Message of the dying crabs


For those who have enjoyed the Discovery Channel show Deadliest Catch, (309 episodes and counting), which follows the lives and fortunes of fishermen who scour the Berring Sea, off Alaskan coast, for snow crabs, there is bad news. The snow crabs, an iconic species, are disappearing.

According to a study published in Science, between 2018 and 2021, some 10 billion snow crabs disappeared; revenues from snow crabs, which averaged about $150 million, fell to $24 million in the 2021-22 crabbing season.

Why? Marine heat waves, caused by global warming.

Snow crabs like it nice and cold; they live in waters that are about 20 C, though they can stay alive even up to 120 C. It was not the heat that killed the crabs, the study says, but the warming waters triggered off a chain of ecological events that resulted in not enough food for the crabs, causing them to starve to death.

“Calculated caloric requirements, reduced spatial distribution, and observed body conditions suggest that starvation played a role in the collapse. The mortality event appears to be one of the largest reported losses of motile marine macrofauna to marine heatwaves globally,” the scientists say.

With the next round of international climate negotiations (COP28) approaching, these findings should serve as a sharp reminder for urgent action.





Source link

धारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने


Sharad Pawar Support Gautam Adani :  गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अदानींना धारावी गिळू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. येत्या दोन तीन दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांच्या मनातली शंका समजून घेणार असल्याचं विधान शरद पवारांनी केले आहे.

शरद पवार गौतम अदानी यांच्या मदतीला आले धावून

पवार आणि अदानी मैत्रीचं नातं सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अदानी आणि पवारांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. अशात उद्धव ठाकरेंनी धारावी गिळू देणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली.मात्र पवारांनी त्यावर घेतलेल्या भूमिकेनं पवार पुन्हा अदानींच्या मदतीला धावल्याचं बोललं जातंय. 

गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार पाहायला मिळाले. गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उदघाटनाचा फोटो शरद पवारांनी ट्विट केलाय.  गुजरातमध्ये गौतम अदानींनी नवा पॉवरप्लँट सुरू केलाय. याच पॉवरप्लांटचं उदघाटन पवारांनी केलंय. 

धारावीचा पुनर्विकास  अदानी समूह करणार

आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास अखेर अदानी समूह करणार आहे. राज्य सरकारने धारावीच्या पुनर्विकासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तेव्हा धारावीच्या साडे सहा लाख झोपडीधारकांचं आता येत्या 7 वर्षात पुनर्वसन करण्यात येणार आहे.. यासाठी 20 हजार कोटींची बोली अदानी समूहाने लावली होती. 

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.  जिथं प्रशासक आहेत, तिथं घोटाळे सुरू आहेत, असं ते म्हणाले. एका कंत्राटदाराला टर्मिनेशनची नोटीस देण्यात आलीय. त्याच्यावर कारवाई होणार की खोके घेऊन कारवाई थांबवणार, असा सवाल ठाकरेंनी केला. मोठा गाजावाजा करून नारळ फोडला. मात्र, मुंबईतील तब्बल २५०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत, असं ते म्हणाले.

 





Source link

मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा


Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचा लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं, सरकारने मजा पाहू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू होणार असून, गावागावात आमरण उपोषण (Hunger Strike) केलं जाणार आहे. आमरण उपोषणात कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार असेल असं जरांगे म्हणालेयत. तर आरक्षणासाठी मराठा आमदार, खासदारांनी एकत्र यावं. समाजासाठी आमदार, खासदार मंत्री एकत्र येणार नाहीत त्यांना गावबंदी केली जाईल, बाहेर फिरूही देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.

आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या
एकीकडे आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Marahta Reservation) तरुणांच्या आत्महत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीए. बीडच्या अंबाजोगाईच्या गिरवली गावाक मराठा आरक्षणासाठी 42 वर्षीय व्यक्तीने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडला. या तरुणाच्या आत्महत्यनेतंर मराठा समाज आक्रमक झाला, मृतदेह छत्रपती शिवाजी चौकात ठेऊन मराठा समाजाने आंदोलन केलं. 

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली इथं एका 42 वर्षांच्या व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मराठा समाजाने त्या व्यक्तीचा मृतदेह अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवला आणि आंदोलन सुरु केलं.  मृत तरुणाचं नाव शत्रुघ्न काशीद असं होतं. मराठा आरक्षणासाठी शत्रुघ्न पाण्याच्या टीकावर चढले. पोलसांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. पण शत्रुघ्न यांनी पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत शत्रघ्न यांनी पाण्याच्या टाकीवरुन थेट खाली उडली मारली. यात शत्रुघ्न यांचा जागीच मृत्यू झाला.

शत्रुघ्न काशीद यांनी आत्महत्या केल्यानंतर गावातील मराठा समाज आक्रमक झाला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. शत्रुघ्न काशीद यांच्या पश्चात आईृ-वडिल, पत्नी आणि दोन मुलं आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काशीद यांचा सक्रीय सहभाग होता. 

चोवीस तासात दुसरी आत्महत्या
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी चोवीस तासात आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.  श्री क्षेत्र आळंदी इथल्या इंद्रायणी नदीत मराठा सेवकाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती.  व्यंकट नरशिंग ढोपरे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. लातूर जिल्ह्यातील उंबरदरा गावचे ते माजी सरपंच होते. सध्या पुणे जिल्ह्यातील नरे आंबेगाव इथं वास्तव्यास होते. इंद्रायणी नदीत उडी मारल्याची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री आठ वाजल्यापासून पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरु केली. आज दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. 





Source link

मुंबईतील ‘या’ विभागात पाणी पुरवठा बंद; जलवाहिनी दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम


Mumbai Water Shortage : मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी  के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे. 

 के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गा वरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटी जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे  नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम,  वेरावली जलाशय १ व २ चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुमारे १५ तास के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण  विभागातील खालील नमूद परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

१) के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर,जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राउत रस्ता , पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग , साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग , श्रद्धानंद  मार्ग , नेहरू  मार्ग , तेजपाल  मार्ग , शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व , अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग , मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग , पारसी पंचायत मार्ग , आर. के. सिंग रस्ता , निकोलसवाडी परिसर. 

२) के पश्चिम विभाग – जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग , सहकार मार्ग , बांदिवली हिल.  

३) पी दक्षिण –  राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा) 

पाणी पुरवठा वेळेत बदल 

के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.





Source link

मराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव, तर नांदेडमध्ये खासदाराच्या गाड्या फोडल्या



Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला तर नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्या. हिंगोलीत माजी सहकारमंत्र्यांना गावबंदी करण्यात आली.



Source link

शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा ‘तो’ Video


Maharastra Politics : शिर्डीतील (Shirdi) जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. माजी कृषीमंत्री राहिलेल्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी (Narendra Modi) केली. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला.

पंतप्रधान मोदी राष्ट्र बळकटीचं काम करत आहेत. म्हणून विकासाचा हाच धागा पकडून आपण भाजसोबत गेल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. शिर्डीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मोदींचं कौतूक केलं. मात्र, मोदींनी अजित पवारांसमोर काका शरद पवार यांना टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात (Mahrastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.

किती हा विरोधाभास, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं जयंत पाटील म्हणतात.

पाहा Video

2024 मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. मोदी पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं शिंदेंनी शिर्डीतील जाहीर सभेत बोलताना सांगितलं. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. कितीही लोकं एकत्र आले तरी इंडिया आघाडी मोदींचं काहीच बिघडवू शकत नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.

आणखी वाचा – Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची लवकरच सुटका होणार आहे. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेच आज पंतप्रधानांकडून लोकार्पण होणार आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp