संकट विसरुन कुटुंबासोबत दिवस घालवावे लागतात; पवारांच्या विधानाचा अर्थ काय?

संकट विसरुन कुटुंबासोबत दिवस घालवावे लागतात; पवारांच्या विधानाचा अर्थ काय?


Ajit Pawar : पवार कुटुंबीयांची दिवाळी यंदा बारामती ऐवजी पुण्यात साजरी करण्यात आली. शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले होते.  यानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चा रंगलेय ती अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाची. 

राष्ट्रवादीत सध्या राजकीय उलथापालथींना वेग आलाय. डेंग्यूमुळे अनेक दिवस घराबाहेर न पडलेले अजित पवार शुक्रवारी अचानक शरद पवारांना भेटले. पवार कुटुंबाच्या पुण्यातल्या दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान अजित पवार-शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर अजित पवारांनी तातडीनं दिल्लीत जाऊन अमित शाहांचीही भेट घेतली. याचदरम्यान शरद पवारांचं एक विधान समोर आलंय, ज्यामुळे चर्चांना उधाण आलंय.. शरद पवारांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वेळप्रसंगी संकाटालाही तोंड द्यावं लागतं असं विधान पवारांनी केलं..

दरम्यान, अजित पवार हे शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मोठं विधान रवी राणांनी केले होते.  राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. त्यात शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली आणि पवारांनी संकटांचा उल्लेख करत सूचक विधान केलं.

अजित पवारांसोबत कौटुंबिक कार्यक्रमात झालेली भेट, त्यानंतर अजित पवार-अमित शहांची भेट आणि शेवटी शरद पवारांनी केलेलं सूचक विधान यामुळे पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरु झालीय.

काका पुतण्या एक होणार?

अजित पवार दिल्लीला जाण्यापूर्वी आज दुपारी पुण्यात पवार कुटुंब एकत्र आलं. पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची दिवाळी साजरी करण्यात आली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे दिवाळीसाठी एकत्र आले होते. सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एक होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय. 

पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट दिल्ली गाठली

काका-पुतण्याच्या या भेटीमुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट राजधानी दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीत नेमकं काय घडलं, त्यावरुन चर्चांना उधाण आलंय.

 





Source link

भाजपा पदाधिकाऱ्याची ढाब्यावर निर्घृण हत्या; आरोपींनी गाडी घेऊन पळ काढला पण…

भाजपा पदाधिकाऱ्याची ढाब्यावर निर्घृण हत्या; आरोपींनी गाडी घेऊन पळ काढला पण…



Nagpur Crime : नागपुरात ग्राम पंचायत निवडणुकीत निवडणून आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. अपघातानांतर आरोपींनी ढाब्यावरील पैसे घेऊन पळ काढला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.



Source link

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठून अमित शाहांची भेट का घेतली?

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठून अमित शाहांची भेट का घेतली?


पुढील
बातमी

पुण्यातील ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर निलंबीत





Source link

मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले…

मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले…


Nashik Crime : दिवाळीत तुम्ही चमचमीत पदार्थ बनवत असाल तर सावधान…कारण तुम्ही वापरत असलेले मसाले भेसळयुक्त (colored chili powder) असण्याची शक्यता आहे. कारण मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून भेसळ करणाऱ्या मसाल्यांचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. गुलशन-ए-मदिना नावाच्या बंगल्यात SEA-MA मसाले प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कारखाना सुरू होता. या कारखान्यात रंगांचा वापर करून तिखट आणि मसाले तयार करण्यात येत होते. कायद्यानं मसाले आणि तिखटासाठी रंग वापरण्यास बंदी आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर खाद्य रंग साठवण्यात आल्याचं आढळून आलं. तब्बल दोन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त मसाले या कारवाईत जप्त करण्यात आले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने खाद्य पदार्थांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी मालेगाव येथील सी- मा मसाले प्रॉडक्ट, गुलशन ए मदिना, मालदे शिवार येथे धाड टाकून सिंथेटीक रंगांचा समावेश असलेला लाखो रुपयांचा मिरची पावडरचा साठा आणि टीका मसाला जप्त केला आहे.

मिर्ची व मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी असूनही मालेगावात मिरची पावडर व टिका मसाल्यामध्ये सिंथेटीक रंग आढळून आला. या कारवाईत 24 हजार रुपये किमतीचा आठशे पाकिटे टिका फ्राय मसाला, कुठल्याही प्रकारचे लेबल नसलेली 1 लाख 61 हजार 400 रुपये किमतीची 538 किलो मिरची पावडर, साडेआठ किलो 740 रुपये किमतीचा सिंथेटीक रंगाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची एकूण किंमत ही 1 लाख 85 हजार 740 रुपये असल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान या प्रकरणी मसाल्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या विक्रेत्याची संशयास्पद हालचाल वाटत असल्याने बुधवारी सापळा रचला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मसाले खरेदी करताना काय खबरदारी घ्यावी?

सुट्टे विना पॅक मसाले खरेदी करू नका

एगमार्क किंवा जैविक भारत लोगो असलेल्या पॅकेजमध्येच मसाले खरेदी करा

पॅकेजवर छापलेले उत्पादन माहिती काळजीपूर्वक वाचा

विचित्र वास किंवा गडद रंग असलेले मसाले खरेदी करणे टाळा

लाल तिखटमध्ये कशी ओळखावी भेसळ?

मिरची पावडरच्या चवीमध्ये फरक झालेला आढळून येतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाकावी ही पावडर पाण्यात विरघळल्यास त्यामध्ये भेसळ असल्याचे कळते. लाल रंग वर तरंगल्यास भेसळ ओळखता येते. लाल मिरचीमध्ये भेसळ करण्यासाठी ब्रिकेट्स तालक किंवा मीठ पावडर, कृत्रिम रंग , ग्रिट वाळू लाकडू , भुसा, वाळलेल्या टोमॅटोच्या साली वापरल्या जातात. धणे पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी पेंढा किंवा जनावराचे शेण वापरले जाते.

आरोग्याला अपायकारक

दीर्घकाळ भेसळयुक्त मसाले सेवन करणाऱ्यांना पोटाचा समस्या निर्माण होऊ शकतात कर्करोग, उलट्या, जुलाब, अल्सर ,त्वचेचे विकार, न्यूरो टॉक्सी सीसीटी सारखा मोठा धोका वाढू शकतो.





Source link

कोल्हापुरात भीषण अपघात; वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली

कोल्हापुरात भीषण अपघात; वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली



Kolhapur Accident : कोल्हापुरात मुंबईच्या दिशेने जात असलेली बस पहाटेच्या सुमारास थेट नदीच्या पुलावरुन कोसळ्याने मोठा अपघात घडलाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह प्रशासनाने मदतकार्य सुरु केले.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp