'भाजपच्या दबावाला जेव्हा…', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

'भाजपच्या दबावाला जेव्हा…', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!


Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.

काय म्हणाले रोहित पवार?

आपल्याला अडचण ठरू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी सरकारे पाडणे, केंद्रीय यंत्रणा अथवा इतर मार्गाचा अवलंब भाजपकडून केला जातोय, परंतु ज्यांचा वैचारिक पाया भक्कम आहे, त्यांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणार्थ कुठल्याही दबावाला बळी न पडता भाजपसोबत संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे, असं रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

आज बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून बिहारची स्वाभिमानी जनता तेजस्वी यांच्यासोबत भक्कमपणे उभी राहील आणि तेजस्वी उद्या नक्कीच बिहारचा भरोसादायक चेहरा म्हणून पुढे येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

तेजस्वी यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. 243 जागांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 79 आमदार आहेत. त्यांना काँग्रेसचे 19 आमदार आणि 16 कम्युनिस्ट पक्षांचाही पाठिंबा आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव 2022 मध्ये एकत्र आले होते. तब्बल 17 महिने त्यांचं राजकीय समीकरण टिकलं.

दरम्यान, वेगवेगळ्या दबाव तंत्राचा वापर करून, व्यापाऱ्यांना धमकावून मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांना सुरतमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडलं पण शेवटी पदरात काय पडलं? मुंबई हे नैसर्गिक व्यापार केंद्र आहे. जागतिक व्यापाराला पूरक असं वातावरण मुंबईत आहे, त्यामुळे केवळ मोठमोठ्या बिल्डींग उभारून मुंबईचा व्यापार स्थलांतरीत करण्याचे मनसुबे देशाच्या हिताचे नाहीत. हे असले मनसुबे रचणाऱ्यांनी आणि त्यांना साथ देण्यासाठी मूग गिळून गप्प बसणाऱ्या महाराष्ट्र धर्म विरोधी गद्दारांनी लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.





Source link

Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त…', अजित पवारांवर खोचक टीका!

Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त…', अजित पवारांवर खोचक टीका!


Jitendra Awhad On Rohan Bopanna : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धमाकेदार विजय मिळवत रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. गुडघ्याचं दुखणं, सावरत्या वयामुळे रोहन बोलन्ना जिंकेल की नाही? यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, त्याने करून दाखवलं अन् ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीचं सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. अशातच आता  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्ना याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्नाला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते याचं उदाहरण त्याने दिलंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.  

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन..! रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांनी वय बघून आता राजकारणातून संन्यास घ्यावा असं अजित पवार यांनी वेळोवेळी बोलून दाखवलंय. मात्र, शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षीही राजकारणात सक्रीय आहेत. गेल्या 4 दशकाहून अधिक त्यांची राजकीय कारकीर्द राहिलीये. त्यामुळे  काही नेते वयस्कर झाले तरी बाजूला होत नाहीत, तरूणांना संधी देत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी ताजं उदाहरण देऊन अजित पवारांवर निशाणा साधलाय.





Source link

Delhi Crime : दिल्लीमध्ये 'मुळशी पॅटर्न', भर बाजारात तरुणाची हत्या, CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ!

Delhi Crime : दिल्लीमध्ये 'मुळशी पॅटर्न', भर बाजारात तरुणाची हत्या, CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ!


Youth chased shot In Delhi : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीत पुण्यासारखा मुळशी पॅटर्न पहायला मिळतोय. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क (Shastri Park) परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नेमकं काय झालं? 

नॉर्थ ईस्ट दिल्लीमधील शास्त्री पार्कमधील बाजारात ही घटना घडली. झालं असं की, नेहमीप्रमाणे व्यापारी आपला व्यवसाय करत होते. तेव्हा बाजारात काहीतरी गोंधळ सुरू असल्याचं लोकांना कळालं. सर्वत्र गोंधळाचा आवाज येऊ लागला. एक मुलगा बाजाराच्या रस्त्यावरून पळत होता. तर त्याच्या मागे काही तरुण पोरं पळत होते. काहींच्या हातात चाकू होता तर काहींच्या हातात चक्क देशी पिस्तुलं होती. तर दोन पोरं गाडीवरून तरुणाचा पाठलाग करत होते.

काही अंतरावर आरोपींनी तरुणाला अडवलं अन् त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी तरुणाला धु धु धुडतं… एवढंच नाही तर गोळी देखील चालवली. त्यानंतर देखील नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपींचं मन भरलं नाही. त्यांनी तरुणावर चाकूचे वार केले अन् घटनास्थळावरून पळ काढला. 

तरुणावर हल्ला होत असताना आपसापच्या व्यापाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यांनी आपपालं दुकान आटोपून बंद केले. आरोपींनी पळ काढल्यानंतर देखील तरुणासमोर कोणीही जाण्याचं धाडस केलं नाही. काही वेळाने पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीच तरुणाला रुग्णालयात हलवलं. सध्या तरुण जगण्यासाठी झुंज देत आहे.

दरम्यान, नवी दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक आयुक्ताच्या मुलाचं किडनॅपिंग केलं गेलं होतं आणि त्यानंतर 23 जानेवारी रोजी मुलाला कालव्यात ढकलून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्ष्य हा दिल्ली पोलिसातील एसीपी यशपाल सिंग यांचा मुलगा होता. लक्ष्य यांचं मित्रासोबत पैशावरून वाद झाल्यानं त्याच्या मित्रानं अपहरन करून हत्या केल्याचे समोर आलंय.





Source link

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?


Meaning Of SageSoyare : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. ‘आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ’, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलंय. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच सगेसोरये म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

मनोज जरांगे यांनी सगेसोयरे या शब्दाची व्याख्याही पत्रकार परिषदेत वाचून दाखवली होती. मराठा समाजाच्या नजरेत सगेसोयरे यांची व्याख्या नेमकी आहे तरी काय? यावर जरांगे यांनी उत्तर दिलं होतं. समाजातील सगेसोयरे व्याख्येनुसार, सर्वांना आरक्षण प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

‘सगेसोयरे’ची व्याख्या काय पाहुया…

मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार गणगोतात, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी जरांगे यांची आहे. आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाचे नातेवाईक विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागात आहेत. ज्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून आधीपासून दाखल आहेत. त्यामुळे सरकारने आश्वासन देताना ‘रक्तातील सगेसोयरे’ हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावं.

पहिल्यांदा सरकारने आमची मागणी मान्य केली होती. मात्र, आता त्यांनी मागे हटू नये. सरकारने आमची ही व्याख्या घेतली नाही. त्यात फक्त पितृसत्ताक टाकलं, मग आम्ही म्हटलं मातृसत्ताकही टाका.. मात्र, त्यांनी अजून आमची मागणी मान्य केली नाही, असं जरांगे यांनी म्हटलं होतं.

मराठा समाजातील महिलांच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील सासरच्या आधारावर कुणबी दाखला मिळवा. मातृसत्ताक पद्धत म्हणत असाल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या, अशी मागणी जरांगे यांची आहे. पण सरसकट पद्धतीने जर वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली जाऊ शकत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र  लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.





Source link

शिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती

शिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती


आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेना शहराध्यक्षाच्या हत्येने खळबळ उडाली होती. शिवा वझरकर नावाच्या उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक केली आहे. शिवा वझरकरच्या हत्यनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवा वझरकरच्या समर्थकांनी या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.

चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. शिवा वझरकरची गुरुवारी संध्याकाळी चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयाजवळ शिवा वझरकरचा मृतदेह आढळला होता. मृतक वझरकर आणि तीन आरोपी यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक कारणावरून धुसफूस सुरु होती. त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

गुरुवारी संध्याकाळी शिवा वझरकर याला तिन्ही आरोपींनी भेटायला बोलावलं आणि त्याची हत्या केली. चाकूने पोटात सपासप वार करत आरोपींनी शिवाची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. त्यानतंर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, शिवा वझरकर समर्थकांनी हत्येनंतर याभागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून व्यक्त संताप केला.

पोलिसांनी हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या उबाठा गटाच्या तीन कार्यकर्त्याना अटक केली. पोलिसांनी रात्रीच कारवाई करत तिघांना जेरबंद केलं. रामनगर पोलीस आता या हत्या प्रकरणातील दुवे उकलत आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

‘काल रात्री साडेआठच्या दरम्यान शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. शिवा वझरकर आणि कुमरे यांच्यात भांडण झालं होतं. हिमांशू कुमरे याने चाकूने भोकसून शिवा वझरकरची हत्या केली. त्यामध्ये इतर साथीदारांनी सहभाग घेतला,’ अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली.





Source link

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री



मल्लखांब पितामह अशी ओळख असणा-या उदय देशपांडेंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेय. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp