33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम

33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम


Ram Mandir Inauguration: मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

दीपोत्सवाचे जगभरातील लाखो रामभक्त साक्षीदार ठरले. पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाच्या शशी लखन, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान केवट भोई समाजाच्या आशा दाते,  तिसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मुस्लिम समाजाच्या चांद पाशा सय्यद, चौथी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान अनुसूचित जातीच्या प्रियंका थुल, पाचवी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आदिवासी समाजाच्या गीता गेडाम तर सहावी रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा यांना मिळाला. तसेच सौ. सपना मुनगंटीवार, शलाका बिडवई यांनीही ज्योत पेटवली. त्यानंतर राम सेविकांमार्फत संपूर्ण ज्योती पेटविण्यात आल्या.

हा नयनरम्य सोहळा साजरा होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांचे कौतुक केले. ‘अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी 29 मार्च 2023 रोजी चंद्रपूर-गडचिरोलीच्या दंडकारण्यातून अतिशय पवित्र भावनेने सागवान काष्ठ पाठविण्यात आले. त्या काष्ठापासून प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाच्या महाद्वाराचे अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाच्या नावामध्ये चंद्रपूरचा चंद्र देखील आहे. प्रभू राम देशाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे विश्वविक्रमी रामज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रामज्योत सेवेची व भक्तीची आहे,’ अशा उत्स्फूर्त भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

‘सियावर रामचंद्र की जय’ या 11 अक्षरी मंत्राच्या दीपप्रज्वलनाचे फोटो व व्हिडिओ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या लंडन कार्यालयाला तसेच १८० देशांमध्ये पाठविले जाणार आहेत, अशी माहिती गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे श्री. मिलिंद वेर्लेकर यांनी दिली.

देशभरातून चंद्रपूरकरांचे अभिनंदन – ना. सुधीर मुनगंटीवार

रामभक्तीचा विश्वविक्रम केल्यामुळे जगात चंद्रपूरचा गौरव वाढला आहे. आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत देशभरातील केंद्राचे प्रतिनिधी, महामंत्री, राज्याचे अध्यक्ष, प्रमुख, 21 खासदारांच्या बैठकीत सर्वांत पहिले एकमताने चंद्रपूरच्या अभिनंदनचा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

‘अयोध्येच्या वर्तमानपत्रात चंद्रपूरच्या सागवान काष्ठाचे कौतुक करण्यात आले आहे. मी कारसेवेला गेलो होते तेव्हाच्या सर्व घटना आजही आठवतात. त्यामुळे आज प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान आहे. आता पुढच्या टप्प्यात रामभक्तीचा विश्वविक्रम करणाऱ्या 1350 रामभक्तांना अयोध्येला नेण्याचा संकल्प केला आहे,’ असेही ते म्हणाले.

भवानी मातेची पालखी अन् श्रीशैलमचे मंदिर

 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे सरकार ब्रिटनवरून भारतात येणार आहेत. जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार पकडलेल्‍या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले. आता शत्रूची वाकडी नजर भारतावर पडणार नाही, याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरातील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय अध्यक्ष राजेश्वर सुरावार, डॉ. तन्मय बीडवाई, पवन गादेवार, मिलिंद वेरलेकर, प्रसाद कुलकर्णी, पवन गादेवार, मधुसूदन रुंगठा, शैलेंद्र शुक्ला, अशोक संगिडवार, डॉ. गुलवाडे, प्रमोद कडू, राखी कंचर्लावार, रोडमल गहलोत, शैलेश बागला, मधुसूदन रूंगठा, चमकोरसिंह बसेरा, मीना देशकर, गिरिश मारलीवार, अन्नाजी ढवस, विनोद तिवारी, प्रभाकर खड़के,  कुशन नागोसे, स्मिता रेवनकर, चंदाताई इटनकार, दामोदर सारडा, राजीव गोलीवार आदींची उपस्थिती होती.





Source link

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर


उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.

सिंधुदुर्गातील शिराळेच्या गावपळणीला सुरुवात 450 वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. गावपळणी दरम्यान शिराळेवासीय पाळीव प्राण्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी राहुट्यामध्ये विसावले आहेत.देवाला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावाबाहेर सर्व लोक बाहेर पडतात. तसेच गावभरणीच्या वेळी सुद्धा देवाला कौल लावूनच गाव भरणी केली जाते.देव गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. तळकोकणात काही ठराविक गावात गावपळणीची प्रथा आहे.मात्र दरवर्षी होणारी ही एकमेव गावपळण.

या शिराळे गावातील ही दृष्य पाहिली की वाटेल की गावात घरे आहेत पण माणसे कुठे दिसत नाही. गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि पाच दिवस गावात कोणी माणूस थांबत नाही असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात. तसेच जनावरे पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे ढोरे,सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागते. गावात शाळा सुद्धा पाच दिवस भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते. त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते.

या गावपळनीसाठी चाकरमानी, माहेरवशनी ही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. ही गावपळनीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात. दरम्यान, महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवण आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल जर म्हटलं तर श्रद्धा नाहीतर अंधश्रद्धा होऊ शकते.

ही वाडवडिलांनी सुरु केलेली 450 वर्षांची परंपरा आहे. मंदिरात जाऊन कौल प्रसाद घेतल्यानंतर आम्ही सीमेच्या बाहेर येतो. इथे झोपडी बनवून पाच दिवस राहतो. काही पाळीव प्राणी, जनावर असेल तर त्यांनाही सोबत घेऊन येतो. इथे पाच दिवस झाल्याशिवाय परत जात नाही, असे इथल्या ग्रामस्थाने सांगितले.





Source link

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द



उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.



Source link

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात…'

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात…'


Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी नोटीस पाठवली आहे. ईडीने आमदार रोहित पवार यांना 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांच्यासह मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून सातत्याने हल्लाबोल केला जात असताना आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप होत असतानाच या दोघांनाही समन्स प्राप्त झालं आहे. रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे संचालक असून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. तपासात ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरात बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संजय राऊत, अनेक देशमुख  यांनासुद्धा ईडीची नोटीस आली आली आहे. अनिल देशमुख सहा महिने तुरुंगात राहिले आहे. ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. मलाही ईडीची नोटीस झाली होती. रोहित पवार यांना नोटीस आली असेल. पण चिंता करायची कारण नाही,” असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

या नोटीसीनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल,” असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारीसाठी समन्स बजावले आहे. बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांना यापूर्वीच वेगवेगळ्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांकडून नोटिसा आल्या आहेत.





Source link

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा


Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे. 

रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं (Raktachandan). .महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभागही 24 तास अलर्ट असतो. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिदुर्मिळ झाडासाठी चोख सुरक्षा आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी
रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात (Intenation Market) अतिशय महत्त्व आहे. बाजारामध्ये जवळपास 5 ते सहा हजार रूपये किलो दरानं रक्तचंदनाची विक्री होते. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः चीनमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे.. उंची दारू, आयुर्वेदिक औषधं, मूर्तींसाठी रक्तचंदनाचा वापर होतो. तसंच सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा वापर केला जात असल्याची माहिती आयुर्वेदात आढळते. त्यामुळेच या झाडाला कोट्यवधी रुपयांची किंमत असते. 

कोकणात हे झाड आलं कसं
कोकणच्या देवराईत दीडशे वर्षांचं हे झाड डौलात उभं आहे. पण इथे हे रक्तचंदनाचं झाड आलं कसं याची माहिती कोणाकडेच नाही.  जंगलात खोलवर ही झाडं सापडतात. रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. 

खूप वर्षांपूर्वी कोकणातला कातकरी समाज जंगलात जायचा. त्यांच्या बैलाची प्रकृती बिघडली की हा समाज या झाडाची साल उगाळून बैलाला देत असतं, त्यानंतर बैल ठणठणीत होत असल्याने हे झाड औषधी आहे अशी ख्याती कोकणात पसरली. हे झाड तोडण्याचाही प्रयत्न झाला. पण हे झाड औषधी आणि दुर्मिळ असल्याने तोडायचं नाही असा निर्णय एकमुखाने घेतला गेल्याचं इथले गावकरी सांगतात. काही अभ्यासकांनी यावर अभ्यास करत हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं सांगितलं. पण हे झाड कुणी लावलं, इथं कसं आलं याची काहीच माहिती नाही, पक्षाच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांच्या काळात हे झाड लावलं गेलं असावं असा अंदाज असल्याचं गावकरी सांगतात. 

झाडाला 24 तास सुरक्षा
झाडाची ख्याती पसरल्यानतंर हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर पोलीस, गावकरी आणि महसुलविभागामार्फेत ठराविक अंतराने या ठिकाणी गस्त घातली जाते. महसुल विभागाचं या झाडावर विशेष लक्ष असतं. 





Source link

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित


पुढील
बातमी

PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण





Source link

YouTube
Instagram
WhatsApp