पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'


लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. तर काही सर्वेक्षण करणाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे समोर आलं आहे. 

राज्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी या वेळेत पूर्ण करायचं आहे. सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी महसूल विभागासह महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरातील सर्वेक्षणासाठी 816 कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले आहेत. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले मोठ्या प्रमाणात प्रगणक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशिक्षित आहेत. या कर्मचाऱ्यांना वाचता तसेच स्मार्टफोन हाताळता येत नसल्याचे समोर आलं आहे.

त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भांबेरी उडाली आहे. नगर शहरातील सर्वेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रगनक असलेला कर्मचारी आपल्याला सर्वेक्षण करतात येत नसल्याचं सांगत असून आपण इलेक्ट्रॉनिक मदतनीस असल्याचे सांगत आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून मराठा सर्वेक्षणाबाबत सुरू असलेला सावळा गोंधळ या व्हायरल व्हिडिओ मुळे समोर आला आहे.

याबाबत विचारले असता कर्मचाऱ्याने ‘मला यातलं काही कळत नाही. मी पालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून काम पाहतो. मोबाईल हाताळता येत नाही. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मला यातलं कळत नाही. त्यांनी हे माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचं बघा, जोडीदार घ्या आणि कसेही काम पूर्ण करा असे सांगितलं,’ असं म्हटलं आहे.

मराठा आरक्षण सर्व्हेच्या APPमध्ये असंख्य अडचणी

वाशिम शहरात मराठा कुटुंबाचा सर्व्हे काल पासून सुरू झाला मात्र अॅपमध्ये असंख्य अडचणी येत असून एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. त्यामुळं सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत सर्व्हे पूर्ण होणे अशक्य असल्याचं सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा सर्व्हे सुरू झाल्यानंतर त्यामध्ये वाशिम शहराचे नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाशिम शहरात दुसऱ्या दिवशी सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेत 182 प्रश्न असून आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रश्न विचारून माहिती भरली जात आहे.

सर्वेक्षणासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात नागरिकांचा आक्षेप.

कोल्हापुरात सर्वेक्षणामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत मराठा समाजातील नागरिक आक्षेप घेतला जात आहे. माजी नगरसेवक विजय साळुंखे सरदार यांनी मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी जे सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे त्यातील प्रश्नांवर आक्षेप नोंदवला आहे. शासन असे प्रश्न विचारून आमची मराठा समाजाची अब्रू काढत आहे. मराठा नेतेच आता मतासाठी भिकारी झाले आहे, विजय साळुंखे यांनी म्हटलं आहे.





Source link

BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक

BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक


पुढील
बातमी

कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर





Source link

Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल


पुढील
बातमी

सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर ‘बुलडोझर’! मुंबईत योगी स्टाइल कारवाई





Source link

…म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

…म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य


Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.  नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा का दिला याचा खुलासा केला आहे. तसेच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला (maharashtra politics). 

शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा

नाशिकमध्येही  शूर्पनखेला श्रीरामांनी इथेच  ठार  केले  होते.  जेव्हा  त्यांना 14  हजार  राक्षस मारायला  आले  होते तेव्हा  त्यांचा  वध  इथेच  करण्यात  आला. अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आणि पंचवटी ही पराक्रमभूमी आहे. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना नाही. शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे,  शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही

राम मंदिर बनविण्यासाठी, 370 कलम काढण्यासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्येकवेळी भाजपला पाठिंबा दिला. ईडी, सीबीआय, आयटी हे तुमचे घरगडी आहेत. आमच्या निर्दोष शिवसैनिकांच्या घरावर धाडी घालतायत. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही. हे सत्तेत असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ असेल तर खुर्ची सोडून द्या, आम्ही सक्षम आहोत.

दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं? 

महाराष्ट्र्र संकटात असताना मोदीजी कुठे होते? आता फक्त मतांसाठी येत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही. मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. देश के लिए ‘मन की बात’ आणि गुजरात के लिए ‘धन की बात’! ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा. पंतप्रधान मोदी देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. हे हिंदुत्व नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलंय?  संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं, त्या महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालताय? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. 

ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघाले

मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय? ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघालायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 





Source link

Balasaheb Thackeray Birth Anniversary : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Balasaheb Thackeray Birth Anniversary : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल


Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात (Balasaheb Thackeray 98 th Birth Anniversary) आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया…

ठाकरे नव्हे धोडपकर

ठाकरे कुटूंबाचं मुळ आडनाव धोडपकर होतं. प्रबोधनकार ठाकरे यांचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर हे रायगडमध्ये वास्तव्यास होते. मात्र, त्यांच्या पुत्रांनी म्हणजेच रामचंद्र धोडपकर यांनी आडनाव बदलून पनवेलकर केलं. रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये स्थाईक झाल्याने त्यांनी आडनाव बदललं. प्रबोधनकारांना (केशव सिताराम ठाकरे) वाचनाची आवड होती. ब्रिटीश लेखक विल्यम मेकपीस थॅकरे यांचा प्रभाव प्रबोधनकारांवर पडला. त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव पनवेलकर न ठेवता ठाकरे केलं.

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांना एकूण आठ अपत्ये… त्यात 3 मुलगे आणि 5 मुली… बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे अशी त्यांच्या मुलांची नावं. बाळासाहेब ठाकरे 21 वर्षांचे असताना त्यांनी सरला वैद्य यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर सरला सासरी येऊन मिनाताई झाल्या. रमेश ठाकरे यांनी लग्न केलं नाही. तर श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे सध्या राजकारणात आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताईंना तीन मुलं… सगळ्यात थोरले बिंदुमाधव ठाकरे, दुसऱ्या नंबरचे जयदेव ठाकरे आणि धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे… 

बिंदुमाधव ठाकरे

बिंदुमाधव ठाकरे यांचा राजकारणाचा जास्त काही संबंध आला नाही. त्यांनी स्वत:ची व्हिडिओ कंपनी सुरू केली होती आणि नंतर फीचर फिल्म्सच्या निर्मितीकडे वळले. मात्र, 1996 मध्ये लोणावळा इथं त्यांचा अकाली मृत्यू झाला होता. मग त्यानंतर त्यांचं कुटुंब ‘मातोश्री’ हे ठाकरेंचं निवासस्थान सोडून बाहेर पडलं. बिंदुमाधव यांना दोन मुलं आहेत. निहार ठाकरे असं मुलाचं नाव आहे. तर नेहा ठाकरे असं मुलीचं नाव… निहार ठाकरे यांचा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या लेकीशी (अंकिता पाटील) विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. तर नेहा ठाकरे यांचं विवाह डॉ. मनन ठक्कर यांच्याशी झाला.

जयदेव ठाकरे

जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे थोरले बंधू… बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद उफाळून आला होता. जयदेव ठाकरेंची तीन लग्न झाली. पहिल्या पत्नीचं नाव जयश्री ठाकरे. जयदेव आणि जयश्री यांना एक जयदीप नावाचा मुलगा आहे. जयदीप हे आर्ट डिरेक्टर आणि ग्राफीक्स डिझायनर आहेत. तर दूसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहूल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. तर तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून माधुरी नावाची मुलगी आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बरी नसताना उद्धव ठाकरेंकडून त्यांची दिशाभूल केली, असा आरोप जयदेव ठाकरे यांनी केला होता. बाळासाहेबांनी माझ्याजवळ त्यांनी मन मोकळं केलं होतं पण मी आत्ता बोलू शकत नाही कारण बोललो तर त्यावरून प्रचंड मोठा गदारोळ होईल, असं जयदेव ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे

बाळासाहेबांचे तिसरे पुत्र उद्धव ठाकरे यांनी 1989 मध्ये रश्मी ठाकरे यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन पुत्र आहेत. मोठा मुलगा आदित्य ठाकरे आणि दुसरा मुलगा तेजस ठाकरे… आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तेजस ठाकरे राजकारणात येणार अशी चर्चा नेहमी होते. मात्र, त्यांनी कधी रस दाखवला नाही. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर तेजस ठाकरे राजकीय मंचावर दिसू लागले आहेत. मुलगा तेजस हे वन्यजीव अभ्यासक म्हणजेच वाईल्डलाईफ रिसर्चर आहेत. नुकताच त्यांनी सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावला होता.

श्रीकांत ठाकरे 

बाळासाहेब ठाकरे यांचे धाडके बंधू श्रीकांत ठाकरे यांना कुंदा ठाकरे यांच्याशी विवाह झाला. श्रीकांत आणि कुंदा यांना दोन मुलं… एकाचं नाव राज ठाकरे (स्वरराज ठाकरे) आणि दुसऱ्या मुलीचं नाव जयवंती ठाकरे… राज ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला माहित आहेतच… राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला ठाकरे यांच्याशी झाला. त्यांना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे अशी दोन मुलं आहेत. उर्वशी ठाकरे फॅशन डिझायनर आहेत. तर राजपुत्र अमित ठाकरे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेंना मागील वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती, त्याचं नाव ‘किआन’.





Source link

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा


Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ram Pran Pratishtha) करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पदडा हटवण्यात आला आणि रामलल्लाचं सुंदर दर्शन जगाला झालं. 

ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या (Ayodhya) राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी बाल रामाची मूर्ती अख्ख्या जगानं पाहिली. रामलल्लाला हिरेजडित मुकूट घालण्यात आलंय…कपाळी टिळा, हातात धनुष्यबाण, आभूषणांनी सजवण्यात आलंय. चेहऱ्यावर स्मित हास्य, कमलनयन, कानात कुंडलं, गळ्यात रत्नजडित हार घालण्यात आलाय…यामुळेच रामल्लाची मूर्ती सुंदर, मनमोहक, तेजस्वी रुपात दिसतेय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली… विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं.  रामलल्लाला आता तंबूत राहावं लागणार नाही, अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अयोध्यावासियांनी शेकडो वर्ष विरह सहन केला असं सांगत त्यांनी अयोध्यावासियांचंही कौतुक केलं. 22 जानेवारी ही तारीख नाही तर कालचक्राचा उगम आहे असंही मोदींनी म्हंटलंय.

सीएम शिंदेंनी ढोल वाजत केला आनंद
अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सहकाऱ्यांसोबत एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय श्रीरामचा जयघोष केला. त्यानंतर ढोल वाजवून शिंदेंनी शिवसैनिकांसोबत आपला आनंद साजरा केला..

देवेंद्र फडणवीस नागपूरात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरातल्या रामनगर इथल्या राममंदीर परिसरातून अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहीला. श्रीरामाच्या मूर्तीवरचा पडदा दूर होताच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया खुपच बोलकी होती. मूर्ती अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी उपस्थितांसमोर बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत.. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतल्या राम मंदिरात करण्यात आली..  मूर्ती स्थापनेनंतर राम दर्शनाची ओढ आहे. ही ओढ फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार असल्याचं फडणीस म्हणालेत. त्यामुळे येत्या फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीराम पालखीमध्ये सहभाग घेतला. डीजेच्या तालावर ठेका धरत गुलाबरावांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद लुटला. देशभरात सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्याचे मंत्री देखील या उत्सवात सहभागी झाले.

रामभक्तांच्या राहण्याची सोय
अयोध्येत जाणा-या रामभक्तांसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे राहण्याची सोय केली जाईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलीय.. राज्य सरकार लवकरच अयोध्येत धर्मशाळा आणि भक्त निवास बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं… अयोध्येतील मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नार्वेकरांनी कुलाब्यातील राममंदिरात साजरा केला. यावेळी ते रामभजनांमध्ये तल्लीन झाले होते. लवकरच आपण रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp