'कांड्या पेटवायच्या, त्यातून…'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार

'कांड्या पेटवायच्या, त्यातून…'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार


Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केल्यानंतर फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला. नवाब मलिक आजही अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या बाकड्यावर जाऊन बसले.

अजित पवार संतापले

नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट विरोध असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लहून कळवलं आहे. हे पत्र राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच या पत्राला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पूर्ण समर्थन होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवरुन (ट्वीटरवरुन) पोस्ट केलेल्या पत्राला शिंदेंचा पाठिंबा होता असं म्हणत दुसऱ्या दिवशी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता ते चांगलेच संतापले.

शिंदेंची पत्रावर सही असल्याचं ऐकलं अन्…

अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस अजित पवार यांनी नवाब मलिक भूमिका स्पष्ट करतील त्यानंतरच आपण बोलू असं सांगितलं. अजित पवारांना प्रश्न विचारताना एका पत्रकाराने, “दादा ते फडणवीसांचं मत आहे तेच शिंदेचं मत आहे,” असं म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकाराला मध्येच थांबवत अजित पवारांनी, “ते तुम्हाला बोलले का?” असा प्रश्न विचारला. त्यावर पत्रकाराने, “त्यांना मडियाशी बोलायचं नाही,” असं उत्तर दिलं. “ते असं काही म्हटलेलं नसताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की…’ असं म्हणत अजित पवार प्रतिक्रिया देत होते तितक्यात एका पत्रकाने फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असल्याचं म्हटलं. हे विधान ऐकून अजित पवार अजूनच संतापले.

नक्की वाचा >> मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदेंनी कोणाची बाजू घेतली? म्हणाले, ‘पक्ष कसा चालवावा हा..’

कांड्या पेटवायच्या..

अजित पवारांनी थेट त्या पत्रकाराकडे मुख्यमंत्री शिंदेची स्वाक्षरी असलेल्या पत्राची मागणी केली. “बघू दाखव” असं अजित पवार पत्रकाराला म्हणाले. “हेच जे तुमचं चुकतं. काही वाटेल ते..” असं अजित पवार म्हणत असतानाच पत्रकाने ‘आहे सही’ असं पुन्हा म्हटलं. “आहे सही तर दाखव ना पुरावा. दाखव की. उगच काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार म्हणून बोलायचं. काही महिती नाही कुठल्या तरी कांड्या पेटवायच्या, त्याच्यातून कोणाचं तरी ऐकायचं आणि सांगायचं की असं असं आहे. मला दाखव,” असं अजित पवार संतापून म्हणाले.





Source link

दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीने धाड का टाकली? 'ते' 113 कोटी ठरले कारणीभूत

दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीने धाड का टाकली? 'ते' 113 कोटी ठरले कारणीभूत



सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी दादरमधील साड्यांचं प्रसिद्ध दुकान ‘भरतक्षेत्र’वर धाड टाकली. या कारवाईमागे 113 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण आहे. 
 



Source link

भाच्याच्या रडण्याने डोकं दुखायला लागलं म्हणून मामाचं हादरवणारं कृत्य; ड्रममध्ये बुडवून केली हत्या

भाच्याच्या रडण्याने डोकं दुखायला लागलं म्हणून मामाचं हादरवणारं कृत्य; ड्रममध्ये बुडवून केली हत्या



Dhule Crime : धुळ्यात मामाने भाच्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. भाच्याच्या रडण्याचा त्रास होत असल्याने आरोपी मामाने हे धक्कादायक कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.



Source link

'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम


Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता येईल का याची चाचपणी शिंदे सरकार (Shinde Government) करतंय. मात्र मनोज जरांगेंनी सरकारच्या या हालचालींवरच निशाणा साधलाय. 50 टक्क्यांच्यावरचं आरक्षण नकोच, ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीचा जरांगेंनी पुनरुच्चार केलाय. राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु केलंय, त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी कायदा करण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं समजतंय..

सुप्रीम कोर्टात सुनावणी
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण वैध आहे की नाही, या मुद्द्यावर पाच सदस्यीय घटनापीठाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केलं होतं. मात्र मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेवून शेवटचा प्रयत्न म्हणून सरकारने क्युरेटिव्ह याचिका सादर केली आहे.

जरांगे पाटील यांचा इशारा
मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) चांगलेच संतापलेत.. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलं होतं, त्यामुळे जरांगेंचा तिळपापड झालाय. मराठ्यांना नडू नका असा थेट इशारा जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांना दिलाय. आधीच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे-पाटील असा सामना सुरु आहे. त्यात गिरीश महाजनांच्या रुपानं दुसरा मंत्री सरकारच्या निशाण्यावर आलाय.. 

इतकंच काय तर या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करण्यासाठी सर्वच आमदारांनी ताकद लावावी. तसंच जर कायदा पास झाला नाही तर तुमची गय नाही असा इशारा जरांगेंनी आमदारांना दिलाय. 

ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षण देण्यात कायदेशीर अडचणी निर्माण होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी मजबूत कायदा करण्यावर सरकारचा भर आहे असं समजतंय. मात्र आरक्षणाची मर्यादा वाढवून नाही तर ओबीसीतूनच आरक्षण हवं यावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे शिंदे सरकार ही कोंडी कसं फोडतं याकडे लक्ष लागलंय.





Source link

Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार

Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार



Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे. 
 



Source link

ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र

ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र


Maharashtra Politics : परळीत शासन आपल्या कार्यक्रमात मुंडे भावा-बहिणीचं अनोखं मनोमिलन पाहायला मिळालं. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोघेही भाऊबहिण एकत्र आलेले दिसले. केवळ औपचारिकता म्हणून हे दोघे एकत्र दिसले नाहीत तर बहिण-भावानं दिलखुलासपणे एकमेकांना साद घातली.. विशेष म्हणजे बीड आणि परळीच्या विकासाचा मुद्दा दोघांच्याही भाषणात आला..

धनंजय मुंडेंनी परळीच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याची जाहीर भाषणातून आठवण करुन दिली. पंकजा मुंडे आणि मी एकत्र येऊन बीड जिल्ह्याचा विकास करू, असं वचन धनंजय मुंडेंनी परळीत दिलंय. बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह, धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुडेंना श्रद्धाजली वाहिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना ओढून जवळ घेतलं. 

फडणवीस-पंकजा मुंडेंचं मनोमिलन
याच कार्यक्रमात आणखी एक मनोमिलन पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पंकजा मुंडेंमधले कथित मनभेद संपल्याचं चित्र मंचावर दिसले. फडणवीस-मुंडे दोघंही मंचावर बाजूबाजूला बसले होते. दोघांमध्ये हास्यसंवाद रंगताना दिसला. वर्षभरात देवेंद्र फडणवीसांचे बीडमध्ये दोन ते तीन मोठे कार्यक्रम झाले. मात्र एकाही कार्यक्रमाला पंकजा किंवा प्रीतम मुंडेंनी हजेरी लावली नव्हती. मात्र परळीमध्ये पंकजांनी आधी गोपीनाथ गडावर फडणवीसांचं स्वागत केलं. त्यानंतर मंचावर दोघांमध्ये गप्पाही झाल्या. फडणवीसांनीही मुंडे भावा-बहिणीला एकत्र येण्याची साद घातली..

पंकजा आणि धनंजय मुंडे आज एकाच स्टेजवर आहे. मी त्यांना आव्हान करेल असेच एकत्र राहा, आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठिशी उभी करु की परळी असेल बीड असेल, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत, तुम्ही सर्व एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल बी़डचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल असं फडणवीस म्हणाले.

तर आमच्या तिघांबरोबर पंकजा ताईं आणि धनंजय मुंडेंनाही हेलिकॉप्टरमधून घेऊन आलो. आता धनंजय यांना सांगितले आहे बीडचा विकास सर्वांनी एकत्र येत करु, एकदिलाने करुन, सरकार तुमच्या पाठिशी आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं. एकंदरीतच शासन आपल्या दारी कार्यक्रमात अनोखं मनोमिलन पाहायला मिळालं..

ज्या परळीवरुन पंकजा आणि धनंजय यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, त्याच परळीत भावा-बहिणीचं मनोमिलन झालं. तर गोपीनाथगडावर पंकजा आणि फडणवीसही एकत्र येताना दिसले. बीडसाठी मुंडे भाऊ-बहिणीत तह झाल्याची चर्चा रंगलीय. तसंच महायुतीला या एकीचा निश्चित फायदा होईल असाही अंदाज बांधला जातोय.. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp