Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे… हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल

Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे… हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल


Maharashtra Weather : भारतीय हवमानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात पावसाचा नवा टप्पा सुरु होण्याची चिन्हं आहेत. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये पावसाच्या सरीही बरसण्याची शक्यता आहे. 

तिथं कोकण किनारपट्टी, गोवा आणि लगतच्या दक्षिण भारत पट्ट्यामध्येही पावसाची हजेरी असेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये मात्र हवामान कोरडं राहणार असून, इथं किमान तापमानात काही 2 अंशांची घट पाहायला मिळू शकते. 

अचानक कुठून आला हा पाऊस? 

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार 16 नोव्हेंबरपर्यंत पश्चिम वायव्य दिशेकडे सरकणारा बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार आहे. याचे परिणाम मागील 24 तासांमध्ये केरळ, तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाले आहेत. येत्या काळातही या राज्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पावसाची वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळं अवकाळीचं सावट शंभर टक्के टळलं असं आता म्हणता येणार नाही. 

देशाच्या उत्तरेकडील राज्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान या भागांमध्ये सहसा सध्याच्या सुमारास कडाक्याची थंडी पडते. पण, अचानकच इथं किमान तापमानाच पाच अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. पण, केदारनाथ परिसर मात्र याला अपवाद ठरतोय, कारण इथं बर्फवृष्टी सुरुच आहे. राज्यातील उर्वरित भगामध्ये मात्र हवामान कोरडं आहे. 

हवामानाची स्थिती स्थिर राहिल्यास 16 नोव्हेंबरनंतर पश्चिम आणि उत्तर भारतात पुन्हा एकदा काही पर्वतीय भागांसह हिमाचल आणि उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसू शकतात. त्यामुळं तापमानातही काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं तुम्ही उत्तरेकडील राज्यांमध्ये जाणार असाल, तर काळजी घ्या. कारण इथं तुम्हाला कोणत्याही ऋतूचा सामना करावा लागू शकतो.  

 





Source link

एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक; असा सापडला पोलिसांच्या तावडीत

एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक; असा सापडला पोलिसांच्या तावडीत



अहमदनगरमधल्या MIDCच्या दोन अधिका-यांनी एक कोटीची कॅश लाच म्हणून घेतली होती. त्यातल्या एकाला बेड्या ठोकल्या होत्या. तर दुसरा पसार झाला होता. 



Source link

‘मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये…’; सेमी-फायलनमध्ये हारण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला

‘मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये…’; सेमी-फायलनमध्ये हारण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला



Viv Richards On Indian Semi Final : 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही जेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेला आणि पराभूत करण्यास अशक्य वाटणारा भारतीय संघ सेमीफायलनमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तर मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडला.



Source link

महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी


पुढील
बातमी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?





Source link

‘पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का’; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं

‘पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का’; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं


Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) देऊन त्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरली आहे. मनोज जरांगे यांनी या मागणीसाठी दोनवेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. मात्र सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. यावर आता मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कुणबी प्रमाणपत्रासह मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्यावर त्यांना आरक्षणाचा केवळ तीन ते साडेतीन टक्केच लाभ मिळणार आहे. त्याऐवजी मराठ्यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं 10 टक्के आरक्षण घ्यावं, असा सल्ला ओबीसी नेत्यांनी जरांगे यांना दिला आहे. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पिकत नाही ते वावर आम्हाला आणि स्वतःला चांगले ठेवता, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

“कायदा सांगतो की, मराठ्यांना मिळणारं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आहे. म्हणजेच मराठ्यांना 50 टक्के आरक्षण मिळेल. आता तुम्ही ईडब्ल्यूएसचा मुद्दा काढू नका. हवं तर ते आरक्षण तुम्ही घ्या आणि आम्हाला हे ओबीसी आरक्षण द्या. तुम्ही ते 10 टक्के आरक्षण घ्या आणि ओबीसी आरक्षण आम्हाला द्या. चांगलं वावर तुम्ही घेताय आणि डोंगराचं वावर आम्हाला देताय का? चांगलं काळं रान तुम्ही घेताय आणि ज्या वावरात औत चालत नाही ते आम्हाला देताय. आम्हाला वेडे समजता का? त्यापेक्षा वाटण्या करा आणि तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या,” असा सल्ला मनोज जरांगेंनी दिलाय.

“मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही, तसेच दिवाळीदेखील साजरी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मी दिवाळी साजरी करू शकत नाही. मी दोन दिवस आंतरवाली सराटी या माझ्या गावी जाणार. ज्या-ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार. त्यानंतर महाराष्ट्राचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार. मराठ्यांची एकजूट करण्यासाठी 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुन्हा मराठवाडा आणि मुंबई असा दौरा करणार आहोत. आंदोलकांच्या गाठीभेटी घेणं सुरू करणार. या काळात साखळी आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय.





Source link

फटाके फोडण्याची वेळ लक्षात ठेवा; मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन

फटाके फोडण्याची वेळ लक्षात ठेवा; मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन



दीपावलीचा मंगलमय सण सुरक्षितपणे साजरा करावा.  आगीसारख्या घटनेप्रसंगी मदतीसाठी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp