ते म्हणाले.
असा कुठलाही वाद झालेला नाही. आम्ही सर्व एकत्र तिथं होतो, चहाही घेतला सोबत. पण वाद झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली.
काय घडला प्रकार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदारही त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे हे सभागृहात गेल्यानंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद नेमका कोणत्या कारणांनी झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या वादामुळे एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये वाद झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरु झाल्या आहे
महायुती सरकारमध्ये एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये अशाप्रकराची धक्काबुक्की होण्याची ही पहिलीच घटना आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. त्यात आता या घटनेमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. दरम्यान महेंद्र थोरे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये वाद झाला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी त्यांच्या मध्यस्थी केली आणि त्यांनाथांबण्याचा प्रयत्न केला.
कामकाज एक तासासाठी तहकूब
राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली .या घटनेनबद्दल तपासून माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. तसंच तोपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री केसरकर उत्तर देतील असं त्या म्हणाल्या. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं.
Source link