वारंवार बलात्कार अन् मारहाण; पोटच्या लेकीसाठी बापच झाला हैवान; अखेर मुलीचा मृत्यू
Mumbai Crime News: बाप-लेकीचे नाते हळवे असते. मात्र नालासोपाऱ्यात बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे.
Source link
Mumbai Crime News: बाप-लेकीचे नाते हळवे असते. मात्र नालासोपाऱ्यात बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे.
Source link
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा झााल. हमरीतुमरीत स्मृतीस्थळाचं रेलिंग देखील तुटलं आहे.
Source link
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो ३ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मेट्रो 3 धावण्यास सज्ज आहे.आरे कॉलनी ते बीकेसीपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वीच मेट्रो 3 बाबत आणखी एक अपडेट समोर येत आहे. मेट्रो 3वरील कफ परेड स्थानक हे अंडरग्राउंड असून या स्थानकात मिनि मॉल, पार्किंगची सुविधाही देण्यात येणार आहे.
कफ परेड मेट्रो स्थानकात सनकेन प्लाझाची रचना करण्यात येणार आहे. मिनी मॉलच्या स्वरुपात हे स्टेशन डिझाइन करण्यात येणार आहे. यात पार्किगची सुविधाही देण्यात येणार आहे. कप परेड मेट्रो स्टेशनमध्ये तीन लेव्हल असणार आहेत. 2.8 लाख स्केअर फुट इतक्या जागेत अंडरग्राउंड हे स्थानक उभारण्यात आलं आहे. स्थानकातच जवळपास 192 गाड्या पार्किंग करु शकता त्यासाठी 43,055 चौरस फुटांच्या जागेत कार पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे.
मेट्रो 3 वरील कफ परेड हे स्थानक अनेक सुविधांनी सज्ज असणार आहे. विशेष पार्किंग सुविधांमुळं हे स्थानक विशेष ठरणार आहे. कप परेड स्थानक हे मेट्रो 3 मार्गासाठी एक महत्त्वाचे स्थानक ठरणार आहे. कफ परेड ते आरे कॉलनी पर्यंत ही मार्गिका 33.5 किलोमीटरपर्यंत असून या मार्गावर 27 स्थानके आहेत.
मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यातील काम 91 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावर आता साइनेज आणि फिनिशिंगते काम बाकी आहे. आरे येथील मेट्रो स्थानक पूर्णपणे तयार झाले आहे. मुंबई मेट्रो 3च्या पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. आरे ती बीकेसीपर्यंत हा पहिला टप्पा असून त्यात 10 स्थानके असणार आहेत. यात 9 स्थानके ही भुयारी असून त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, इंटरनॅशनल एअरपोर्ट, सहार रोड,डोमॅस्टिक एअरपॉर्ट, सांतक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी, अशी स्थानके पहिल्या टप्प्यात असतील.
कुलाबा ते सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या कामाला 2016मध्ये सुरुवात झाली होती. या मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र, आता या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो 3 चा कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत 2.5 किमीने विस्तार होणार असून या दरम्यान नेव्ही नगर हे एकमात्र मेट्रो स्थानक असणार आहे. 2025 पर्यंत या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या विस्तारीत मार्गिकेसाठी अंदाजे २५०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे.
Lizard Found In Bread : चहा पाव, वडा पाव, मस्का पाव खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेकरीतून पाव विकत घेताना सावधान, नरम पावात मेलेली पाल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
Source link
Maharashtra Weather : भारतीय हवमानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात पावसाचा नवा टप्पा सुरु होण्याची चिन्हं आहेत. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये पावसाच्या सरीही बरसण्याची शक्यता आहे.
तिथं कोकण किनारपट्टी, गोवा आणि लगतच्या दक्षिण भारत पट्ट्यामध्येही पावसाची हजेरी असेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये मात्र हवामान कोरडं राहणार असून, इथं किमान तापमानात काही 2 अंशांची घट पाहायला मिळू शकते.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार 16 नोव्हेंबरपर्यंत पश्चिम वायव्य दिशेकडे सरकणारा बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार आहे. याचे परिणाम मागील 24 तासांमध्ये केरळ, तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाले आहेत. येत्या काळातही या राज्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पावसाची वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळं अवकाळीचं सावट शंभर टक्के टळलं असं आता म्हणता येणार नाही.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान या भागांमध्ये सहसा सध्याच्या सुमारास कडाक्याची थंडी पडते. पण, अचानकच इथं किमान तापमानाच पाच अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. पण, केदारनाथ परिसर मात्र याला अपवाद ठरतोय, कारण इथं बर्फवृष्टी सुरुच आहे. राज्यातील उर्वरित भगामध्ये मात्र हवामान कोरडं आहे.
हवामानाची स्थिती स्थिर राहिल्यास 16 नोव्हेंबरनंतर पश्चिम आणि उत्तर भारतात पुन्हा एकदा काही पर्वतीय भागांसह हिमाचल आणि उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसू शकतात. त्यामुळं तापमानातही काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं तुम्ही उत्तरेकडील राज्यांमध्ये जाणार असाल, तर काळजी घ्या. कारण इथं तुम्हाला कोणत्याही ऋतूचा सामना करावा लागू शकतो.