by Hansraj Agrawal | Feb 7, 2024 | Trending News
Devendra Fadnavis On NCP Name And Symbol: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे. अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या राज्यामध्ये सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचा सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे राज्याची सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया अगदी 4 शब्दांमध्ये नोंदवल्या आहेत.
चार शब्दांमध्ये प्रतिक्रिया
“हा निर्णय अपेक्षित आहे,” या 4 मोजक्या शब्दांमध्ये फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. “गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली त्याकडे पाहिल्यास अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर 5 प्रकरणात घेतलेली भूमिका पाहा. आयोगाची सातत्याने अशीच भूमिका राहिलेली आहे. आलेला निर्णय अपेक्षितच आहे,” असं फडणवीस म्हणाले.
अपेक्षा आहे की…
“बहुमताचा जो निर्णय घेतो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो,” असंही फडणवीस म्हणाले. “पक्षाचे जे संविधानाचे किती पालन करण्यात आले हे खूप महत्त्वाचे असते. या सगळ्या गोष्टींचा उहापोह निर्णयात करण्यात आला आहे. मी अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असंही फडणवीस यांनी सांगितलं. “अपेक्षा आहे की, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदवली.
सगळ्या गोष्टींचा उहापोह
“बहुमताला महत्त्व आहेच पण नुसत्या बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही. सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. पार्टीचं संविधान काय होतं, त्याचं किती पालन करण्यात आलं, निवडणुका झाल्या की नाही, पार्टी कोणाची आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये झालेला आहे,” असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी ट्वीटरवरुनही यावर प्रतिक्रिया नोंदवली. “आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असं फडणवीस ट्वीटरवर म्हणाले.
“2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडलेला त्यांना आज लोकशाही काय असते हे त्यांना समजले,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 6, 2024 | Trending News
पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तहसूल कार्यालयात ठेवलेली EVM मशीन चोरीला गेली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 5, 2024 | Trending News
Ratnadurg Fort Ratnagiri Maharashtra : कोकणातील अथांग समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. याच कोकणात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळ देखील आहेत. यापैकीच एक आहे तो रत्नागिरी शहराजवळ असलेला रत्नदुर्ग किल्ला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. हा किल्ला पाहण्यासाठी नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी असते.
कुठे आहे रत्नदुर्ग किल्ला
रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना रत्नदुर्ग किल्ला हा मुख्य आकर्षण असते. हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे. किल्ल्यावरुन दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे किल्ला नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. 120 एकर क्षेत्रफळावर पसरलेला हा किल्ला अतिशय सुदंर आहे.
काय आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास
बहामनी राजवटीत बांधला गेलेला हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. यानंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाच्या ताब्यातून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. संभाजी राजेंनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले. त्यानंतरच्या काळात हा किल्ला करवीर छत्रपतींच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आंग्रे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.आंग्रे सोबतच्या युद्धात पेशव्यांनी हा किल्ला जिंकला पण शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अशी आहे किल्ल्याची रचना
किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 मीटर आणि रुंदी 1000 मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला “सिद्ध बुरुज” असे म्हणतात. किल्ल्याच्या परिसरात अनेक झाडे आहेत. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर देखील आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच असलेले भगवती देवीचे मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. बालेकिल्ल्याला 9 बुरुज आहेत. तर, संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे.
गुहेसारखा भुयारी मार्ग
किल्ल्यावर तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पर्यटकांसाठी बंद आहे. हा भुयारी मार्ग समुद्रात बाहेर पडतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेले गुहेसारखे भुयार स्पष्ट दिसते.
रत्नदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे
जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे. रत्नागिरी शहरातून रिक्षा पकडून थेट किल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याजवळ राहण्याची तसेच जेवणाची सोय नाही.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 5, 2024 | Trending News
आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळाले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 4, 2024 | Trending News
Vasai Crime News : एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने वसईत खळबळ उडाली आहे. हे तीनही मृतदेस संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
वसई पश्चिमेच्या उमेळमान येथील आशा सदन सोसायटीत राहणाऱ्या तीन जणांचा रहस्यमय मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत तिघेजण हे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात राहणारे असून, ते वसई परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील नागरिकांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बंद घराचा दरवाजा तोडला असता त्यांना तीन जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
मोहम्मद अझहम, राजू आणि चुटकाउ बाबू अशी या मयत इसमांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याचे गूढ अजून समजू शकलेले नाही पोलिसांनी केलेल्या तपासणीत सर्व मृतदेह दोन दिवसांपूर्वी मयत झाल्याचे समजत आहे. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक
नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात पूर्ववैमस्यातून धारदार शस्त्राने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. रिझवान शेख उर्फ सोनू व जंटेकम शेख अशी या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपिंनी पूर्ववयमस्यातून त्यांच्या ओळखीचा सलीम शेख याला प्रगतीनगर परिसरात कोयत्याने व सुऱ्याने हल्ला केला, यावेळी आरोपिंचा सलीम शेख याला संपविण्याचा डाव होता, मात्र सलीम या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याचा जीव वाचला आहे, तुळींज पोलिसांना याबाबतचीं तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना सापळा रचून अटक केली आहे.
ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा मृत्यू झालाय. गोंडपीपरी तालुक्यातून जाणाऱ्या अहेरी-चंद्रपूर मार्गावरील आक्सापूरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मृतक तिघेही गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यात असलेल्या कालीनगर येथील रहिवासी आहेत. अमृत सरकार (32), शैलेंद्र रॉय (63) आणि मनोज सरदार (43) अशी मृतांची नावं आहेत. दुपारी हे तिघेही २ दुचाकीने चंद्रपूरकडे निघाले होते. आक्सापूर येथील मंदिराजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. खनिज घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करत धावणाऱ्या वाहनांविरोधात सामान्य नागरिकात मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 4, 2024 | Trending News
Jitendra Awhad: राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विरोधी गटाकडून अनेकदा धमकी येत असते. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आव्हाडांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली. काय घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात एक फोन आला. या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. फोन करणाऱ्याने आपले नाव सांगितले नाही. रात्री अचानक आलेल्या या फोनबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. बॉम्ब असल्याच्या निनावी फोन मुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. त
ही घटना गांभीर्याने घेत बॉम्ब शोधक विभागाने तपासणी केली. पण या तपासणीत काहीही निष्पन्न झाले नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशा आशयाचे ट्विटदेखील त्यांनी केल होतं. दरम्यान फोन कॉल आल्याप्रमाणे काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती वर्तक नगर पोलिसांनी दिली.
जितेंद्र आव्हाड आणि कुटुंबियांना विनाकारण त्रास देण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा करत असल्याचे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान पोलीस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
आव्हाडांचे सूचक ट्वीट
2 फेब्रुवारी रोजी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट मुंबई पोलीस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले होते. यामध्ये ते आपल्याला मारण्याचे प्लानिंग सुरु असल्याचे सांगत होते. यावेळी त्यांनी फोटोदेखील दाखवला.या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ काॅलवर कुणाशी तरी बोलत होते, असे त्यांनी ट्वीटमध्ये दर्शविले आहे. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती, असे त्यांनी सांगितले. त्यांची चर्चा एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल ट्रायडंटमध्ये 19 व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्या हाती लागला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. या ट्विटच्या बरोबर 2 दिवसांनंतर बॉम्बचा फोन आल्याने यंत्रणा सजग होती.
Source link